2 उत्तरे
2
answers
भारतीय सण व ते साजरे करण्याची कारणे काय आहेत?
4
Answer link
राष्ट्रीय सणसंपादन करा
भारतात खालील तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.
भारतीय स्वातंत्र्यदिवस - १५ ऑगस्ट
भारतीय प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
गांधी जयंती - २ आक्टोबर
हिंदूंचे सण आणि उत्सव
गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा
रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी
हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा
परशुराम जयंती - वैशाख शुद्ध द्वितीया
अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
आषाढी एकादशी - आषाढ शुद्ध एकादशी
नागपंचमी - श्रावण शुद्ध पंचमी
नारळी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी) - श्रावण कृष्ण अष्टमी
पोळा - आषाढ अमावस्या, श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या
गणेश चतुर्थी - भाद्रपद शुद्ध चतुर्थी
अनंत चतुर्दशी - भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
रक्षा बंधन
घटस्थापना - आश्विन शुद्ध प्रतिपदा
दसरा (विजयादशमी) - आश्विन शुद्ध दशमी
कोजागरी पौर्णिमा - आश्विन पौर्णिमा
दीपावली (दिवाळी, दिपावळी)
नर्क चतुर्दशी - आश्विन कृष्ण चतुर्दशी
लक्ष्मीपूजन - आश्विन अमावास्या
बलिप्रतिपदा - कार्तिक शुद्ध प्रतिपदा
भाऊबीज - कार्तिक शुद्ध द्वितीया
कार्तिकी एकादशी - कार्तिक शुद्ध एकादशी
त्रिपुरारी पौर्णिमा - कार्तिक पौर्णिमा
चंपाषष्ठी (सट) - मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी
श्रीदत्त जयंती - मार्गशीर्ष पौर्णिमा
मकरसंक्रांत - पौष महिन्यात
दुर्गाष्टमी - पौष शुद्ध अष्टमी
रथसप्तमी - माघ शुद्ध सप्तमी
महाशिवरात्र - माघ कृष्ण चतुर्दशी
होळी - फाल्गुन पौर्णिमा
रंगपंचमी -फाल्गु
न कृष्ण पंचमी
पोंगल ( पोळा )
ओणम
सण, धार्मिक उत्सव आणि व्रते साजरे करण्याचे उद्देश
१. देवतांची कृपादृष्टी संपादन करणे
२. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्यांनी जीवन वेचले, अशा संतमाहात्म्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्मरण ठेवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
३. आपण ज्या धर्मात जन्म घेतला, त्या धर्माचे शिक्षण मिळवणे
४. ईश्वरोपासनेतून कुटुंबात सतत भक्तीभाव आणि धर्मनिष्ठा वृद्धिंगत करणे
५. दैनंदिन ठराविक चाकोरीबद्ध जीवनाला बाजूला सारून देवतांची पूजा, सेवा यांच्या माध्यमातून उच्च सांस्कृतिक जीवनाचा समन्वय साधणे
६. समाजातील प्रत्येकात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून व्यक्तीसह समाजजीवनही समृद्ध करणे
अशा विविधांगी आणि व्यापक दृष्टीकोनातून समाजातील धर्म कायम टिकवून संपूर्ण सृष्टीला सुखी करणे, हा उत्सव करण्यामागचा प्राचीन आर्यांचा मूळ उद्देश होता.
अ. सर्वसाधारण माहिती
आमचे सण आणि उत्सव हे असे आहेत की, जे इहलोकी सुखावह होतातच, शिवाय मृत्यूनंतर सद्गती देतात.
आ. निसर्गातील बदल
उदा. नारळी पौर्णिमा. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात.
इ. अवतारांच्या जन्मतिथी
उदा. श्रीराम नवमी. श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतारांच्या जन्मतिथी साजर्या करतात; कारण देहत्याग हा त्यांचा मृत्यू नसतो. ते भक्तांसाठी केव्हाही देह धारण करू शकतात, म्हणजेच ते अमर आहेत.
