फळ

कोणती फळं व कोणत्या भाज्या वात वाढवतात?

2 उत्तरे
2 answers

कोणती फळं व कोणत्या भाज्या वात वाढवतात?

3
प्रत्येक माणूस तीन काळातून जातो अन् प्रत्येक काळाशी त्याच्या आरोग्याचा संबंध दडलेला असतो. बालपण, तारूण्य आणि वृद्धत्व हे तीन काळ एकेका दोषाने प्रभावीत झालेले दिसतात. बालपण कफाने, तारूण्य पित्ताने तर वृद्धत्व वात दोषाने प्रभाव‌ति झालेले असते. आज आपण ज्येष्ठांमधील आजार हा विषय पाहत असल्याने ज्येष्ठत्वातील वाताच्या विकृत प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी आयुर्वेदाच्या अंगाने उपचार पाहणार आहोत.

कोणत्या आहार आणि विहाराने वाताच्या दोषाची वाढ नियंत्रणात आणता येते याचा विचार करताना कोणती आहार व विहारपद्धती या दोषांना वाढवते हे अभ्यासणं आवश्यक ठरतं. आहाराचा प्रत्येक कण शरीर आणि मनोषक असतो. तसा तो शरीर आणि मनोघातक ही प्रकृती काळाप्रमाणे ठरताना दिसते. म्हणूनच आयुर्वेद ग्रंथकारांनी दिनचर्या आणि ऋतूचर्या यांचं पालन करायला सांगितलं आहे. या ही पुढे जाऊन वयोमानाप्रमाणे शरीरात दोषांची साठवण होण्याची प्रवृत्ती वाढत असल्याने वयाच्या अनुषंगाने आहार पद्धती योजणं आवश्यक ठरतं. साधारणपणे वृद्धापकाळात हाडांची ठिसुळता, मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, मलावष्टंम, डोळ्यांचा अशक्तपणा कानाचे आणि श्वसनाचा त्रास, हृदयविकार, वात नाड्यांचे विकार, प्रोस्टेट ग्रंथीचे विकार, विस्मृती, वात वाहन संस्थेचे विकार अधिक प्रमाणात आढळून येतात. या सर्वांवर वाताचा परिणाम असला तरी शरीराने अगोदरच्या काळात घेतलेल्या काळजीचा थेट संबंध येथे येतो. अगोदर प्रस्तूत जशी काळजी घेतल्यास पुढील ऋतूचा त्रास उद्भवत नाही तसंच बालपण, तारूण्य या अवस्थांमध्ये उत्तम नियोन केल्यास वृद्धापकाळात अधिक त्रास होत नाही. त्याची अनेक उदाहरणं दिसून येतात आणि ही सर्व मागील पिढीमध्ये दिसतात हे विशेष. त्याचं उत्तर योग्य आहार आणि विहार. वय वाढतं तसा आहार कमी होतो विहार मंदावतो आणि वात दोषाची विकृती वाढते. आवडणाऱ्या गोष्टींवर प्रतिबंध येतात. म्हणून मा‌नसिक वाताचासुद्धा क्षोभ होतो आणि आजारपण बळावते. मागील पिढीचा आहार आणि विहार योग्य होता म्हणूनच कालमर्यादा, वयोमर्यादा तसंच सशक्त शरीरासह जीवनशैली दिसून येते.


वातवर्धक आहार : सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, स्नेह नसलेले पदार्थ (तूप, तेल विरहीत पदार्थ), मेथी, शेपू, पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, उशिरा आंबवलेले अन्न पदार्थ, वाळवलेली फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, मासे, पपई, अननस, कच्च्या भाज्या, कच्चा कांदा, चणाडाळ, वाळलेले काजू, सोयाबिन, पांढरा तसंच काळा वाटाणा, कारले, मका, काकडी, पांढरा कोंडा, बकरीचे-डुकराचे मांस हे वात दोषांची वाढ करतात. या यादीकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की वृद्धापकाळात‘अती अभ्यास’करून हेच पदार्थ खातांना व्यक्ती आढळतात. म्हणजेच डाएट करण्याच्या अट्टहासात आपण जे खायला नको तेच खातो. हे पदार्थ संख्यात्मक दृष्ट्या कदाच‌ति चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. पण गुणात्मक दृष्ट्या संपूर्ण शरीराची स्थिती बिघडवतात.

