Topic icon

शब्दाचा अर्थ

1
ज्ञान संपादन ही प्रक्रिया आहे ज्याद्वारे समस्या सोडवण्याचे कौशल्य काही ज्ञान स्त्रोतांकडून, सामान्यत: डोमेन तज्ञाकडून प्राप्त केले जाते . हे ज्ञान नंतर एखाद्या तज्ञ प्रणाली कार्यक्रमात लागू केले जाऊ शकते जे मानवी तज्ञ उपलब्ध नसताना आणि कोठे नसलेल्या तज्ञांना तज्ञ सहाय्य प्रदान करू शकते.
एकंदरीत प्रत्येक व्यक्ती, तिची ज्ञानेंद्रिये, तिचा सांस्कृतिक ठेवा व व्यक्तिगत अनुभव आणि स्वतःची बोधनिकप्रक्रिया – विचारप्रक्रिया, निर्णयप्रक्रिया, समस्या निवारणप्रक्रिया इ. – इत्यादींचा उपयोग करून ज्ञान-संपादन करीत असते.
उत्तर लिहिले · 18/3/2023
कर्म · 48335
0
स्वयं अध्ययन म्हणजे क्लासेस न लावताश ; शाळा ,कॉलेज रेगूलर न करता घरच्या घरीच स्वतःच पुस्तकांच्या माध्यमातून अभ्यास करणे होय. बरीच विद्यार्थी अनेक कारणांमुळे स्वयं अध्ययन करतात. ते मोठे अधिकारी सुद्धा होतात. आता तर या कोरोनाच्या काळात सर्वचजण स्वयं अध्ययन करत आहेत.
उत्तर लिहिले · 9/3/2023
कर्म · 48335
0
ताम्रपट हा तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला मजकूर असतो.



इसवीसन पूर्व तिसऱ्या शतकातील सोघौरा येथील ताम्रपट
यावर प्रामुख्याने दानपत्रे आणि राजाज्ञा तसेच इतर दूरगामी आज्ञा कोरून ठेवण्याची प्रथा दिसून येते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने भारतीय क्रांतिकारकांना त्यांच्या बलिदानाच्या गौरवार्थ ताम्रपट दिले होते.
उत्तर लिहिले · 8/3/2023
कर्म · 48335
0
कथा म्हणजे काय 

कथेत घटना असतात. या घटनांना एखादया सूत्रानुसार गुंफण्यासाठी कथानक असते. कथा पात्रे असतात. वास्तविक माणसांचेच पात्र चित्रित असते. वास्तवातली जशीलाशी वागणे, माणसेच पात्रे सुद्धा तंत्राशी वागतात. ती तंत्राशी

अध्याय 3: कथा-साहित्यप्र-परिचय- क्रिया (२)
वास्तविक माणसांचेच पात्र चित्रित असते. वास्तवातली जशीलाशी वागणे, माणसेच पात्रे सुद्धा तंत्राशी वागतात. ती तंत्राशी भांडतात. फक्त मदत करतात. फक्तवर प्रेम करतात. राग, लोभ, प्रेम, असूया, दया, सहानुभूती भावभावना वास्तवातल्या माणसांमध्ये असतात. तशाचभावना पात्रांमध्ये असतात. पात्रांच्या मुळाशी वागण्यातून घडलेली घटना. तसेच, कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ पहाही चित्रण केलेले असते. कथेच्या विषयानुसार वातावरण असते. पात्रांचे परस्परांशी वागणे, संघर्ष, संघर्ष निर्माण होते. या सर्व घटकांनी अशी रचना तयार केली होती. तिला समर्पक शीर्षकाची कथा पूर्ण होती.
उत्तर लिहिले · 8/3/2023
कर्म · 48335
1
आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
नागरिकत्वाची रंजक गोष्ट:जर देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती असतील तर दुसरे, तिसरे आणि चौथे कोण? तुमचा नंबर कितवा?
मयुरी वाशिंबे3 महिन्यांपूर्वी

मी भारताचा नागरिक आहे...असे आपण अगदी सहज म्हणतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की भारताचा दुसरा, तिसरा, चौथा... नागरिक कोण आहे? आणि तुमचा नंबर कितवा आहे. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. हे लहानपणापासून पुस्तकांतून शिकवले जाते.


जर राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतील तर यानुसार तुमचा कितवा नंबर लागतो? देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. चला तर तुमचा कितवा नंबर लागतो ते जाणून घेऊया...

