2 उत्तरे
2
answers
हरित क्रांतीचे अनेक फायदे कोणते?
3
Answer link
कृषी क्षेत्रात संशोधन , कृषी विषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि काही कृषी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवून कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठीच्या धोरणाला ' हरित क्रांती ' असे म्हणतात .
स्वातंत्र्यासोबत आपणास दारिद्र्य व बेकारी या समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर मिळाल्या होत्या . १९६० च्या दशकात अन्न समस्या उग्र बनल्याने उपासमार अतिशय वाढली व सरकारने अन्नधान्याची आयात करण्याचे धोरण अवलंबले . अमेरिकेतील पीएल ४८० या कायद्यानुसार अन्नधान्याची विशेष करून गव्हाची निर्यात भारतात करण्यात आली व या अनुभवानंतर भारताच्या कृषी धोरणात बदल करण्यात आले . अन्न सुरक्षितता व स्वालंबन या गोष्टीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात आले . त्यासाठी म्हणून साठच्या दशकात कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी देशात वेगाने हालचाली सुरू झाल्या . भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR ) ही संस्था शेती संबधी काम करणारी शिखर संस्था आहे . भारत सरकारच्या कृषी विभागांतर्गत Department of Agricultural Research and Education ( DARE ) ची स्थापना करण्यात आली .राज्यामधील विद्यापीठांना संशोधनासाठी पाठिंबा देण्यात आला.
UPSC च्या धरतीवर कृषी संशोधकांच्या निवडीसाठी Agricultural Research Service ( ARS ) ची स्थापना करून Agricultural Scientists Recruitment Board ( AERB ) हे स्वतंत्र मंडळ बनवले त्यामुळे तरुण संशोधकांचा ओढा संशोधनात दाखल झाला . याशिवाय तीन नवीन राष्ट्रीय संस्थांची निर्मिती करून नवीन संशोधनाची दिशा ठरवली . यापैकी Indian Agricultural Research Institute ( IARI ) या संस्थेची धुरा डॉ स्वामिनाथन यांच्या खांद्यावर दिली . जगाचे हरितक्रांतीचे जनक नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन बोरलॉग यांचे डॉ स्वामीनाथन यांना खूप सहकार्य लाभले आणि पुढे जाऊन त्यांनी जे काही अदभुत काम करून दाखवले त्यामुळे ते भारतीय हरितक्रांतीचे जनक ठरले . ही हरितक्रांती स्वदेशी नव्हती . त्या हरित क्रांतीचे धोरण अमेरिकी वैज्ञानिकांनी तयार केले होते . या धोरणाचा पहिला यशस्वी प्रयोग मेक्सिकोत झाला होता व नंतर ते धोरण भारतात निर्यात केले गेले व हरित क्रांतीची वाटचाल सुरू झाली . सर्वात जास्त भर गहू उत्पादनावर होता .
हरितक्रांतीचे जनक म्हणून जगात नावाजलेले नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग म्हणून आहेत.
हरितक्रांतीमुळे झालेले परिणाम/फायदे:-
अन्नधान्याच्या उत्पादनात अमुलाग्र बदल घडवून आणणे व अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे कृषी धोरणाचे उद्दिष्ट बनले . स्वातंत्र्याच्या ४० वर्षांनंतर हरितक्रांतीच्या आधारे अन्नधान्य उत्पादन ८२ मिलियन टनावरून २०० मिलीयन टनापर्यंत नेणे शक्य झाले . हरितक्रांती म्हणजे शेतीमध्ये आधुनिक शेती कसण्याच्या पद्धतीचा स्वीकार होय . जेव्हा आपण हरितक्रांतीचा विचार करतो . त्या वेळेस यात रासायनिक खतांचा वापर कीटकनाशके , जास्त उत्पन्न देणाऱ्या बियांच्या जाती , बहुपिक पद्धती , सिंचनाच्या सुविधा , कोरडवाहू क्षेत्राचा विकास अशा सर्वांचा विचार करावा लागतो . हरितकांतीमुळे कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे . तसेच शेतीच्या आदानात गुणात्मक वाढ झाल्यामुळे शेती उत्पादन वाढले आहे . त्यामुळे हरितक्रांतीनंतर देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला . हरितक्रांतीच्या कालखंडात फक्त अन्नधान्य पिकांच्या उत्पादनातच वाढ न होता इतर व्यापारी पिकांच्या उत्पादनातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ घडून आली . जसे ऊस , कापूस इत्यादी ; परंतु यातील ऊस हे पीक बागायती आहे . यासाठी पाणी