अध्यात्म अभंग

तुका म्हणे धन्य त्यांचा व्यभिचार, साधिलें अपार निजसुख, या अभंगाचा अर्थ सांगता येईल का?

2 उत्तरे
2 answers

तुका म्हणे धन्य त्यांचा व्यभिचार, साधिलें अपार निजसुख, या अभंगाचा अर्थ सांगता येईल का?

0
प्रस्तुत प्रश्नातील अभंगाच्या ओळी या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातील रास क्रीडा आणि कृष्णा लिलांचे भक्ती पुर्ण वर्णन करणाऱ्या ओळी आहेत.

गोकुळातील या गौळणी या पुराणातील श्रुती होत्या, सर्व देव हे गोपाळ होते आणि ऋषी मुनी हे पशु - पक्षी, वृक्ष - वल्ली होते. या सर्वांनी भगवान कृष्णा बरोबरच पृथ्वीवर अवतार धारण केला होता.

"तुका म्हणे धन्य त्यांचा व्यभिचार, साधिलें अपार निजसुख",

या शेवटच्या ओळी आहेत. त्या अभंगाच्या सुरवातीच्या ओळी काही अशा प्रकारे आहेत.

हरिअंगसंगे हरिरुप झाल्या । बोलो विसरल्या तया सुखा ||

व्याभिचारभावे भोगिले अनंता । वर्तोनि असता घराचारी ||

सकळा चोरोनि हरि जया चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्ये ||

उणे पुरे त्यांचे पडो नेदी कांही । राखे सर्वाठायी देव तया ।।

न कळे लाघव ब्रह्मादिकां माव । भक्तिभावे देव केला तैसा ||

तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार । साधिले अपार निजसुख ||

सदर अभंगाचा व्यवस्थित विवेचन केल्यास, सर्व गौळणी या कृष्णाच्या भक्तीरसात मध्ये एवढ्या डूबून गेल्या आहेत, की त्यांचे स्वतः चे काही अस्तित्व राहिले नाही. काया, वाचा, मने त्या भगवान श्रीकृष्णार्पण झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना भले - बरे, चांगले - वाईट असे काही कळत नाही. त्यांनी श्रीकृष्ण भक्तीचा जो अनुभव घेतला आहे, त्यामध्ये सर्व करता - धरता पृथ्वीचा पालन कर्ता तो एक जग्गजीवन आहे.

जे काय घडत आहे, ते फक्त भगवान श्रीकृष्णाच्या लीला मुळेच होत आहे, आणि तो सर्वव्यापी असल्याने प्रत्येक गोष्ट तोच करून घेत आहे. त्याच्या शिवाय वाऱ्याचे पान पण हलत नाही, त्यामुळे आम्ही जे काय करतो, ते प्रेम आणि भक्ती म्हणून करीत आहे. सर्व ब्रह्मामंडातील हालचाली त्याच्या मुळे होतात. आमच्या कडुन काही जरी घडले तर ती त्याची मर्जी आहे. याच संदर्भ देऊन संत जगद्गुरू तुकाराम महाराज सांगत आहे की व्यभिचार झाला तरी त्यातून कुठलेही कुकर्म न घडता, त्यातून पण आत्मिक सुख आणि स्वानंद मिळणार आहे.
उत्तर लिहिले · 22/4/2022
कर्म · 1850
0
sicher, मी तुम्हाला तुका म्हणे धन्य त्यांचा व्यभिचार, साधिलें अपार निजसुख अभंगाचा अर्थ सांगू शकेन.

अभंगाचा अर्थ:

या अभंगात, संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीने व्यभिचार केला आहे, म्हणजे वासना आणि मोह यांचा त्याग केला आहे, तो धन्य आहे. कारण त्याने स्वतःच्या आत्मिक सुखाचा मार्ग शोधला आहे.

विस्तृत अर्थ:

तुकाराम महाराज या अभंगात 'व्यभिचार' शब्दाचा उपयोग पारंपरिक अर्थाने करत नाहीत. येथे 'व्यभिचार' म्हणजे सांसारिक मोह, वासना, आणि क्षणिक सुखांच्या मागे धावणे. जेव्हा एखादी व्यक्ती या गोष्टींचा त्याग करते, तेव्हा ती स्वतःच्या आत्मिक सुखाच्या मार्गावर वाटचाल करते.

ज्या व्यक्तीने वासना आणि मोहांवर विजय मिळवला आहे, तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या 'स्व'ला ओळखतो आणि त्याला आत्मिक शांती मिळते. अशा व्यक्तीला बाह्य जगात नव्हे, तर स्वतःच्या आतच आनंद मिळतो.

तात्पर्य:

या अभंगातून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरा आनंद बाह्य वस्तूंमध्ये नाही, तर तो आपल्या आतच आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या वासना आणि मोहांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1420

Related Questions

वारकरी संप्रदायाचा आचारधर्म स्पष्ट करा?
मोक्षावर टीप लिहा?
विभूती ही नेहमीच प्रतिमारूप असते म्हणजे काय?
भगवान शंकर यांना भोळा सांब का म्हणतात?
माळकरी माणसाने नॉनव्हेज हॉटेल मध्ये जॉब करावा का?
आपल्याला गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्यात काय साम्य आढळते?
गोसावी लागणे म्हणजे काय?