4 उत्तरे
4
answers
समतोल आहार म्हणजे काय?
9
Answer link
◆आहार केव्हा? का? कसा? किती?◆
रात्रीचं जेवण व झोप यामध्ये 2/3 तासांचं अंतर हवं म्हणून 10 ला झोपणे.
आरोग्यपूर्ण सवय असेल तर 7 ला जेवण त्यापूर्वी 4, 12, 8-9 असा जेवण्याचा खाण्याचा उलटा क्रम येतो.
सकाळी फळं/दूध (1/2 तासाचं अंतर ठेवा) घेऊन 8 ला दमदमीत पोटभरीचा नाश्ता हवा.
नेहमी महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ खा. थालीपीठ हा जगातील सर्वात पौष्टिक पदार्थ आहे. 18 धान्यांची भाजणी करा. कडबोळ्यापेक्षा भाज्यासारखी मोकळी भाजणी, थालीपिठे करा लोणी किंवा दह्याबरोबर खा.
पोटभरीचा सर्व घटकांनी युक्त पण पचायला हलका आहार होईल त्यात कधी पालक, कोथिंबीर, मेथी कोणतीही भाजी चिरून घाला.
भोपळा, बीट, गाजर, कोबी, फ्लॉवर किसून घाला. कढीपत्ता, तीळ, ओवा घाला. वांगं भाजून टाका. रात्रीचं ठरलेलं अन्नही चालेल खमंग थालीपीठ गरमच खा.थालीपिठाप्रमाणेचत दशमी, परोठा, ठेपले, धपाटे, पोहे, शिरा, उपमा, सांजा, उप्पीट खा. जिथं पिकतं जे परंपरागत अन्न ज्या प्रदेशाचं आहे ते खा. पंजाबमध्ये गेलात त्यांच्यासारखं खा. दक्षिणेत गेलात दक्षिणेचं खा. त्या त्या ऋतूनुसार खा. खायच्या वेळी खा. प्यायच्यावेळी प्या. भूक लागली की शीतपेयं तहान लागली की सामोसे वडापाव खाणं असं करू नका. शरीराची भाषा ओळखा. आहाराचे नियम अगदी साधे सोपे आहेत.
●आहाराविषयी महत्त्वाच्या गोष्टी तर समजल्या पण कृती?
एक गोष्ट सांगतो एक झेन गुरू होता. त्याच्याकडे एक दिवस पाहुणे आले. आश्रम मोठा होता. स्वयंपाकी होता. गुरुने पाहुण्यांना विचारले, तुम्ही कोणासारखे जेवणार? डुकरासारखे का माणसासारखे? पाहुण्यांना राग आला ते म्हणाले, म्हणजे काय आम्ही माणसं आहोत. माणसासारखेच जेवणार. गुरुंनी स्वयंपाक्याला आज्ञा केली. नेहमीपेक्षा दुप्पट जेवण बनवा. पाहुण्या माणसांच्या संख्येच्या दुप्पट. आणि तेव्हा पाहुणे वरमले. नेमकं किती खायचं असतं याचा वस्तुपाठ गुरूने सर्वांनाच दिला होता. तात्पर्य लक्षात नाही आलं? भुकेपेक्षा कमीच खा. पोटभर गळ्यापर्यंत येईल कधी मिळेल की नाही असं वाढून एकावेळी खूप खाऊ नका. थोडा अवकाश ठेवून खा.
सर्व पशू-पक्षी झाडं आपला आहार ठराविकच व ठराविक मापातच घेतात. अपवाद माणसाचा. माणूस सोडून तान्ही बाळं व इतर खाणारे बरोबर भूक भागेल एवढंच खतात. तेव्हा किमान तान्ह्या बाळाचा आदर्श ठेवा. कावळा-चिमणीचा ठेवा.
योग्य वेळी जठराग्नी प्रज्वलित असेल तेव्हाच योग्य प्रमाणात योग्य तेच (शारीरिक गरजेनुसार) खा. पटतंय ना! खाण्यावर विचार करा दैनंदिनी ठेवा दिवस कसा जातोय ते बघा.