पुरवठ्याची सोय मोठ्या प्रमाणात आवश्यक असते ; परंतु कापूस या पिकांसाठी पाणी पुरवठ्याची सोय हंगामी असली तरी चालते . त्यामुळे ज्या ठिकाणी बारमाही सिंचनाची सोय नाही . अशा ठिकाणी शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस उत्पादन घेताना दिसतात . १९६० नंतर शेती उत्पादन वाढीचा कल हा काही काळ चढता होता . एकूणच शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले . यावरून असे दिसते की , हरितक्रांतीने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन वाढीस प्रवृत केले , यातून ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न वाढून काही प्रमाणात दारिद्र्यात घट होऊ लागली . असे असले तरी आपणास दिसते की , हरितक्रांतीचे फायदे मोठ्या शेतकऱ्यांनाच मिळाले . कारण हरितक्रांती भांडवल प्रधान होती . रासायनिक खते , यंत्राचा वापर , कीटकनाशके यासाठी पैशाची गरज मोठ्या प्रमाणावर होती . त्यामुळे जरी उत्पन्नात वाढ झाली , तरी त्याचा फायदा लहान शेतकरी व शेतमजुरांना झाला नाही . लहान शेतकऱ्यांची धारण क्षमता कमी होती तसेच पाणी पुरवठ्याच्या सोयीसाठी , ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते . जी लहान शेतकरी पूर्ण करू शकत नव्हते . हरितक्रांतीने काही प्रमाणात प्रादेशिक असमतोलातदेखील वाढ केली . संकरीत वाणापैकी खाद्यान्न वाणामध्ये फक्त गहू आणि तांदळमध्येच मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढली .
असे असले तरी हरितक्रांतीमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात व्यापारी दृष्टीकोन आला . यामुळेच अधिक उत्पन्नासाठी ऊस , कापूस , सोयाबीन ताग , ज्यूट इत्यादी व्यापारी पिकांचे उत्पादन देखील वाढल्याचे दिसते . या कालखंडानंतर गुजरात , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , कर्नाटक या राज्यांमधून कापसांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढल्याचे दिसून येईल . तसेच विविध कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिल्याचे दिसून येईल . महाराष्ट्र , उत्तरप्रदेश , तामिळनाडू , कर्नाटक या राज्यांतील साखर कारखानदारी तसेच महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , गुजरात या राज्यांतील कापूस प्रक्रिया उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणात हरितक्रांतीनंतरचाच आहे . या व्यापारी पिकांच्या भविष्यकालीन धोरण निश्चितीसाठी ताग महामंडळ , ऊस महामंडळ , कापूस महामंडळ अशा विविध महामंडळांची स्थापना शासनाने केल्याचे पाहवयास मिळते . _ _ _ हरिक्रांतीचा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून विचार करता महाराष्ट्राला विशेष फायदा झाला असे म्हणता येत नाही . कारण महाराष्ट्रात बहुसंख्य भाग हा जिरायती व कोरडवाहू शेती खाली आहे . महाराष्ट्रात मोठ्या नद्या नसल्याने सिंचनासाठी धरणाच्या बाबतीत महाराष्ट्रावर मर्यादा येतात व यामुळे सिंचनाच्या सुविधांवर मर्यादा पडतात . पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात ऊस उत्पादन वाढले आहे . ज्यामधून सहकारी साखर कारखानदारीचा विकास झाला आहे . महाराष्ट्राच्या इतर भागांचा विचार करता . सिंचनाच्याअभावी जिरायती पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते . ज्यामध्ये सोयाबीन , उडीद , कापूस इ . चा समावेश असतो . परंतु हरितक्रांतीच्या कालखंडानंतर नगदी पिकांबरोबरच इतर पिकांसाठी देखील रासायनिक खतांचा वापर , कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे . विदर्भ व मराठवाड्यातील कापसाच्या लागवडी खालील क्षेत्राला उत्पादन वाढीसाठी काही प्रमाणात या खताचा , कीटकनाशकांचा , संकरित बियांणाचा फायदा झाला आहे . कृषी आधारित उद्योग हे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील असतात असे उद्योग हे शेतीतून उत्पादनवाढ झाल्यानंतर विकसित होतात . ह्याप्रकारे बरेच उद्योग हे वाढीस लागले आहेत.
