2 उत्तरे
2 answers

हरितालिका म्हणजे काय?

7
हरितालिका हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी.पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका ' असे म्हणतात.हरितालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरीसंवादात आली आहे.शिवा भूत्वा शिवां यजेत् | या भावनेने हरितालिकेची पूजा करावी.


कथा,आख्यायिका

पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देवून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे.

व्रतामागील आशय

शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो.आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची.

पूजाविधी

वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते.दुस-या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटता आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात.

प्रांतानुसार

पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात.महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात. श्रावण शुद्ध तृतीयेला सुवर्णगौरी (मधुश्रावणिका), श्रावण कृष्ण तृतीयेला कज्‍जली गौरी आणि भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका ही व्रते करून सौभाग्यवती स्त्रियांनी तीनदा गौरी पूजा करावी असे शास्त्र सांगते
उत्तर लिहिले · 24/8/2017
कर्म · 80330
0
हरितालिका (हरतालिका) हे एक हिंदू व्रत आहे जे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला केले जाते. हे व्रत विशेषतः महिलांसाठी असून ते पार्वती देवी आणि भगवान शंकराच्या पूजेसाठी समर्पित आहे.

व्रताचे महत्त्व:

  • हरितालिका हे व्रत कुमारिका (अविवाहित मुली) आणि विवाहित स्त्रिया दोघेही करतात.
  • अविवाहित मुली चांगला पती मिळवण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
  • या व्रतामध्ये पार्वती देवी आणि भगवान शंकर यांच्या मूर्तींची पूजा केली जाते.

व्रताची पद्धत:

  • हरितालिकेच्या दिवशी महिला उपवास करतात आणि रात्रभर जागरण करतात.
  • पार्वती देवी आणि भगवान शंकराची पूजा करतात, त्यांच्या कथा व आरती म्हणतात.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन करतात आणि उपवास सोडतात.

कथा:

हरितालिकेशी संबंधित एक प्रसिद्ध कथा आहे, ज्यामध्ये पार्वती देवीने भगवान शंकराला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन भगवान शंकराने पार्वतीशी विवाह केला.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2760

Related Questions

वसंत पंचमी म्हणजे काय?
श्रावण महिन्यात कोणता सण येत नाही?
शिवजयंतीला मटण दुकान चालू असते का?
धर्मराज बिजी हा सण का साजरा करतात?
"डोल ग्यारस" हा कोणता सण/उत्सव आहे?
झोका पंचमी म्हणजे कोणता सण?
12 नोव्हेंबर: गुरुनानक जयंती आहे का?