पोषण आरोग्य आहार

कोणत्या भांड्यात जेवल्यास काय फायदा होतो?

3 उत्तरे
3 answers

कोणत्या भांड्यात जेवल्यास काय फायदा होतो?

23
*✍🏽जानुन घ्या भांडी आणि आपले आरोग्य यांचा संबंध*

🏚🏚🏚🏚🏚🏚🏚🏚🏚🏚

*👉🏽सोन्याची भांडी*

सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.

*👉🏽चांदीची भांडी*

चांदी हा एक शीतल धातू आहे, जी शरीराला आंतरिक थंडावा देते. शरीर शांत ठेवते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.

*👉🏽कांस्यची भांडी*

कांस्याच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांस्याच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांस्याच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ३% पोषक तत्व नष्ट होतात.

*👉🏽तांब्याची भांडी*

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्हर संबंधी तक्रारी नाहीश्या होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूष पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.

*👉🏽पितळेची भांडी*

पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्व नष्ट होतात.

*👉🏽लोखंडाची भांडी*

लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडूरोग नाहीसा करते, शरीरात सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, कामला रोगाला नाहीसे करते, आणि कावीळ दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दुध पिणे चांगले असते.

*👉🏽स्टीलची भांडी*

स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत कारण गरम किंवा आम्ल, कशाशीही यांची रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही. स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने श्सारीराला कोणताही फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.

*👉🏽एल्युमिनिअमची भांडी*

एल्युमिनिअम हे बॉक्साईट पासून बनलेले असते. त्याच्या भांड्यात बनवलेले खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीम ला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. एल्युमिनिउमच्या कुकर मध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्व नष्ट होतात.

*👉🏽मातीची भांडी*

मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.

पाणी पिण्याच्या भांड्याच्या विषयी "भावप्रकाश ग्रंथा"मध्ये लिहिले आहे...

जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्।
पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्।
काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्।
(भावप्रकाश, पूर्वखंडः4)

अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि अंजलीतून पाणी पिऊ नये.

*टिप - माहीती आयुर्वेद आरोग्य विभागाच्या आधारे*

*संकलन श्री अरुण पगार*

👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽👏🏽
उत्तर लिहिले · 13/9/2018
कर्म · 569245
3
तुम्ही कोणत्या धातूच्या भांड्यात जेवण करता त्याचे तुमच्या आरोग्यावर कसे परिणाम होतात?

स्वयंपाक घरातील भांडी हा गृहिणींच्या जिव्हाळ्याचा विषय. अगदी चमचा सुद्धा पाठ असतो. बाजारात नवीन प्रकारची भांडी आली कि घ्यायची घाई सुद्धा असते. पण Scinitfically कधी विचार केला आहे का कि ज्यात आपण अन्न बनवतो, खातो ते आपल्या शरीरावर कश्या प्रकारचे संस्कार करतात? आज तुम्हाला याचीच माहिती भेटणार आहे.

काळानुसार स्वयंपाकातील भांडी बदललेली दिसतात. अगदी १२०० इसा.पूर्व मधील हडप्पा संस्कृती मधील लाल आणि काळ्या भांड्यांमुळे त्या संस्कृतीला “Black and Red ware culture” असे ओळखले गेले. ६००-२०० इसा.पूर्व मध्ये जेव्हा महाजन पदांचा काळ सुरु होता. मगध, कशी, गांधार अवंती इत्यादी महाजन पदांच्या काळाला “Northern-black polished ware culture” असे म्हटले गेले. यावरून आपल्याला स्वयंपाक घरातील भांडी आणि मानवी जीवन किती निगडित आहे हे समजण्यास मदत होते.
काळ जसा बदलेल तसे Culture बदलते. आर्य Culture मध्ये भाजलेल्या मातीच्या भांड्याना प्राधान्य दिले, नंतर तांबे, लोखंड, पितळ, अल्लुमिनियम, ग्लास इत्यादी प्रकारची भांडी क्रमाने आली. आयुर्वेदा मध्ये या बाबतीत संक्षिप्त वर्णन दिलेले आहे. आयुर्वेदा नुसार धातू ची भांडी मानवी आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात आणि तुमच्या आरोग्यावर पॉसिटीव्ह परिणाम करतात. या आर्टिकल मध्ये आपण हि भांडी आपल्या शरीरावर कश्या प्रकारे परिणाम करतात हे पाहणार आहोत .
चला तर मग सुरु करूयात,

तांब्याची भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

आयुर्वेदात तांब्याला Anti-bacterial धातू म्हणले आहे. या कारणा मुळे तांबे या धातू मधील पाणी पिल्यास आपले चयापचन सुधारते, यात Antioxidant properties असतात, अंगावरील आणि शरीराच्या आतील घाव भरून निघण्यास मदत होते, Hemoglobin वाढवण्यात मदत करते. भात शिजवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. आता तुम्हाला कळले असेल कि याचे महत्व काय मात्र एक गोस्ट लक्षात ठेवा जर तुम्ही ताभ्यां च्या भांड्या मधून काही Acidic खाल्ले अथवा पिले तर त्या घटकाची चव बदलू शकते.

