कृषी हरितक्रांती

हरितक्रांती म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

हरितक्रांती म्हणजे काय?

1
कृषी, शेती क्षेत्रात नव नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि नव नवीन संकरित बी-बियाण्यांच्या संशोधनामुळे कृषी उत्पादनात जे बदल घडून आले, त्या बदलाला हरितक्रांती असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 3/5/2024
कर्म · 765
0
१९६० पूर्वी भारतामध्ये पारंपरिक शेती केली जात होती. पूर्वीपासून चालत आलेली पद्धत, तेच तेच पिके, सिंचनाच्या पारंपरिक पद्धती, गावरान बी चा वापर यामुळे शेती जास्त असून देखील खूपच कमी धान्य उत्पादन त्यावेळी होत असे जे पूर्ण घराला वर्षभर देखील पुरत नसे. अशातच १९६० मध्ये डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांनी भारतीय शेतीमध्ये अमुलाग्र बदल केला तो म्हणजे त्यावेळी त्यांनी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्या मदतीने न्यूयॉर्क येथून काही गव्हाचे संकरित बीज भारतामध्ये आणून त्याची पेरणी पंजाब या प्रांतामध्ये केली. भारतामध्ये हरित क्रांतीनंतर शेती मध्ये खूपच बदल झाले आणि आपली उत्पादन क्षमता किती तरी पटीने वाढली. आज भारत देश किती तरी देशाला अन्न धान्याची निर्यात करतो. एक वेळ अशी होती आपली की आपल्याला खायला अन्नधान्य नव्हते. त्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर संकरित बियाणे तयार करण्यासाठी रिसर्च होवू लागला त्यात यश मिळत गेले आणि आज प्रत्येक पीक, भाजीपाला हा संकरित आहे.
उत्तर लिहिले · 26/5/2024
कर्म · 920
0
हरितक्रांती म्हणजे कृषी उत्पादन वाढवण्यासाठी अवलंबलेली एक योजना होती. यात प्रामुख्याने जास्त उत्पादन देणाऱ्या (High Yielding Varieties - HYV) बियाण्यांचा वापर, रासायनिक खतांचा वापर, सिंचनाचे जाळे तयार करणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे यांवर भर देण्यात आला.
हरितक्रांतीची प्रमुख उद्दिष्ट्ये:
  • अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे.
  • नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
  • देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे.

हरितक्रांतीचे फायदे:
  1. अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ.
  2. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ.
  3. ग्रामीण भागाचा विकास.
  4. रोजगार निर्मिती.

हरितक्रांतीचे तोटे:
  • रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली.
  • पाण्याचा जास्त वापर केल्यामुळे पाण्याची पातळी घटली.
  • जैवविविधतेचे नुकसान झाले.

भारतातील हरितक्रांती:
भारतामध्ये हरितक्रांतीची सुरुवात 1960 च्या दशकात झाली. ह्या क्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग (Norman Borlaug) आणि भारतात डॉ. एम. एस. स्वामीनाथन (M. S. Swaminathan) होते.
हरितक्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5220

Related Questions

9. कृषी विपणन म्हणजे काय? त्याचे महत्त्व स्पष्ट करा.
कृषी विपणनातील समस्या कोणत्या आहेत? त्यावर उपाय सुचवा.
2. भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व सविस्तर स्पष्ट करा?
माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?