
ध्यानधारणा
1
Answer link
श्वासात परमात्मा कसा ओळखावा
ध्यान समाधी साधताना तुम्हाला मन शरीर वासना विचार यांचा विरोध होईल पण
-
तिकडे लक्ष नका देऊ विचांराना रोकू नका. विरोध करु नका. संघर्ष नके जे येतात, ते
जातातही. शरीराला मनाला पीडा देत बसू नका. कारण तुमची आत्म उर्जा त्याच कामात खर्च
-
होऊन जाईल. राग आला, क्रोध आला, अहंकार आला तर केवळ त्योच येणे पहा. त्याच्या
परिवारात सामिल नका होऊ. मूल झोपी गेले की त्याची सारी खेळणी जवळच इतस्ततः पडलेली
दिसतात. तसे तुम्ही आता ध्यानात आहात. काही करीत नाही आहात.
विकार, वासना अति विचार यामुळे आत्मउर्जेचा नाश होतो. ते सारे आत्मप्रदूषक व चित्त प्रदूषक असतात. ते प्रदूषण घालवयाचे तर समाधी तंत्रातील एक एक श्लोक स्पष्टपणे हळूहळु म्हणावा. अर्थाकडे फार दुऊनका प्रत्येक श्लोक हा केवळ मंत्रच आहे, असे जाणा. तोच श्लोक २/३ वेळा म्हणावा तसे केल्याने चित्तशुध्दीचा । पर्गेशन्स ऑफ इमोशन) मार्ग शुध्द होतजातो. जे श्लोक सहज, सुलभ सोपे असतील ते पुनः म्हणावेत, प्रत्येक शब्द, ओळ याकडे सुरुवातीला कटाक्षाने लक्ष द्यावे. कशाचीही घाई / गडबड नसावी. ध्यानात हळुहळू आकंठ डुंबण्याची रीत सुलभतेने प्राप्त होईल.
ध्यान करताना मौन है महत्वाचे साधन आहे. बोलणे बंद. कुणाला काहीही सुचना देऊ नका. गोंगाट, गडबड जेथे नाही, अशीच अनुभवा. इतर सारे विचार / आकांक्षा हळुहळू निरस्त होत जातील. तणाव मुक्त ध्यान, तणाव रहित मौन हे अधिक उपयोगी, म्हणून धैर्य जीवन पध्दती. तुमचे मित्र आप्त इ. साऱ्यांचा तुमच्यावर प्रभाव प्रतीचे धैर्य, सहनशीलता है ध्यानाला सहाय्यक होतात.
ध्यान म्हणजे परमात्म्याच्या दिशेने होणारी यात्रा आहे. त्या यात्रेत तुम्ही एकटेच आहात. एकअयानेच जायचे आहे. हळूहळू सारी इंद्रिये, मन व त्यांचे सर्व विषय हे निरस्त करीत जातील.. केवळ तुम्हीच, एकटेच त्या यात्रेत आहात. डोळेही बंद व त्या डोळ्याने जे पाहात होता, बाहेरचे विश्व तेही बंद. गहन अंधारात तुम्ही प्रवेशत आहात. त्या अंधारात सारे विश्व बुडाले आहे. तेथे तुम्हीच काय ते प्रकाशमान आहात. अशी एकटेपणची एकत्वाची स्थिती येईल. ,
ध्यान ही क्रिया नाही, हे अगोदर घ्यानात घ्या. शरीर पूर्णतः शिथिल, शांत स्थिर व पूर्ण विश्रामात असावे. मनही तसेच. कसल्याही टोकाच्या भूमिकेत राहू नका. कारण मग तुम्ही परमात्म्च्या प्रत जाऊच शकणार नाही. म्हणून सारे ताण तणाव इच्छा, वासना, विचार यांना बाहेरच ठेवावे. ध्यान साध्य झाले वा नाही, याचाही विचार नको. केवळ एका शांत स्वभावात तुम्ही श्वास घेता आहात, तो श्वासही जाणवू घेत आहात, अनुभवत आहात . ध्यान प्रक्रियेत तन, मन विचार शांत होत जातील. प्रतिक्षा करा. घाई करु नका.
