कुटुंब मशीन लेखन कथा लेखन

पुढील मुद्द्यांवरून गोष्ट तयार कशी कराल? शीर्षक व तात्पर्य कसे लिहाल? मुद्दे: गरीब कुटुंब, कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, द्यायला शिलाई मशीन बेतलेले, कपडे शिवणे, खूप कष्ट, परिस्थितीला टक्कर.

2 उत्तरे
2 answers

पुढील मुद्द्यांवरून गोष्ट तयार कशी कराल? शीर्षक व तात्पर्य कसे लिहाल? मुद्दे: गरीब कुटुंब, कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, द्यायला शिलाई मशीन बेतलेले, कपडे शिवणे, खूप कष्ट, परिस्थितीला टक्कर.

1
शिर्षक - सुखाचे दिवस.



एका गावात सखाराम नावाचा मनुष्य त्याची पत्नी वेणूताई आणि दोन मुले ह्यांच्याबरोबर राहत होता. सखाराम हा मेहनती व इमानदार मनुष्य होता. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे आपले आणि आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी तो मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे.

एके दिवशी असाचे सखाराम एके ठिकाणी कामावर गेले असता अचानक त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि वेणूताई व तिच्या दोन्ही मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळतो.

वेणूताईला हया परिस्थितीत आपला आणि आपल्या मुलांचे पालन कसे करावे ह्याची चिंता लागली कारण सखाराम हाच कुटुंभप्रमुख हया नात्याने त्याच्या घराचा सर्व कारभार बघीत असे व दोन्ही मुले वयाने लहान असल्यामुळे व पतीच्या अश्या अचानक अकस्मित निधनाने आता आपले आणि आपल्या मुलांचे पोट कसे भरायचे हा विचार तिला त्रास देऊ लागतो.

परंतु आपल्याला आता धीर सोडून चालणार नाही व सखारामच्या मागे आता आपणच कुटुंबप्रमुख असून आपल्याला आपल्या मुलांसाठी व त्यांच्या शिक्षणासाठी काही ना काही तरी तजवीज करावीच लागणार म्हणून वेणूताई उधारीवर एक शिलाई मशीन घेते व त्यावर गावातील स्त्रियांचे व मुलांचे कपडे शिवून देण्याचे काम सुरु करते. पुढे वाचा......


वरील कथा संपूर्ण वाचण्यासाठी भेट दया www.sopenibandh.com 






उत्तर लिहिले · 4/10/2022
कर्म · 1100
0

शीर्षक: आशा आणि संघर्ष

एका लहान गावात, एक गरीब कुटुंब राहत होते. रामराव हे त्या कुटुंबाचे प्रमुख होते. ते एका लहान शेतात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पत्नीचे नाव सीताबाई होते आणि त्यांना दोन मुले होती - रवी आणि राधा. रामराव खूप कष्टाळू होते, पण अचानक त्यांचे निधन झाले.

रामरावांच्या निधनानंतर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. सीताबाई हतबल झाल्या, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांना माहित होते की आपल्या मुलांसाठी त्यांना जगायचे आहे आणि परिस्थितीचा सामना करायचा आहे. गावात एक दानशूर व्यक्तीने सीताबाईंना शिलाई मशीन दिली. सीताबाईंना थोडेफार शिवणकाम येत होते. त्यांनी तेच आपले साधन बनवले.

सीताबाईंनी रात्रंदिवस कपडे शिवून पैसे कमवायला सुरुवात केली. त्यांचे कष्ट पाहून गावकऱ्यांनीही त्यांना मदत केली. हळूहळू, सीताबाईंच्या कामाला मागणी वाढली. त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले. रवी डॉक्टर झाला आणि राधा शिक्षिका बनली. सीताबाईंनी आपल्या मुलांना स्वावलंबी बनवले आणि एक उदाहरण घालून दिले.

तात्पर्य:

  • कठीण परिस्थितीतही आशा सोडू नये.
  • आत्मविश्वास आणि कष्टाने आपण परिस्थितीवर मात करू शकतो.
  • एकीने आणि मदतीने जीवन सोपे होते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कथालेखन, इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी गणिताच्या अभ्यासावर आधारित, परीक्षेत यश मिळवण्यासाठी शिक्षणातील महत्त्व काय आहे?
कथा लेखन कसे कराल? खेडेगांव, वृद्ध आजोबा, आंब्याचे रोप, शेजारचा तरुण, आश्चर्य, काय उपयोग, नातवंडे, आंबे, भविष्यासाठी
एका मुलाने सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेतले. कामाच्या ठिकाणी त्याला 'शर्ट ग्रेट' म्हणून गौरवण्यात आले. घरी जाताना त्याला रेल्वे रूळ सरकलेले दिसले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याने शेकडो लोकांचे प्राण वाचवले. या आधारावर कथालेखन कसे करावे?
विषयसूत्र, संविधानक, पात्रचित्रण आणि संवाद गृहीत धरून लेखक कथेवरील घटकांचे नियोजन कसे करतो?
एक मुलगा सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतो. कामाच्या ठिकाणी शर्ट ग्रेट म्हणून मिळाले. घरी जाताना रेल्वे रूळ सरकलेले दिसले. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते व तो शेकडो लोकांचे प्राण वाचवतो. या आधारे कथालेखन कसे करावे?
मुद्द्यांच्या आधारे कथा लेखन कसे करावे: घरातून पळून जाणे?
कादंबरीच्या कथानकात कोणत्या तंत्राचा वापर केला जातो?