स्वातंत्र्यासोबत आपणास दारिद्र्य व बेकारी या समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर मिळाल्या होत्या . १९६० च्या दशकात अन्न समस्या उग्र बनल्याने उपासमार अतिशय वाढली व सरकारने अन्नधान्याची आयात करण्याचे धोरण अवलंबले . अमेरिकेतील पीएल ४८० या कायद्यानुसार अन्नधान्याची विशेष करून गव्हाची निर्यात भारतात करण्यात आली व या अनुभवानंतर भारताच्या कृषी धोरणात बदल करण्यात आले . अन्न सुरक्षितता व स्वालंबन या गोष्टीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात आले . त्यासाठी म्हणून साठच्या दशकात कृषी क्षेत्र विकसित करण्यासाठी देशात वेगाने हालचाली सुरू झाल्या . भारतीय कृषी संशोधन परिषद ( ICAR ) ही संस्था शेती संबधी काम करणारी शिखर संस्था आहे . भारत सरकारच्या कृषी विभागांतर्गत Department of Agricultural Research and Education ( DARE ) ची स्थापना करण्यात आली .राज्यामधील विद्यापीठांना संशोधनासाठी पाठिंबा देण्यात आला.
UPSC च्या धरतीवर कृषी संशोधकांच्या निवडीसाठी Agricultural Research Service ( ARS ) ची स्थापना करून Agricultural Scientists Recruitment Board ( AERB ) हे स्वतंत्र मंडळ बनवले त्यामुळे तरुण संशोधकांचा ओढा संशोधनात दाखल झाला . याशिवाय तीन नवीन राष्ट्रीय संस्थांची निर्मिती करून नवीन संशोधनाची दिशा ठरवली . यापैकी Indian Agricultural Research Institute ( IARI ) या संस्थेची धुरा डॉ स्वामिनाथन यांच्या खांद्यावर दिली . जगाचे हरितक्रांतीचे जनक नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन बोरलॉग यांचे डॉ स्वामीनाथन यांना खूप सहकार्य लाभले आणि पुढे जाऊन त्यांनी जे काही अदभुत काम करून दाखवले त्यामुळे ते भारतीय हरितक्रांतीचे जनक ठरले . ही हरितक्रांती स्वदेशी नव्हती . त्या हरित क्रांतीचे धोरण अमेरिकी वैज्ञानिकांनी तयार केले होते . या धोरणाचा पहिला यशस्वी प्रयोग मेक्सिकोत झाला होता व नंतर ते धोरण भारतात निर्यात केले गेले व हरित क्रांतीची वाटचाल सुरू झाली . सर्वात जास्त भर गहू उत्पादनावर होता .
हरितक्रांतीचे जनक म्हणून जगात नावाजलेले नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग म्हणून आहेत.
हरितक्रांतीमुळे झालेले परिणाम/फायदे:-
अन्नधान्याच्या उत्पादनात अमुलाग्र बदल घडवून आणणे व अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे कृषी धोरणाचे उद्दिष्ट बनले . स्वातंत्र्याच्या ४० वर्षांनंतर हरितक्रांतीच्या आधारे अन्नधान्य उत्पादन ८२ मिलियन टनावरून २०० मिलीयन टनापर्यंत नेणे शक्य झाले . हरितक्रांती म्हणजे शेतीमध्ये आधुनिक शेती कसण्याच्या पद्धतीचा स्वीकार होय . जेव्हा आपण हरितक्रांतीचा विचार करतो . त्या वेळेस यात रासायनिक खतांचा वापर कीटकनाशके , जास्त उत्पन्न देणाऱ्या बियांच्या जाती , बहुपिक पद्धती , सिंचनाच्या सुविधा , कोरडवाहू क्षेत्राचा विकास अशा सर्वांचा विचार करावा लागतो . हरितकांतीमुळे कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे . तसेच शेतीच्या आदानात गुणात्मक वाढ झाल्यामुळे शेती उत्पादन वाढले आहे . त्यामुळे हरितक्रांतीनंतर देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला . हरितक्रांतीच्या कालखंडात फक्त अन्नधान्य पिकांच्या उत्पादनातच वाढ न होता इतर व्यापारी पिकांच्या उत्पादनातदेखील मोठ्या प्रमाणात वाढ घडून आली . जसे ऊस , कापूस इत्यादी ; परंतु यातील ऊस हे पीक बागायती आहे . यासाठी पाणी पुरवठ्याची सोय मोठ्या प्रमाणात आवश्यक असते ; परंतु कापूस या पिकांसाठी पाणी पुरवठ्याची सोय हंगामी असली तरी चालते . त्यामुळे ज्या ठिकाणी बारमाही सिंचनाची सोय नाही . अशा ठिकाणी शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस उत्पादन घेताना दिसतात . १९६० नंतर शेती उत्पादन वाढीचा कल हा काही काळ चढता होता . एकूणच शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर करू लागले . यावरून असे दिसते की , हरितक्रांतीने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादन वाढीस प्रवृत केले , यातून ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न वाढून काही प्रमाणात दारिद्र्यात घट होऊ लागली . असे असले तरी आपणास दिसते की , हरितक्रांतीचे फायदे मोठ्या शेतकऱ्यांनाच मिळाले . कारण हरितक्रांती भांडवल प्रधान होती . रासायनिक खते , यंत्राचा वापर , कीटकनाशके यासाठी पैशाची गरज मोठ्या प्रमाणावर होती . त्यामुळे जरी उत्पन्नात वाढ झाली , तरी त्याचा फायदा लहान शेतकरी व शेतमजुरांना झाला नाही . लहान शेतकऱ्यांची धारण क्षमता कमी होती तसेच पाणी पुरवठ्याच्या सोयीसाठी , ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गरज असते . जी लहान शेतकरी पूर्ण करू शकत नव्हते . हरितक्रांतीने काही प्रमाणात प्रादेशिक असमतोलातदेखील वाढ केली . संकरीत वाणापैकी खाद्यान्न वाणामध्ये फक्त गहू आणि तांदळमध्येच मोठ्या प्रमाणात उत्पादकता वाढली .