उत्साही, मरगळलेला की ठीक त्याप्रमाणे अन्न खा. चवीत बदल करा विविधता आणा पोळ्या नकोशा वाटल्या फुलके करा शिरा करा धिरडी करा धान्य, तेल वापर विविधतेने कौशल्याने करा अन्नाशी कृतज्ञ रहा. अन्नदात्याविषयी (मी सांगितलेले पथ्य) कृतज्ञता बाळगा आणि जेवा. रोजच सणासारखं जेवा तब्येत राखा सण तोच की सारी आरोग्याची पथ्य पालून आपण खातोपितो वागतो धार्मिक सण हे काही खरे सण नव्हेत. इतरांशी सौहार्दतेने वागणे आपला कुणाला त्रास होऊ नये यासाठी भान जागृत ठेवून वागणे तो दिवस सणासारखा. ताजं सेंद्रिय खाल्लं तर ताजंतवानं वाटेल वाईट चुकीचं वागण्याची इच्छा होते.
विवेकाने वागणं होत नाही म्हणजेच खाणं आहार चुकला तो सुधारा शाकाहारी व्हा. मांसाहारी असाल तर कमी खा त्या प्राण्याविषयी कृतज्ञ रहा नि जेवा बघा फरक पडेल असंच आपल्याला वाटतं नि मारतं हे तुम्हाली मग सहज पटेल.
◆केव्हा खायचं?
भूक लागेल तेव्हाच- सकाळी फळं खाऊन सुरुवात
÷स. 8 – पोटभरीचा नाश्ता
÷दु. 12-1 – चौरस चारी ठाव जेवण
÷दु. 4 हलका उपहार फळ, राजगीरा लाडू
÷संध्या. 7- भाकरी+पालेभाजी, डाळ, भात, कोथिंबीर चटणी
÷रात्री 10- झोपताना कोमट दूध
◆भांडी कोणती वापरायची?
लोखंडी कढईत पालेभाज्या/फळभाज्या करा.
पितळी पातेल्यात करा. निर्लेप नकोच नको (माळ्यावर टाकून द्या) स्टीलमध्ये फोडण्या नकोत. लोखंडी भांड्यात करा. मातीची वापरा, दगडी, खलबत्ता वापरा, सुरी, चाकू स्टीलचे वापरा
◆अन्न असे हवे –
दिसायला छान खाण्याची इच्छा झाली पाहिजे अर्थात भूक लागल्यावरच, त्याचा वास चांगला हवा, त्याची चव चांगली हवी. त्याचा पोत हवा तसा पोळी मऊसूद, भाजी शिजलेली मऊ, भाकरी कडक तूप रवाळ चटणी दाणेदार वरण गंधासारखं.
¢ मांडी घालून खाली जमिनीवर बसावं (टेबलवर नको. हाताची पूर्ण हालचाल होत नाही)
प्रसन्न वाटेल असं वाढावं. पाणी तांब्याभांडे घेऊनच बसावं. शांत परिसर हवा. घाई नको, उष्ट पाडायच नाही.
◆यज्ञात जशी हळूहळू आहुती देतात. तसतसे छोटे घास करून चावून चावून खावे. अन्न लाळेत पूर्ण मिसळून त्याचं चूर्ण व्हायला हवं (निम्म पचन तिथेच होतं) बेचव झालं की गिळावे. रागावल्यावर भांडण झाल्यावर जेवण टाळा.
●जेवताना टी. व्ही. मोबाईल बंद ठेवा. कोणाशीही बोलू नका गप्पा नकोत. स्वस्थ शांतचित्ताने खा. जेवताना मधून मधून 1/1 घोट पाणी प्या. सुरुवात गोडाने करा शेवट ताक पिऊन करा. भाताला फाटा देऊ नका थोडा का होईना दिवसात हवाच तो. जेवणानंतर थंड आईस्क्रिम टाळा/ चहा टाळा/ फळंही टाळा. मुखवास घ्या. प्रसन्न मनाने उठा. जेवताना शास्त्रीय वाद्यसंगीत चालेल; पण सनई नको बासरी, संतुर सरोद गीटार यापैकी काहीतरी एखादं लावा ऐका चालेल. यथासांग सणाच्या दिवशी तरी एवढं सगळं पाळलं तरच अंगी लागेल. तेव्हा हे जरूर पाळा.
भूक लागली असेल तरच खा. मात्र तहान लागली नाही तरी दिवसाकाठी 1।। ते 2 लि. पाणी गरजेनुसार, बाहेरच्या तपमानानुसार प्या. भुकेच्या वेळा टाळू नका.बाहेरचं, हॉटेलचं निसत्व अन्न वारंवार खाऊ नका.बेकरीतील सर्व पदार्थ आरोग्य राखण्याच्या क्रमवारीत सर्वात खाली आहे. ते खाऊ नका.
