2 उत्तरे
2
answers
१८५७ च्या उठावाची कारणे व परिणाम विशद करा?
0
Answer link
अ) राजकीय कारणे :
१) वेलस्लीच्या तैनाती फौजेचे दुष्परिणाम : तैनाजी फौजेच्या पध्दतीमध्ये इंग्रज फौजेचा सर्व खर्च ती ज्याच्या पदरी असेल त्या राजाने करायचा व त्या फौजेवर हुकुमत गाजवायची ती मात्र इंग्रजांनी, वेलस्लीच्या डावपेचांमुळे तैनाजी फौजेच्या प्रभावाखालील राज्ये दुबळी बनली व त्यांच्यात असंतोष निर्माण झाला.
२) डलहौसीचे आक्रमक विस्तारवादी धोरण : प्रशासकीय सोयीसाठी भारतातील सर्व भूप्रदेश एकछत्री अंमलाखाली आणण्याच्या हेतूने लॉर्ड डलहौसीने १८४८ ते १८५६ या काळात भारतातील अनेक संस्थाने 'दत्तक वारस नामंजूर' (व्यपगत सिद्धांत) तत्त्वानुसार तसेच प्रशासनात अकार्यक्षमता या कारणावरून खालसा केली. राजेरजवाड्यांच्या पदव्या व तनखे बंद करून टाकले. यामुळे बिटिशांविरूध्द असंतोष धुमसत राहिला.
ब) सामाजिक कारणे :
१) केवळ स्वत:ची संस्कृती श्रेष्ठ मानताना इंग्रजांनी भारतीय संस्कृतीला रानटी संस्कृती व भारतीय लोकांना रानटी असे संबोधले.
२) हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना : सतिबंदी कायदा, बालविवाहप्रतिबंधक कायदा, विधवा-पुनर्विवाह कायदा यासारखे काही अन्यायनिवारण कायदे ब्रिटिशांनी भारतात राबवले. परंपरागत भारतीय समाजाला हे आपल्या संस्कृतीवरील आक्रमण वाटले.
क) धार्मिक कारणे :
१) तिसरे संकट धर्मावर : १८१३ च्या कायद्याने इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. पर्यायाने, इंग्रजी आक्रमणाने भारतीयांची प्रथम सत्ता गेली, नंतर व्यापारउमीद बुडाला आणि आता धर्मावर तिसरे संकट आल्याची भावना वाढीस लागली.
२) समाजसुधारणावादी धोरणाविषयी प्रतिकूल प्रतिक्रिया : सतीबंदी, विधवा-पुनर्विवाह, बालविवाहबंदी यासारख्या सामाजिक सुधारणा म्हणजे भारतीय संस्कृती व धर्म नष्ट करण्याचा डाव आहे अशी भावना वाढीस लागली. लष्कराच्या मद्रास छावणीतील शिपायांना गंध लावण्यास व दाढी वाढवण्यास बंदी घालण्यात आली (१८०६). १८४२ साली ब्रह्मदेशच्या युध्दात हिंदू शिपायांना सक्तीने पाठविण्यात आले. परदेशगमन, समुद्रपर्यटन या गोष्टी त्याज्य मानणाऱ्या हिंदी शिपायांत यामुळे असंतोष वाढू लागला.
ड) आर्थिक कारणे :
१) हस्तव्यवसायांचा हास : भारतातील कच्च्या मालावर आधारित इंग्लंडमधील यंत्रावरील तयार माल भारतात उपलब्ध झाल्याने येथील पारंपरिक हस्तव्यवसायांचा हास होऊन कारागीर पुरते बुडाले.
२) शेतकरी-जमीनदार या वर्गात रयतवारी, महालवारी, कायमधारा आदी सदोष महसुलपध्दतींमुळे असंतोष पसरला.
इ) लष्करी कारणे :
१) हिंदी शिपायांना ब्रिटिश सैन्याच्या तुलनेत मिळणारी अन्यायी वागणूक, हिंदी शिपायांवरील लष्करातील शिस्तीसंबंधीचे जाचक नियम इत्यादी कारणांमुळे सैनिकांत असंतोष होता.
२) तात्कालिक कारण : सैनिकांना बंदुकीची काडतुसे वापरताना या काडतुसांची आवरणे दातांनी तोडावी लागत. या काडतुसांना गाईची व डुकरांची चरबी लावलेली असते अशी बातमी लष्करात पसरताच हिंदू-मुस्लीम सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या आणि ते बंड करून उठले. अशापकारे वर्षांनुवर्षे दाटलेल्या असंतोषाचा उद्रेक १८५७ च्या उठावाने झाला. १८५७ च्या उठावाचे लोण उत्तर भारतात सर्वाधिक पसरले. त्यामानाने दक्षिण भारत उठावापासून बऱ्यापैकी वंचित राहिला.
१८५७ चा उठाव याविषयात अधिक माहितीसाठी तसेच १८५७ चा उठावाच्या अपयशाची कारणे व १८५७ चा उठावाचे परिणाम या बद्दल माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
0
Answer link
१८५७ च्या उठावाची कारणे आणि परिणाम खालीलप्रमाणे:
१८५७ च्या उठावाची कारणे:
- राजकीय कारणे: ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने भारतीय राज्यांवर साम्राज्यवादी धोरणे लादली.
उदा. तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर करणे यामुळे अनेक राज्ये खालसा झाली आणि तेथील शासक व प्रजा नाराज झाली.
- आर्थिक कारणे: ब्रिटीश धोरणांमुळे भारतीय शेतकरी आणि कारागीर गरीब झाले.
ब्रिटिशांनी शेती आणि व्यापारावर जाचक कर लावले, ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण झाले. पारंपरिक उद्योगधंदे बंद पडल्यामुळे कारागीर बेकार झाले.
- सामाजिक आणि धार्मिक कारणे: ब्रिटीशांनी भारतीय समाजाच्या चालीरीतींमध्ये हस्तक्षेप केला.
सती प्रथा बंद करणे, विधवा पुनर्विवाह कायदा यांसारख्या सुधारणा केल्या, परंतु काही लोकांनी याला आपल्या धर्मावरील आणि संस्कृतीवरील आघात मानले.
- लष्करी कारणे: भारतीय सैनिकांमध्ये असंतोष होता.
त्यांना कमी पगार मिळत होता आणि बढती मिळवण्याची संधी कमी होती. नवीन एनफिल्ड रायफलमध्ये वापरल्या जाणाऱ्या काडतुसांमध्ये गायीची चरबी वापरली जाते, अशी अफवा पसरल्याने हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या.
१८५७ च्या उठावाचे परिणाम:
- कंपनी शासनाचा अंत: १८५७ च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीचे शासन संपुष्टात आले आणि भारतावर थेट ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली.
- प्रशासकीय बदल: भारताच्या प्रशासनात बदल करण्यात आले. व्हाईसरॉयची नेमणूक करण्यात आली, जो ब्रिटिश राजघराण्याचा प्रतिनिधी म्हणून काम पाहणार होता.
- लष्करी पुनर्रचना: भारतीय सैन्यात सुधारणा करण्यात आली. ब्रिटिश सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आणि महत्त्वाच्या पदांवर फक्त ब्रिटिश अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
- सामाजिक परिणाम: राणीच्या जाहीरनाम्याद्वारे धार्मिक सहिष्णुतेचे आश्वासन देण्यात आले आणि भारतीयांना शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी देण्याचे आश्वासन देण्यात आले.
- राष्ट्रवादाला प्रेरणा: १८५७ चा उठाव अयशस्वी झाला तरी, या घटनेने भारतीय राष्ट्रवादाला प्रेरणा दिली.