अगदी सुरुवातीच्या स्थितीत एखादया मंत्राचाही आश्रय घेतला तरी तो योग्य होय. उदाहरणार्थ ओम णमो अरिहंताणं हा मंत्र उच्चारत राहावा त्या मंत्राशी एकरूप व्हावे. सा-यआविचारांची चक्रे आपोआप थांबतील. काही दिवसांनी तुम्ही शांत होत आहात, तणावमुक्त होत आहात. स्थिर होत आहात.
या समाधि तंत्रातून हाच विचार मांडला आहे. शरीर व आत्मा एक आहे, ही भावना सर्वाची असते. म्हणून देह भिन्न, वेगळा, अशी मानसिक धारणा आचार्य तयार कतात. देह वेगळा, माझा आत्मा वेगळा अशा विचारांच्या लहरीी तयार होतहल. हळुहळू त्या विचारांच्या लहरी तयार 1 होतील. हळुहळू त्या विचारांची परिपक्वता, दृढता मनात निर्माण होईल. वेळ खूपच लागेल. असे समजा. पण अशी भाव स्थिती आतून हृढ होत जाईल. तशी भावस्थ्तिी पक्की व्हावी म्हणून आचार्यानी वेगवेगळे दृष्टांत, उदाहरणे दिली आहेत. त्यातून मन मोकळे होईल, प्रसन्न होईल व हळुहळू ते मनही शंत व निरस्त होईल. असा दृढ अभ्यास- साधना होत गेल्यावर तुम्ही समाधी तंत्रात प्रवेश करीत जाल.
अशी शांत अवस्था प्राप्त होत असताना समाधी शतकाचे भक्ती पूर्वक, तल्लीनतापूर्वक पठण करावे. जे श्लोक मनाला अधिक प्रिय अधिक प्रेरक असतील त्यांची निवड करावी व तेच श्लोक १० १५ नित्य म्हणत जावेत. सारेच श्लोक एकाच बैठकीत म्हटले पाहिजे असे नाही. जेवढे शक्य, तवेढे नित्य करावे. आपल्या ध्यान साधनेची चर्चाही कुणाशी करु नये. काय प्राप्त इ झाले हे देखील पाहत बसू नये. ध्यान व तुम्ही असे एकरुप णालात की मग ते ध्यान तुम्ही चालता बोलता वा इतर सा-या क्रिया करताना देखील सहज साध्य होईल. ध्यान सहज घडावे. कारण ध्यान करणारा व ध्यान दोन असणार नाहीत. असो.
तुमच्या जीवनात अशी ध्यान ज्योत पेटावी, तुमचे जीवन सुंदर, शांत प्रसन्न, निर्लेप व्हावे यासाठी हा छोटासा ग्रंथ तयार करुन तुम्हाला अर्पण केला आहे.
1
Answer link
ध्यान करताना पाठीचा कणा सरळ असावा. बसल्यावर डोके, मान, पाठ, माकडहाड एका रेषेत आणि जमिनीला काटकोनात असावे.
बसताना वज्रासन, पद्मासन, अर्धपद्मासन, सुखासन अशा कुठल्याही अवस्थेत बसावे. मी बहुतेक वेळा डावा पाय खाली आणि त्यावर उजवा पाय अशी मांडी घालून बसतो. तुम्हाला काय सोयीचं जातं ते बघावं, आणि त्यानुसार बसावं.

ही झाली ध्यानासाठी बसण्याची आदर्श पध्दत किंवा आदर्श 'पोश्चर' (posture). पण प्रत्येक जण आदर्श 'पोश्चर'मध्ये बसू शकत नाही.
काही लोकांना खाली बसता येत नाही, त्यांनी खुर्चीवर बसावं. शक्यतो पाठीचा कणा सरळ असावा.
काही लोकांच्या शारीरिक मर्यादा असतात. त्यांना 'बसणं' शक्य नसतं. त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार योग्य त्या अवस्थेत ध्यान करावे.
