
संगीतकार
1
Answer link
संगीतकाराचे कौशल्य ललित कला आणि ललित लेखन कला या दोन्ही क्षेत्रांमध्ये आपले स्थान अद्याप विशेष आहे. संगीतकार निर्माण करणार्या कलाकारांना ललित कलेचे नित्यजीवन कौशल्य आवडते. त्यांनी संगीताच्या विविध आवृत्तींवर त्यांच्या विकासात काम केले आहे. त्यांच्या संगीतकलेच्या अद्याप अभ्यासाची परिपूर्णता त्यांनी आता प्राप्त केली आहे.
ललित लेखन कला हे एक साधन आहे जेणेकरून लोकांना एकत्रित करण्याची क्षमता विकसित केली जाते. संगीतकारांना ललित लेखन कलेचे आवडते कारण त्यांनी अपने संगीताचे भावनात्मक अंश लोकांसमोर नेण्यास मदत करते. त्यांच्या संगीताच्या कवितांमध्ये, लेखनातील कला परिचित आहे, ज्यामुळे संगीतकार आणि लेखक योग्यतेत मिळतात.
ललित कला आणि लेखन कला यांचे स्वरूप वेगवेगळे असतात, परंतु त्यांचे स्वरूप सामाजिक परिस्थितीच्या परिणामांसह बदलतात. ललित कलेच्या कामात, आपल्या कौशल्यात आणि दृश्यात काळाचा महत्त्व आहे. त्यामुळे, संगीतकारांच्या समजावणीच्या प्रयत्नांमुळे त्यांना सामाजिक स्थितीत उंचाव आणि समाविष्टी मिळते. आणि लेखन कलेच्या कामात, समाजातील विविध समस्यांची उपेक्षा केली जाते आणि त्यांच्यामध्ये आपल्या भावना, दु:ख, आणि आदर्शांची अभिव्यक्ती केली जाते.
ललित कला आणि लेखन कला यांचे स्वरूप सामाजिक परिस्थितीमध्ये परिणत होत असतात. वेगवेगळे काळ, सांस्कृतिक मूल्ये, आणि समाजातील बदलत्या परिस्थितींमुळे हे दोन्ही क्षेत्रांचे स्वरूप बदलत असतात. परंतु, संगीतकार आणि लेखक यांच्या कौशल्यात, सामाजिक परिस्थितींच्या परिणामांमध्ये उत्तमी आणि सुसंगती सुनिश्चित करण्यात मदत करते. त्यांच्या कामामध्ये सामाजिक परिस्थितीच्या समस्या वाचा, सामाजिक अभिवृद्धीच्या प्रेरणात्मक असतात आणि लोकांना स्थायी प्रेरणा आणि सुगमता प्रदान करतात.
2
Answer link
जागतिक संगीत क्षेत्रात ज्या अत्यंत प्रभावी संगीत पद्धती मानल्या जातात . त्यामध्ये पाश्चात्य संगीतास मानाचे स्थान द्यावे लागेल. भारतीय संगीत जागतिक संगीताच्या तुलनेत सर्व श्रेष्ठ संगीत म्हणून ओळखले जाते . संगीतातील राग पद्धती हि एक अतुलनीय व अजोड अशी स्वरांची किमया आहे. परंतु अशा प्रकारचे राग्पद्धतीवर आधारित संगीत भारतातच वापरले जाते . त्या तुलनेने विचार केला तर पाश्चात्य संगीत व पाश्चात्य स्वर लेखन यांचा प्रचार जगाच्या पाठीवर फार मोठ्या प्रमाणात आहे . भारतावर इंग्रजांनी जवळजवळ दीडशे वर्षे केले. त्यांच्या राहणीचा , आचार-विचाराचा ,एकूण पाश्चात्य संस्कृतीचा परिणाम भारतीय जीवनावर झालेला येतो. परंतु भारतीय संगीतावर मात्र पाश्चात्य संगीताचा तसा कोणताही परिणाम झाला नाही . भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा याही कालखंडात स्वच्छ व निर्मल राहिली . मात्र अलीकडे लोकप्रिय झालेल्या हिंदी चित्रपट (काही अंशी मराठी चित्रपट पण ) संगीतावर या पाश्चात्य संगीताचा प्रभाव पडला असून , त्या संगीत रचनात हार्मनीवर आधारलेली रचना , तशाच स्वरूपाचे वाद्य मेळ यांचा सर्रास वापर केला जातो. काही मराठी गाणी तर अशा पाश्चात्य स्वर रचनेमुळे हास्यास्पद वाटतात .