रात्रीचं जेवण व झोप यामध्ये 2/3 तासांचं अंतर हवं म्हणून 10 ला झोपणे.
आरोग्यपूर्ण सवय असेल तर 7 ला जेवण त्यापूर्वी 4, 12, 8-9 असा जेवण्याचा खाण्याचा उलटा क्रम येतो.
सकाळी फळं/दूध (1/2 तासाचं अंतर ठेवा) घेऊन 8 ला दमदमीत पोटभरीचा नाश्ता हवा.
नेहमी महाराष्ट्रीयन मराठी पदार्थ खा. थालीपीठ हा जगातील सर्वात पौष्टिक पदार्थ आहे. 18 धान्यांची भाजणी करा. कडबोळ्यापेक्षा भाज्यासारखी मोकळी भाजणी, थालीपिठे करा लोणी किंवा दह्याबरोबर खा.
पोटभरीचा सर्व घटकांनी युक्त पण पचायला हलका आहार होईल त्यात कधी पालक, कोथिंबीर, मेथी कोणतीही भाजी चिरून घाला.
भोपळा, बीट, गाजर, कोबी, फ्लॉवर किसून घाला. कढीपत्ता, तीळ, ओवा घाला. वांगं भाजून टाका. रात्रीचं ठरलेलं अन्नही चालेल खमंग थालीपीठ गरमच खा.थालीपिठाप्रमाणेचत दशमी, परोठा, ठेपले, धपाटे, पोहे, शिरा, उपमा, सांजा, उप्पीट खा. जिथं पिकतं जे परंपरागत अन्न ज्या प्रदेशाचं आहे ते खा. पंजाबमध्ये गेलात त्यांच्यासारखं खा. दक्षिणेत गेलात दक्षिणेचं खा. त्या त्या ऋतूनुसार खा. खायच्या वेळी खा. प्यायच्यावेळी प्या. भूक लागली की शीतपेयं तहान लागली की सामोसे वडापाव खाणं असं करू नका. शरीराची भाषा ओळखा. आहाराचे नियम अगदी साधे सोपे आहेत.
●आहाराविषयी महत्त्वाच्या गोष्टी तर समजल्या पण कृती?
एक गोष्ट सांगतो एक झेन गुरू होता. त्याच्याकडे एक दिवस पाहुणे आले. आश्रम मोठा होता. स्वयंपाकी होता. गुरुने पाहुण्यांना विचारले, तुम्ही कोणासारखे जेवणार? डुकरासारखे का माणसासारखे? पाहुण्यांना राग आला ते म्हणाले, म्हणजे काय आम्ही माणसं आहोत. माणसासारखेच जेवणार. गुरुंनी स्वयंपाक्याला आज्ञा केली. नेहमीपेक्षा दुप्पट जेवण बनवा. पाहुण्या माणसांच्या संख्येच्या दुप्पट. आणि तेव्हा पाहुणे वरमले. नेमकं किती खायचं असतं याचा वस्तुपाठ गुरूने सर्वांनाच दिला होता. तात्पर्य लक्षात नाही आलं? भुकेपेक्षा कमीच खा. पोटभर गळ्यापर्यंत येईल कधी मिळेल की नाही असं वाढून एकावेळी खूप खाऊ नका. थोडा अवकाश ठेवून खा.
सर्व पशू-पक्षी झाडं आपला आहार ठराविकच व ठराविक मापातच घेतात. अपवाद माणसाचा. माणूस सोडून तान्ही बाळं व इतर खाणारे बरोबर भूक भागेल एवढंच खतात. तेव्हा किमान तान्ह्या बाळाचा आदर्श ठेवा. कावळा-चिमणीचा ठेवा.
योग्य वेळी जठराग्नी प्रज्वलित असेल तेव्हाच योग्य प्रमाणात योग्य तेच (शारीरिक गरजेनुसार) खा. पटतंय ना! खाण्यावर विचार करा दैनंदिनी ठेवा दिवस कसा जातोय ते बघा.
