कायदा संविधान मूलभूत हक्क

संविधानाचे मूलभूत हक्क काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

संविधानाचे मूलभूत हक्क काय आहेत?

4

_*⭕  संविधानाचे मुलभूत हक्क    ⭕*_


```आज संविधान दिवस त्यानिमीत्त जाणून घ्या, प्रत्येक नागरिकांस भारतीय संविधानाने दिेलेले मुलभूत हक्क```

  .         *_भारतात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नागरिकाला हे मुलभूत अधिकार संविधानाने बहाल केले आहेत. पण दुर्देवाने हे मुलभूत हक्क बऱ्याच नागरिकांना आज देखील माहिती नाहीत. मुलभूत अधिकाराचा अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपण अभ्यास केला जातो. मात्र हे दुर्देवाचे आहे, कारण संविधानाने दिलेले हे अधिकार आपण दैनंदिन जीवनात पावलो पावली वापर असतो पण याविषयी सविस्तर माहिती नसते. त्यामुळेच जीवन जगत असताना आपल्या या मुलभूत हक्काचे हणहण होते असते पण आपणास यांची कल्पना देखील नसते._*

*♾प्रत्येक नागरिकांस भारतीय संविधानाने दिेलेले मुलभूत हक्क*
या मुलभूत हक्काबाबत संविधानात भाग तीन मध्ये कलम १४ ते ३५ मध्ये आपणास माहिती दिली आहे. हे हक्क कोणते आहेत ते आपण जाणून घेवू...
*♾समानतेचा हक्क (कलम १४ ते १८)*
समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरूष असा भेद करून कोणालाही वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वासाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात, की जे आपल्याला संरक्षण देतात. उदा. विनाचौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते.आपण वाचत आहात. याबरोबरच सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्था यांवर आधारीत भेदभाव करता येत नाही. अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायद्याने नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. त्याचबरोबर लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. उदा. राजा, महाराजा, रावबहाद्दूर यासारख्या पदव्या.
*♾स्वातंत्र्याचा हक्क (कलम १९ ते २२)*
संविधानाने दिलेला हा एक महत्वाचा हक्क असून त्यात व्यक्तिच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे. यात नागरिक म्हणून आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्यांचा अधिकार देण्यात आला आहे. यामुळे आपण आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचारावर वाचा फोडू शकतो. त्याचबरोबर आपणास एकत्र येवून संस्था किंवा संघटना स्थापन करू शकतो. तर प्रत्येकाला आपल्याला निवडीनुसार उद्योग व व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य दिेले आहे.कोणत्याही व्यक्तिचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय कोणत्याही व्यक्तिला अटक करून स्थानबद्दध करता येत नाही.
महत्वाचे म्हणजे याच हक्कामध्ये शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आला आहे. ६ ते १४ वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मुलभूत हक्क यात देण्यात आला आहे. यामुळे या हक्कापासून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
*♾शोषणाविरूध्दचा हक्क (कलम २३, २४)*
शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरूध्दचा हक्क होय. संविधानाने यावर बंदी घातली आहे, तर विशेष म्हणजे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये १४ वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. तसेच वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून त्याच्या इच्छेविरूध्द काम करून घेणे,त्याच्या कामाचा योग्य मोबदला न देणे, त्याच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणत: महिला, बालके, दुर्बल समाजघटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. यामुळे कोणत्याही प्रकारचे शोषण असो, त्याविरोधात उभे राहण्याचा यात हक्क देण्यात आला आहे.
*♾धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क (कलम २५ ते २८)*
भारतीय संविधानात धर्मनिरपेक्षतेला विशेष महत्व देण्यात आले आहे. त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क दिेले आहेत. यामुळे कोणत्याही नागरिकांस आपापला धर्म जपणाचा अधिकार आहे. यामध्ये हे हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक बाबतीत दोन बाबींना महत्वाच्या आहेत.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ
१) ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत. याला संविधानाने प्रतिबंध घातला आहे. २) तर शिक्षणामध्ये शासनाची आर्थिक मदत घेत असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. यामुळे शिक्षण संस्थामधून कोणत्याही धर्माचा प्रसार होणार नाही यांची काळजी या कायद्यात घेण्यात आली आहे.
*♾सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क (कलम २९ ते ३१)*
सण, उत्सव, जीवनपध्दती यामध्ये आपल्या देशात विविधता आहे. अनेक समाजात हे सण उत्सव करत असताना विविधता आढळते त्या त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग आहे. संविधानाने विविध लोकसमूहांना हे वेगळेपण जतन करण्याचा हक्क दिला आहे. यामुळे आपापल्या लोकसमूहाला त्याच्या संस्कृतीचे जतन करता येते तसेच त्याचे संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात.