ई. संतांच्या पुण्यतिथी
उदा. श्री ज्ञानेश्वर पुण्यतिथी. संतांच्या देहत्यागाचा दिवस साजरा करतात; कारण ते जन्माला येतात, तेव्हा बहुधा बाह्यतः केवळ सर्वसाधारण व्यक्ती किंवा साधक असतात. पुढे साधना करून ते संतपदाला पोहोचतात. देहत्यागानंतर ते उच्चलोकात जातात आणि त्यांचे कार्य आणखी वाढते; कारण देहासाठी आवश्यक असलेली शक्ती देह उरलेला नसल्याने कार्यासाठीच वापरली जाते. यासाठी त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस म्हणून पुण्यतिथी साजरी करतात. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत मात्र त्यांच्या मृत्यूदिनी श्राद्ध करणे आवश्यक असल्याने तो दिवस लक्षात ठेवतात.
उ. पौराणिक आणि ऐतिहासिक घटना
उदा. वटपौर्णिमा. या दिवशी सावित्रीने यमाला वादविवादात जिंकून पतीला पुन्हा जिवंत करून घेतले.
ऊ. आध्यात्मिक शिकवण
साधक, साधन आणि साध्य यांच्यात अद्वैत व्हावे, साधकाने परमेश्वराशी एकरूप व्हावे, हा साधनेचा एकमेव उद्देश असतो. त्या दृष्टीने एक टप्पा म्हणून साधनांतही ईश्वराचे रूप पहायला शिकण्याच्या दृष्टीने काही सण साजरे केले जातात, उदा.
१. शीतला सप्तमी
स्वयंपाकाच्या शेगडी, कढई, सांडशी वगैरे साधनांचा या दिवशी वापर न करता त्यांची पूजा केली जाते.
२. पोळा
या दिवशी शेतकरी बैल आणि नांगर यांची पूजा करतात.
३. विजयादशमी
प्रत्येक जण आपापल्या साधनांची पूजा करतो, उदा. शिंपी कात्री आणि शिलाई यंत्र यांची; विद्यार्थी अन् अभ्यासक त्यांच्या पुस्तकांची वगैरे.
४. लक्ष्मीपूजन
व्यापारी लोक तराजू आणि हिशोबाच्या वह्या यांची पूजा करतात, तसेच गृहिणी केरसुणीची पूजा करतात.
२. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांच्यातील भेद
हा भेद स्पष्ट असा नाही; कारण काही सण हे धार्मिक उत्सव आणि व्रत म्हणूनही साजरे केले जातात, उदा. श्रीराम नवमी वैयक्तिकरित्या साजरी करतात, तेव्हा ‘सण’ असतो, समाजात एकत्रितपणे साजरी करतात, तेव्हा ‘उत्सव’ असतो आणि संकल्प सोडून वैयक्तिकरित्या करतात, तेव्हा ‘व्रत’ असते.
३. सण, उत्सव इत्यादींकडे केवळ रूढी म्हणून
पाहू नका, तर त्यांमागील गूढार्थ आणि शास्त्र लक्षात घ्या !
भारतात अनेक सण, उत्सव आणि परंपरा आहेत. बहुतांश जण त्यांकडे केवळ रूढी म्हणून पाहातात आणि त्या दृष्टीनेच साजरे करतात; त्यांच्या पाठीमागील गूढार्थ आणि शास्त्र लक्षात घेत नाहीत. गुढीपाडव्याला कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण करतात. ‘इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडुनिंबात त्या काळात जास्त प्रमाणात येणार्या प्रजापति-लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण केल्याने प्रजापति-लहरींचा लाभ अधिक होण्यास साहाय्य होते’, हे कडुनिंब ग्रहण करण्यामागील शास्त्र आहे. प्रादेशिकभिन्नता, लोकजीवन, उपासनेच्या पद्धती इत्यादींमुळे सण, उत्सव साजरे करतांना ठिकठिकाणच्या चालीरीतींत काही वेळा भेद आढळतो. शास्त्रीय आधार नसतांनाही केवळ पूर्वापार चालत आलेली लौकिक प्रथा म्हणून एखादी प्रथा साजरी करणे हे अयोग्य आहे. अशा लौकिक प्रथांना मूठमाती देऊन शास्त्रसंमत कृती करणेच आवश्यक असते. व्रतांविषयी त्यांच्यामागे एखाद्या उन्नतांचा संकल्प असतो, हेच त्यांच्यामागचे शास्त्रीय कारण होय.
