मानसशास्त्र भावनिक नियंत्रण

रागीटपणा कसा कमी करावा?

3 उत्तरे
3 answers

रागीटपणा कसा कमी करावा?

3
 रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे ते म्हणजे स्वतः वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
आजकाल लोकांमध्ये रागीटपणा चे प्रमाण वाढले आहे. जर आपण देखील रागीट आहात व जर आपल्याला देखील राग लगेच येतो, तर याच्यावर उपाय करणे जरुरी आहे. हे आपल्या सुखी जीवनासाठी महत्वपूर्ण आहे. काही लोकांना एवढा राग येतो की त्यांना स्वतः वर नियंत्रण ठेवता येत नाही. ते रागाच्या भरात काहीही करतात, त्यांना इतर गोष्टींचा भान रहात नाही.

अति रागाचे दुष्परिणाम :

१) क्रोध एक सामान्य आणि जास्त करून स्वाथ्यप्रद मानवाच्या मनातील भावना आहे. रागावर आपण जर लगेच नियंत्रण केलेत तर ते चांगले आहे, जर आपण रागावर नियंत्रण नाही केलेत तर आपल्या समस्या वाढतात. त्या शारीरिक असो, मानसिक असो व भावनिक किंवा सामजिक अति रागामुळे काहीच समजत नाही आणि रागाच्य भरात आपण काहीही करून बसतो. आणि आपले स्वतःचे जास्त नुकसान होते.

२) अतिरागामुळे आपल्या जीवनातही नाही तर आपल्या आरोग्यावर देखील त्याचे वाईट परिणाम होतात. रागामुळे आपल्या हृदयाचे ठोके जोराने वाढतात, रक्तदाब मोठ्या प्रमाणत वाढते, तणाव वाढते हे त्याचे प्रारंभिक परिणाम आहेत.

३) श्वास घेण्याची प्रक्रिया जोराने होते, जेव्हा राग येतो तेंव्हा शरीर व मन विचलित होते. फक्त आपल्या आरोग्यावर नाही तर आपल्या इतर गुणवत्ते वर देखील प्रभाव पडतो.

४) रागामुळे आपल्याला खूप समस्यांना सामोरे जावे लागते, जसे हृदयविकाराचा झटका, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्वचे चे आजार , अनिद्रा, पचना संबंधी च्या समस्या, चिंता वाढणे, डोकेदुखी, उच्चरक्तदाब, नकारात्मक भावना निर्माण होते. राग आपली विचार करण्याची शक्ती कमी करतो अशावेळी स्वतःची चुकी असली तरी माणूस ती मानायला तयार नसतो तो नेहमी दुसऱ्याची चुकी शोधत असतो यामुळे अजून राग येतो.

रागावर नियंत्रण कसे करावे

१) जेंव्हा पण आपल्याला खूप राग येईल तेंव्हा मोठा श्वास घ्या व सोडा. जर आपण काही वेळासाठी असे केलेत तर आपला राग कमी होईल.


 

२) अशावेळी आपले डोळे बंद करा मोठा श्वास घ्या आणि आपल्या मनात काय चालेय त्याकडे लक्ष द्या.

३) आपल्यला माहित असेल श्वास तणाव दूर करते आणि मन शांत ठेवण्यास मदत करते, जर आपल्याला रात्री नीट झोप लागत नसेल तर हे देखील राग येण्याचे कारण असू शकते, म्हणून दररोज ८ तास झोपणे जरुरी आहे.

४) यामुळे आपले मन व शरीराला आराम भेटेल आणि आपली बैचैंनी कमी होईल, ज्यामुळे राग येणार नाही. झोपल्या मुळे आपल्या रागावर नियंत्रण राहते. तसेच आपण ध्यान (meditation) करा आपल्याला लाभ होईल, प्राणायम चा नियमित अभ्यास करा संतुलित आहार करा, जेंव्हा पण आपल्याला राग येईल तेंव्हा काहीतरी मनात ल्या मनात गुणगुणत जा अस केल्याने आपला राग शांत होईल.


उत्तर लिहिले · 7/3/2022
कर्म · 121765
0
कोणताही सण
उत्तर लिहिले · 7/3/2022
कर्म · 5
0
रागीटपणा कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

1. श्वासावर लक्ष केंद्रित करा:

जेव्हा तुम्हाला राग येतो, तेव्हा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने तुमचे मन शांत होते.

2. विश्रांती तंत्रे:

नियमितपणे विश्रांती तंत्रांचा सराव करा, जसे की ध्यान (meditation) आणि योगा.

3. शारीरिक व्यायाम:

शारीरिक हालचाल केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. नियमित व्यायाम करा.

4. संवाद:

आपल्या भावनांबद्दल इतरांशी मनमोकळेपणाने बोला. संवाद साधल्याने राग कमी होतो.

5. वेळेचे व्यवस्थापन:

कामांचे योग्य नियोजन करा आणि वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे ताण कमी होतो.

6. सकारात्मक विचार:

सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नकारात्मक विचार टाळा.

7. झोप:

पुरेशी झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिडेपणा वाढू शकतो.

8. संगीत ऐका:

संगीत ऐकल्याने मन शांत होते आणि राग कमी होतो.

9. छंद जोपासा:

आपल्या आवडीच्या गोष्टींमध्ये वेळ घालवा, जसे की चित्रकला, बागकाम किंवा लेखन.

10. समुपदेशन:

जर तुम्हाला स्वतःहून राग नियंत्रित करणे कठीण वाटत असेल, तर व्यावसायिक समुपदेशकाची मदत घ्या.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

रागासाठी काही उपाय आहे का?
रागावर नियंत्रण कसे करावे?
जर घरातील लोक एका क्षुल्लक गोष्टीवर ४५ मिनिटे व्याख्यान देत असतील व आपण काही बोललो तर विषय वाढत असेल, अशा वेळी स्थिती कशी संभाळावी? राग कसा नियंत्रित करावा?
मला छोट्या छोट्या गोष्टींचा खूप राग येतो?
कोणी माझ्या विरोधात, म्हणजेच मनाविरुद्ध वागल्यास मला लगेच राग येतो, मग मला रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावे लागेल?
माझ्या मनाविरुद्ध काहीतरी घडले की मी ती गोष्ट लगेच स्वीकारू शकत नाही. बहुतेक वेळा तरी माझाच मला राग येतो. ह्यावर काय करू शकतो?
मला अगदी किरकोळ गोष्टीवरून खूप राग येतो. एक जरी गोष्ट मनाविरुद्ध घडली ना की सगळा दिवस खराब जातो. काहीतरी उपाय सांगा सर?