संभाजी महाराज ऐतिहासिक कथा इतिहास

थोरल्या राणी सरकार हे पात्र खरे आहे का? संभाजी महाराज यांना बदनाम का केले?

2 उत्तरे
2 answers

थोरल्या राणी सरकार हे पात्र खरे आहे का? संभाजी महाराज यांना बदनाम का केले?

2
 थोरांताची कमळा 



_काय आहे खरा इतिहास_



__________________________
http://bit.ly/3sV0clE
छ. संभाजी महाराजाना बदनाम करण्यात अनेक नतद्रष्ट लोकांचा हात होता.त्यापैकीच एक "थोंराताची कमळा" हे पात्र रंगवुन संभाजी महाराजाना ते किती स्त्रीलंपट नादावलेले होते हे अनेक पुस्तकात रंगविले गेले,त्याला नाटक व चित्रपटानी हातभार लावुन छ.संभाजी महाराज यांची आधिकच बदनामी करण्यात आली.मला अजूनही प्रश्न पडते की,शिवभक्त असणाऱ्या चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांंनी या बदनाम विषयावर चित्रपट काढलाच कसा? त्यांना छ. संभाजी महाराज व कमळा हे पात्र खरे घडले असेल असे वाटुन त्यांनी तो "थोंराताची कमळा" हा चित्रपट काढला असावा.परंतु कथा कादंबरी,नाटकवा चित्रपट म्हणजे इतिहास नव्हे.यामुळे लोकांना कुजबुजायला विषय मिळाला.म्हणुन आपण खरा इतिहास पाहणार आहोत.
पन्हाळयाजवळ आपटी या गावात एक थडगे आहे.ते थडगे कथित कमळा थोरात हिचे आहे,असेच आजपर्यंत सांगितले गेले.व लोकही ते खरे मानत गेले.यामुळे गेल्या पिढिकडुन दुसरया पिढिकडे हा बदनाम इतिहास असाच सांगितला गेला.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,पन्हाळ्याचे सुप्रसिध्द इतिहास संशोधक श्री. मु.गो.गुळवणी यांनी खरा इतिहास शोधुन काढून छत्रपती संभाजी महाराजाच्या चरित्रावर वाढलेले बांडगुळ मुळापासून उपटून टाकलेआहे.आपटी गावाच्या दक्षिणेस अर्ध्या मैलावर शेतरानात ही तथाकथित थोरातांच्या कमळेची समाधी उभी आहे.प्रथम गुळवणी यांनी तहसील कचेरीत या शेताची व त्यावरील या वास्तुची नोंद काय आहे, याचा तपास काढला, ती नोंद अशी मिळाली. "सर्व्हे नंबर १९७,क्षेत्र १एकर १५गुंठे,खराब ३गुंठे, आकार तीन रूपये चार आणे. जमिनीचे वहिवाटदार श्री आप्पा धोंडी कदम. ३ गुंठे खराब जमिनीत ही ऐतिहासिक वास्तु आहे. तिला कागदोपत्री थोरातांचे थडगे असे नोंदलेले आहे.
तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की कोणा एका इतिहासकालीन थोरात नामक व्यक्तिची ही समाधी आहे. 'कमळे'चा उल्लेख कागदोपत्री नव्हता. पण तो कागदोपत्री नव्हता म्हणून ते थोरातांच्या कमळेचे मंदिर नव्हते, असे विधान करणे धाडसाचे ठरले असते. आता दुसरा प्रश्न होता की, हे कुणा 'थोराताचे' थडगे आहे? हे समजायला मार्ग नव्हता.यासाठी त्यांनी अनेक मोडी लिपितले कागद तपासले मग ऐतिहासिक कागदपत्रांचा मागोवा घेत असताना त्यांना कै वि का राजवाडे यांनी संपादित केलेल्या ,'मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३' या साधन ग्रंथात जिवाजी बिन शिदोजी थोरात यांचा करीना सापडला आणि मग या थोरातांच्या थडग्याचे कोडे उलगडत गेले.!
पेशवा बाळाजी विश्वनाथ हा दिल्लीच्या मोहिमेवरून परतल्यानंतर त्यास शाहु महाराजांनी करवीर राज्याच्या स्वारीवर पाठविले. यावेळी यशवंतराव विजापुर प्रांती कामगिरीवर होता.त्यास बाळाजीच्या स्वारीची वार्ता समजताच तो वारणेच्या प्रदेशात आला. पुढे काय झाले हे करीना सांगतो,
"येसबा(यशवंतराव)अष्टेस आले.तंव पुढे रावप्रधान फौजा घेऊन दुसरे रोजी अष्टेस गाठ घालावी या विचारे निघोन आले. हे वर्तमान येसबास कळताच रातोरात ठाणेत काही लोक ठेऊन पन्हाळेत मुले माणसे घेऊन गेले...तेथून (बाळाजीचे) लष्कर जाऊन कोल्हापुरास वेढा घातला . एक रोज पन्हाळ्यावर चालोन येत असता येसबाचे फौजेस गाठ पडली,युध्द जाहले.येसबास भाला लागला, तेच जखमेने मृत्यु पावले. आपले तीर्थरूप (सिदोजी)आपले जमावानिशी जवळच होते.येसबाचे पोटी संतान नाही.धाकटे भाऊ चौघे होते. ती लहान मुले त्यांची मातोश्री सईजीआवा होती.नायकीचा आव पडे ऐसे कोणी नव्हते आणि विठोजी चव्हाण यांसी दावा लागला असे, ऐसी संधी पडली.येसबाची बायको गोडाबाई होती तिने सहगमन केले.ते समयी घोडी व बिध्णत होती ती कर्जदारास व लोकांस देऊ लागली. मग ते समयी सर्वांनी विचार केला की या नायकीस आव शिदोजी थोरात यांनी घालावा. लोकांचा दिलासा करून कर्जदारांचा हवाला घ्यावा आणि हे नायकी थोर आहे, बुडवू नये. ऐेसे समस्तांनी शिदोजीबाबास सांगुन उभे केले. तेव्हा यांनी गोडाबाईपाशी जाऊन अवघे लोकांची व कर्जदारांची निराशा केली त्यावर गोडाबाईंनी अग्नीप्रवेश केला.(म्हणजे सती गेली)
पन्हाळ्याच्या पायथ्याशी जिथे ही घटना घडली तिथे थोरात घराण्यातील लोकांनी वीर यशवंतराव व सती गोडाबाई यांचे संयुक्त समाधी मंदिर उभारले आणि गाभाऱ्यात स्त्रीपुरूषाची पाषाण मुर्ती उभारली.ही मुर्ती ढाल,तलवार आदि शस्त्रांनी सज्ज दाखविली आहे. मंदिर घुमटाकार असुन काळया पाषाणात आहे.आपले पुर्वज शिक्षित नव्हते काही लिहुन ठेवत नव्हते म्हणुन खरा इतिहास दबला गेला,व छ. संभाजी महाराज यांच्या वर बदनामीचा शिक्का बसला.श्री गुळवणी यांनी हे बहुमोल संशोधन केले नसते तर अजुन किती वर्षे ही बदनामी होत राहिली असती कुणास ठाऊक.तर असे हे "थोरांताची कमळा" चा खरा इतिहास आहे.
अनिल पाटील,पेठवडगाव
9890875498
0