*♾संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क (कलम ३२ ते ३५)*
आपल्या मुलभूत हक्काचा भंग झाल्यास आपल्याला या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा हक्क हा एक मुलभूत हक्क आहे. संविधानात याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हटले आहे.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ,  ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ   या कलमामध्ये आपल्या हक्कभंगाविरोधात न्यायालयाकडे दाद मागण्याची तरतूद आपणास संविधानाने दिली आहे. त्यानुसार न्यायालयालाही या हक्काचे संरक्षण करणे बंधनकारक आहे.
आपण प्रामुख्याने या मुलभूत अधिकारावर नजर टाकण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आजही या हक्काचे हणहण होत आहे. आपण पाहिलेल्या पहिल्याच समानतेच्या हक्कामध्ये कायद्याने स्त्री-पुरूष भेदभाव करता येत नाही. मात्र आजही देशात हा भेदभाव नष्ट झाला नाही, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सबरीमाला मंदीरामध्ये न्यायालयाने महिलांना प्रवेश दिला असतानाही तो हक्क महिलांना मिळत नाही. तसेच स्वातंत्र्याच्या हक्कावर आज मोठ्या प्रमाणात गदा आणली जात आहे. या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर वाचा फोटण्यासाठी मत मांडण्याचा(भाषणाचा) तसेच अभिव्यक्तीचा अधिकार देण्यात आला. मात्र आजच्या परिस्थितीत यावर गदा आणली जात आहे. काही दिवसापूर्वीच सरकारने अशा अन्याय अत्याचारावर सोशल मीडियावर वाचा फोडत असलेल्या अनेक नागरिकांना नोटीसा पाठवल्या. तर अनेक लेखकांना माओवाद्याचा संबंध असल्याचे दाखवत तुरूंगात टाकले. ही सर्व परिस्थिती पाहता आज या मुलभूत हक्काविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे आज खरच देशात संविधान रूजले आहे की ते धोक्यात येत आहे याचा विचार करणे गरजेचे आहे.
दै पुढारी वरून साभार

0

भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केले आहेत. हे हक्क खालीलप्रमाणे आहेत:

  1. समानतेचा हक्क: कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण (कलम 14), धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या आधारावर कोणताही भेदभाव नाही (कलम 15), सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी (कलम 16), अस्पृश्यता निवारण (कलम 17), पदव्यांची समाप्ती (कलम 18).
  2. स्वातंत्र्याचा हक्क: भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततापूर्वक नि:शस्त्र सभा भरवण्याचे स्वातंत्र्य, संघटना किंवा युनियन बनवण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचे आणि स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य (कलम 19). जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य संरक्षण (कलम 21), शिक्षणाचा अधिकार (कलम 21A), अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण (कलम 22).
  3. शोषणाविरुद्धचा हक्क: मानवी तस्करी आणि सक्तीने केलेल्या मजुरीला मनाई (कलम 23), बालमजुरीला मनाई (कलम 24).
  4. धर्म स्वातंत्र्याचा हक्क: कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे, आचरण करण्याचे आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य (कलम 25), धार्मिक వ్యవಹಾರ व्यवस्थापित करण्याचे स्वातंत्र्य (कलम 26), विशिष्ट धर्माच्या संवर्धनासाठी कर भरण्यापासून सूट (कलम 27), धार्मिक शिक्षण किंवा उपासना सभेला उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य (कलम 28).
  5. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क: अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषेचे, लिपीचे आणि संस्कृतीचे संरक्षण करण्याचा हक्क (कलम 29), शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे व्यवस्थापन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क (कलम 30).
  6. घटनात्मक उपायांचा हक्क: मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा हक्क (कलम 32).

हे मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयात जाऊन त्यांचे संरक्षण मागता येते.

अधिक माहितीसाठी, आपण भारतीय संविधानाची अधिकृत वेबसाइट पाहू शकता: भारतीय संविधान

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1180

Related Questions

मूलभूत मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्य या संकल्पना स्पष्ट करा?
मूलभूत हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने न्यायदान मंडळाचे कार्य स्पष्ट करा?
Hakk mhnje kay?
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणते आहेत?
व्यक्ती आणि समाजाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर आधारित हक्क?
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क स्पष्ट करा?
भारतीय राज्य घटनेतील मूलभूत हक्क स्पष्ट करा?