2 उत्तरे
2 answers

भारतामध्ये कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?

0
भारतामध्ये लोकशाही शासनप्रणाली बर्‍याच काळापासून अस्तित्वात आहे. राजेशाही जरी होती तरी गावपातळीवर गावातील पंचायत गावाच्या शासनासंबंधी सर्व निर्णय घेत असे. राजाची जबाबदारी मुख्यत्वे संरक्षण व दोन किंवा अधिक गावांमधील तंट्याबाबत असे. सध्याची व्यवस्था पश्चिमी देशाकडून घेतली आहे व तीमध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटी दूर करून लोकशाही व्यवस्था अधिक कार्यक्षम बनवणे आवश्यक आहे. या करता उमेदवाराच्या पात्रतेपासून शासन चालवण्यापर्यंत सध्याचे अडथळे जाणून घेऊन नियम बनवले पाहिजेत. भारतीय लोकशाही ही सर्वांत मोठी लोकशाही आहे.
उत्तर लिहिले · 17/2/2023
कर्म · 9415
0

भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे.

संसदीय लोकशाही म्हणजे:

  • प्रतिनिधी निवडणे: नागरिक निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडतात.
  • सरकार: हे प्रतिनिधी मिळून सरकार बनवतात.
  • कायदे: हे सरकार जनतेसाठी कायदे बनवते.

भारताच्या लोकशाहीत, जनता निवडणुकीत मतदान करून आपले नेते निवडते आणि ते नेते देशासाठी कायदे बनवतात.

अधिक माहितीसाठी, तुम्ही हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

स्वतंत्र भारताचा अर्थमंत्री कोण?
ग्रामीण राजकीय नेतृत्वाचा अर्थ स्पष्ट करा?
ग्रामसंस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
वारली आदिवासींच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
वारली अधिवेशनाच्या राजकीय जीवनाचे वर्णन करा?
ग्राम संस्थेची प्रमुख कामे स्पष्ट करा?
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण?