औषधे आणि आरोग्य
श्वसन
श्वसन आरोग्य
आरोग्य
दमा लवकर बरा होण्यासाठी काही हमखास उपाय आहे का? (दमा लवकर बरा होत नाही हे मला ठाऊक आहे). तरीदेखील आशेखातर मी हा प्रश्न विचारत आहे.
2 उत्तरे
2
answers
दमा लवकर बरा होण्यासाठी काही हमखास उपाय आहे का? (दमा लवकर बरा होत नाही हे मला ठाऊक आहे). तरीदेखील आशेखातर मी हा प्रश्न विचारत आहे.
3
Answer link
🌴 दमा 🌱
👇
सर्दी पडसे असो वा दमा असो – कोणताही आजार बरा होण्यासाठी औषधोपचार करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घेतलाच पाहिजे. याचं कारण असं की, अनेक औषधं एका आजारात वापरता येत असली तरीही नक्की कोणतं वापरलं जावं याचबरोबर ती पूर्णत: सुरक्षित आहेत ना, याचीही खात्री करून घेणं आवश्यक असतं.
आजार,
कडाक्याच्या थंडीमुळे वाढणारा आणखीन एक महत्त्वाचा आजार म्हणजे दमा. याला आयुर्वेदात ‘श्वासव्याधी’ या नावाने ओळखलं जातं. हा आजार सुरुवातीला सर्दीनंतर खोकला आणि याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अथवा हलगर्जीपणामुळे, सर्दी ठीक झालेली नसतानाही अपथ्य केल्याने, अधिक काळ पाण्यात किंवा दमट वातावरणात राहिल्याने, सातत्याने वातानुकूलित जागेत वावरल्यामुळे, थंड जल किंवा इतर शीत जलीय पदार्थाचं सेवन केल्याने थंड वा-यावर पुरेसं ऊन कपडे न घालता फिरल्याने, स्वभावत: शीत अर्थात् थंड असलेले पदार्थ खाण्या-जेवणात आल्याने अशा अनेक कारणांमुळे होतो. श्वास घ्यायला त्रास होणं, नाक सातत्याने चोंदलेलं राहणं, बसल्या जागीही धाप लागणं, अशी लक्षणं दिसू लागतात. हळूहळू हा आजार बळावत जातो आणि कफ वाढून होणारा दमा हा आजार जडतो.
दमा या आजारात श्रम न करताही बसल्या जागीच दम लागल्यासारखी स्थिती होऊन प्रयत्नपूर्वक श्वास घेण्याची गरज भासू लागते. या आजारामध्ये औषधोपचार घेऊनही वारंवार हाच त्रास होत राहतो आणि याला शास्त्रीय भाषेत ‘दम्याचे वेग येणं’ किंवा बोलीभाषेत ‘दम्याचा अॅटॅक’ असं म्हटलं जातं.
सर्वसाधारणपणे याची सुरुवात नाकातून पाणी गळण्यापासून होते. हळूहळू घशात कफ जमू लागतो. खूप प्रयत्न करून, खाकरून तो काढण्याचा प्रयत्न केला तरी अतिप्रयत्नांनंतर थोडासा कफ सुटतो, अत्यंत चिकट स्वरूपाचा हा कफ थोडासा बाहेर पडल्यानंतर काही काळ बरं वाटतं. पण पुन्हा तसाच त्रास सुरू होतो. सोबत श्वासोच्छ्वासाच्या क्रियेसही त्रास जाणवू लागतो. कफ सुटल्यावरचं बरं वाटणं अल्पकाळच टिकतं. पुन्हा चिकट कफ एकत्र होतो. श्वासोच्छ्वासाच्या वेळी घुरघुर वाढते, पोट फुगतं, तोंडाची चव जाते, खोकल्याची उबळ येते आणि बरंच खोकल्यानंतर थोडासा आणि तोही अत्यंत चिकट असा थोड्या प्रमाणात कफ बाहेर पडतो. तब्येत ठीक झाल्याची जाणीव होते, पण तीही थोड्या वेळापुरतीच. पुन्हा कफ जमणं, खोकल्याची उबळ येणं, दम लागणं, असं सातत्याने चालूच राहतं. कालांतराने तर छातीचा पिंजराही गोलाकार होऊ लागतो.
🌱काय उपाय कराल?🌴
छाती व पाठ गरम पाण्याच्या पिशवीने – गरम पाण्याने शेकल्याने तात्पुरतं बरं वाटतं आणि तेही अगदी तात्पुरतंच! साधारणत: २० ते २५ मिनिटांत श्वास घेताना घुरघुर आवाज येणं, झोपल्यावर त्रास वाढणं व उठून बसल्यावर थोडं बरं वाटणं, त्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं, श्वास घेताना कष्ट झाल्याचं जाणवणं अशी स्पष्ट लक्षणं पुन्हा दिसू लागतात. अशा वेळी तत्काळ फायदा मिळतो तो म्हणजे छातीला व पाठीला गरम केलेल्या तेलाने मालिश करूनच. फुप्फुसांच्या आतील भागाला चिकटून असलेला चिकट कफ आतल्या भिंतींपासून सुटायला मदत होते आणि गरम पाण्याच्या पिशवीच्या मदतीने मिळालेल्या उष्णतेमुळे हा कफ पातळ होऊन सुटू लागतो. पातळ झालेला कफ मुखावाटे थुंकून टाकता येतो व आजारी व्यक्तीला आराम मिळतो.
सर्दी पडसे असो वा दमा असो – कोणताही आजार बरा होण्यासाठी औषधोपचार करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घेतलाच पाहिजे. याचं कारण असं की, अनेक औषधं एका आजारात वापरता येत असली तरीही नक्की कोणतं वापरलं जावं याचबरोबर ती पूर्णत: सुरक्षित आहेत ना, याचीही खात्री करून घेणं आवश्यक असतं.
तरुण वयात ज्या व्यक्तींना वा-यावर जाऊन आल्यावर किंवा दमट जागेत बसल्यामुळे क्षयाचा त्रास होतो, त्यांनी तालिसादी चूर्ण व श्वासकुठार यांचा वापर जरूर करावा. पिण्यासाठी थंड पाणी पूर्णत: टाळावं. गरम पाण्याने गुळण्या करणं व पिण्यासाठी गरम पाणी वापरणं इष्ट आहे.
प्रौढ व्यक्तींनी दम्यासाठी छातीला मीठ घातलेलं तिळाचं तेल लावून शेकून घ्यावं व सातत्याने गरम-कोमट पाणी पिणं हे उपयोगी व लाभदायक ठरतं.
अनेकदा असं म्हटलं जातं की, आयुर्वेदिक औषधं हळूहळू काम करतात व रोग बरा होण्यास वेळ लागतो, परंतु असं सरसकट विधान चुकीचं ठरतं. उत्तम व त्वरित लाभ देणारी औषधंही आयुर्वेदात आहेत आणि तसा लाभ मिळण्यासाठी ती कोणत्या पद्धतीने बनवलेली आहेत, ती मानकीकृत (स्टँडर्डाइज्ड) आहेत किंवा नाहीत, शुद्धतेची खात्री देणारे मापदंड पाळून बनविलेली आहेत की नाहीत हे पाहणं आवश्यक असतं.
आयुर्वेद क्षेत्रात स्टँडर्डायझेशन – मानकीकरण नसल्याचं बोललं जात असलं तरी ते पूर्णपणे सत्य नाही. कच्च्या मालाच्या निवडीपासून ते त्यावर होणारे संस्कार आणि विक्रीसाठी तयार झालेलं अंतिम उत्पादन या प्रत्येकासाठी मानकीकरणाचे ‘एस.डी.एस.’ नावाने ओळखले जाणारे निकष उपलब्ध आहेत. या मानकांतर्गत बनविण्यात आलेल्या महालक्ष्मीविलास रस, सूतशेखर रस, श्वासकास चिंतामणी रस, लक्ष्मीविलास (नारदीय गुटी), सितोपलादी चूर्ण, तालीसादी चूर्ण, कफकुठार रस, श्वासकुठार रस, कुमारी आसव नं.१, गोदंती भस्म आदी औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करणं लाभदायक ठरतं. ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी, पडसं होण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असेल किंवा ज्यांना दम्याचा वारंवार त्रास होत असेल, अशांसाठी शरीरातील सर्व घटकांना – विशेषत: कमजोर झालेल्या फुप्फुसांना – बल मिळावं आणि वारंवार त्रास होऊ नये यासाठी सुवर्णवसंत मालती हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. पानं गळून गेलेल्या झाडांना जशी वसंत ऋतू येताच पालवी फुटते, तशीच सर्व घटक क्षीण झालेल्या शरीराला सुवर्णवसंत मालती पल्लवीत करते, पोषण देते आणि म्हणून मानकीकृत सुवर्णवसंत मालतीचं स्वामला च्यवनप्राश अवलेहाबरोबर सेवन केल्यास वारंवार सर्दी, खोकला होणा-यांना किंवा ज्यांना दम्याचा जुनाट त्रास आहे अशा व्यक्तींना पुन्हा नव्याने ताकद व जोम देणारं ठरतं. अर्थात, या सर्वासाठी वैद्यकीय सल्ला घेणं हे निश्चितच आवश्यक!
खालील लिंकवर क्लिक करून आपण दमा व अनेक आजाराविषयी आणि त्यांच्या प्रथमोपचारा विषयी जाणून घेऊ शकता..
👇
दमा व प्रथमोपचार
👇
सर्दी पडसे असो वा दमा असो – कोणताही आजार बरा होण्यासाठी औषधोपचार करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घेतलाच पाहिजे. याचं कारण असं की, अनेक औषधं एका आजारात वापरता येत असली तरीही नक्की कोणतं वापरलं जावं याचबरोबर ती पूर्णत: सुरक्षित आहेत ना, याचीही खात्री करून घेणं आवश्यक असतं.
आजार,
कडाक्याच्या थंडीमुळे वाढणारा आणखीन एक महत्त्वाचा आजार म्हणजे दमा. याला आयुर्वेदात ‘श्वासव्याधी’ या नावाने ओळखलं जातं. हा आजार सुरुवातीला सर्दीनंतर खोकला आणि याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अथवा हलगर्जीपणामुळे, सर्दी ठीक झालेली नसतानाही अपथ्य केल्याने, अधिक काळ पाण्यात किंवा दमट वातावरणात राहिल्याने, सातत्याने वातानुकूलित जागेत वावरल्यामुळे, थंड जल किंवा इतर शीत जलीय पदार्थाचं सेवन केल्याने थंड वा-यावर पुरेसं ऊन कपडे न घालता फिरल्याने, स्वभावत: शीत अर्थात् थंड असलेले पदार्थ खाण्या-जेवणात आल्याने अशा अनेक कारणांमुळे होतो. श्वास घ्यायला त्रास होणं, नाक सातत्याने चोंदलेलं राहणं, बसल्या जागीही धाप लागणं, अशी लक्षणं दिसू लागतात. हळूहळू हा आजार बळावत जातो आणि कफ वाढून होणारा दमा हा आजार जडतो.
दमा या आजारात श्रम न करताही बसल्या जागीच दम लागल्यासारखी स्थिती होऊन प्रयत्नपूर्वक श्वास घेण्याची गरज भासू लागते. या आजारामध्ये औषधोपचार घेऊनही वारंवार हाच त्रास होत राहतो आणि याला शास्त्रीय भाषेत ‘दम्याचे वेग येणं’ किंवा बोलीभाषेत ‘दम्याचा अॅटॅक’ असं म्हटलं जातं.
सर्वसाधारणपणे याची सुरुवात नाकातून पाणी गळण्यापासून होते. हळूहळू घशात कफ जमू लागतो. खूप प्रयत्न करून, खाकरून तो काढण्याचा प्रयत्न केला तरी अतिप्रयत्नांनंतर थोडासा कफ सुटतो, अत्यंत चिकट स्वरूपाचा हा कफ थोडासा बाहेर पडल्यानंतर काही काळ बरं वाटतं. पण पुन्हा तसाच त्रास सुरू होतो. सोबत श्वासोच्छ्वासाच्या क्रियेसही त्रास जाणवू लागतो. कफ सुटल्यावरचं बरं वाटणं अल्पकाळच टिकतं. पुन्हा चिकट कफ एकत्र होतो. श्वासोच्छ्वासाच्या वेळी घुरघुर वाढते, पोट फुगतं, तोंडाची चव जाते, खोकल्याची उबळ येते आणि बरंच खोकल्यानंतर थोडासा आणि तोही अत्यंत चिकट असा थोड्या प्रमाणात कफ बाहेर पडतो. तब्येत ठीक झाल्याची जाणीव होते, पण तीही थोड्या वेळापुरतीच. पुन्हा कफ जमणं, खोकल्याची उबळ येणं, दम लागणं, असं सातत्याने चालूच राहतं. कालांतराने तर छातीचा पिंजराही गोलाकार होऊ लागतो.
🌱काय उपाय कराल?🌴
छाती व पाठ गरम पाण्याच्या पिशवीने – गरम पाण्याने शेकल्याने तात्पुरतं बरं वाटतं आणि तेही अगदी तात्पुरतंच! साधारणत: २० ते २५ मिनिटांत श्वास घेताना घुरघुर आवाज येणं, झोपल्यावर त्रास वाढणं व उठून बसल्यावर थोडं बरं वाटणं, त्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटणं, श्वास घेताना कष्ट झाल्याचं जाणवणं अशी स्पष्ट लक्षणं पुन्हा दिसू लागतात. अशा वेळी तत्काळ फायदा मिळतो तो म्हणजे छातीला व पाठीला गरम केलेल्या तेलाने मालिश करूनच. फुप्फुसांच्या आतील भागाला चिकटून असलेला चिकट कफ आतल्या भिंतींपासून सुटायला मदत होते आणि गरम पाण्याच्या पिशवीच्या मदतीने मिळालेल्या उष्णतेमुळे हा कफ पातळ होऊन सुटू लागतो. पातळ झालेला कफ मुखावाटे थुंकून टाकता येतो व आजारी व्यक्तीला आराम मिळतो.
सर्दी पडसे असो वा दमा असो – कोणताही आजार बरा होण्यासाठी औषधोपचार करताना वैद्यकीय सल्ला अवश्य घेतलाच पाहिजे. याचं कारण असं की, अनेक औषधं एका आजारात वापरता येत असली तरीही नक्की कोणतं वापरलं जावं याचबरोबर ती पूर्णत: सुरक्षित आहेत ना, याचीही खात्री करून घेणं आवश्यक असतं.
तरुण वयात ज्या व्यक्तींना वा-यावर जाऊन आल्यावर किंवा दमट जागेत बसल्यामुळे क्षयाचा त्रास होतो, त्यांनी तालिसादी चूर्ण व श्वासकुठार यांचा वापर जरूर करावा. पिण्यासाठी थंड पाणी पूर्णत: टाळावं. गरम पाण्याने गुळण्या करणं व पिण्यासाठी गरम पाणी वापरणं इष्ट आहे.
प्रौढ व्यक्तींनी दम्यासाठी छातीला मीठ घातलेलं तिळाचं तेल लावून शेकून घ्यावं व सातत्याने गरम-कोमट पाणी पिणं हे उपयोगी व लाभदायक ठरतं.
अनेकदा असं म्हटलं जातं की, आयुर्वेदिक औषधं हळूहळू काम करतात व रोग बरा होण्यास वेळ लागतो, परंतु असं सरसकट विधान चुकीचं ठरतं. उत्तम व त्वरित लाभ देणारी औषधंही आयुर्वेदात आहेत आणि तसा लाभ मिळण्यासाठी ती कोणत्या पद्धतीने बनवलेली आहेत, ती मानकीकृत (स्टँडर्डाइज्ड) आहेत किंवा नाहीत, शुद्धतेची खात्री देणारे मापदंड पाळून बनविलेली आहेत की नाहीत हे पाहणं आवश्यक असतं.
आयुर्वेद क्षेत्रात स्टँडर्डायझेशन – मानकीकरण नसल्याचं बोललं जात असलं तरी ते पूर्णपणे सत्य नाही. कच्च्या मालाच्या निवडीपासून ते त्यावर होणारे संस्कार आणि विक्रीसाठी तयार झालेलं अंतिम उत्पादन या प्रत्येकासाठी मानकीकरणाचे ‘एस.डी.एस.’ नावाने ओळखले जाणारे निकष उपलब्ध आहेत. या मानकांतर्गत बनविण्यात आलेल्या महालक्ष्मीविलास रस, सूतशेखर रस, श्वासकास चिंतामणी रस, लक्ष्मीविलास (नारदीय गुटी), सितोपलादी चूर्ण, तालीसादी चूर्ण, कफकुठार रस, श्वासकुठार रस, कुमारी आसव नं.१, गोदंती भस्म आदी औषधांचा वापर वैद्यकीय सल्ल्यानुसार करणं लाभदायक ठरतं. ज्या व्यक्तींना वारंवार सर्दी, पडसं होण्याची प्रवृत्ती निर्माण झाली असेल किंवा ज्यांना दम्याचा वारंवार त्रास होत असेल, अशांसाठी शरीरातील सर्व घटकांना – विशेषत: कमजोर झालेल्या फुप्फुसांना – बल मिळावं आणि वारंवार त्रास होऊ नये यासाठी सुवर्णवसंत मालती हे औषध अत्यंत उपयोगी ठरतं. पानं गळून गेलेल्या झाडांना जशी वसंत ऋतू येताच पालवी फुटते, तशीच सर्व घटक क्षीण झालेल्या शरीराला सुवर्णवसंत मालती पल्लवीत करते, पोषण देते आणि म्हणून मानकीकृत सुवर्णवसंत मालतीचं स्वामला च्यवनप्राश अवलेहाबरोबर सेवन केल्यास वारंवार सर्दी, खोकला होणा-यांना किंवा ज्यांना दम्याचा जुनाट त्रास आहे अशा व्यक्तींना पुन्हा नव्याने ताकद व जोम देणारं ठरतं. अर्थात, या सर्वासाठी वैद्यकीय सल्ला घेणं हे निश्चितच आवश्यक!
खालील लिंकवर क्लिक करून आपण दमा व अनेक आजाराविषयी आणि त्यांच्या प्रथमोपचारा विषयी जाणून घेऊ शकता..
👇
दमा व प्रथमोपचार
0
Answer link
नमस्कार, तुमचा प्रश्न वाचून मला तुमच्या परिस्थितीची जाणीव झाली. दमा (Asthma) हा एक दीर्घकालीन आजार आहे आणि तो पूर्णपणे बरा करणे शक्य नाही, हे तुम्ही जाणता हे पाहून बरे वाटले. तरीही, काही उपायांनी तुम्ही नक्कीच आराम मिळवू शकता आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारू शकता.
दमा नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाय:
- डॉक्टरांचा सल्ला: तुमच्या डॉक्टरांनी दिलेले उपचार आणि औषधे नियमितपणे घ्या. त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेणे किंवा बंद करणे टाळा.
- इनहेलरचा योग्य वापर: इनहेलरचा वापर कसा करायचा हे डॉक्टरांकडून शिकून घ्या आणि नियमितपणे सराव करा.
- धूल आणि धुरापासून दूर राहा: ज्या गोष्टींमुळे तुम्हाला एलर्जी (allergy) होते, त्या टाळा।example href="https://www.mayoclinic.org/diseases-conditions/asthma/diagnosis-treatment/drc-20353520" target="_blank">Mayo Clinic - Asthma Diagnosis and Treatment
- आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. ताज्या भाज्या आणि फळे खा.
- व्यायाम: नियमित व्यायाम करा, परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. धावणे किंवा जास्त जोर लावण्याचे व्यायाम टाळा. योगा आणि प्राणायाम फायदेशीर ठरू शकतात.
- तणाव कमी करा: तणाव कमी करण्यासाठी ध्यान (meditation) करा किंवा संगीत ऐका.
- पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
- धूम्रपान टाळा: स्वतः धूम्रपान करू नका आणि धूम्रपान करणाऱ्या लोकांच्या आसपास राहणे टाळा.
- वजन नियंत्रित ठेवा: जर तुमचे वजन जास्त असेल, तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा.
आयुर्वेदिक उपाय (consult a doctor before following):
- आले (Ginger): आल्याचा चहा प्या किंवा आल्याचा रस घ्या.
- मध (Honey): मधामध्ये असणारे गुणधर्म घसा खवखवणे आणि दम्याच्या त्रासावर गुणकारी असतात.
- लसूण (Garlic): लसूण दम्याच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
- हळद (Turmeric): हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन (curcumin) दम्यासाठी उपयुक्त आहे.
टीप:
हे उपाय केवळ आराम देण्यासाठी आहेत. तुमच्या डॉक्टरांनी दिलेले उपचार घेणे महत्त्वाचे आहे. कोणताही नवीन उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
हे लक्षात ठेवा कि दमा पूर्णपणे बरा होत नसला तरी योग्य उपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे तुम्ही नक्कीच एक चांगले जीवन जगू शकता.