संविधानानुसार विचार केला तर प्रत्येक सामान्य नागरिक हा भारतातील 27व्या क्रमांकावरील नागरिक असतो. कारण, तरतुदीनुसार पहिल्या 26 क्रमांकांवर भारतातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपती देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करतात. सध्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. त्या भारताच्या पहिल्या नागरिक आहेत. तर उपराष्ट्रपतींना देशाचा द्वितीय नागरिक म्हटले जाते. सध्या भारताचे उपाध्यक्ष जगदीप धनखड आहेत. अशा प्रकारे ते देशाचे दुसरे नागरिक आहेत.

भारतात देशाच्या पंतप्रधानांना देशाचा तृतीय नागरिक म्हटले जाते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनंतर देशाचे पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती तिसरा नागरिक असते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत. त्यामुळे ते भारताचे तिसरे नागरिक बनले आहेत.


नागरिकत्वाची रंजक गोष्ट:जर देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती असतील तर दुसरे, तिसरे आणि चौथे कोण? तुमचा नंबर कितवा?
मयुरी वाशिंबे3 महिन्यांपूर्वी

मी भारताचा नागरिक आहे...असे आपण अगदी सहज म्हणतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की भारताचा दुसरा, तिसरा, चौथा... नागरिक कोण आहे? आणि तुमचा नंबर कितवा आहे. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. हे लहानपणापासून पुस्तकांतून शिकवले जाते.


जर राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतील तर यानुसार तुमचा कितवा नंबर लागतो? देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. चला तर तुमचा कितवा नंबर लागतो ते जाणून घेऊया...

संविधानानुसार विचार केला तर प्रत्येक सामान्य नागरिक हा भारतातील 27व्या क्रमांकावरील नागरिक असतो. कारण, तरतुदीनुसार पहिल्या 26 क्रमांकांवर भारतातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपती देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करतात. सध्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. त्या भारताच्या पहिल्या नागरिक आहेत. तर उपराष्ट्रपतींना देशाचा द्वितीय नागरिक म्हटले जाते. सध्या भारताचे उपाध्यक्ष जगदीप धनखड आहेत. अशा प्रकारे ते देशाचे दुसरे नागरिक आहेत.

द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. तर भारताचे 14 वे उपराष्ट्रपती हे जगदीप धनखड हे आहेत. - 
द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. तर भारताचे 14 वे उपराष्ट्रपती हे जगदीप धनखड हे आहेत.
भारतात देशाच्या पंतप्रधानांना देशाचा तृतीय नागरिक म्हटले जाते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनंतर देशाचे पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती तिसरा नागरिक असते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत. त्यामुळे ते भारताचे तिसरे नागरिक बनले आहेत.

 -
भारतातील विविध राज्यांचे राज्यपाल हे देशाचे चौथे नागरिक असतात. उदाहरणार्थ, भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. अशा प्रकारे ते देशाचे चौथे नागरिक आहेत. त्यांच्याप्रमाणेच इतर राज्यांचे राज्यपालही देशाचे चौथे नागरिक असतात. भारताचे माजी राष्ट्रपती हे भारताचे पाचवे नागरिक आहेत. त्यानुसार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाचे पाचवे नागरिक बनले आहेत. याशिवाय माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पटेल याही देशाच्या पाचव्या नागरिक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि लोकसभेचे अध्यक्ष हे देशाचे सहावे नागरिक असतात. त्यानुसार देशाचे सहावे नागरिक हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आहेत. नुकतीच देशाच्या 50व्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली. तर ओम बिरला हे 17व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांची जून 2019ला निवड बिनविरोध झाली होती.

तर देशाचा सातवे नागरिक हे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, नीती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेते हे असतात. तर आठवे नागरिक हे भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर) हे असतात. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे देशाचे नववे नागरिक असतात. देशातील राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, नीती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडित इतर मंत्री हे दहावे नागरिक असतात. अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल हे देशातील अकरावे नागरिक असतात.

उत्तर लिहिले · 8/3/2023
कर्म · 7440
0
भारतात समानतेचा अधिकार
कलम १५ = धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान इत्यादी आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. कलम १६ = सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता. कलम १७ = अस्पृश्यता नाहीशी केली आहे. कलम 18 = शीर्षके रद्द करण्यात आली आहेत.
उत्तर लिहिले · 6/3/2023
कर्म · 9395
1