वृद्धकाळाच्या आगमनापासून विशिष्ट आहार वाढवल्यास त्याचा उपयोग उत्तम होतो. हे शास्त्र सिद्ध आहे. किमान १ चमचा शुद्ध तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. (त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणं आवश्यक आहे.) ओल्या नारळाचा वापर, सुक्या खोबऱ्याचा वापर, अंजीर, खजुर, मोसंबी, आंबा, संत्री, पपया, चेरी सर्व प्रकारच्या बेरी, अक्रोड ही फळं अत्यंत लाभदायी ठरतात. तिळाचा, खुरासणीचा आहारात आवर्जून वापर करावा, शतावरी (भाजीची), गाजर, मेथीदाणा, गाजर, मटार, मोहरी, ओक्रा, ऑलिव्ह भिजवलेला कांदा, तूपात तळलेला लसुण भोपळा, बदाम, आमचूर, तुळस, केळफूल, दगडफूल, लवंग, दालचिनी, कोथिंबीर, आलं, पिंपनी, चिंच, हळद, वेनित्रा, संत्रासाल, पेपरमिंट, पुदिना, काळेतील यांचा वापर मिळेल तसा करावा. आपला मसाला हा वातनाशक करू शकता.

मूग, मसूर, लाल माठ, तांदुळका, चाकवत, काही आदिवासी भागात मिळणाऱ्या पालेभाज्या यांचा शरीराला फायदा होतो. ऊसाचा रस (आलं लिंबू टाकून) बदाम, पिस्ते, भोपळ्याच्या बिया, ताक, गाईचे दूध, मऊ चीज, लोणी, सर्व प्रकारचे तांदूळ याचं सेवन व्हायलाच हवं. समुद्रातील तसंच गोड्या पाण्यातील मासे, कोंबडी मांस, तिसऱ्या (शिंपल्या) हे मांसाहार विशेषत: उपयोगी ठरतात. सध्या उपलब्ध असलेले विविध वनस्पतीजन्य चहा निश्च‌तिपणे गुणकारी ठरतात. सामान्यपणे वर दिल्याप्रमाणे वाताचा त्रास असलेल्या ज्येष्ठांनी काय खायचं अथवा काय खायचं नाही याचं नियोजन केल्यास नक्की चांगला फायदा होताना दिसतो.
उत्तर लिहिले · 8/2/2022
कर्म · 121765
0

वात वाढवणारी फळे:

  • कच्ची केळी: आयुर्वेदानुसार, कच्ची केळी वात वाढवू शकतात.
  • टरबूज: काही जणांना टरबूज पचनास जड जाते आणि त्यामुळे वात वाढू शकतो.
  • खरबूज: खरबूज देखील काही लोकांमध्ये वात वाढवू शकते.

वात वाढवणाऱ्या भाज्या:

  • बटाटा: बटाटा वात वाढवणारा मानला जातो.
  • वाटाणा: वाटाणा पचनास जड असल्याने वात वाढू शकतो.
  • पालेभाज्या: जास्त पालेभाज्या खाल्ल्याने वात वाढू शकतो. विशेषतः ज्या भाज्या चवीला तुरट असतात.
  • कोबी आणि ফুলकोबी: या भाज्या वात वाढवू शकतात.

टीप:

  • प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या फळांचा आणि भाज्यांचा परिणाम वेगळा असतो. त्यामुळे काही लोकांना ह्या भाज्या आणि फळे खाऊन काही त्रास होत नाही.
  • वात वाढवणारी फळे आणि भाज्या moderation मध्ये खावीत.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 860

Related Questions

या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील?
आजोबांच्या नावावर विहीर आहे, सामाजिक क्षेत्रफळांमध्ये वाटून घेण्यासाठी काय करावे लागेल?
काही फळांमध्ये एकच बी तर काही फळांमध्ये अनेक बिया असतात, असे का?
वनस्पतीच्या बिया म्हणजे धान्य, कडधान्य, फळांतील बिया यांमध्ये वनस्पतीचा जीव असतो, मग धान्य, कडधान्य हे शाकाहारी अन्न कसे काय?
कोणती फळे खाल्ली असता कफ होण्याचा त्रास होऊ शकतो? (मला कफ होण्याचा त्रास आहे).
फळे खाणे चांगले की फळांचा ज्यूस पिणे चांगले? रोज किंवा एक दिवसाआड ज्यूस पिणे योग्य आहे का? कोणत्या फळांचा ज्यूस नियमित/एक दिवसाआड प्यावा? खोकला व कफ याचा त्रास असल्यास कोणत्या फळाचा ज्यूस घेऊ नये?
घोलवड, सासवड आणि देवगड हे ठिकाण कोणत्या फळांसाठी प्रसिद्ध आहे? या फळांची झाडे त्या विशिष्ट गावांच्या परिसरातच का वाढत असतील? महाराष्ट्राच्या नकाशात ही स्थळे दाखवा.