एक गोष्ट महत्त्वाची: शरीराला त्रास करून घेणं हा ध्यानाचा हेतू नाही!
ध्यान करण्याचे दोन हेतू: धार्मिक आणि आध्यात्मिक.
धार्मिक म्हणजे परमेश्वराची आराधना करण्यासाठी. आध्यात्मिक म्हणजे 'वर्तमानात जगायला शिकण्यासाठी'. (तुम्ही 'ध्यान आणि योग उपचार', 'लक्ष केंद्रित करणे' या कारणांसाठी ध्यान करू इच्छिता. त्याला मी अध्यात्म म्हणतो.)
हेतू कुठलाही असो, पण एका गोष्टीची जाणीव ठेवावी. ध्यानासाठी बसताना आदर्श 'पोश्चर'मध्ये बसण्याचा प्रयत्न करावा, पण हट्ट धरू नये.
कुठल्याही गोष्टीला घट्ट धरायचा हट्ट सोडणं, हीच ध्यानाची पूर्व अट आहे!
0
Answer link
ध्यान करताना डोळे उघडे ठेवायचे की बंद, हे ध्यानाच्या प्रकारावर आणि तुमच्या सोयीवर अवलंबून असते. दोन्ही पद्धतींचे फायदे आणि तोटे आहेत.
डोळे बंद ठेवून ध्यान करण्याचे फायदे:
- एकाग्रता वाढते: डोळे बंद केल्याने बाहेरील distractions कमी होतात आणि लक्ष एकाग्र करणे सोपे जाते.
- शांतता: डोळे मिटल्याने मनाला शांती मिळते.
- अंतर्मुखता: हे आपल्याला आपल्या आत डोकावण्यास मदत करते.
डोळे उघडे ठेवून ध्यान करण्याचे फायदे:
- alertness: झोप येण्याची शक्यता कमी होते.
- वास्तविकता: हे ध्यानाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनण्यास मदत करते.
शेवटी, तुमच्यासाठी काय चांगले काम करते हे शोधणे महत्त्वाचे आहे. प्रयोग करा आणि तुम्हाला सर्वात आरामदायक आणि प्रभावी काय वाटते ते पहा.
तुम्ही खालील लिंकवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता:
- ईशा फाउंडेशन: ईशा फाउंडेशन लेख
19
Answer link
ध्यान केल्याने तुम्हाला हे सर्व फायदे आणि बरंच काही मिळू शकते. तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, तुमचे काम तितकेच जास्त गतिशील.
ध्यानामुळे तणावमुक्ती
ध्यानाचे दोन महत्वपूर्ण फायदे आहेत :
तणावाला आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये येण्यापासून प्रतिरोध आणिआपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत
हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदी ठेवतात.
ध्यानाचे शारीरिक फायदे
ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो.
ध्यानामुळे शारीरक स्तरावर होणारे फायदे
उच्च रक्तदाब कमी होतो.रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते.मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात.सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते.रोगप्रतिकार शक्ती वाढते.एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.
ध्यानामुळे मानसिक स्तरावर होणारे फायदे
ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रोग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू आणि सुंदर होते. नियमित ध्यान केल्याने :
अनामिक भीती कमी होते.भावनात्मक स्थिरता वाढते.सृजनात्मकता वाढते.आनंद वाढतो.अंतर्ज्ञान (तात्कालिक ज्ञान) विकसित होते.परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक शांती मिळते.समस्या छोट्या वाटू लागतात.एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि विश्रांतीमुळे मनाचा विस्तार होतो.कुशाग्र मनाचा विस्तार न झाल्यास तणाव, राग आणि निराशा वाढते.विस्तारित चेतना जर कुशाग्र नसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही.तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास मदत होते.
आपल्यातील वृत्तींमुळेच आपण आनंदी किंवा दु:खी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते.
ध्यानाचे इतर फायदे
भावनिक स्थिरता आणि सुसंवाद : ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावना उफाळून येतात, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, भावनांचा अतिरेक होतो, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.
समस्त सृष्टीशी सुसंगती: जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशाची विशालता, शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता.
