भारताचा इतिहास समाजशास्त्र संत समाज विचार इतिहास

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक विचार सांगा?

2 उत्तरे
2 answers

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सामाजिक विचार सांगा?

2
तुकडोजी महाराज यांचे सामाजिक विचार-

मुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रतुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत  म्हणून ओळखले जाते.  अंधश्रद्धा निर्मूलन,  जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते.

मुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रमुक्त ऋण विद्युत्कणांचे शास्त्रअमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वत:ला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती. त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले.खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले.सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला.
उत्तर लिहिले · 7/4/2020
कर्म · 3350
0
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाला अनेक महत्त्वपूर्ण विचार दिले, त्यापैकी काही प्रमुख विचार खालीलप्रमाणे आहेत:
  • ग्राम स्वराज्य: तुकडोजी महाराजांनी ग्राम स्वराज्य स्थापनेवर जोर दिला. त्यांनी गावांना आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण बनवण्याची कल्पना मांडली. महाराष्ट्र राज्याच्या वेबसाईटवरील माहिती नुसार, ग्राम स्वराज्य म्हणजे 'गावातील लोकांचे राज्य' असावे, जेथे निर्णय ग्रामसभेमध्ये घेतले जातात.
  • जातिभेद निर्मूलन: त्यांनी समाजातील जातिभेद आणि उच्च-नीचतेच्या भावनांना विरोध केला. सर्व माणसे समान आहेत, असा विचार त्यांनी लोकांमध्ये रुजवला.
  • अंधश्रद्धा निर्मूलन: तुकडोजी महाराजांनी समाजाला अंधश्रद्धा आणि रूढीवादी विचार सोडून देण्यास सांगितले. त्यांनी लोकांना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवण्याचे महत्त्व पटवून दिले.
  • स्वच्छता: त्यांनी स्वच्छतेच्या महत्त्वावर भर दिला आणि लोकांना आपले परिसर स्वच्छ ठेवण्यास प्रवृत्त केले. या वेबसाईटवर याबद्दल माहिती उपलब्ध आहे.
  • सामुदायिक प्रार्थना: तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व सांगितले. त्यांनी लोकांना एकत्र येऊन प्रार्थना करण्यास प्रोत्साहित केले, ज्यामुळे एकता आणि समरसता वाढते.
  • राष्ट्रभक्ती: त्यांनी लोकांना आपल्या देशावर प्रेम करण्यास आणि देशासाठी त्याग करण्यास शिकवले.
या विचारांच्या माध्यमातून तुकडोजी महाराजांनी समाजाला एक नवीन दिशा दिली आणि लोकांमध्ये सामाजिक सुधारणा घडवून आणल्या.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1200

Related Questions

कोणत्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे वृद्धांना एकाकी रहावे लागते?
आदिवासींच्या मूलभूत हक्कांवर गदा येण्याची कारणे कोणती?
कुटुंबातील पुरुषवर्चस्व म्हणजे काय?
कुटुंबात स्त्रीच्या वाट्याला येणारे स्थान स्पष्ट करा?
आपल्या कुटुंब व्यवस्थेत वर एकत्र कुटुंब पद्धतीचा प्रभाव कसा आहे ते स्पष्ट करा?
शहरांमधील सामाजिक असुरक्षिततेचे स्वरूप वर्णन करा?
फीमेल, फेमिनाईल आणि फेमिनिष्ठ टिपा लिहा?