प्रेरणा
घरगुती उपाय
खच्चीकरण
ध्यानधारणा
मानसशास्त्र
भावनिक कल्याण
मानसिक स्वास्थ्य
मनात मी खचून गेलो, त्यांच्यासाठी मी काय करू?
2 उत्तरे
2
answers
मनात मी खचून गेलो, त्यांच्यासाठी मी काय करू?
35
Answer link
कृपया संपूर्ण उत्तर वाचा...!
असाच एक English picture बघितलेला, ...'Last Holiday'......'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.
त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी ' सुट्टी घेणं' परवडत नव्हतं, त्या 'मोठ्ठ्या सुट्टी' वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये...आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते...."why now ?...आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?"
पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता 'आणखी काही' गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा 'दांभिक सभ्यतेचा बुरखा फाडून स्वतः शी आणि इतरांशी प्रामाणिक पणे राहते/बोलते/ वागते.
आणि तिला जाणवतं आत्तपर्यन्त आयुष्य गृहीत धरताना... आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही... केवळ "भविष्य" आणि "लोक काय म्हणतील" याची चिंता करत हे सुंदर आयुष्य फुकट घालवले... "I have wasted too much of time on assumptions...now i have time only for reality...
राहिलेले दोन आठावड्यांचा सच्चे पणाने जगायला सुरुवात करते... तिच्या डिपार्टमेंट स्टोर च्या ओनर ला ही खरी खोटी सुनवुन दाखवते... त्याच्या चुकीच्या वागण्याची त्याला जाणीव करुन देते...
आणि अचानक तिला कळते की तिचे रिपोर्ट्स चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... ती मरणार नाही... तिच्या आनंदाला पारावार राहत नाही... पण या last holiday ने शिकविलेला धड़ा ती कधीच विसरु शकत नाही...
तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात...
फ़िल्मी भाग सोडला तर खरेच विचार करायला लावणारा होता...
नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास...!
आपणही,... आजचा, आत्ताचा क्षण कधी भरभरुन जगतच नाही...! मनात कायम उद्याची चिंता...!
काहीतरी अशाश्वत मिळविण्यासाठी ... कायम हातचे सोडून पळत्या पाठी... जीवाच्या आकांताने पळत राहतो...
इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो...
सगळा आनंद/ सगळी मजा...एखाद्या सुट्टीत उपभोगण्यासाठी शिलकित टाकला जातो... आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरंच हवे होतं... आनंद ... हे या कशातच नव्हते... हे कळायच्या आतच शेवटची सुट्टी लागते... शिलकितील पूंजी तशीच राहून जाते...न वापरलेली... कोरिच्या कोरी... पण आता निरुपयोगी...!
या शेवटच्या सुट्टी पर्यन्त वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच क्षणात चिंता व भयमुक्त होऊन जगुन घेतला तर..! तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकेच आनंदाचा होईल...!
नोकरी... व्यवसाय... जबाबदारी मात्र करावी... सोडु नये... पण त्यात नेहमी आनंद आणि आनंद असला पाहिजे...
तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहता इतरही आनंदी दिसू लागतात...
मन हे चंचल असते... कधीच शांत नसते... प्राणायम करा की योगासने... विचारांवर मात करू शकतो पण मन हे मनाचे राज्य असते... आणि जो पर्यन्त आपण मनाला समजून घेत नाही तो पर्यन्त मन ही तुम्हाला समजत नाही...
म्हणून बेभान नका होऊ पण चिंतामुक्त रहा...
मन खचून काय प्राप्त होईल...?
काहीच नाही...
मनाला उदास ठेवू नका...!
अजुन एक म्हणजे आपण ना नेहमी तक्रार करतो... स्वतः ची , इतरांची... जितकी तक्रार कमी तितकेच आयुष्य सुरळीत होते...
म्हणून सकारात्मक राहा...
आनंदी रहा...
चांगले विचार असले की ...चांगले मार्ग मिळते...!
धन्यवाद...
असाच एक English picture बघितलेला, ...'Last Holiday'......'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं.
त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी ' सुट्टी घेणं' परवडत नव्हतं, त्या 'मोठ्ठ्या सुट्टी' वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये...आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते. तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते...."why now ?...आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?"
पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता 'आणखी काही' गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा 'दांभिक सभ्यतेचा बुरखा फाडून स्वतः शी आणि इतरांशी प्रामाणिक पणे राहते/बोलते/ वागते.