आत्मविकास: रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.
जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
वैयक्तिक परिवर्तन: ध्यान हे तुमच्यात खरेखुरे वैयक्तिक परिवर्तन आणू शकते. स्वत: विषयी ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. आणि मग "आयुष्याचा अर्थ काय? आयुष्याचा हेतू काय? विश्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतात.
ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतील त्यावेळी हे नक्की समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पहाल.
तुमच्यात वैश्विक चेतनेचा उदय होतो:
दररोज ध्यान केल्याने चेतनेची पाचवी स्थिती म्हणजेच वैश्विक चेतना आपण अनुभवू लागतो. वैश्विक चेतना म्हणजेच संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होणे.
ज्यावेळी संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होते त्यावेळी तुम्ही आणि विश्व हे प्रेमाच्या धाग्यात अगदी घट्ट बांधले जातात. आणि ह्याच प्रेमामुळे तुम्हाला जीवनातील अशांती आणि विरोधी तत्त्वांच्या पलीकडे जाण्याची क्षमता येते. राग आणि निराशा ह्या "आली रे आली की गेली" अशा क्षणभंगूर भावना होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
ज्ञान आणि ध्यान याचं संगम आयुष्य परिपूर्ण करते. जेंव्हा तुम्ही वैश्विक चेतनेची पातळी गाठता, तेंव्हा तुम्ही सुंदर तरीही सशक्त बनता. जीवनाची वेगवेगळी मुल्ये विनाशर्त सामावून घेणारं एक मृदू, नाजूक आणि सुंदर व्यक्तिमत्व बनता.
ध्यानाचे फायदे कसे घ्यावेत
ध्यानाचे फायदे अनुभवण्यासाठी नियमित सराव करत राहणे जरुरी आहे, आणि तो पण फक्त रोजची काही मिनिटे. एकदा का ते तुमच्या रोजच्या व्यवहातर समाविष्ट झाले की ध्यान हे तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग बनून जाईल.
ध्यान हे एका बीजा प्रमाणे आहे. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे ध्यान. काही ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्षे पण लागतात. आणि ज्या झाडांना खत पाणी मिळत नाही, ज्यांची काही काळजी घेतली जात नाही, त्यांना कधीच फळे लागत नाहीत. ती फक्त जगतात.
सर्व कार्यक्षेत्रातील व्यस्त लोक रोज काही मिनिटे ध्यानाचा आनंद लुटायला मिळतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात. आत्म्यात खोल डुबकी मारा आणि आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध बनवा.
स्रोत:द आर्ट ऑफ़ लिविंग वेबसाईट
ध्यानामुळे तणावमुक्ती
ध्यानाचे दोन महत्वपूर्ण फायदे आहेत :
तणावाला आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये येण्यापासून प्रतिरोध आणिआपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत
हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदी ठेवतात.
ध्यानाचे शारीरिक फायदे
ध्यानामुळे आपल्या शरीर प्रणालीमध्ये बदल घडतात आणि शरीराच्या प्रत्येक कणात अधिक प्राणशक्ती भरली जाते. ह्याचाच परिणाम म्हणजे आपल्याला अधिक आनंद व शांती मिळते आणि उत्साह वाढतो.
ध्यानामुळे शारीरक स्तरावर होणारे फायदे
उच्च रक्तदाब कमी होतो.रक्तातील लॅक्टिक अॅसिडची मात्रा कमी होते, ज्यामुळे उगीचच भीती वाटणे कमी होते.मानसिक तणावाशी संबंधित तक्रारी (जसे डोकेदुखी, व्रण, निद्रानाश, स्नायू व सांधे संबंधित तक्रारी) कमी होतात.सेरोटोनीन निर्मिती वाढते, ज्यामुळे आपला मूड आणि वर्तन सुधारण्यास सहाय्य होते.रोगप्रतिकार शक्ती वाढते.एक आंतरिक शक्ती स्त्रोत मिळतो.