उत्साही, मरगळलेला की ठीक त्याप्रमाणे अन्न खा. चवीत बदल करा विविधता आणा पोळ्या नकोशा वाटल्या फुलके करा शिरा करा धिरडी करा धान्य, तेल वापर विविधतेने कौशल्याने करा अन्नाशी कृतज्ञ रहा. अन्नदात्याविषयी (मी सांगितलेले पथ्य) कृतज्ञता बाळगा आणि जेवा. रोजच सणासारखं जेवा तब्येत राखा सण तोच की सारी आरोग्याची पथ्य पालून आपण खातोपितो वागतो धार्मिक सण हे काही खरे सण नव्हेत. इतरांशी सौहार्दतेने वागणे आपला कुणाला त्रास होऊ नये यासाठी भान जागृत ठेवून वागणे तो दिवस सणासारखा. ताजं सेंद्रिय खाल्लं तर ताजंतवानं वाटेल वाईट चुकीचं वागण्याची इच्छा होते.
विवेकाने वागणं होत नाही म्हणजेच खाणं आहार चुकला तो सुधारा शाकाहारी व्हा. मांसाहारी असाल तर कमी खा त्या प्राण्याविषयी कृतज्ञ रहा नि जेवा बघा फरक पडेल असंच आपल्याला वाटतं नि मारतं हे तुम्हाली मग सहज पटेल.
◆केव्हा खायचं?
भूक लागेल तेव्हाच- सकाळी फळं खाऊन सुरुवात
÷स. 8 – पोटभरीचा नाश्ता
÷दु. 12-1 – चौरस चारी ठाव जेवण
÷दु. 4 हलका उपहार फळ, राजगीरा लाडू
÷संध्या. 7- भाकरी+पालेभाजी, डाळ, भात, कोथिंबीर चटणी
÷रात्री 10- झोपताना कोमट दूध
◆भांडी कोणती वापरायची?
लोखंडी कढईत पालेभाज्या/फळभाज्या करा.
पितळी पातेल्यात करा. निर्लेप नकोच नको (माळ्यावर टाकून द्या) स्टीलमध्ये फोडण्या नकोत. लोखंडी भांड्यात करा. मातीची वापरा, दगडी, खलबत्ता वापरा, सुरी, चाकू स्टीलचे वापरा
◆अन्न असे हवे –
दिसायला छान खाण्याची इच्छा झाली पाहिजे अर्थात भूक लागल्यावरच, त्याचा वास चांगला हवा, त्याची चव चांगली हवी. त्याचा पोत हवा तसा पोळी मऊसूद, भाजी शिजलेली मऊ, भाकरी कडक तूप रवाळ चटणी दाणेदार वरण गंधासारखं.
¢ मांडी घालून खाली जमिनीवर बसावं (टेबलवर नको. हाताची पूर्ण हालचाल होत नाही)
प्रसन्न वाटेल असं वाढावं. पाणी तांब्याभांडे घेऊनच बसावं. शांत परिसर हवा. घाई नको, उष्ट पाडायच नाही.
◆यज्ञात जशी हळूहळू आहुती देतात. तसतसे छोटे घास करून चावून चावून खावे. अन्न लाळेत पूर्ण मिसळून त्याचं चूर्ण व्हायला हवं (निम्म पचन तिथेच होतं) बेचव झालं की गिळावे. रागावल्यावर भांडण झाल्यावर जेवण टाळा.
●जेवताना टी. व्ही. मोबाईल बंद ठेवा. कोणाशीही बोलू नका गप्पा नकोत. स्वस्थ शांतचित्ताने खा. जेवताना मधून मधून 1/1 घोट पाणी प्या. सुरुवात गोडाने करा शेवट ताक पिऊन करा. भाताला फाटा देऊ नका थोडा का होईना दिवसात हवाच तो. जेवणानंतर थंड आईस्क्रिम टाळा/ चहा टाळा/ फळंही टाळा. मुखवास घ्या. प्रसन्न मनाने उठा. जेवताना शास्त्रीय वाद्यसंगीत चालेल; पण सनई नको बासरी, संतुर सरोद गीटार यापैकी काहीतरी एखादं लावा ऐका चालेल. यथासांग सणाच्या दिवशी तरी एवढं सगळं पाळलं तरच अंगी लागेल. तेव्हा हे जरूर पाळा.
भूक लागली असेल तरच खा. मात्र तहान लागली नाही तरी दिवसाकाठी 1।। ते 2 लि. पाणी गरजेनुसार, बाहेरच्या तपमानानुसार प्या. भुकेच्या वेळा टाळू नका.बाहेरचं, हॉटेलचं निसत्व अन्न वारंवार खाऊ नका.बेकरीतील सर्व पदार्थ आरोग्य राखण्याच्या क्रमवारीत सर्वात खाली आहे. ते खाऊ नका.