आणि तिला जाणवतं आत्तपर्यन्त आयुष्य गृहीत धरताना... आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही... केवळ "भविष्य" आणि "लोक काय म्हणतील" याची चिंता करत हे सुंदर आयुष्य फुकट घालवले... "I have wasted too much of time on assumptions...now i have time only for reality...
राहिलेले दोन आठावड्यांचा सच्चे पणाने जगायला सुरुवात करते... तिच्या डिपार्टमेंट स्टोर च्या ओनर ला ही खरी खोटी सुनवुन दाखवते... त्याच्या चुकीच्या वागण्याची त्याला जाणीव करुन देते...
आणि अचानक तिला कळते की तिचे रिपोर्ट्स चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... ती मरणार नाही... तिच्या आनंदाला पारावार राहत नाही... पण या last holiday ने शिकविलेला धड़ा ती कधीच विसरु शकत नाही...
तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात...
फ़िल्मी भाग सोडला तर खरेच विचार करायला लावणारा होता...
नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास...!
आपणही,... आजचा, आत्ताचा क्षण कधी भरभरुन जगतच नाही...! मनात कायम उद्याची चिंता...!
काहीतरी अशाश्वत मिळविण्यासाठी ... कायम हातचे सोडून पळत्या पाठी... जीवाच्या आकांताने पळत राहतो...
इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या शर्यतीत सहभागी होतो...
सगळा आनंद/ सगळी मजा...एखाद्या सुट्टीत उपभोगण्यासाठी शिलकित टाकला जातो... आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरंच हवे होतं... आनंद ... हे या कशातच नव्हते... हे कळायच्या आतच शेवटची सुट्टी लागते... शिलकितील पूंजी तशीच राहून जाते...न वापरलेली... कोरिच्या कोरी... पण आता निरुपयोगी...!
या शेवटच्या सुट्टी पर्यन्त वाट न पाहता प्रत्येक क्षण, त्याच क्षणात चिंता व भयमुक्त होऊन जगुन घेतला तर..! तर प्रत्येक क्षण त्या सुट्टी इतकेच आनंदाचा होईल...!
नोकरी... व्यवसाय... जबाबदारी मात्र करावी... सोडु नये... पण त्यात नेहमी आनंद आणि आनंद असला पाहिजे...
तुमच्या चेहऱ्यावर चा आनंद पाहता इतरही आनंदी दिसू लागतात...
मन हे चंचल असते... कधीच शांत नसते... प्राणायम करा की योगासने... विचारांवर मात करू शकतो पण मन हे मनाचे राज्य असते... आणि जो पर्यन्त आपण मनाला समजून घेत नाही तो पर्यन्त मन ही तुम्हाला समजत नाही...
म्हणून बेभान नका होऊ पण चिंतामुक्त रहा...
मन खचून काय प्राप्त होईल...?
काहीच नाही...
मनाला उदास ठेवू नका...!
अजुन एक म्हणजे आपण ना नेहमी तक्रार करतो... स्वतः ची , इतरांची... जितकी तक्रार कमी तितकेच आयुष्य सुरळीत होते...
म्हणून सकारात्मक राहा...
आनंदी रहा...
चांगले विचार असले की ...चांगले मार्ग मिळते...!
धन्यवाद...
0
Answer link
मला समजले की तुम्ही कठीण परिस्थितीतून जात आहात. अशा परिस्थितीत, तुम्ही स्वतःची काळजी घेणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे महत्त्वाचे आहे.
तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
- भावना व्यक्त करा: तुमच्या भावनांबद्दल विश्वासू व्यक्तीशी बोला. मित्र, कुटुंब किंवा व्यावसायिक सल्लागार मदतीसाठी उपलब्ध आहेत.
- स्वतःची काळजी घ्या: पुरेसा आराम करा, पौष्टिक अन्न खा आणि नियमित व्यायाम करा.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: सकारात्मक विचारसरणीचा सराव करा आणि नकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे टाळा.
- लक्ष विचलित करा: चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे किंवा छंद जोपासणे यांसारख्या आनंददायी क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा.
- मदत मागा: भावनिक आधारासाठी ऑनलाइन संसाधने, हेल्पलाइन किंवा समर्थन गटांशी संपर्क साधा.
टीप: ही केवळ सामान्य माहिती आहे आणि व्यावसायिक सल्ल्याचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी कृपया मानसिक आरोग्य तज्ञाचा सल्ला घ्या.