ध्यानामुळे मानसिक स्तरावर होणारे फायदे
ध्यानामुळे मेंदू लहरी “अल्फा स्थितीत” येतात ज्यामुळे रोग-निवारणाची नैसर्गिक प्रक्रिया सुलभपणे होते. मन ताजे, मृदू आणि सुंदर होते. नियमित ध्यान केल्याने :
अनामिक भीती कमी होते.भावनात्मक स्थिरता वाढते.सृजनात्मकता वाढते.आनंद वाढतो.अंतर्ज्ञान (तात्कालिक ज्ञान) विकसित होते.परिस्थितीचे स्पष्टपणे आकलन करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक शांती मिळते.समस्या छोट्या वाटू लागतात.एकाग्रता वाढल्यामुळे मन कुशाग्र होते आणि विश्रांतीमुळे मनाचा विस्तार होतो.कुशाग्र मनाचा विस्तार न झाल्यास तणाव, राग आणि निराशा वाढते.विस्तारित चेतना जर कुशाग्र नसेल तर क्रियाशीलता अथवा प्रगती होणे शक्य नाही.तीक्ष्ण मन आणि विस्तारित चेतना यांचा समतोल असेल तर परिपूर्णता येण्यास मदत होते.
आपल्यातील वृत्तींमुळेच आपण आनंदी किंवा दु:खी होतो हे ध्यान केल्याने लक्षात येते.
ध्यानाचे इतर फायदे
भावनिक स्थिरता आणि सुसंवाद : ध्यान केल्याने आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक स्तरावर पोषण मिळते. ज्या ज्या वेळी आपल्या भावना उफाळून येतात, आपल्याला मानसिक अस्थिरता वाटते, भावनांचा अतिरेक होतो, त्या त्या वेळी मन शांत करण्यास ध्यान मदत करते.
समस्त सृष्टीशी सुसंगती: जेव्हा तुम्ही ध्यान करता त्यावेळी तुमचे मन आकाशाची विशालता, शांतता आणि आनंदाने भरून जाते आणि ह्याच गोष्टी तुम्ही वातावरणात पसरवता व सृष्टीमध्ये सुसंगती निर्माण करता.
आत्मविकास: रोजच्या आयुष्यात जर आपण ध्यानाला जागा दिली तर आत्म्याचा विकास होते, व हळूहळू विकसित आणि शुद्ध चेतना म्हणजे काय याचा अनुभव होतो.
जेव्हा आत्मा विकसीत आणि विशाल होते त्यावेळी आयुष्यातील क्षोभ अगदी नगण्य होऊन जातो. राग आणि निराशा ह्या भावना क्षणिक होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
वैयक्तिक परिवर्तन: ध्यान हे तुमच्यात खरेखुरे वैयक्तिक परिवर्तन आणू शकते. स्वत: विषयी ज्यावेळी तुम्हाला अधिक समजायला लागते त्यावेळी स्वाभाविकपणे आयुष्याचे रहस्य, विश्वाचे रहस्य जाणून घेण्याची उत्सुकता वाढते. आणि मग "आयुष्याचा अर्थ काय? आयुष्याचा हेतू काय? विश्व म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? वगैरे वगैरे असे प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतात.
ज्यावेळी हे प्रश्न तुमच्या मनात यायला लागतील त्यावेळी हे नक्की समजा की तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात. हे प्रश्न समजून घेण्याची गरज आहे. ह्या प्रश्नांची उत्तरे एखाद्या पुस्तकात वगैरे मिळणार नाहीत. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधता शोधता तुमचे जीवन एका उच्च स्तरावर गेलेले पहाल.
तुमच्यात वैश्विक चेतनेचा उदय होतो:
दररोज ध्यान केल्याने चेतनेची पाचवी स्थिती म्हणजेच वैश्विक चेतना आपण अनुभवू लागतो. वैश्विक चेतना म्हणजेच संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होणे.
ज्यावेळी संपूर्ण विश्व हे आपलाच एक भाग असल्याची जाणीव होते त्यावेळी तुम्ही आणि विश्व हे प्रेमाच्या धाग्यात अगदी घट्ट बांधले जातात. आणि ह्याच प्रेमामुळे तुम्हाला जीवनातील अशांती आणि विरोधी तत्त्वांच्या पलीकडे जाण्याची क्षमता येते. राग आणि निराशा ह्या "आली रे आली की गेली" अशा क्षणभंगूर भावना होऊन जातात. तुम्ही वर्तमानात जगायला सुरुवात करता आणि भूतकाळातल्या गोष्टींना "झालं ते गेलं" च्या नजरेने पाहता.
ज्ञान आणि ध्यान याचं संगम आयुष्य परिपूर्ण करते. जेंव्हा तुम्ही वैश्विक चेतनेची पातळी गाठता, तेंव्हा तुम्ही सुंदर तरीही सशक्त बनता. जीवनाची वेगवेगळी मुल्ये विनाशर्त सामावून घेणारं एक मृदू, नाजूक आणि सुंदर व्यक्तिमत्व बनता.
ध्यानाचे फायदे कसे घ्यावेत
ध्यानाचे फायदे अनुभवण्यासाठी नियमित सराव करत राहणे जरुरी आहे, आणि तो पण फक्त रोजची काही मिनिटे. एकदा का ते तुमच्या रोजच्या व्यवहातर समाविष्ट झाले की ध्यान हे तुमच्या दिवसाचा सर्वोत्तम भाग बनून जाईल.
ध्यान हे एका बीजा प्रमाणे आहे. ते जेव्हा प्रेमाने पेरले जाते ते अधिकाधिक फुलते. त्याचप्रमाणे आत्मा विकासाच्या रोपट्याचं खतपाणी म्हणजे ध्यान. काही ताडाची झाडे तीन वर्षात फळे द्यायला लागतात तर काहींना दहा वर्षे पण लागतात. आणि ज्या झाडांना खत पाणी मिळत नाही, ज्यांची काही काळजी घेतली जात नाही, त्यांना कधीच फळे लागत नाहीत. ती फक्त जगतात.
सर्व कार्यक्षेत्रातील व्यस्त लोक रोज काही मिनिटे ध्यानाचा आनंद लुटायला मिळतो म्हणून कृतज्ञता व्यक्त करतात. आत्म्यात खोल डुबकी मारा आणि आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध बनवा.
स्रोत:द आर्ट ऑफ़ लिविंग वेबसाईट
13
Answer link
ध्यान हे शक्यतो सकाळी करावे. कारण सकाळी आपले मन शांत असते.कुठलेच विचार नसतात. आपली नित्य कर्मे उरकून ध्यानात बसावे.
डोळे मिटून आसनावर बसावे. ताठ बसावे. सुरवातीची दोन मिनिटे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत करावे.
नंतर ओम नमः शिवाय किंवा नुसता ओम: ओम: असा दीर्घोच्चार करावा.
त्याने मनाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान होते. विलक्षण शांतीचा अनुभव होतो.
डोळे मिटून आसनावर बसावे. ताठ बसावे. सुरवातीची दोन मिनिटे श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रीत करावे.
नंतर ओम नमः शिवाय किंवा नुसता ओम: ओम: असा दीर्घोच्चार करावा.
त्याने मनाला एक वेगळीच ऊर्जा प्रदान होते. विलक्षण शांतीचा अनुभव होतो.
15
Answer link
ध्यान ही स्वतःचे मन न्याहाळण्याची साधीशी 'प्रक्रिया' आहे.
मनाला विरोध नाही करायचा किंवा त्यावर ताबाही नाही चालवायचा.
फक्त मनात काय चाललंय त्याकडे तटस्थपणे पहात रहायचे.
मनात जे विचार येतात त्यांकडे लक्ष ठेवायचे.
कसलेही पूर्वग्रह ठेवून चांगले विचार, वाईट विचार असे न मानता केवळ लक्ष ठेवायचे विचारांवर.
मनात येणाऱ्या विचारांना कुठल्याही प्रतिक्रिया ( reactions ) द्यायच्या नाहीत :
की , " हे असं माझ्या मनात यायला नको",
की, "हा वाईट विचार आहे, किंवा, हा सुंदर विचार आहे, किंवा, हा मौल्यवान विचार आहे."