भारतात खालील तीन दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरे केले जातात.
भारतीय स्वातंत्र्यदिवस - १५ ऑगस्ट
भारतीय प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी
गांधी जयंती - २ आक्टोबर
हिंदूंचे सण आणि उत्सव
गुढीपाडवा - चैत्र शुद्ध प्रतिपदा
रामनवमी - चैत्र शुद्ध नवमी
हनुमान जयंती - चैत्र पौर्णिमा
परशुराम जयंती - वैशाख शुद्ध द्वितीया
अक्षय्य तृतीया - वैशाख शुद्ध तृतीया
आषाढी एकादशी - आषाढ शुद्ध एकादशी
नागपंचमी - श्रावण शुद्ध पंचमी
नारळी पौर्णिमा - श्रावण पौर्णिमा
कृष्णजन्माष्टमी (गोकुळ अष्टमी) - श्रावण कृष्ण अष्टमी
पोळा - आषाढ अमावस्या, श्रावण अमावास्या किंवा भाद्रपद अमावास्या
गणेश चतुर्थी - भाद्रपद शुद्ध चतुर्थी
अनंत चतुर्दशी - भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
रक्षा बंधन
घटस्थापना - आश्विन शुद्ध प्रतिपदा
दसरा (विजयादशमी) - आश्विन शुद्ध दशमी
कोजागरी पौर्णिमा - आश्विन पौर्णिमा
दीपावली (दिवाळी, दिपावळी)
नर्क चतुर्दशी - आश्विन कृष्ण चतुर्दशी
लक्ष्मीपूजन - आश्विन अमावास्या
बलिप्रतिपदा - कार्तिक शुद्ध प्रतिपदा
भाऊबीज - कार्तिक शुद्ध द्वितीया
कार्तिकी एकादशी - कार्तिक शुद्ध एकादशी
त्रिपुरारी पौर्णिमा - कार्तिक पौर्णिमा
चंपाषष्ठी (सट) - मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी
श्रीदत्त जयंती - मार्गशीर्ष पौर्णिमा
मकरसंक्रांत - पौष महिन्यात
दुर्गाष्टमी - पौष शुद्ध अष्टमी
रथसप्तमी - माघ शुद्ध सप्तमी
महाशिवरात्र - माघ कृष्ण चतुर्दशी
होळी - फाल्गुन पौर्णिमा
रंगपंचमी -फाल्गु
न कृष्ण पंचमी
पोंगल ( पोळा )
ओणम
सण, धार्मिक उत्सव आणि व्रते साजरे करण्याचे उद्देश
१. देवतांची कृपादृष्टी संपादन करणे
२. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्यांनी जीवन वेचले, अशा संतमाहात्म्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्मरण ठेवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे
३. आपण ज्या धर्मात जन्म घेतला, त्या धर्माचे शिक्षण मिळवणे
४. ईश्वरोपासनेतून कुटुंबात सतत भक्तीभाव आणि धर्मनिष्ठा वृद्धिंगत करणे
५. दैनंदिन ठराविक चाकोरीबद्ध जीवनाला बाजूला सारून देवतांची पूजा, सेवा यांच्या माध्यमातून उच्च सांस्कृतिक जीवनाचा समन्वय साधणे
६. समाजातील प्रत्येकात असलेल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळून व्यक्तीसह समाजजीवनही समृद्ध करणे
अशा विविधांगी आणि व्यापक दृष्टीकोनातून समाजातील धर्म कायम टिकवून संपूर्ण सृष्टीला सुखी करणे, हा उत्सव करण्यामागचा प्राचीन आर्यांचा मूळ उद्देश होता.
अ. सर्वसाधारण माहिती
आमचे सण आणि उत्सव हे असे आहेत की, जे इहलोकी सुखावह होतातच, शिवाय मृत्यूनंतर सद्गती देतात.
आ. निसर्गातील बदल
उदा. नारळी पौर्णिमा. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात.
इ. अवतारांच्या जन्मतिथी
उदा. श्रीराम नवमी. श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी अवतारांच्या जन्मतिथी साजर्या करतात; कारण देहत्याग हा त्यांचा मृत्यू नसतो. ते भक्तांसाठी केव्हाही देह धारण करू शकतात, म्हणजेच ते अमर आहेत.
ई. संतांच्या पुण्यतिथी
उदा. श्री ज्ञानेश्वर पुण्यतिथी. संतांच्या देहत्यागाचा दिवस साजरा करतात; कारण ते जन्माला येतात, तेव्हा बहुधा बाह्यतः केवळ सर्वसाधारण व्यक्ती किंवा साधक असतात. पुढे साधना करून ते संतपदाला पोहोचतात. देहत्यागानंतर ते उच्चलोकात जातात आणि त्यांचे कार्य आणखी वाढते; कारण देहासाठी आवश्यक असलेली शक्ती देह उरलेला नसल्याने कार्यासाठीच वापरली जाते. यासाठी त्यांच्या पुण्यस्मरणाचा दिवस म्हणून पुण्यतिथी साजरी करतात. सर्वसाधारण व्यक्तींच्या बाबतीत मात्र त्यांच्या मृत्यूदिनी श्राद्ध करणे आवश्यक असल्याने तो दिवस लक्षात ठेवतात.
उ. पौराणिक आणि ऐतिहासिक घटना
उदा. वटपौर्णिमा. या दिवशी सावित्रीने यमाला वादविवादात जिंकून पतीला पुन्हा जिवंत करून घेतले.
ऊ. आध्यात्मिक शिकवण
साधक, साधन आणि साध्य यांच्यात अद्वैत व्हावे, साधकाने परमेश्वराशी एकरूप व्हावे, हा साधनेचा एकमेव उद्देश असतो. त्या दृष्टीने एक टप्पा म्हणून साधनांतही ईश्वराचे रूप पहायला शिकण्याच्या दृष्टीने काही सण साजरे केले जातात, उदा.
१. शीतला सप्तमी
स्वयंपाकाच्या शेगडी, कढई, सांडशी वगैरे साधनांचा या दिवशी वापर न करता त्यांची पूजा केली जाते.
२. पोळा
या दिवशी शेतकरी बैल आणि नांगर यांची पूजा करतात.
३. विजयादशमी
प्रत्येक जण आपापल्या साधनांची पूजा करतो, उदा. शिंपी कात्री आणि शिलाई यंत्र यांची; विद्यार्थी अन् अभ्यासक त्यांच्या पुस्तकांची वगैरे.
४. लक्ष्मीपूजन
व्यापारी लोक तराजू आणि हिशोबाच्या वह्या यांची पूजा करतात, तसेच गृहिणी केरसुणीची पूजा करतात.
२. सण, धार्मिक उत्सव आणि व्रते यांच्यातील भेद
हा भेद स्पष्ट असा नाही; कारण काही सण हे धार्मिक उत्सव आणि व्रत म्हणूनही साजरे केले जातात, उदा. श्रीराम नवमी वैयक्तिकरित्या साजरी करतात, तेव्हा ‘सण’ असतो, समाजात एकत्रितपणे साजरी करतात, तेव्हा ‘उत्सव’ असतो आणि संकल्प सोडून वैयक्तिकरित्या करतात, तेव्हा ‘व्रत’ असते.
३. सण, उत्सव इत्यादींकडे केवळ रूढी म्हणून
पाहू नका, तर त्यांमागील गूढार्थ आणि शास्त्र लक्षात घ्या !
भारतात अनेक सण, उत्सव आणि परंपरा आहेत. बहुतांश जण त्यांकडे केवळ रूढी म्हणून पाहातात आणि त्या दृष्टीनेच साजरे करतात; त्यांच्या पाठीमागील गूढार्थ आणि शास्त्र लक्षात घेत नाहीत. गुढीपाडव्याला कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण करतात. ‘इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडुनिंबात त्या काळात जास्त प्रमाणात येणार्या प्रजापति-लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने कडुनिंबाचा प्रसाद ग्रहण केल्याने प्रजापति-लहरींचा लाभ अधिक होण्यास साहाय्य होते’, हे कडुनिंब ग्रहण करण्यामागील शास्त्र आहे. प्रादेशिकभिन्नता, लोकजीवन, उपासनेच्या पद्धती इत्यादींमुळे सण, उत्सव साजरे करतांना ठिकठिकाणच्या चालीरीतींत काही वेळा भेद आढळतो. शास्त्रीय आधार नसतांनाही केवळ पूर्वापार चालत आलेली लौकिक प्रथा म्हणून एखादी प्रथा साजरी करणे हे अयोग्य आहे. अशा लौकिक प्रथांना मूठमाती देऊन शास्त्रसंमत कृती करणेच आवश्यक असते. व्रतांविषयी त्यांच्यामागे एखाद्या उन्नतांचा संकल्प असतो, हेच त्यांच्यामागचे शास्त्रीय कारण होय.
0
Answer link
भारतामध्ये अनेक सण साजरे केले जातात आणि प्रत्येक सणाचे स्वतःचे महत्त्व आणि कारण आहे. काही प्रमुख सण आणि ते साजरे करण्यामागील कारणे:
-
दिवाळी:
- हा सण दिव्यांचा उत्सव आहे.
- राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परतले, त्या आनंदात हा सण साजरा केला जातो.
- दिवाळी अंधारावर प्रकाशाचा विजय आणि वाईटावर चांगल्याची मात दर्शवते.
-
होळी:
- होळी हा रंगांचा सण आहे.
- भक्त प्रल्हादाला होलिका नावाच्या राक्षसीणीने आगीत जाळण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद वाचले आणि होलिका जळून खाक झाली. या घटनेच्या स्मरणार्थ होळी साजरी करतात.
- हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
-
दसरा:
- दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
- या दिवशी, देवी दुर्गेने महिषासुराचा वध केला आणि प्रभू रामाने रावणाचा वध केला, म्हणून हा दिवस विजय दशमी म्हणून साजरा करतात.
-
गणेश चतुर्थी:
- गणेश चतुर्थी हा भगवान गणेशाच्या जन्माचा उत्सव आहे.
- गणेश हे बुद्धी, समृद्धी आणि সৌভাগ्याचे प्रतीक आहेत.
- हा सण १० दिवस चालतो आणि अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाने समाप्त होतो.
-
रक्षाबंधन:
- रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण आहे.
- बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिची रक्षा करण्याचे वचन देतो.
-
मकर संक्रांती:
- मकर संक्रांती हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा दिवस आहे.
- हा दिवस नवीन सुरुवात आणि सकारात्मक बदलांचा प्रतीक आहे.
- या दिवशी तीळ-गूळ वाटले जातात, ज्यामुळे नात्यांमध्ये गोडवा येतो.
याव्यतिरिक्त, भारतातील प्रत्येक प्रांतात आणि समुदायात विशिष्ट सण साजरे केले जातात, जे त्या विशिष्ट संस्कृती आणि परंपरांचे भाग आहेत.