3 उत्तरे
3
answers
संत गाडगे महाराजानी जंतेला कोता उपदेश दिला?
0
Answer link
संत गाडगेबाबा महाराजांनी जनतेला उपदेश दिला.
गाडगे बाबा यानी समाजातील अज्ञान अनिष्ट रूढ़ि प्रथा, अंध श्रद्धा हे सर्व दूर करण्यासाठी आपले आयुष्य वेचले..
• या साठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग अवलंब केला. . त्यांचे उपदेश सादे व सरळ आहे.
1. चोरी करू नका, सवकारा पासून कर्ज घेऊ नका. 2. व्यसनांचा आहारी जाऊ नका.
3. देव धर्माच्या नावा खाली प्राण्यांची हत्या करू नका.
4. जातिचे भेद करू नका.
5. ते आपल्या कीर्तनात सांगत असत की देव दगड़ात नाही तो माणसात आहे, आमच्या हा शरीरात • आहे.
6. संत तुकाराम महाराजाला ते आपले गुरु मानीत. " मी कोणाचा गुरु नाही, माझे कोण शिष्य नाही' " असे ते कायम म्हणत
हे सर्व विचार सर्वांना पटवून घेण्या साठी ते ग्रामीण
भाषेचा प्रयोग करित असत.
भुकेलेल्यांना = अन्न
तहानलेल्यांना = पाणी
उघड्यानागड्यांना = वस्त्र
गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
बेघरांना = आसरा
अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
बेकारांना = रोजगार
पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
दुःखी व निराशांना = हिंमत
गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व देवपूजा आहे !! .
त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.
0
Answer link
संत गाडगे महाराजांनी जनतेला दिलेला उपदेश खालीलप्रमाणे:
- स्वच्छता: गाडगे महाराजांनी स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. ते नेहमी लोकांना परिसर स्वच्छ ठेवण्यास सांगत.
- शिक्षणाचे महत्त्व: त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि मुलांना शाळेत पाठवण्यास प्रोत्साहित केले.
- अंधश्रद्धा निर्मूलन: गाडगे महाराजांनी अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचार दूर करण्याचे आवाहन केले.
- सामাজিক समता: त्यांनी समाजात समानता आणि सलोखा निर्माण करण्याचा संदेश दिला.
- वृक्षारोपण: झाडे लावा आणि पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश त्यांनी दिला.
- गोरगरीबांना मदत: गरजू लोकांना मदत करा आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हा, असे ते नेहमी सांगत.
- देवभोळेपणा: देवभोळेपणा चांगला, पण अंधश्रद्धा नको, असा विचार त्यांनी मांडला.
या उपदेशांच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न केला.