2 उत्तरे
2 answers

विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी माहिती सांगा?

4
*विनायक दामोदर सावरकर*

*विज्ञाननिष्ठ, महान क्रांतिकारक*

*जन्मदिन - २८ मे १८८३*

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी, धैर्याचे मेरुमणी, प्रतिभासंपन्न कवी, सिध्दहस्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, तत्त्वनिष्ठ राजकारणी, सहस्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते, चिंतनशील, कर्ते समाजसुधारक, भाषा शुध्दीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक असे विविध पैलू होते.

'मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी  विसरू नये' या त्यांच्या प्रतिपादनातून ते साजसुधारणांना किती महत्त्व देत होते हे समजून येते. ते हिंदू समाजापुरते बोलत आणि लिहीत होते. तरीपण त्यांना विज्ञाननिष्ठ, पोथीमुक्त आणि ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता. सर्व पंथांना एकत्र करून आचार विचार भेद न मानता 'या भूमीला पितृभू आणि पुण्यमू मानणारे ते हिंदू' अशी माझी बौध्दिक व्याख्या आहे, असे ते म्हणत. त्यांच्या सामाजिक विचारांचा हिंदुत्व हा गाभा होता. त्यांनी आधुनिक विश्वसंस्कृतीस हिंदुत्वाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा, शास्त्रांचा अनुकूल असा अर्थ लावला नाही. त्यांनी वेदांचे प्रामाण्य मानले नाही. ते मनुस्मृतीला, वेदांना अभ्यासनीय, आदरणीय ग्रंथ मानत. पण ते अनुकरणीय नाहीत हे सुध्दा परखडपणे सांगतात. विज्ञानयुगाची, यंत्रयुगाची कास धरण्याचे आवाहन करतात. आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. धर्मग्रंथ हे ईश्वरनिर्मित आहेत, हे त्यांना मान्य नव्हते तर धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांचे सामाजिक विचार हे इहवादावर आणि भौतिकवादावर आधारित होते. तरीपण ते अध्यात्माचे वैयक्तिक स्तरावर महत्त्व मान्य करीत. विज्ञानाच्या संशोधन ग्रंथांनाच ते धर्मग्रंथ मानतात. बुध्दीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात. हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे, असे ते म्हणतात. धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत नाही, विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

 

ते विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ असल्याने प्रत्क्षनिष्ठ आणि प्रयोगसिध्द विज्ञानच आजच्या परिस्थितीत आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. पाच हजार वर्षांपूर्वीच्या अज्ञानयुगाकडे पाठ फिरवा आणि विज्ञानुगाचे स्वागत करा, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी शुध्द इहवाद मांडला. ते गाईला-बैलाला उपयुक्त पशू मानत. त्यांना देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहूनही नीच मानण्यासारखे आणि माणुसकीला कमीपणा आणणारे आहे, असे ते म्हणत. गोमतापूजन, सत्यनारायण, वास्तुशांती या गोष्टी त्यांना वेडेपणाच्या वाटत. गाय ही बैलाची माता आहे, मनुष्याची नव्हे अशा भाषेत ते गाईबद्दल धर्मश्रध्देची चिकित्सा करतात.

 

2 मे 1921 रोजी सावरकरांची रत्नागिरीमध्ये स्थानबध्दता आणि कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग न घेण्याच्या मुख्य अटींवर सुटका करण्यात आली. अंदामानातील बंदिवासात आणि रत्नागिरीतील 1924 ते 1937 या तेरा वर्षांच्या स्थानबध्दतेच्या कालखंडात त्यांनी सखोल असे समाजचिंतन केले. या काळात त्यांनी सामाजिक आंदोलनावर, समाज प्रबोधनावर आणि विज्ञानाच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले. जातिभेदाचे उन्मूलन, अस्पृश्यता निवारण, भाषाशुध्दी, अंधश्रध्दा निर्मलून, लिपी सुधारणा, हिंदूंचे संघटन आणि शुद्धिकरण हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. त्यासाठी व्याख्याने देणे, लेख लिहिणे, विचार विनिमय, चर्चा, प्रश्नोत्तरे शंकांचे समाधान, वैयक्तिक गाठीभेटी याद्वारे सवर्णांचे प्रबोधन आणि दलितांमध्ये जाणीवजागृतीला त्यांनी सुरुवात केली. सनातन्यांचा, धर्ममार्तंडांचा आपल्या कार्याला विरोध होणार, प्रतिकूल ते घडणार हे त्यांनी गृहीत धरलेले होतेच. परंतु सावरकरांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर रत्नागिरीतील बहुतांशी लोकांची मानसिकता समाजसुधारणांना अनुकूल होऊ लागली.