थोरल्या राणी सरकार हे पात्र:

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत थोरल्या राणी सरकार (सोयराबाई) हे पात्र दाखवण्यात आले आहे. इतिहासानुसार, सोयराबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मातोश्री होत्या. मालिकेत त्यांचे नकारात्मक चित्रण करण्यात आले असले, तरी त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्व होत्या.

संभाजी महाराज यांना बदनाम का केले?

संभाजी महाराजांना बदनाम करण्याचे अनेक प्रयत्न इतिहासात झाले. काही ठिकाणी त्यांच्याबद्दल चुकीच्या कथा व माहिती पसरवण्यात आली. ह्यामागे अनेक कारणे असू शकतात:

  • राजकीय कारणे: संभाजी महाराजांच्या निधनानंतर, त्यांच्या विरोधकांनी त्यांच्याबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्यांचे राज्य दुर्बळ व्हावे.
  • सामाजिक कारणे: काही लोकांच्या मनात संभाजी महाराजांबद्दल गैरसमज निर्माण झाले, ज्यामुळे समाजात चुकीच्या कल्पना पसरल्या.
  • इतिहासलेखनातील त्रुटी: काही इतिहासकारांनी तत्कालीन उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर लेखन केले, ज्यामुळे काही ठिकाणी चुकीची माहिती नमूद झाली.

आजकाल, अनेक इतिहासकार आणि अभ्यासक संभाजी महाराजांच्या जीवनातील सत्य घटना आणि त्यांचे योगदान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1420

Related Questions

सामाजिक सांस्कृतिक इतिहास लेखन पद्धत सविस्तर लिहा?
कालगणना पद्धती ही संकल्पना सविस्तर लिहा?
कालगणना पद्धती संकल्पना स्पष्टीकरण लिहा?
सामाजिक व सांस्कृतिक इतिहास लेखन पद्धत सविस्तर लिहा?
इतिहासाच्या साधनांचे बदलते स्वरूप थोडक्यात लिहा?
इतिहासाच्या अभ्यासाचे प्रयोजन काय याविषयी थोडक्यात माहिती लिहा?
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?