6
Answer link
⭕ समतोल आहार म्हणजे काय? ⭕
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우 '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
https://youtu.be/DXxZpbmr_A0
🌹तारीख 28 मार्च 2017 🌹
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
समतोल आहाराची कल्पना समतोल आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात. हे पदार्थ अगदी रोज नाही तरी आठवडयातून दोन-तीन वेळेस अदलून बदलून मिळावेत. दूध हा तसा संपूर्ण पण महागआहारआहे. दूध, शेंगदाणे, इत्यादींतून मिळणारी प्रथिने तुलनेने 'महाग' प्रथिने आहेत आणि ज्वारी, बाजरीतून मिळणारी प्रथिने स्वस्त आहेत. प्राणिज पदार्थ, मांस, मासे, अंडी ही महाग प्रथिने आहेत. त्यातल्या त्यात अंडे सर्वात स्वस्त व परिपूर्ण प्राणिज प्रथिन आहे.
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
▪चौरंगीआहार कल्पना▪
आहार शास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहारही कल्पना चौरस आहार म्हणून सांगता येईल. चौरंगी म्हणजेचार रंग. पांढरा, पिवळा हिरवा, लाल. कोणत्याही जेवणात हे चार रंग असावे म्हणजे आहारचौरस होतो.1.पांढरा - भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी2.पिवळा - भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु3.हिरवा - हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या4.लाल - फळभाज्या, (टोमॅटो), गाजर, मांस, मिरची(यातील मांसाहारी पदार्थ ऐच्छिक आहेत) ही कल्पना वापरूनआहारात समतोलता आणता येते.
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖_* *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ 9890875498*
*_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_*
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
우 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 우 '''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
https://youtu.be/DXxZpbmr_A0
🌹तारीख 28 मार्च 2017 🌹
'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
समतोल आहाराची कल्पना समतोल आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने,क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात. हे पदार्थ अगदी रोज नाही तरी आठवडयातून दोन-तीन वेळेस अदलून बदलून मिळावेत. दूध हा तसा संपूर्ण पण महागआहारआहे. दूध, शेंगदाणे, इत्यादींतून मिळणारी प्रथिने तुलनेने 'महाग' प्रथिने आहेत आणि ज्वारी, बाजरीतून मिळणारी प्रथिने स्वस्त आहेत. प्राणिज पदार्थ, मांस, मासे, अंडी ही महाग प्रथिने आहेत. त्यातल्या त्यात अंडे सर्वात स्वस्त व परिपूर्ण प्राणिज प्रथिन आहे.
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖
▪चौरंगीआहार कल्पना▪
आहार शास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहारही कल्पना चौरस आहार म्हणून सांगता येईल. चौरंगी म्हणजेचार रंग. पांढरा, पिवळा हिरवा, लाल. कोणत्याही जेवणात हे चार रंग असावे म्हणजे आहारचौरस होतो.1.पांढरा - भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी2.पिवळा - भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु3.हिरवा - हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या4.लाल - फळभाज्या, (टोमॅटो), गाजर, मांस, मिरची(यातील मांसाहारी पदार्थ ऐच्छिक आहेत) ही कल्पना वापरूनआहारात समतोलता आणता येते.
*'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
*_💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव 💖_* *'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''*
https://youtu.be/DXxZpbmr_A0
*✆ 9890875498*
*_'''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''_*
0
Answer link
समतोल आहार म्हणजे असा आहार ज्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात असतात. ह्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे आणि पाणी यांचा समावेश असतो.
समतोल आहारामुळे:
- शरीराला योग्य ऊर्जा मिळते.
- शारीरिक आणि मानसिक विकास चांगला होतो.
- रोगप्रतिकारशक्ती वाढते.
- शरीराची कार्यक्षमता सुधारते.
समतोल आहारात खालील गोष्टींचा समावेश असावा:
- धान्ये: गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी (कर्बोदके)
- कडधान्ये: डाळ, वाटाणा, मूग (प्रथिने)
- भाज्या आणि फळे: पालेभाज्या, फळभाज्या, फळे (जीवनसत्वे आणि खनिजे)
- दुग्ध उत्पादने: दूध, दही, पनीर (कॅल्शियम आणि प्रथिने)
- मांस आणि अंडी: (प्रथिने)
- तेल आणि तूप: (स्निग्ध पदार्थ)
समतोल आहाराचे प्रमाण व्यक्तीनुसार बदलते, जसे की वय, लिंग, शारीरिक क्रिया आणि आरोग्य स्थिती.