हिंदूंच्या समाजजीवनावर आघात करणार आणि हिंदूंनी आपल्या हातांनी हौसेने पायात घालून घेतलेल्या वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या सात बेड्या तोडून घेतल्याशिवाय राष्ट्र त्याग केला पाहिजे. परधर्मात गेलेल्या किवा परधर्मीयांना हिंदू धर्मात घेता आले पाहिजे. त्यांना समतने आणि ममतेने वागवावे, अशी त्यांची शिकवण होती. यज्ञाने पाऊस पडतो हे साफ कोटे असून यज्ञात तुपाचा एक थेंबही वाया गावू नका असे ते सांगत. यज्ञाने पेटलेल्या भारतात दुष्काळ कसे पडतात? असा सवाल ते विचारतात. रत्नागिरीत अस्पृश्यतेचा पुतळा जाळण्यासाठी त्यांनी तरुणांना संमती दिली. 
त्यांनी केलेले कार्य म्हणजे देशभक्तीचे, मानवतवादी, चिरकालीन महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे, हिंदू राष्ट्राबद्दलचे विचार हे वादग्रस्त असू शकतील, पण त्यांचे पोथीमुक्तीचे, विज्ञानवादी, सुधारणावादी आणि इहवादी विचार त्यांच्या अनुयायांनाही पेलले नाहीत. पण त्यांचे हे विचार सगळ्यांनीच स्वीकारले, अमलात आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली तर जातिवादचे, अंधश्रद्धांचे निर्मूलन होऊन जग सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल. अशा या विज्ञानवादी, समाजसुधारक, उत्कट देशभक्तीचे प्रतीक झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतश: नमन 🙏🏼

               संकलन
      आर.एम.डोईफोडे
      शिक्षण अधिकारी
डाॅ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे
************************************
उत्तर लिहिले · 28/5/2019
कर्म · 16010
0
विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, वकील आणि लेखक होते.

जन्म: २८ मे १८८३, नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी.
मृत्यू: २६ फेब्रुवारी १९६६, मुंबई.

स्वातंत्र्य चळवळीतील योगदान:

  • अभिनव भारत संस्थेची स्थापना: सावरकरांनी १९०४ मध्ये ‘अभिनव भारत’ नावाची गुप्त বিপ্লবী संघटना स्थापन केली, ज्याचा उद्देश सशस्त्र मार्गाने भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त करणे हा होता.

  • लंडनमध्ये क्रांतिकारी कार्य: त्यांनी लंडनमध्ये ‘इंडिया हाऊस’ मध्ये राहून भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र केले आणि त्यांना स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरित केले. त्यांनी ‘फ्री इंडिया सोसायटी’ची स्थापना केली, ज्याने भारतीय स्वातंत्र्याच्या विचारांचा प्रसार केला.

  • पुस्तके आणि लेखन: सावरकरांनी अनेक पुस्तके लिहिली, ज्यात ‘१८५७ चा स्वातंत्र्य সমর’ (The Indian War of Independence) हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. हे पुस्तक १८५७ च्या उठावाचे विश्लेषण करते आणि ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांच्या संघर्षाला प्रेरणा देते.

  • अंदमानची शिक्षा: सावरकरांना १९१० मध्ये अटक करण्यात आली आणि त्यांना अंदमानच्या সেলুলার জেলে पाठवण्यात आले. तिथे त्यांनी अनेक वर्षे कठोर कारावास भोगला.

  • हिंदुत्व विचार: सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार मांडला, जो भारतीय संस्कृती आणि इतिहासावर आधारित होता. त्यांनी ‘हिंदुत्व: कोण आहे हिंदू?’ (Hindutva: Who is a Hindu?) या पुस्तकात आपले विचार स्पष्ट केले.

राजकीय विचार आणि कार्य:

  • हिंदू महासभेचे अध्यक्ष: सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून काम केले आणि हिंदूंच्या हक्कांसाठी संघर्ष केला.

  • सामाजिक सुधारणा: त्यांनी अस्पृश्यता निवारण आणि जातीभेदाच्या विरोधात कार्य केले.

टीका: सावरकरांच्या काही विचारांवर आणि कार्यांवर टीकाही झाली आहे, परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1080

Related Questions

भारताचे स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांचे सविस्तर वर्णन कसे लिहाल?
भारताचे स्वातंत्र्य सैनिक शिवराम हरी राजगुरू यांचे सविस्तर वर्णन कसे लिहाल?
बारेंद्र कुमार घोष यांनी काय केले?
कोणाला यवतमाळ जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे माहीत असतील तर कृपया त्यांची नावे पाठवा....🙏?
डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या गावात कोणते क्रांतिकारक राहत होते?
आझाद हिंद सेनेशी संबंधित क्रांतिकारक?
14 फेब्रुवारी व भगतसिंह, राजगुरू, व सुखदेव यांचा काय संबंध आहे?