3 उत्तरे
3 answers

आणीबाणी म्हणजे काय?

3

आणीबाणी म्हणजे कोणत्या एखाद्या व्यक्तीने लोकशाहीच्या नियमांचा भंग करून सर्व अधिकार स्वःताकडे घेणे आणि न्यायव्यवस्था, लष्कर, पत्रकारिता या सर्वांचे अधिकार कमी करून देशात एकप्रकारचे राजकीय अस्थैर्य निर्माण होणे याला राजकीय आणीबाणी म्हणतात.


आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण संघ अणिबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभा राहिला.


मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली ह्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये हार पत्कारावी लागली.


आणीबाणी ही स्वतंत्र भारताच्या इतिहासामधील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक मानली जाते.

उत्तर लिहिले · 7/12/2016
कर्म · 48240
0

आजच्या तरुण पिढीला तर आणीबाणी म्हणजे नक्की काय हे माहीतही नाही. ज्यांना पुस्तकांतून वा वृत्तपत्रीय लेखनातून आणीबाणीविषयक माहिती आहे, त्यांना आणीबाणीचा प्रत्यक्ष अनुभव नाही.
ते स्वाभाविक आहे. बरोबर 36 वर्षांपूर्वी, 25 जूनच्या मध्यरात्रीनंतर आणि 26 जूनच्या पहाटे, त्या वेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. 26 जूनच्या सकाळी आठ वाजता देशाला उद्देशून आकाशवाणीवरून भाषण करताना त्या म्हणाल्या की, देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्थैर्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणले गेले आहे.

लोकांची माथी भडकावली जात आहेत आणि कायदा, सुव्यवस्था व शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सरकारला काही कठोर पावले उचलणे भाग पडले आहे. ते कठोर पाऊल म्हणजेच आणीबाणी. आचार्य विनोबा भावेंनी आणीबाणीच्या त्या काळाला ‘अनुशासन पर्व’ असे पुढे म्हटले.

आणीबाणी बद्दल अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता .

आणीबाणी

आणीबाणी : एक ट्रॅजिडी


उत्तर लिहिले · 6/12/2016
कर्म · 15105
0

आणीबाणी म्हणजे असामान्य परिस्थितीत देशाच्या शासनाला काही विशेष अधिकार मिळतात, ज्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर काही निर्बंध येतात.

आणीबाणीचे प्रकार:

  • राष्ट्रीय आणीबाणी: युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड झाल्यास (अनुच्छेद ३५२).
  • राजकीय आणीबाणी: राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यास (अनुच्छेद ३५६).
  • आर्थिक आणीबाणी: देशाची आर्थिक स्थिती बिघडल्यास (अनुच्छेद ३६०).

भारतात आणीबाणी:

  • १९६२ मध्ये चीन-भारत युद्धाच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती.
  • १९७१ मध्ये पाकिस्तान युद्धाच्या वेळी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती.
  • १९७५ मध्ये अंतर्गत अशांततेच्या कारणावरून राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती, जी सर्वात वादग्रस्त ठरली.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 980

Related Questions

आणीबाणीचे नागरिकांवरील दोन परिणाम काय?
आणीबाणी म्हणजे काय माहिती?
आणीबाणी तरतुदी आणि राष्ट्रपती राजवट या विषयाची प्रस्तावना काय आहे?
आणीबाणी तरतुदी आणि राष्ट्रपती राजवट याबद्दल माहिती मिळेल का?
आणीबाणीला म्हणजे काय ?
आणीबाणी कशामुळे लागू केल्या जातात?
आणीबाणी म्हणजे काय आणि ती का लागू करतात?