
ध्यानधारणा

ध्यान करताना डोळे उघडे ठेवायचे की बंद, हे ध्यानाच्या प्रकारावर आणि तुमच्या सोयीवर अवलंबून असते. दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे आहेत.
- एकाग्रता वाढते: डोळे बंद केल्याने बाहेरील distractions कमी होतात आणि लक्ष एकाग्र करणे सोपे जाते.
- शांतता: डोळे मिटल्याने मनाला शांती मिळते.
- अंतर्मुखता: हे आपल्याला आपल्या आत डोकावण्यास मदत करते.
- alertness: झोप येण्याची शक्यता कमी होते.
- वास्तविकता: हे ध्यानाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यास मदत करते.
शेवटी, तुमच्यासाठी काय चांगले काम करते हे शोधणे महत्त्वाचे आहे. प्रयोग करा आणि तुम्हाला सर्वात आरामदायक आणि प्रभावी काय वाटते ते पहा.
तुम्ही खालील लिंकवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता:
- ईशा फाउंडेशन: ईशा फाउंडेशन लेख
तुमच्या प्रश्नाचा अर्थ असा आहे की राज्यशास्त्र हा एक 'शास्त्र' (Science) आहे की नाही? 'शास्त्र' म्हणजे काय, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शास्त्रामध्ये विशिष्ट नियमांचे पालन केले जाते, जसे की निरीक्षण, प्रयोग, विश्लेषण आणि निष्कर्ष. या आधारावर, आपण पाहू की राज्यशास्त्र हे शास्त्र आहे की नाही:
राज्यशास्त्र (Political Science) एक शास्त्र आहे का?
1. पद्धतशीर अभ्यास: राज्यशास्त्रामध्ये राजकीय घटना, विचार आणि संस्था यांचा पद्धतशीर अभ्यास केला जातो.
2. सिद्धांत आणि नियम: यात काही सिद्धांत आणि नियम आहेत, जे राजकीय वर्तनाचे स्पष्टीकरण देतात.
3. अनुभवजन्य अभ्यास: राज्यशास्त्रज्ञ राजकीय घटनांचा अनुभवजन्य डेटा (empirical data) वापरून अभ्यास करतात.
4. विश्लेषणात्मक साधने: राजकीय विश्लेषणासाठी सांख्यिकी (statistics) आणि इतर विश्लेषणात्मक साधनांचा वापर केला जातो.
परंतु काही मर्यादा:
1. मानवी वर्तन: राज्यशास्त्र मुख्यतः मानवी वर्तनाशी संबंधित आहे, जे पूर्णपणे predictable नसते.
2. व्यक्तिनिष्ठता: राजकीय विचार आणि विचारधारा व्यक्तिनिष्ठ (subjective) असू शकतात.
3. प्रयोगांची कमतरता: नैसर्गिक विज्ञानांप्रमाणे (natural sciences) राज्यशास्त्रात प्रयोग करणे कठीण आहे.
निष्कर्ष:
राज्यशास्त्र पूर्णपणे नैसर्गिक विज्ञानासारखे नसले तरी, ते एक सामाजिक विज्ञान (social science) आहे. यात विशिष्ट पद्धती, सिद्धांत आणि विश्लेषणात्मक साधने वापरली जातात. त्यामुळे, राज्यशास्त्र एक 'शास्त्र' आहे, असे म्हणता येईल.
ध्यानामुळे तणावमुक्ती
ध्यानाचे दोन महत्वपूर्ण फायदे आहेत :
तणावाला आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये येण्यापासून प्रतिरोध आणिआपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत
हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदी ठेवतात.
ध्यानाचे शारीरिक फायदे
ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो.
ध्यानामुळे शारीरक स्तरावर होणारे फायदे
उच्च रक्तदाब कमी होतो.रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते.मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात.सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते.रोगप्रतिकार शक्ती वाढते.एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.
ध्यानामुळे मानसिक स्तरावर होणारे फायदे
ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रोग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू आणि सुंदर होते. नियमित ध्यान केल्याने :
अनामिक भीती कमी होते.भावनात्मक स्थिरता वाढते.सृजनात्मकता वाढते.आनंद वाढतो.अंतर्ज्ञान (तात्कालिक ज्ञान) विकसित होते.परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक शांती मिळते.समस्या छोट्या वाटू लागतात.एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि विश्रांतीमुळे मनाचा विस्तार होतो.कुशाग्र मनाचा विस्तार न झाल्यास तणाव, राग आणि निराशा वाढते.विस्तारित चेतना जर कुशाग्र नसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही.तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास मदत होते.
आपल्यातील वृत्तींमुळेच आपण आनंदी किंवा दु:खी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते.
ध्यानाचे इतर फायदे
भावनिक स्थिरता आणि सुसंवाद : ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावना उफाळून येतात, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, भावनांचा अतिरेक होतो, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.
समस्त सृष्टीशी सुसंगती: जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशाची विशालता, शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता.
आत्मविकास: रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.
जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
वैयक्तिक परिवर्तन: ध्यान हे तुमच्यात खरेखुरे वैयक्तिक परिवर्तन आणू शकते. स्वत: विषयी ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. आणि मग "आयुष्याचा अर्थ काय? आयुष्याचा हेतू काय? विश्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतात.
ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतील त्यावेळी हे नक्की समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पहाल.
तुमच्यात वैश्विक चेतनेचा उदय होतो:
दररोज ध्यान केल्याने चेतनेची पाचवी स्थिती म्हणजेच वैश्विक चेतना आपण अनुभवू लागतो. वैश्विक चेतना म्हणजेच संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होणे.
ज्यावेळी संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होते त्यावेळी तुम्ही आणि विश्व हे प्रेमाच्या धाग्यात अगदी घट्ट बांधले जातात. आणि ह्याच प्रेमामुळे तुम्हाला जीवनातील अशांती आणि विरोधी तत्त्वांच्या पलीकडे जाण्याची क्षमता येते. राग आणि निराशा ह्या "आली रे आली की गेली" अशा क्षणभंगूर भावना होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
ज्ञान आणि ध्यान याचं संगम आयुष्य परिपूर्ण करते. जेंव्हा तुम्ही वैश्विक चेतनेची पातळी गाठता, तेंव्हा तुम्ही सुंदर तरीही सशक्त बनता. जीवनाची वेगवेगळी मुल्ये विनाशर्त सामावून घेणारं एक मृदू, नाजूक आणि सुंदर व्यक्तिमत्व बनता.
ध्यानाचे फायदे कसे घ्यावेत
ध्यानाचे फायदे अनुभवण्यासाठी नियमित सराव करत राहणे जरुरी आहे, आणि तो पण फक्त रोजची काही मिनिटे. एकदा का ते तुमच्या रोजच्या व्यवहातर समाविष्ट झाले की ध्यान हे तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग बनून जाईल.
ध्यान हे एका बीजा प्रमाणे आहे. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे ध्यान. काही ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्षे पण लागतात. आणि ज्या झाडांना खत पाणी मिळत नाही, ज्यांची काही काळजी घेतली जात नाही, त्यांना कधीच फळे लागत नाहीत. ती फक्त जगतात.
सर्व कार्यक्षेत्रातील व्यस्त लोक रोज काही मिनिटे ध्यानाचा आनंद लुटायला मिळतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात. आत्म्यात खोल डुबकी मारा आणि आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध बनवा.
स्रोत:द आर्ट ऑफ़ लिविंग वेबसाईट
डोळे मिटून आसनावर बसावे. ताठ बसावे. सुरवातीची दोन मिनिटे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत करावे.
नंतर ओम नमः शिवाय किंवा नुसता ओम: ओम: असा दीर्घोच्चार करावा.
त्याने मनाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान होते. विलक्षण शांतीचा अनुभव होतो.
मनाला विरोध नाही करायचा किंवा त्यावर ताबाही नाही चालवायचा.
फक्त मनात काय चाललंय त्याकडे तटस्थपणे पहात रहायचे.
मनात जे विचार येतात त्यांकडे लक्ष ठेवायचे.
कसलेही पूर्वग्रह ठेवून चांगले विचार, वाईट विचार असे न मानता केवळ लक्ष ठेवायचे विचारांवर.
मनात येणाऱ्या विचारांना कुठल्याही प्रतिक्रिया ( reactions ) द्यायच्या नाहीत :
की , " हे असं माझ्या मनात यायला नको",
की, "हा वाईट विचार आहे, किंवा, हा सुंदर विचार आहे, किंवा, हा मौल्यवान विचार आहे."
मनात येणाऱ्या विचारांना कुठल्याही पूर्वग्रहांच्या चष्म्यातून न पहाता ते जसे आहेत तसेच पहायचे आहे.
तुम्ही ज्या क्षणी विचारांना कुठलीही प्रतिक्रिया दिली वा योग्य/ अयोग्य ठरवले, की तुमचे ध्यान तुटले! तुम्ही विचारात गुंतलात !
कारण ध्यान म्हणजे विचारप्रक्रिये पासून अलिप्त रहाणे आहे.
पूर्णपणे अलिप्त, शांत!
मनात काय चाललंय ते फक्त न्याहाळत रहायचे.
आणि मग? एक जादू होते! आपल्याला लक्षात येते की विचार कमी कमी होत आहेत.
अगदी हळूहळू आपल्या लक्षात येते की मनातले विचार कमी कमी होत आहेत.
तुम्ही जेवढे जास्त जागरूक, तेवढे विचार कमी येतात.
तुमची जागरूकता कमी झाली की विचारांची संख्या वाढते.
हे म्हणजे जणू काही जागरूकतेवर अवलंबून असलेली विचारांची रहदारीच!
जेव्हा तुम्ही अगदी क्षणभर का होईना, संपूर्णपणे जागरूक असता, तेव्हा विचार पूर्णपणे थांबतात.
ताबडतोब आणि अचानक सर्वकाही थांबते, 'रोड' पूर्ण मोकळा, रहदारी पूर्णपणे थांबते.
हा क्षण म्हणजेच ध्यान.
धन्यवाद😊😊