कायदा कागदपत्रे ग्रामपंचायत पोलीस स्थानिक स्वराज्य संस्था

ग्रामपंचायतीने रहिवासी दाखला देणे बंद केले आहे, ते स्वयंघोषणापत्र देतात. पोलीस पाटलाला रहिवासी दाखला देण्याचा अधिकार आहे की त्यांना सुद्धा स्वयं घोषणापत्र द्यावे लागते?

3 उत्तरे
3 answers

ग्रामपंचायतीने रहिवासी दाखला देणे बंद केले आहे, ते स्वयंघोषणापत्र देतात. पोलीस पाटलाला रहिवासी दाखला देण्याचा अधिकार आहे की त्यांना सुद्धा स्वयं घोषणापत्र द्यावे लागते?

7
ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या ग्रामस्थांना रहिवासी दाखल्यासह इतर दाखले, शासकीय कामासाठी लागणारे दाखले आता महाराष्ट्र राज्य सरकारने शासन निर्णय क्रमांक आर, टी, एस, 2018 /प्र.क.145 /आस्था 5 दिनांक 13/2/19 नुसार बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. याची प्रत सर्व गावातील सर्व ग्रामपंचायतींना देण्यात आलेली आहे.
व त्याची अंमलबजावणी करण्याचेही आदेश सर्व ग्रामपंचायत कार्यालयास देण्यात आले आहेत. त्यात असेही नमूद केले आहे कि ग्रामपंचायत कार्यालय दाखले देणे जरी बंद झाले तरी ग्रामस्थांना त्या दाखल्यांसाठी आता स्वयंघोषणापत्र करावे लागेल. स्वयंघोषणापत्र करून हे सरकारी वा इतर कोणत्याही कामासाठी वापरता येईल.    
हे दाखले झाले बंद
१)रहिवासी प्रमाणपत्र २) विधवा असल्याचा दाखला ३)परितक्त्या असल्याचा दाखला ४) विभक्त कुटुंबाचा दाखला ५) नोकरी व्यवसायासाठी ना हरकत दाखला ६) बेरोजगार प्रमाणपत्र ७)हयातीचा दाखला ८) शौचालयाचा दाखला ९) नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र १०)चारीत्र्याचा दाखला ११) वीजेच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र १२) जिल्हा परिषद फंडातून कृषी साहित्य खरेदी १३) राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम १४) बचत गटांना खेळते भागभांडवल बँकेमार्फत कर्ज पुरवठा १५) कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र १६) निराधार योजनेसाठी वयाचा दाखला
उत्तर लिहिले · 22/7/2020
कर्म · 8355
5
सरकारी नियमात बदल झालाय, आता ग्रामपंचायत रहिवासी दाखला देणार नाहीत. स्वतःचे स्वयंघोषणा प्रमाणपत्र दिले तरी काम होईल, अडचण येणार नाही. पोलीस पाटील देतील.
उत्तर लिहिले · 22/7/2020
कर्म · 11370
0

ग्रामपंचायतीने रहिवासी दाखला देणे बंद केले आहे आणि ते स्वयंघोषणापत्र देत आहेत. polícia पाटलाला रहिवासी दाखला देण्याचा अधिकार आहे की नाही, हे तपासण्यासाठी काही माहिती आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार, ग्रामसेवक/तलाठी/मंडळ अधिकारी यांच्याकडे रहिवासी दाखला मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. (https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/IntegratedServicePage/IntegratedServicePage?serviceId=1137 ).

पोलीस पाटील हे गावपातळीवरील शासकीय अधिकारी असतात. काही ठिकाणी, त्यांना रहिवासी दाखला देण्याचा अधिकार असू शकतो, परंतु हे अधिकार राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी जारी केल्या जाणाऱ्या आदेशांवर अवलंबून असते.

तुम्ही खालील गोष्टी करू शकता:
  1. ग्रामपंचायत: ग्रामपंचायतीकडून अधिकृत माहिती मिळवा की त्यांनी रहिवासी दाखला देणे का बंद केले आहे आणि या संदर्भात नवीन नियम काय आहेत.
  2. तहसील कार्यालय: आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात संपर्क करून पोलीस पाटलांना रहिवासी दाखला देण्याचा अधिकार आहे की नाही, याची माहिती घ्या.
  3. अधिकृत वेबसाइट: महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा जिल्हा प्रशासनाच्या वेबसाइटवर यासंबंधी माहिती उपलब्ध असू शकते.
स्वयंघोषणापत्र: जर ग्रामपंचायत आणि पोलीस पाटील दोघांनाही रहिवासी दाखला देण्याचा अधिकार नसेल, तर तुम्हाला स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

एका जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या किती असते?
महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?
ग्रामीण प्रशासन की शहरी प्रशासन?
नगरपालिका व नगरपंचायत मध्ये काय फरक आहे?
सरपंच पद गेल्यावर किती दिवस ते पद रिक्त राहते?
जनजागृती ग्रामपंचायत कशी करावी?
महिला सबलीकरण ७३वी घटना दुरुस्ती विषयी माहिती मिळेल का?