2 उत्तरे
2
answers
विलगीकरण आणि अलगीकरणमधील फरक काय आहे?
0
Answer link
*🤔काय आहे विलगीकरण आणि अलगीकरणमधील फरक?*
*🔰📶महा डिजी । माहिती*
💁♀️करोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर अलगीकरण विलगीकरण हे शब्द अनेकांच्या नव्यानं कानावर पडायला लागले.
*👉अलगीकरण (क्वारंटाइन) कक्ष* म्हणजे जेथे संशयित रुग्णांना १४ दिवसांसाठी वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवले जाते. येथे मास्कपासून, जेवण, वायफाय, औषधांसह सर्व सुविधा रुग्णालयात पुरविल्या जातात.
👉संशयितांना या दिवसात करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने *विलगीकरण (आयसोलेशन)* कक्षामध्ये ठेवले जाते. संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक काळजी म्हणून त्यांना वॉर्डमध्ये ठेवले जाते.
👉करोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णांपासून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. देशात परतल्यापासून १४ दिवसांनंतर कोणतीही लक्षणे न आढळल्यास आणि चाचणी नकारात्म्क आल्यास या रुग्णांना घरी सोडले जाते.
*👉विलगीकरण कक्ष* म्हणजे जेथे करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असते अशा रुग्णांना स्वतंत्र ठेवले जाते. करोनाच्या संसर्गावर सध्या औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे दिली जातात.
👉रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून सर्वच कर्मचारी कक्षामध्ये जाताना विशेष काळजी घेतात. अलगीकरण आणि विलगीकरण हे पूर्णपणे वेगवेगळे वॉर्ड असतात. यातील रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही, याची काळजी घेतली जाते.
👉राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले असून ५०२ खाटा उपलब्ध केल्या आहेत. बाधित देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
🦠 *करोना* हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. हा विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असली तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.
*🧐‘करोना’चा संसर्ग कसा होतो?*
👉रुग्ण खोकल्यावर हवेत उडालेल्या तुषारामध्ये करोनाचे विषाणू असतात. ही विषाणूयुक्त हवा श्वसनावाटे घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते प्रवेश करू शकतात.
👉रुग्णाच्या खोकल्यातून उडालेले तुषार करोनाच्या विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यास ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर हे हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास तर ते श्वसनमार्गातून जाऊन संसर्ग होतो.
*👀कशी होते करोनाची चाचणी?*
👉ही चाचणी करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या कापसाच्या बोळ्यांचा वापर केला जातो. हा बोळा घशाच्या मागच्या भागातून आणि नाकपुडीतून फिरवला जातो.
👉घशातील याच ठिकाणी अधिक प्रमाणात विषाणू असण्याचा संभव असतो. हा बोळा नंतर तपासणीसाठी पाठविला जातो.
*🤔चाचणीची गरज कोणाला?*
👉सध्या मुंबई, पुणे आणि नागपूर येथे करोनाची चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. बाधित देशातून आलेल्या आणि करोनाची लक्षणे आढळलेल्या प्रवाशांनी तातडीने जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधून चाचणी करणे गरजेचे आहे.
👉याव्यतिरिक्त करोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाधित देशातून प्रवास न केलेल्या आणि करोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात न आलेल्या व्यक्तींनी सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास करोनाची बाधा झाली असेल या भीतीने चाचणी करण्यासाठी जाऊ नये.
*😳सर्वाधिक धोका कुणाला?*
👉ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला, मूत्रपिंडाचे विकार, कर्करुग्ण ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा रुग्णांमध्ये संसर्गाचे स्वरूप गंभीर होण्याचा संभव असतो.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
*🔰📶महा डिजी । माहिती*
💁♀️करोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर अलगीकरण विलगीकरण हे शब्द अनेकांच्या नव्यानं कानावर पडायला लागले.
*👉अलगीकरण (क्वारंटाइन) कक्ष* म्हणजे जेथे संशयित रुग्णांना १४ दिवसांसाठी वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवले जाते. येथे मास्कपासून, जेवण, वायफाय, औषधांसह सर्व सुविधा रुग्णालयात पुरविल्या जातात.
👉संशयितांना या दिवसात करोनाची लक्षणे आढळल्यास तातडीने *विलगीकरण (आयसोलेशन)* कक्षामध्ये ठेवले जाते. संशयित रुग्णांपासून इतरांना संसर्ग पसरू नये म्हणून प्रतिबंधात्मक काळजी म्हणून त्यांना वॉर्डमध्ये ठेवले जाते.
👉करोनाबाधित रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णांपासून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता नसते. देशात परतल्यापासून १४ दिवसांनंतर कोणतीही लक्षणे न आढळल्यास आणि चाचणी नकारात्म्क आल्यास या रुग्णांना घरी सोडले जाते.
*👉विलगीकरण कक्ष* म्हणजे जेथे करोनाचा संसर्ग झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले असते अशा रुग्णांना स्वतंत्र ठेवले जाते. करोनाच्या संसर्गावर सध्या औषधे उपलब्ध नसल्याने त्यांना सर्दी, खोकला, ताप यावरील औषधे दिली जातात.
👉रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून सर्वच कर्मचारी कक्षामध्ये जाताना विशेष काळजी घेतात. अलगीकरण आणि विलगीकरण हे पूर्णपणे वेगवेगळे वॉर्ड असतात. यातील रुग्णांचा एकमेकांशी संबंध येणार नाही, याची काळजी घेतली जाते.
👉राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू केले असून ५०२ खाटा उपलब्ध केल्या आहेत. बाधित देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
🦠 *करोना* हे विषाणूच्या एका समूहाचे नाव असून माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये आढळतो. हा विषाणू यापूर्वी माणसामध्ये आढळलेल्या सहा-सात विषाणूंपेक्षा वेगळा आहे. म्हणून याला नोवेल करोना विषाणू असे म्हटले आहे. या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असली तरी यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे.
*🧐‘करोना’चा संसर्ग कसा होतो?*
👉रुग्ण खोकल्यावर हवेत उडालेल्या तुषारामध्ये करोनाचे विषाणू असतात. ही विषाणूयुक्त हवा श्वसनावाटे घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते प्रवेश करू शकतात.
👉रुग्णाच्या खोकल्यातून उडालेले तुषार करोनाच्या विषाणूंसह आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्या वस्तूंना आपल्या हाताचा स्पर्श झाल्यास ते विषाणू हातांना चिकटतात. त्यानंतर हे हात चेहऱ्याला किंवा नाकाला लावल्यास तर ते श्वसनमार्गातून जाऊन संसर्ग होतो.
*👀कशी होते करोनाची चाचणी?*
👉ही चाचणी करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या कापसाच्या बोळ्यांचा वापर केला जातो. हा बोळा घशाच्या मागच्या भागातून आणि नाकपुडीतून फिरवला जातो.
👉घशातील याच ठिकाणी अधिक प्रमाणात विषाणू असण्याचा संभव असतो. हा बोळा नंतर तपासणीसाठी पाठविला जातो.
*🤔चाचणीची गरज कोणाला?*
👉सध्या मुंबई, पुणे आणि नागपूर येथे करोनाची चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. बाधित देशातून आलेल्या आणि करोनाची लक्षणे आढळलेल्या प्रवाशांनी तातडीने जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क साधून चाचणी करणे गरजेचे आहे.
👉याव्यतिरिक्त करोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे बाधित देशातून प्रवास न केलेल्या आणि करोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात न आलेल्या व्यक्तींनी सर्दी, खोकला यासारखी लक्षणे आढळल्यास करोनाची बाधा झाली असेल या भीतीने चाचणी करण्यासाठी जाऊ नये.
*😳सर्वाधिक धोका कुणाला?*
👉ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, मधुमेहाचे रुग्ण, गर्भवती महिला, मूत्रपिंडाचे विकार, कर्करुग्ण ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, अशा रुग्णांमध्ये संसर्गाचे स्वरूप गंभीर होण्याचा संभव असतो.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
0
Answer link
isolating (विलगीकरण) आणि quarantine (अलगीकरण) मध्ये काय फरक आहे ते येथे स्पष्ट केले आहे:
विलगीकरण (Isolation):
- जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या संक्रामक रोगाने आजारी असते, तेव्हा त्या व्यक्तीला इतरांपासून दूर ठेवणे म्हणजे विलगीकरण.
- याचा उद्देश रोग फैलावणे थांबवणे हा असतो.
- विलगीकरण हे रुग्णालयात किंवा घरी केले जाऊ शकते.
अलगीकरण (Quarantine):
- जेव्हा एखादी व्यक्ती संक्रामक रोगाच्या संपर्कात आलेली असते, परंतु अजून आजारी नसते, तेव्हा त्या व्यक्तीला इतरांपासून दूर ठेवणे म्हणजे अलगीकरण.
- याचा उद्देश रोगाची लक्षणे दिसू लागल्यास त्याचा फैलाव रोखणे हा असतो.
- अलगीकरण साधारणतः 14 दिवसांसाठी केले जाते, कारण बहुतेक रोगांची लक्षणे ह्या काळात दिसू लागतात.
मुख्य फरक:
- विलगीकरण आजारी लोकांसाठी आहे, तर अलगीकरण संभाव्य संक्रमित लोकांसाठी.