चांदी ची भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

चांदी हा एक Precious metal आहे. तसेच Antibacterial सोबत Antimicrobial सुद्धा आहे. या धातू चे नेसर्गिक गुणधर्म हे थंड आहेत. पित्त प्रवृत्ती च्या लोकांना या धातूच्या भांड्याचा फायदा होतो. चांदी च्या भांड्यांमधून खाल्ले अथवा पिले तर शरीराचे तापमान कमी होतेच आणि तुमच्या त्वचे साठी सुद्धा हे अत्यंत गुणकारी आहे.

पितळी भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

गावाकडे अथवा जुन्या लोकांच्या घरात आपण एकदातरी पितळी भांडी पहिलीच असणार. कणग्या, डबे, देवपूजेसाठी लागणारी भांडी या मध्ये पितळी भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. मात्र स्वयंपाक घरात याचा वापर टाळावा. हि भांडी मीठ आणि Acid यांवर लगेच React करते.

स्टेनलेस स्टील ची भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

हा एक Non reactive धातू आहे. त्यामुळे या ढळू ला स्वयंपाक घरातील Ideal धातू मानले गेले आहे. या मधून खाणे आणि पिणे अगदी Safe असते. हा धातू Chromium, Nickel, Carbon, Silicon पासून बनतो आणि खालचा भाग उष्णते साठी तांब्याचा ठेवतात. या धातूची भांडी उत्तम मानली जातात.

ऍल्युमिनिअम ची भांडी तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात?

स्वयंपाक घरातील भांड्यांचा विषय चाललंय आणि ऍल्युमिनिअम चे नाव नाही असे कसे होईल? स्वयंपाक कामामधील जगातील सर्वात आवडता धातू आहे. अन्नामध्ये या धातूचे कण मिसळत नाहीत त्या साठी Scratch-resistant भांडे घ्यावे. मात्र जे Uncoated aluminium असते ते आरेग्यासाठी हानिकारक असते.



भांड्यांचे प्रकार व त्यांची उदाहरणे संपादन करा
अन्नपदार्थ साठवायची/वस्तू काढून ठेवायची भांडी : कारवारी घाटाची बरणी, कुंडा, गंज, गोकर्णपाटी, डबा, डबी, तरसाळे, तसराळे, तेलाची बरणी, पेढेघाटी डबा, बरणी, #शकुंतला भांडे, सतेले
आंघोळीची भांडी : घंगाळे, तपेली, बंब, बादली, लोटा/लोटी
खाद्यपदार्थ साठवायची भांडी : बरणी, डबा, डबी
जेवण वाढायची भांडी : ओगराळे, कप, काटा, कावळा,ग्लास , चमचा, डाव, ताट, ताटली, थाळी, पळी, बशी, तेलातुपाचे भांडे, वाटी, वाडगा, वाढणी
पाणी उपसायची भांडी : लांब दांड्याचे भांडे, घगराळ
पाणी प्यायची भांडी : कप, गडवा, गडू - मराठीतला आठाचा आकडा आणि त्याचे प्रतिबिंब एकमेकांसमोर ठेवून जोडले आणि वर काठ लावले तर दिसेल तसे दिसणारे धातूचे भांडे. कधी कधी छोट्या कमंडलूलाही गडू म्हणतात., ग्लास, चंबू, झारी, तांब्या, तांब्याभांडे, नाशिक घाटाचा तांब्या, पेला, फुलपात्र, लोटा, लोटी
पाणी वाहण्याचे/वाहून नेण्याचे साधन : कळशी, कावड, घागर
पाणी साठवायची भांडी : कळशी, घागर, पीप, बंब, बादली
पूजेची भांडी : ताम्हण/ताम्हन, तेलाची बुधली, पंचपात्र, फुलांचे तबक, संध्येची पळी, कर्पूर पात्र (पंचारती)-कापूर लावण्यासाठी एक नागमोडी आकाराचे लहानसे भांडे असते त्याला हलकारती असे म्हणतात. निरांजनाप्रमाणेच लामणदिवा, नंदादीप हेही दिवे असतात.
बागकामाची भांडी : झारी
बांधकामाची भांडी : घमेले
जेवण केल्या नंतर खाता येणारी भांडी
भांडी जमिनीपासून उंचावर ठेवण्याचे साधन : शिंके/शिंकाळी
स्वयंपाकाला लागणारी भांडी : उलथणे, कढई, कातण, कॉफी फिल्टर, किटली, किसणी, कुकर, गाळणे, झाकणी, झारा, डाव, तांब्याच्या बुडाचे भांडे, तवा, खोल/सपाट तवा, नॉनस्टिक तवा, परात, पळी, पातेले, पुरणयंत्र (श्रीखंडयंत्र), बोगणे, बुधला, तेला-तुपाची बुधली, भगुले, मसाल्याचा (मिसळणीचा) डबा, मोदकपात्र, रोवळी, लाटणे, सालकाढणी(णे)
संडासात वापरायची भांडी : टमरेल