हार्मनी : पाश्चात्य संगीतात सामुहिक गायन किंवा सामुहिक वादन याला प्राधान्य दिले जाते . त्यामुळे त्यांच्या सर्व संगीताची उभारणी वृंदवादन किंवा वृंदगान याला उपयुक्त अशी असते . हार्मनी हा पाश्चात्य संगीताचा प्राणभूत आधार आहे. हार्मनी म्हणजे स्वरमेळ . दोन किंवा दोनपेक्षा अधिक स्वर एकाच वेळी वाजवणे या क्रियेला हार्मनी किंवा स्वरमेळ म्हणतात .
मेलोडी: मेलोडी म्हणजे एकापुढे एक स्वर, स्वरसंगीताने घेऊन एक एक स्वराचा आकर्षक आविष्कार करीत संगीत बांधायचे . मेलोडी म्हणजेच स्वरसंगती होय .
स्केल्स : पाश्चात्य संगीतातील स्केलचा विचार करण्यापूर्वी पाश्चात्य संगीताबाबत एक महत्वाची गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे ती म्हणजे पाश्चात्य संगीतात सा हा स्वर निश्चित असतो . आवाजाच्या चढ -उताराची मानवी कंठाची क्षमता व्यक्ती व्यक्ती प्रमाणे भिन्न असल्याने भारतीय संगीतात स या स्वराचे स्थान निश्चित नाही . कोणाचा पांढरी एक हा सा असेल तर कोणाचा काळी एक हा सा असेल. पाश्चात्य संगीत प्रधान गायन-वादन (आर्क्रेस्टा )असल्याने , त्यांनी सा हा स्वर निश्चित केला आहे . पियानो हे पाश्चात्य संगीताचे आधारभूत वाद्य आहे. या वाद्यावरील सर्व पांढऱ्या पट्या शुद्ध स्वरांच्या व सर्व काळ्या पट्या विकृत स्वरांच्या मानल्या गेल्या आहेत . पियानोवरील पांढरी एक हा स्वर सप्तकातील सा मानला असून तो निश्चित केला गेला आहे . त्याची कंपनसंख्या पण २४०हि निश्चित केली आहे . पाश्चात्य संगीतात या सा स्वरालाच फक्त सा म्हणतात .
कार्ड्स : पाश्चात्य संगीत रचनेत स्केल्स प्रमाणे कार्ड्स चा उपयोग केला जात असल्याने कार्ड्स प्रकार हाही पाश्चात्य संगीताचा आधार मानला जातो . भारतीय संगीतात हा प्रकार नाही . भारतीय संगीतात सा -मम किंवा सा -प असे स्वरसंवाद आहेत . उलट पाश्चात्य संगीतात कार्ड्स प्रकारात अनेक विसंगत स्वर एकत्र आणून एक वैचित्र्यपूर्ण पण आकर्षक स्वर रचना केली जाते . उदा . ध सा ग , सा ग प या दोन कार्ड्स वर आधारित आहे .
भारतीय संगीतात शेकडो राग -रचना आहेत . तर पाश्चिमात्य संगीतात शेकडो कार्ड्स असून अशा अनेक कार्ड्सनी पाश्चात्य संगीत समृद्ध बनवले आहे .
0
Answer link
संगीताच्या तालाच्या आवर्तनाच्या आरंभ बिंदूला सम म्हणतात.
सम म्हणजे काय? सम म्हणजे तालातील पहिले beat (beat cycle). भारतीय शास्त्रीय संगीतात, सम हे लय आणि तालाचे चक्रातील सर्वात महत्वाचे स्थान आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
0
Answer link
ठराविक स्वरांचा चढता (आरोही) किंवा उतरता (अवरोही) क्रम म्हणजे 'स्वरसप्तक'. स्वर म्हणजे एका ठराविक स्थिर कंपनसंख्येचा ध्वनी. भारतीय संगीतात षड्ज (सा), ऋषभ (रे), गांधार (ग), मध्यम (म), पंचम (प), धैवत (ध) आणि निषाद (नी) असे सात मूळ स्वर (सप्तक) मानले गेले आहेत.
3
Answer link
टिव्हीवर आपण हिरो, दुसऱ्या देशातील गायक हे गिटार वाजवत गाणे म्हणताना आपल्याला जास्त दाखवले जाते. तसेच फोटो शूट करताना गिटार हातात घेऊन फोटो काढतात. म्हणून तरुणाईत गिटारची खूप क्रेझ आहे. पण गिटार हे एक उत्कृष्ट वाद्य आहे, फक्त आपल्याला ते वाजवता आले पाहिजे.
3
Answer link
व्हायोलिन एक तंतुवाद्य (तारवाद्य) आहे. सर्व रसांमध्ये वाजविले जाणारे 'व्हायोलिन' हे एकमेव वाद्य आहे, असे विख्यात व्हायोलिनवादक मोठ्या आत्मविश्वासाने सांगतात. व्हायोलिनलाच फिडल म्हणतात. भारतात या वाद्याला बेला हे नाव आहे..
चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार्ली चापलिन यांच्या सर्व चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिले गेले आहे. मोहब्बते या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने व्हायोलिनचा उपयोग प्रेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी केला आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये व्हायोलिन वापरले आहे. आनंद, दुःख, गंभीरता, शांतता, मनाची द्विधावस्था इत्यादी सर्व प्रकारांत व्हायोलिन वाजवून वातावरण निर्मिती केली जाते. साथ-संगतीसाठीही इतर वाद्यांबरोबर व्हायोलिनचे वादन केले जाते.
भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्त्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरुन गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता.
चित्रपट, नाटक, शास्त्रीय संगीताची मैफल, लोकगीते यांमध्ये 'व्हायोलिन'चा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. चार्ली चापलिन यांच्या सर्व चित्रपटांना व्हायोलिनचा वापर करून पार्श्वसंगीत दिले गेले आहे. मोहब्बते या हिंदी चित्रपटात शाहरुख खानने व्हायोलिनचा उपयोग प्रेमाची वातावरण निर्मिती करण्यासाठी केला आहे. ऋषी कपूर, राज कपूर यांनी देखील आपल्या गीतांमध्ये व्हायोलिन वापरले आहे. आनंद, दुःख, गंभीरता, शांतता, मनाची द्विधावस्था इत्यादी सर्व प्रकारांत व्हायोलिन वाजवून वातावरण निर्मिती केली जाते. साथ-संगतीसाठीही इतर वाद्यांबरोबर व्हायोलिनचे वादन केले जाते.
भारतीय वाद्यसंगीत परंपरेत तंतुवाद्यांना खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार तंतुवाद्याचे तारा छेडून वाजवावयाची वाद्ये व गजाने वाजवावयाची वाद्ये, असे दोन प्रकार अस्तित्त्वात आहेत. भारतामध्ये व्हायोलिनची प्राचीन जातकुळी सांगणारी वीणाकुंजू, पुल्सुवन, केंदू, पेना, बेनाम, किन्नरी, रावणहट्टा ही तंतुवाद्ये आहेत, असे मानले जाते. व्हायोलिन हे वाद्य भारतीय नाही. जरी ते परकीय असले, तरी आज देशामध्ये मैफलीच्या मध्यभागी विराजमान झालेले ते वाद्य आहे. वरील वाद्ये व्हायोलिनप्रमाणेच उलटी धरुन गजाने वाजविली जातात. या वाद्यांचा वापर अभिजात शास्त्रीय संगीतात आढळत नाही. त्यांचा विशेष वापर लोकसंगीतात होत होता.