मनात येणाऱ्या विचारांना कुठल्याही पूर्वग्रहांच्या चष्म्यातून न पहाता ते जसे आहेत तसेच पहायचे आहे.
तुम्ही ज्या क्षणी विचारांना कुठलीही प्रतिक्रिया दिली वा योग्य/ अयोग्य ठरवले, की तुमचे ध्यान तुटले! तुम्ही विचारात गुंतलात !
कारण ध्यान म्हणजे विचारप्रक्रिये पासून अलिप्त रहाणे आहे.
पूर्णपणे अलिप्त, शांत!
मनात काय चाललंय ते फक्त न्याहाळत रहायचे.
आणि मग? एक जादू होते! आपल्याला लक्षात येते की विचार कमी कमी होत आहेत.
अगदी हळूहळू आपल्या लक्षात येते की मनातले विचार कमी कमी होत आहेत.
तुम्ही जेवढे जास्त जागरूक, तेवढे विचार कमी येतात.
तुमची जागरूकता कमी झाली की विचारांची संख्या वाढते.
हे म्हणजे जणू काही जागरूकतेवर अवलंबून असलेली विचारांची रहदारीच!
जेव्हा तुम्ही अगदी क्षणभर का होईना, संपूर्णपणे जागरूक असता, तेव्हा विचार पूर्णपणे थांबतात.
ताबडतोब आणि अचानक सर्वकाही थांबते, 'रोड' पूर्ण मोकळा, रहदारी पूर्णपणे थांबते.
हा क्षण म्हणजेच ध्यान.
धन्यवाद😊😊
मनाला विरोध नाही करायचा किंवा त्यावर ताबाही नाही चालवायचा.
फक्त मनात काय चाललंय त्याकडे तटस्थपणे पहात रहायचे.
मनात जे विचार येतात त्यांकडे लक्ष ठेवायचे.
कसलेही पूर्वग्रह ठेवून चांगले विचार, वाईट विचार असे न मानता केवळ लक्ष ठेवायचे विचारांवर.
मनात येणाऱ्या विचारांना कुठल्याही प्रतिक्रिया ( reactions ) द्यायच्या नाहीत :
की , " हे असं माझ्या मनात यायला नको",
की, "हा वाईट विचार आहे, किंवा, हा सुंदर विचार आहे, किंवा, हा मौल्यवान विचार आहे."
मनात येणाऱ्या विचारांना कुठल्याही पूर्वग्रहांच्या चष्म्यातून न पहाता ते जसे आहेत तसेच पहायचे आहे.
तुम्ही ज्या क्षणी विचारांना कुठलीही प्रतिक्रिया दिली वा योग्य/ अयोग्य ठरवले, की तुमचे ध्यान तुटले! तुम्ही विचारात गुंतलात !
कारण ध्यान म्हणजे विचारप्रक्रिये पासून अलिप्त रहाणे आहे.
पूर्णपणे अलिप्त, शांत!
मनात काय चाललंय ते फक्त न्याहाळत रहायचे.
आणि मग? एक जादू होते! आपल्याला लक्षात येते की विचार कमी कमी होत आहेत.
अगदी हळूहळू आपल्या लक्षात येते की मनातले विचार कमी कमी होत आहेत.
तुम्ही जेवढे जास्त जागरूक, तेवढे विचार कमी येतात.
तुमची जागरूकता कमी झाली की विचारांची संख्या वाढते.
हे म्हणजे जणू काही जागरूकतेवर अवलंबून असलेली विचारांची रहदारीच!
जेव्हा तुम्ही अगदी क्षणभर का होईना, संपूर्णपणे जागरूक असता, तेव्हा विचार पूर्णपणे थांबतात.
ताबडतोब आणि अचानक सर्वकाही थांबते, 'रोड' पूर्ण मोकळा, रहदारी पूर्णपणे थांबते.
हा क्षण म्हणजेच ध्यान.
धन्यवाद😊😊