दैनंदिन जीवनात अशा वेगवेगळ्या कार्यांसाठी विविध प्रकारची भांडीही वापरली जातात. अशी विविध प्रकारची भांडी ही वेगवेगळ्या धातूंपासून बनलेली असतात. त्यामध्ये कांशाची भांडी, चांदीची भांडी, तांब्याची भांडी, पितळेची भांडी, मातीची भांडी, लोखंडाची भांडी, सोन्याची भांडी, स्टीलची भांडी असे अनेक प्रकार आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांचा आपल्या आरोग्याशी जवळचा संबंध असतो. जसे की-

सोन्याची भांडी :-

सोने हा एक उष्ण धातू आहे. सोन्यापासून बनवलेल्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने शरीराचे आंतरिक आणि बाह्य दोन्ही हिस्से कठोर, बलवान, ताकदवान आणि मजबूत बनतात आणि त्याच्या सोबतच सोने डोळ्यांची दृष्टी सतेज करते.

चांदीची भांडी :-

चांदी हा एक शीतल धातू आहे. हा शरीराला आंतरिक थंडावा देतो. शरीर शांत ठेवतो. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो.

कांशाची भांडी :

कांशाच्या भांड्यात जेवल्याने बुद्धी तल्लख होते, रक्त शुद्ध होते, रक्तपित्त शांत राहते आणि भूक वाढते. परंतु कांशाच्या भांड्यात आंबट वस्तू वाढू किंवा ठेवू नयेत, कारण आंबट वस्तू या धातूच्या संपर्कात येताच हा धातू कळकतो (धातूची आंबट पदार्थांशी रासायनिक क्रिया होते) आणि विषारी होतो ज्यापासून शरीराला नुकसान पोचते. कांशाच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ३% पोषक तत्त्वे नष्ट होतात.

तांब्याची भांडी :

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने व्यक्ती रोगमुक्त होते, रक्त शुद्ध होते, स्मरणशक्ती तीव्र होते, लिव्ह संबंधी तक्रारी नाहीश्या होतात, तांब्याचे पाणी शरीरातील विषारी घटक काढून टाकतात, म्हणूनच या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी उत्तम असते. मात्र तांब्याच्या भांड्यातून दूध पिऊ नये, ते शरीराला नुकसानकारक असते.

पितळेची भांडी :

पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्त्वे नष्ट होतात.

लोखंडाची भांडी :

लोखंडाच्या भांड्यात बनवलेले भोजन खाल्ल्याने शरीराची शक्ती वाढते, लोहतत्त्व शरीरात आवश्यक पोषण तत्त्व वाढवते. लोखंड अनेक रोगांना नाहीसे करते, पंडुरोग नाहीसा करते, शरीराला सूज आणि पिवळेपणा येऊ देत नाही, काविळीला दूर ठेवते. परंतु लोखंडाच्या भांड्यात जेवू नये, कारण त्यामुळे बुद्धी कमी होते आणि मेंदूचा ऱ्हास होतो. लोखंडाच्या भांड्यातून दूध पिणे चांगले असते.

स्टेनलेस स्टीलची भांडी :

स्टेनलेस स्टीलची भांडी कोणतेही नुकसान पोचवत नाहीत, कारण त्यांवर गरम किंवा आम्ल, कशाचीही रासायनिक क्रिया होत नाही. त्यामुळे ही भांडी वापरल्याने कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, स्टीलच्या भांड्यात जेवण बनवल्याने आणि जेवल्याने शरीराला कोणताच फायदा होत नाही, तसेच नुकसान देखील होत नाही.

