2 उत्तरे
2
answers
कालपात्र म्हणजे काय? ते का पुरतात?
4
Answer link
*_⭕ इंदिरा गांधी व नरेंद्र मोदींनी जमिनीत पुरलेल्या “कालपात्राचं” रहस्य काय आहे⭕_*
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी जमिनीमध्ये कालपात्र पुरून ठेवलय. कालपात्र म्हणजे टाईम कॅप्सुल.
तारिख होती ७ जून २०१० ची. तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी या दिवशी गांधीनगर मध्ये तयार करण्यात येण्यात महात्मा मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यात कालपात्र ठेवलं. या कालपात्राचं वजन ९० किलो होतं. तीन फुट लांबी आणि अडीच फूट रुंद असणाऱ्या या स्टिलच्या कालपत्रामध्ये गुजरातचा १ मे १९६० पासूनचा इतिहास लिहण्यात आला होता.
*आत्ता प्रश्न पडला असेल हे कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल काय असत.*
कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल मध्ये त्या त्या कालखंडातील महत्वाच्या गोष्टी मांडण्यात येतात. लिखित स्वरुपात अशा गोष्टी मांडून त्या कालपात्रात ठेवल्या जातात व त्या जमिनीखाली पुरण्यात येतात. याचा उद्देश इतकाच की १००० हजार वर्षांनी जेव्हा हे कालपात्र उघडण्यात येईल तेव्हा आपला इतिहास भविष्यातील व्यक्तिंना समजून यावा.
पण नरेंद्र मोदींवर कालपात्रासाठी टिका करायची असेल तर कॉंग्रेसची अडचण होते.
कारण कालपात्रचा पहिला प्रयोग श्रीमती इंदिरा गांधी यांनीच केला आहे.
१९७३ साली इंदिरा गांधी सत्तेत होत्या. १९७२ च्या युद्धामुळे इंदिरा गांधींना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जावू लागलं होतं. इंदिरा गांधी सार्वभौम बनल्या होत्या आणि याच काळात म्हणजे,
१५ ऑगस्ट १९७३ साली इंदिरा गांधींनी देखील, “कालपात्र” पुरलं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,नंतरच्या काळात आणिबाणी लादली गेली.
आणिबाणीनंतर झालेल्या निवडणूकांच्या प्रचारावेळी जनता पार्टीने इंदिरा गांधीद्वारे पुरण्यात आलेले कालपात्र वरती काढण्यात येईल अस सांगितलं. जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे कालपात्र वर काढलं. हे कालपात्र पुरण्यासाठी ८ हजार तर काढण्यासाठी ५८ हजार रुपये खर्च झाले.
त्यानंतर जनता पार्टीने या इंदिरा गांधीच्या माध्यमातून पुरलेल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी समिती बसवली.
असाच प्रयोग मायावतींनी देखील केला होता. त्यांनी देखील आपल्या कौतुकसोहळा या कालपात्रमध्ये ठेवून पुरल्याची माहिती देण्यात येत होती.
बोलभिडु वरून साभार


https://m.facebook.com/story.php?story_fbid=947584228972834&id=100011637976439
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी जमिनीमध्ये कालपात्र पुरून ठेवलय. कालपात्र म्हणजे टाईम कॅप्सुल.
तारिख होती ७ जून २०१० ची. तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी या दिवशी गांधीनगर मध्ये तयार करण्यात येण्यात महात्मा मंदिराच्या पायाभरणी सोहळ्यात कालपात्र ठेवलं. या कालपात्राचं वजन ९० किलो होतं. तीन फुट लांबी आणि अडीच फूट रुंद असणाऱ्या या स्टिलच्या कालपत्रामध्ये गुजरातचा १ मे १९६० पासूनचा इतिहास लिहण्यात आला होता.
*आत्ता प्रश्न पडला असेल हे कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल काय असत.*
कालपात्र किंवा टाईम कॅप्सुल मध्ये त्या त्या कालखंडातील महत्वाच्या गोष्टी मांडण्यात येतात. लिखित स्वरुपात अशा गोष्टी मांडून त्या कालपात्रात ठेवल्या जातात व त्या जमिनीखाली पुरण्यात येतात. याचा उद्देश इतकाच की १००० हजार वर्षांनी जेव्हा हे कालपात्र उघडण्यात येईल तेव्हा आपला इतिहास भविष्यातील व्यक्तिंना समजून यावा.
पण नरेंद्र मोदींवर कालपात्रासाठी टिका करायची असेल तर कॉंग्रेसची अडचण होते.
कारण कालपात्रचा पहिला प्रयोग श्रीमती इंदिरा गांधी यांनीच केला आहे.
१९७३ साली इंदिरा गांधी सत्तेत होत्या. १९७२ च्या युद्धामुळे इंदिरा गांधींना आयर्न लेडी म्हणून ओळखलं जावू लागलं होतं. इंदिरा गांधी सार्वभौम बनल्या होत्या आणि याच काळात म्हणजे,
१५ ऑगस्ट १९७३ साली इंदिरा गांधींनी देखील, “कालपात्र” पुरलं.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,नंतरच्या काळात आणिबाणी लादली गेली.
आणिबाणीनंतर झालेल्या निवडणूकांच्या प्रचारावेळी जनता पार्टीने इंदिरा गांधीद्वारे पुरण्यात आलेले कालपात्र वरती काढण्यात येईल अस सांगितलं. जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर त्यांनी हे कालपात्र वर काढलं. हे कालपात्र पुरण्यासाठी ८ हजार तर काढण्यासाठी ५८ हजार रुपये खर्च झाले.
त्यानंतर जनता पार्टीने या इंदिरा गांधीच्या माध्यमातून पुरलेल्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी समिती बसवली.
असाच प्रयोग मायावतींनी देखील केला होता. त्यांनी देखील आपल्या कौतुकसोहळा या कालपात्रमध्ये ठेवून पुरल्याची माहिती देण्यात येत होती.
बोलभिडु वरून साभार


https://m.facebook.com/story.php?story_fbid=947584228972834&id=100011637976439
0
Answer link
कालपात्र (टाइम कॅप्सूल) म्हणजे काय:
कालपात्र म्हणजे एक बंद पेटी किंवा कंटेनर. यात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू, कागदपत्रे, छायाचित्रे किंवा इतर स्मरणिका ठेवल्या जातात. भविष्यातील लोकांसाठी भूतकाळातील माहिती जतन करणे हा या मागचा उद्देश असतो.
कालपात्र का पुरतात:
कालपात्र जमिनीत पुरण्याचे काही मुख्य कारण खालीलप्रमाणे आहेत:
- भूतकाळाची माहिती जतन करणे: भविष्यातील पिढ्यांना त्यावेळची संस्कृती, जीवनशैली, आणि महत्त्वाच्या घटनांची माहिती मिळावी.
- ऐतिहासिक संदर्भ: त्या विशिष्ट काळातील सामाजिक, राजकीय आणि वैज्ञानिक घटनांची माहिती देण्यासाठी.
- भविष्यातील पिढ्यांसाठी संदेश: कधीकधी, लोक भविष्यातील पिढ्यांसाठी संदेश किंवा शुभेच्छा देण्यासाठी कालपात्राचा वापर करतात.
- संशोधन आणि अभ्यास: इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ आणि संशोधकांना भूतकाळाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळू शकते.
कालपात्र पुरण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. हे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील एक दुवा साधण्याचे काम करते.
अधिक माहितीसाठी काही स्रोत: