शिक्षण अपंग शारीरिक आरोग्य

मी दहावीला आहे आणि माझे एक अंग बाहेर येते, तर मी अपंगांमध्ये येतो का?

2 उत्तरे
2 answers

मी दहावीला आहे आणि माझे एक अंग बाहेर येते, तर मी अपंगांमध्ये येतो का?

4
अंग बाहेर येणे म्हणजे गुद किंवा योनी यांच्या स्नायू आकुंचन-प्रसरणाच्या प्रमुख कार्यात उणेपणा येणे. ताणले जाणे व पूर्ववत होणे हा स्नायूंचा स्वाभाविक गुणधर्म, परसाकडे वेग आल्यावर गुदाचे स्नायू प्रसरण पावून नंतर त्यांचे आपोआप आकुंचन होत असते. तसेच स्वाभाविक कार्य योनीच्या स्नायूंकडून अपेक्षित असते. स्नायूंचा लवचिकपणा कमी झाला किंवा नाहीसा झाला म्हणजे गुद किंवा योनीबाहेर आलेल्या अवस्थेत थोडा काळ व वरचा काळ रोग्याच्या कमी-अधिक अवस्थेप्रमाणे राहते. हा सारा वायूचा खेळ आहे. वायुवरील नियंत्रण व स्नायूंचे वाजवी पोषण असा दुहेरी विचार या विकारातून सतत डोळ्यासमोर हवा.
लक्षणे:१) परसाकडच्या वेग येण्याचे वेळेस गुदाचा भाग मोठ्या प्रमाणात बाहेर व थोड्या वेळाने आपोआप आत जाणे.
२) परसाकडच्या वेलेस गुदाचा भाग बराच बाहेर येणे व तो तसाच बाहेर राहणे व हाताने ढकलून आत सारावा लागणे.
🎯कारणे
* गुदभ्रंशाची कारणे १) परसाकडचा वेग फार वेळेला येईल असे वातुळ पदार्थ सतत खाणे उदा. शेवभाजी, चिवडा, शिळे अन्न, खूप थंड पदार्थ, तिखट इत्यादी. २) परसाकडे पुनःपुन्हा जाण्याची भावना निर्माण होणे पण प्रत्यक्षात न होणे, जोर करावा लागणे, ३) मलप्रवृत्ती चिकट होणे, शेंबडासारखी होणे, ४) बालकांना दात येण्याच्या काळात किंवा अन्य कारणाने खूप जुलाब होऊन गुदभ्रंश हा विकार होतो. ५) अवेळी व उशीरा किंवा भूक नसताना पुनःपुन्हा जेवण करणे, ६) कृमी किंवा जंत, मुळव्याधाच्या मोडामुळे परसाकडेमध्ये अडथळा होणे.
🏷उपाय
१) पोटात वायू धरेल, पोट डब्ब होईल, पोट फुगेल, पोटास तडस लागेल, शोचास किंवा लघवीचा अवरोध होईल असे खाणे-पिणे नसावे. २) खूप वेळा परसाकडे जावे लागेल असे खाण्यापिण्याचे पदार्थ टाळावेत. ३) हरभरा, बटाटा, मटकी, वाटाणा, मटार, पोहे, चुरमुरे, तेलकट थंड पदार्थ, शिळे अन्न, तीखट, मिरच्या कटाक्षाने खाऊ नयेत.
👉१) कूटजादिकषाय तीन चमचे समभाग पाण्याबरोबर घेणे.
२) अभयारिष्ट चार चमचे समभाग पाण्याबरोबर घेणे.,
३) त्रिफळा गुग्गुळ तीन-तीन गोळ्या सकाळी व संध्याकाळी बारीक करून घेणे.
४) सकाळी परसाकडे साफ व समाधानकारक व्हावी म्हणून रात्री किंवा पहाटे त्रिफला चूर्ण किंवा हरडा चूर्ण यांपैकी एक औषध एक चमचा गरम पाण्याबरोबर घ्यावे. ५) खूप तिखट लोणची, मिरची खाऊन शौचास फार वेळा जावे लागत असेल व त्यानंतर गुदभ्रंश झाला असेल तर नागकेशव चूर्ण पाण्यासोबत घ्यावे.
शतावरी कल्प दोन ते तीन चमचे एक गरम कप दुधाबरोबर दोन वेळा घ्यावे.
0

तुम्ही अपंगांमध्ये येता की नाही, हे काही गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमचे अंग किती प्रमाणात बाहेर आले आहे, त्यामुळे तुम्हाला किती त्रास होतो आणि तुमच्या दैनंदिन जीवनातील कामे किती प्रमाणात प्रभावित होतात.

अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ (Rights of Persons with Disabilities Act, 2016) नुसार, अपंगत्व म्हणजे दीर्घकाळ शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा संवेदी क्षतीमुळे इतर लोकांशी समानतेने वावरण्यात अडचणी येणे.

तुम्ही कोणत्या प्रवर्गात येता हे निश्चित करण्यासाठी, तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मूल्यांकन करून घेणे आवश्यक आहे. ते तुमच्या स्थितीचे मूल्यांकन करतील आणि तुम्हाला अपंगत्वाचे प्रमाणपत्र देऊ शकतील.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील सरकारी संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

तसेच, तुमच्या शहरातील जिल्हा रुग्णालयात किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन तुम्ही याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणती?
पायाच्या मांड्या का भरतात?
उंची कशी वाढते?
हातापायातली शक्ती गेल्यासारखं कधी आणि का वाटतं?
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे परिणाम?
मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम काय आहेत?
मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे शरीरावरील शारीरिक आजार कोणते?