5 उत्तरे
5 answers

राष्ट्रगीत कोणी लिहिले?

2
राष्ट्रगीत हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलेhttps://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%A3_%E0%A4%AE%E0%A4%A8
लिंक वर जाऊन तुम्हाला राष्ट्रगीताची सर्व माहिती मिळेल
उत्तर लिहिले · 9/10/2020
कर्म · 580
1
गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे. हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचलेले आहे.  याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे. भारतो भाग्यो बिधाता या रचनेला २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले.  राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला ५२ सेकंद वेळ लागतो. इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या कलकत्ता (आता कोलकाता ) अधिवेशनात सर्वप्रथम हे सार्वजनिकपणे गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा हिंदीतील भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.


जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.
उत्तर लिहिले · 11/10/2020
कर्म · 6750
0

भारताचे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे.

हे राष्ट्रगीत मूलतः बंगाली भाषेत 'जन गण मन' या नावाने लिहिले गेले.

राष्ट्रगीत प्रथम 27 डिसेंबर 1911 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले गेले.

24 जानेवारी 1950 रोजी 'जन गण मन' हे राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2220

Related Questions

अण्णा भाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगा?
अंत असते प्रारंभ हे पुस्तक वाचायचे आहे का?
ग्रंथ म्हणजे काय?
नवकाव्यांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा?
कथात्म साहित्य म्हणजे काय?
तुम्ही वाचलेल्या कोणत्याही एका दलित कथेचे थोडक्यात विवेचन करा?
झुंबर ही एकांकिका कोणत्या विषयावर आधारलेली आहे, थोडक्यात स्पष्ट करा?