भूगोल कृषी हरितक्रांती

हरित क्रांतीचे यश आणि अपयश कसे स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

हरित क्रांतीचे यश आणि अपयश कसे स्पष्ट कराल?

0
१.२.३ हरित क्रांतीचे यश आणि अपयश 

कृषी क्षेत्रात आवड आसणारे अमेरिकन शास्त्रज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी जगात हरितक्रांतीची सुरूवात केली सन १९४० मध्ये मॅक्सीको येथे प्रथम गव्हाच्या उच्च पैदास देणाऱ्या बियाणाचा शोध लागला. मॅक्सीको मध्ये नॉरमन बोरलॉग यांनी शोधलेल्या उच्च पैदास गव्हाचे बियाणे आणि तेथील यांत्रिकीकरणाची प्रगती यामुळे लोकांच्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन या देशात उत्पादित झाले, तर १९६० मध्ये मेक्सीको


गव्हाचा निर्यातदार देश बनला, यापूर्वी हा देश गव्हाची आयात करीत होता.

हरितक्रांती म्हणजे उच्च पैदास बी-बियाणांचा वापर, खतांचा वाढता वापर व जलसिंचन यामुळे शेती उत्पादन प्रचंड प्रमाणात बाढ होणे होय. हरितक्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाला. भारतात प्रथम १९६५ साली उच्च पैदास बियाणांचा वापर केला. याचे सर्व श्रेय डॉ. एम. एस. स्वामीनाधन यांचे आहे, त्यांना भारतीय हरितक्रांतीचे जनक असे म्हणतात. हरितक्रांतीमुळे नविन तंत्रज्ञानाचा वापर, संकरित बियाणे उच्चपैदास बियाणे आदीचा वापर काढून उत्पादकता दुप्पटीपेक्षा अधिक वाढली. हरितक्रांती कालावधीत रासायनिक खतांचा वापर वाढल्यामुळे माती व शेती उत्पादकतेवर पर्यावरणीय विद्यातक परिणाम दिसू लागले.

अन्नधान्य उत्पादनातील वाढ जागतिक हरितक्रांतीचे जनक नॉरमन बोरलॉग यांच्या प्रयत्नांमुळे झाली. हरितक्रांतीही सिंचन विस्तार, पायाभूत सुविधात वाढ, व्यवस्थापन तंत्रातील आधुनिकीकरण, संकरित बियाणांचे वितरण, रासायनिक खते, किटकनाशके व तणनाशकांचा वापर आदानांचा विस्तार व वृद्धी झाल्यामुळे घडून आली आहे. याचा परिणाम जगातील अब्जावधी लोकांना उपासमारीपासून वाचविले आहे.
उत्तर लिहिले · 14/6/2022
कर्म · 53750
0
हरित क्रांतीचे यश आणि अपयश खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल:

हरित क्रांती: यश

  • उत्पादन वाढ: हरित क्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. गहू आणि तांदूळ উৎপাদनात विशेष वाढ झाली.
  • आत्मनिर्भरता: भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला.
  • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली: উৎপাদनात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले.
  • रोजगार निर्मिती: कृषी क्षेत्रात नवीन रोजगार संधी निर्माण झाल्या.

हरित क्रांती: अपयश

  • असमान विकास: हरित क्रांतीचा फायदा काही राज्यांपुरताच मर्यादित राहिला. उदा. पंजाब, हरियाणा, आणि पश्चिम उत्तर प्रदेश.
  • पर्यावरणावर परिणाम: रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आणि प्रदूषण वाढले. डाउन टू अर्थमधील माहिती
  • पाण्याचा गैरवापर: जास्त पाणी लागणाऱ्या पिकांमुळे भूजल पातळी घटली.
  • लहान शेतकऱ्यांचे नुकसान: लहान शेतकरी महागडी बियाणे आणि खते खरेदी करू शकत नसल्यामुळे ते स्पर्धेत मागे पडले.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2260

Related Questions

ट्रॅक्टरमध्ये कमी डिझेल खपत करणारा ट्रॅक्टर कोणता आहे?
फिल्टर तेल कसे तयार केले जाते?
खेड्या गावात कमी खर्चात उत्पन्न जास्त असा कोणता धंदा आहे?
फळा म्हणजे काय असल्यामुळे रोड लागतात?
भारतामध्ये कृषी क्रांती कधी सुरु होईल?
मी वारसाला 1 लाख भरू शकतो, दोन एकर ऊस आहे. 5 वर्षांसाठी किती लोन भेटेल?
एका एकरमध्ये किती कपाशीचे झाडं बसतात?