कृष्णावळ म्हणजे काय


‘कृष्णावळ’ किती छान शब्द आहे ना… ऐकल्यावर किती भारी वाटतं. हा शब्द आपल्या बोली भाषेत फार वापरला जात नाही पण पौराणिक किंवा ऐतिहासिक मालिकेत या शब्दाचा वापर काही ठिकाणी केला जातो. तुम्हाला माहित आहे का ‘कृष्णावळ’ म्हणजे काय? ‘कृष्णावळ’ कोणाला म्हणतात?.... कृष्णावळचा अर्थ आहे कांदा!!! काहीजणांना हे वाचून नक्की हसू आलं असेल, पण हे खरं आहे. आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना याची माहिती नक्की असेल. भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना रडविणारा, भाव गगनाला गेले की आम्हा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा असा हा ‘कांदा’. या ‘कांद्या’ला ‘कृष्णावळ’ म्हणतात याचे कारण पण गंमतशीर आहे. कांदा उभा चिरला तर तो शंखाकृती आणि आडवा चिरला तर चक्राकृती दिसतो. आता शंख आणि चक्र ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे कांद्यात पहायला मिळतात म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ असे म्हणतात. पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.
कृष्णावळ म्हणण्यामागे केवळ हेच एक कारण नव्हे तर जर आपण कांदा त्याच्या पानांसह उलटा धरला तर तो गदा रुपात दिसेल. कांद्यावरील पातीशिवाय तो पद्म अर्थात कमळाचा आकार घेतो. गदा, पद्म ही आयुधे भगवान विष्णू शंख आणि चक्रासह धारण करतात.कृष्ण आणि वलय असे दोन्ही शब्द एकत्र करुन हा कृष्णावळ शब्द तयार झालाय.
कर्नाटक आणि तामिळनाडू भागात आजही कांद्याला कृष्णावळ असे म्हणतात. आपल्या किचनचा राजा म्हणजे कांदा… दिवसातून एकदा तरी कांदा चिरावाच लागतो. भाजी कोरडी करा किंवा रसभाजी, कांदा हवाच. जेवणावर कच्चा खाण्यासाठी कांदा हवा आणि चाट पदार्थ केले तर मग काय कांद्याशिवाय आपलं पाऊल पुढेच जात नाही. कांदा चिरताना तो जरी खूप रडवत असला तरी कांदा खाणं आरोग्यासाठी अतिशय फायद्याचं ठरतं. कांदा आरोग्याप्रमाणे केस, त्वचेसाठीही औषधी आहे. सध्या कांद्याचे तेल केसांसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते आहे. भारतात लाल आणि पांढरा कांदा असे दोन प्रकार आहेत. कांदा वापरुन अनेक रुचकर पदार्थ केले जातात मात्र मला कांदा म्हटलं की गरमागरम कांदा भजी आठवतात. सध्या थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे जो काही हिवसाळा आपण अनुभवतो आहोत त्यात कांदा भजी म्हणजे लाजवाब!!
कांद्याबद्दल व्हॉट्सअपवर एक मेसजपण फिरतो तो तुम्ही तो नक्की वाचला असेल. मैत्री ही एक कांद्यासारखी आहे, ज्याला भरपूर थर आहेत, जे तुमच्या आयुष्यात स्वादिष्ट चव आणतील पण जर तुम्ही त्याना मध्येच कापण्याचा प्रयत्न केलात तर ते तुमच्या डोळ्यात पाणी आणतील… वा! ज्यांनी कोणी लिहलंय त्यांना सलाम फारच अफलातून लिहिलेलं आहे. कांद्यातून मैत्रीचे मर्म समर्पकपणे समजावलं आहे.
चातुर्मासात कांदा खात नाहीत, असे आपल्या पुराणात सांगितले आहे. पावसाळ्याच्या काळात चार्तुमास येतो, अशा वेळी वातुड स्वभावाचा कांदा पचनशक्तीवर परीणाम करु शकतो म्हणून त्या काळात कांदा खावू नये असे म्हणतात. चातुर्मास सुरू होण्यापूर्वी कांदेनवमी साजरी करतात. यावर काही मतमतांतरे आहेत पण त्यात न पडता आपण कांदे पुराणाचा आनंद घेवूया.
कांद्यावरुन आपल्याकडे म्हणीसुद्धा आहेत. कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात, नाकाने कांदे सोलणे. कोणी रागवलं तर म्हणतात, नाकाचा शेंडा बघ कसा लाल झालाय…. अनेकदा आपण म्हणतो अकलेचा कांदा आहेस किंवा डोक्यात कांदे बटाटे भरलेत का??? असे विचारतात. आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात करणारी पहिली पायरी म्हणजे ‘कांदा’...आर्श्चय वाटलं… अहो कांदे पोहे!! आठवले ना… तो बघण्याचा कार्यक्रम…. तर असे हे कांदेपुराण तेव्हा आता जर तुमच्या सासूबाई म्हणाल्या, कृष्णावळ दे तर अजिबात गडबडून जायचे नाही त्यांना कांदा चिरू द्या आणि हो कृष्णावळ का म्हणतात ते सुद्धा सांगा.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 48335