भारताचा इतिहास भारत प्राचीन इतिहास इतिहास

भारतावर पहिला परकीय आक्रमण करणारा कोण?

6 उत्तरे
6 answers

भारतावर पहिला परकीय आक्रमण करणारा कोण?

7
इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात आलेला ग्रीक राजा  सिकंदर उर्फ अलेक्झांडर हा भारतावर आक्रमण करणारा पहिला परकीय होता. जरी त्याला जगजेत्ता म्हणतात तरी त्याने भारत पूर्ण जिंकलाच न्हवता.
काही वर्षांपूर्वीपर्यंत इतिहासकारांमध्ये असा समज होता की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधू संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सूरू झाला. परंतु नव्या संशोधकांचे असे मत आहे असे आक्रमण झालेच नाही. तसेच वैदिक काळ हा पूर्वीच्या संशोधकांच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन असून वैदिक संस्कृती व हडप्पा व मोहोंदोजडोची संस्कृती या एकच होत्या. हा वादाचा मुद्दा असला तरी सिंधू संस्कृती व वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद्यांच्याकाठी घडल्या होत्या यात दुमत नाही. यातील सरस्वती नदीही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलांमुळे लुप्त पावली. प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब, राजस्थान व कच्छ गुजरात मधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे. वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली.
सिकांदारानंतर शक, हुन, कुशाण यांनी भारतावर हल्ले केले आणि या सर्वांचे आक्रमण येथील राजांनी थोपवले आणि बरेच भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले.
स्वा. सावरकरांचं सहा सोनेरी पाने हे एक यावरील खूप चांगले पुस्तक आहे.
अधिक माहितीसाठी वाचा
उत्तर लिहिले · 10/8/2017
कर्म · 99520
0
सातवाहन काळात कुटुंब प्रमुखाला काय म्हणतात ?
उत्तर लिहिले · 15/5/2021
कर्म · 0
0

भारतावर पहिला परकीय आक्रमण इ.स. पूर्व सहाव्या शतकात सायरस (Cyrus) या हखामनी (Achaemenid) साम्राज्याचा राजाने केले.

त्याने भारताच्या वायव्य भागावर आक्रमण केले, त्यावेळेस तेथे अनेक लहान राज्ये होती.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 5280

Related Questions

भारतीय आकाशवाणीची वाटचाल थोडक्यात लिहा?
बलुतेदारी व्यवस्थेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
भाऊसाहेबांच्या बखरीचे स्वरूप स्पष्ट करा?
संत नामदेवांचा जीवन परिचय लिहा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परीस्थितीचे वर्णन करा?
यादवकालीन महाराष्ट्राच्या सामाजिक परिस्थितीचे वर्णन करा?
औद्योगिक क्रांती काळातील यंत्रशोधांवर टिपा लिहा?