ॲल्युमिनिअमची भांडी :

ॲल्युमिनिअमच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्ल्याने शरीराला केवळ नुकसानच पोचते. हा धातू लोह आणि कॅल्शियम शोषून घेतो त्यामुळे त्यापासून बनलेले भांडे वापरता कामा नये. त्यामुळे हाडे कमकुवत होतात, मानसिक आजार होतात, लिव्हर आणि नर्व्हस सिस्टीमला नुकसान पोचते. याच्या सोबतच किडनी निकामी होणे, क्षयरोग, अस्थमा, मधुमेह यांसारखे गंभीर आजार होतात. ॲल्युमिनिउमच्या कुकरमध्ये जेवण शिजवल्याने ८७% पोषण तत्त्वे नष्ट होतात.

मातीची भांडी :

मातीच्या भांड्यात जेवण शिजवल्याने अशी पोषक तत्त्वे मिळतात की ज्यामुळे प्रत्येक आजार आपल्यापासून दूर राहतात. ही गोष्ट आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे की मातीच्या भांड्यात जेवण केल्याने शरीरातील अनेक प्रकारचे आजार बरे होतात. आयुर्वेदानुसार जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी मातीची भांडी सर्वांत जास्त उपयुक्त आहेत. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्वे मिळतात. आणि जर मातीच्या भांड्यात जेवले तर त्याचा वेगळा स्वाद देखील मिळतो.

पाणी पिण्याच्या भांड्यांविषयी “भावप्रकाश ग्रंथा”मध्ये लिहिले आहे… जेवण केल्या नंतर भांडीच खाऊन टाका

जलपात्रं तु ताम्रस्य तदभावे मृदो हितम्।
पवित्रं शीतलं पात्रं रचितं स्फटिकेन यत्।
काचेन रचितं तद्वत् वैङूर्यसम्भवम्।
(भावप्रकाश, पूर्वखंडः4)

अर्थात पाणी पिण्यासाठी तांबे, स्फटिक किंवा काच-पात्र वापरले पाहिजे. शक्य असेल तर वैङूर्यरत्नजडित पात्राचा उपयोग करावा. यांचा अभाव असेल तर मातीची भांडी शीतल आणि पवित्र असतात. तुटक्या फुटक्या भांड्यातून आणि ओंजळीतून पाणी पिऊ नये. [१]


उत्तर लिहिले · 4/9/2021
कर्म · 121765
0

विविध प्रकारच्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याचे आणि जेवण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

  • लोखंडी भांडी:

    लोखंडी भांड्यांमध्ये जेवण बनवल्याने अन्नामध्ये लोह (Iron) मिसळते. लोहामुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि ॲनिमिया (Anemia) म्हणजेच रक्ताची कमतरता दूर होते.

  • पितळेची भांडी:

    पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने रोगप्रतिकारशक्ती सुधारते. तसेच, पोटाचे विकार कमी होतात.

  • कांशाची भांडी:

    कांशाच्या भांड्यात जेवण केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. तसेच, भूक वाढण्यास मदत होते.

  • तांब्याची भांडी:

    तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायल्याने ते शुद्ध होते. तांबे antimicrobial असल्याने ते जंतू मारते. (National Center for Biotechnology Information)

  • स्टीलची भांडी:

    स्टीलची भांडी वापरण्यास सोपी आणि टिकाऊ असतात. ती गंज resistent असल्यामुळे सहजपणे खराब होत नाहीत.

  • ॲल्युमिनियमची भांडी:

    ॲल्युमिनियमच्या भांड्यात जेवण बनवणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते, कारण ॲल्युमिनियम अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते.

  • मातीची भांडी:

    मातीच्या भांड्यात जेवण बनवल्याने अन्नाला नैसर्गिक स्वाद येतो आणि ते पौष्टिक राहते.

टीप: कोणतेही भांडे वापरण्यापूर्वी ते तुमच्या आरोग्यासाठी सुरक्षित आहे का, याची खात्री करा.

तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास, जरूर विचारा.


उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 2020

Related Questions

कमी कॅलरीचे अन्न कोणते?
जेवण पोटभर जात नाही?
जेवण जात नाही?
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?
पसाभर बदामामध्ये किती प्रोटीन असते?
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी कोणता आहार घ्यावा?
100 ग्रॅम सोयाबीनमध्ये प्रथिने किती असतात?