असे असले तरी हरितक्रांतीमुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात व्यापारी दृष्टीकोन आला . यामुळेच अधिक उत्पन्नासाठी ऊस , कापूस , सोयाबीन ताग , ज्यूट इत्यादी व्यापारी पिकांचे उत्पादन देखील वाढल्याचे दिसते . या कालखंडानंतर गुजरात , उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश , महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , कर्नाटक या राज्यांमधून कापसांच्या लागवडीखालील क्षेत्र वाढल्याचे दिसून येईल . तसेच विविध कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहिल्याचे दिसून येईल . महाराष्ट्र , उत्तरप्रदेश , तामिळनाडू , कर्नाटक या राज्यांतील साखर कारखानदारी तसेच महाराष्ट्र , आंध्रप्रदेश , गुजरात या राज्यांतील कापूस प्रक्रिया उद्योगांचा विकास मोठ्या प्रमाणात हरितक्रांतीनंतरचाच आहे . या व्यापारी पिकांच्या भविष्यकालीन धोरण निश्चितीसाठी ताग महामंडळ , ऊस महामंडळ , कापूस महामंडळ अशा विविध महामंडळांची स्थापना शासनाने केल्याचे पाहवयास मिळते . _ _ _ हरिक्रांतीचा महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून विचार करता महाराष्ट्राला विशेष फायदा झाला असे म्हणता येत नाही . कारण महाराष्ट्रात बहुसंख्य भाग हा जिरायती व कोरडवाहू शेती खाली आहे . महाराष्ट्रात मोठ्या नद्या नसल्याने सिंचनासाठी धरणाच्या बाबतीत महाराष्ट्रावर मर्यादा येतात व यामुळे सिंचनाच्या सुविधांवर मर्यादा पडतात . पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात ऊस उत्पादन वाढले आहे . ज्यामधून सहकारी साखर कारखानदारीचा विकास झाला आहे . महाराष्ट्राच्या इतर भागांचा विचार करता . सिंचनाच्याअभावी जिरायती पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे दिसून येते . ज्यामध्ये सोयाबीन , उडीद , कापूस इ . चा समावेश असतो . परंतु हरितक्रांतीच्या कालखंडानंतर नगदी पिकांबरोबरच इतर पिकांसाठी देखील रासायनिक खतांचा वापर , कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे . विदर्भ व मराठवाड्यातील कापसाच्या लागवडी खालील क्षेत्राला उत्पादन वाढीसाठी काही प्रमाणात या खताचा , कीटकनाशकांचा , संकरित बियांणाचा फायदा झाला आहे . कृषी आधारित उद्योग हे शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील असतात असे उद्योग हे शेतीतून उत्पादनवाढ झाल्यानंतर विकसित होतात . ह्याप्रकारे बरेच उद्योग हे वाढीस लागले आहेत.
0
Answer link
हरित क्रांतीचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- अन्न उत्पादन वाढ: हरित क्रांतीमुळे अन्न उत्पादनात मोठी वाढ झाली. नवीन तंत्रज्ञान, उच्च उत्पादन देणाऱ्या बियाणे आणि रासायनिक खतांचा वापर करूनproduction वाढले.
- Import कमी: अन्न उत्पादन वाढल्यामुळे इतर देशांकडून अन्न import करण्याची गरज कमी झाली.
- शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली: उत्पादन वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली.
- रोजगार वाढ: कृषी क्षेत्रात सुधारणा झाल्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढल्या.
- गरिबी घट: अन्नसुरक्षा वाढल्यामुळे आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे गरिबी कमी झाली.
- औद्योगिक विकास: कृषी उत्पादनात वाढ झाल्याने कृषी आधारित उद्योगांचा विकास झाला, जसे की अन्न प्रक्रिया उद्योग.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: