संस्कृती सण आणि उत्सव

मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली?

2 उत्तरे
2 answers

मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली?

1


मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली 


दरवर्षी १४ जानेवारीला आपण मकर संक्रात साजरी करतो. आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात. १३ तारखेला भोगी, १४ तारखेला संक्रात आणि १५ तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते. संक्रांत म्हणजे संक्रमण. ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो. मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. मकरसंक्रांतीच्या दिवशी संक्रांतीदेवीने संकारसूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले, त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले. दुसरी एक कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी राक्षसांचा वध करून त्यांची मस्तकं मंदार पर्वतात पुरली. राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट आणि नकारात्मकता दूर झाली. म्हणूनच आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तीळगुळ घ्या गोड बोला असे म्हणतो. एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे. मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात. मकर राशीचा स्वामी शनीदेव आहे. म्हणूनच मकर राशीत प्रवेश केल्यावर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते.
मकर संक्रांतीला गंगा, गोदावरी, प्रयाग आदी पवित्र नदीत अंघोळ करण्याला विशेष महत्व आहे. सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते, तेच पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगासागरात स्नान केल्याने प्राप्त होते. अश्वमेध आणि वाजपेय यज्ञ करण्यासारखे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते.कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सगरपुत्रांना वाचवताना गंगा सागराला जावून मिळाली होती. याची एक कथा सांगितली जाते. सगर राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि विश्वविजयासाठी आपला घोडा सोडला. इंद्रदेवांनी त्या घोड्याला कपिलमुनींच्या आश्रमात बांधून ठेवले. सगरराजाचे साठ हजार पुत्र युद्धासाठी कपिल मुनींच्या आश्रमात गेले आणि त्यांना अपशब्द बोलले. 
कपिलमुनींनी क्रोधीत होवून त्यांना भस्म केले. तेव्हा राजा सगराचा नातू राजकुमार अंशुमन हा कपिल मुनींच्या आश्रमात गेला आणि त्याने मुनींची माफी मागून आपल्या काकांच्या उद्धाराचा मार्ग विचारला. तेव्हा कपिल मुनींनी सांगितले, गंगेला पृथ्वीवर आणावे लागेल.अंशुमनने कठोर तपश्चर्या केली आणि त्यातच आपले प्राण दिले. आपल्या आजोबांचे तप भगीरथ पुढे घेऊन गेला. हा भगीरथ राजा दिलीपचा मुलगा आणि अंशुमनचा नातू होता. भगीरथाच्या तपाने गंगा प्रसन्न होवून पृथ्वीवर आली पण तिच्या प्रचंड प्रवाहाने पृथ्वीवर हाहाकार मजला. तेव्हा भगीरथाने भगवान शंभोशंकराची तपश्चर्या केली. जेणेकरून महादेवांच्या जटेतून गंगेचे पाणी पृथ्वीवर प्रवाहित होईल. महादेवाने भगीरथाच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन त्याला इच्छित वरदान दिले. यानंतर गंगा महादेवाच्या केसात लीन होऊन पृथ्वीवर वाहत गेली. भगीरथाने गंगेला मार्ग दाखवला आणि गंगा कपिल मुनींच्या आश्रमात गेली. तिथे त्याचे पूर्वज मोक्षाची वाट पाहत होते. भगीरथाच्या पूर्वजांना गंगेच्या पवित्र पाण्याने वाचवले. त्यानंतर गंगा समुद्रात मिसळून गेली. ज्या दिवशी गंगा कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचली, तो दिवस मकर संक्रांतीचा दिवस होता. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केली जाते.




मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते. काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो. म्हणून संक्रातीदिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात. जानेवारी महिना म्हणजे थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली आहे. काहीजण म्हणतात काळा हा नकारात्मकतेचा रंग आहे. तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही पण संक्रातीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो. आता फक्त काळा कसा घालणार म्हणून त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात. म्हणजे फक्त काळा असे होत नाही तर त्यात दागिन्याच्या रुपात पांढरा रंग एकरुप होतो. शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणूनच तिळगुळ खाल्ला जातो.
प्रत्येक महिन्यांतच संक्रांत येत असते. म्हणजेच सूर्याचे एका राशीतून दुसर्‍या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो. हा एकमेव असा हिंदू सण आहे जो कॅलेंडरवर एकाच दिवशी येतो. त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते. तर अशी ही मकरसंक्रात नात्यांमध्ये गोडवा वाढवणारी.
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये।।
मकरसंक्रांन्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।
ज्याप्रमाणे मकर राशीत प्रवेश केल्यानंतर सुर्य देवाचे तेज वाढते त्याप्रमाणे ही मकर संक्रांत तुमचे यश, संपत्ती, आरोग्यरुपी तेज वाढवणारी ठरो, हीच आमच्याकडून शुभेच्छा…. तिळगुळ घ्या गोड गोड बोला !
उत्तर लिहिले · 13/1/2023
कर्म · 53710
0

मकर संक्रांती हा एक प्राचीन सण आहे, जो हजारो वर्षांपासून साजरा केला जातो. या सणाची सुरुवात नेमकी कधी झाली हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु काही पौराणिक कथा आणि ऐतिहासिक संदर्भानुसार याची माहिती मिळते.

पौराणिक कथा:

  • एका लोकप्रिय कथेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आपल्या पुत्र शनीला भेटायला त्याच्या घरी जातात. शनी मकर राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती म्हणतात. लोकमत

  • महाभारतातील भीष्म पितामह यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी देह त्याग केला, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. YOUTUBE

ऐतिहासिक संदर्भ:

  • मकर संक्रांतीचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. यावरून हा सण फार पूर्वीपासून चालत आलेला आहे, हे सिद्ध होते.

  • सिंधू संस्कृतीमध्येही सूर्यपूजेचे अवशेषFoundations, जे मकर संक्रांतीच्या परंपरेशी जोडले जाऊ शकतात.

त्यामुळे, मकर संक्रांतीची सुरुवात नेमकी कधी झाली हे सांगणे कठीण असले तरी, हा सण प्राचीन काळापासून चालत आलेला आहे आणि त्याचे धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पारशी धर्माचे लोक कोणते सण साजरे करतात?
पारशी धर्माचे लोक कोणकोणते सण उत्सव साजरे करतात?
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात?
दिवाळी सण कोणत्या महिन्यात येतो?
तुम्ही अनुभवलेले चैत्र तुमच्या शब्दात वर्णन करा?
तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत कसे कराल?