2 उत्तरे
2
answers
भारतातील पहिली रेल्वे कोणी चालवली?
2
Answer link
मुख्य पान: भारतातील रेल्वे वाहतुकीचा इतिहास

ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे चा १८७० मधील पसाऱ्याचे चित्र. जी.आय.पी.आर. ही त्यावेळच्या मोठ्या रेल्वे कंपन्यांपैकी एक होती.
भारतातील रेल्वेसेवेचा आरंभ इ.स. १८५३मध्ये झाला. इ.स. १९४७पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. इ.स. १९५१मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली जी जगातील सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.
रेल्वे जाळ्याची सुरुवातसंपादन करा

भारतातील सुरुवातीच्या रेल्वेचे क्षणचित्र
भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इ.स. १८३२सालीच मांडण्यात आला होता, परंतु पुढे एक दशक काहीच हालचाली झाल्या नाहीत. इ.स. १८४४ साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. पुढेल काही वर्षात, इंग्लंडमधील गुंतवणुकदारांनी दाखवलेल्या व्यावसायिक औत्सुक्याचा रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला. भारतातील पहिली रेल्वेगाडी डिसेंबर २२, इ.स. १८५१ रोजी रूडकी मध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर दीड वर्षांनी, एप्रिल २२, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर(नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते, आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४ मध्ये बंगाल मध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही १८६४ मध्ये पूर्ण केला गेला. मुंबई ते कोलकाता हा ६४०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्ण झाला १८७० मध्ये त्यावरून गाडी धावली. १८८५ मध्ये भारतीय बनावटीचे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली.

ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे चा १८७० मधील पसाऱ्याचे चित्र. जी.आय.पी.आर. ही त्यावेळच्या मोठ्या रेल्वे कंपन्यांपैकी एक होती.
भारतातील रेल्वेसेवेचा आरंभ इ.स. १८५३मध्ये झाला. इ.स. १९४७पर्यंत भारतात ४२ रेल्वे कंपन्या होत्या. इ.स. १९५१मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली जी जगातील सर्वांत मोठ्या संस्थांपैकी एक आहे. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.
रेल्वे जाळ्याची सुरुवातसंपादन करा

भारतातील सुरुवातीच्या रेल्वेचे क्षणचित्र
भारतात रेल्वे वाहतुकीचा प्रथम आराखडा इ.स. १८३२सालीच मांडण्यात आला होता, परंतु पुढे एक दशक काहीच हालचाली झाल्या नाहीत. इ.स. १८४४ साली, भारताचे त्यावेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळीना रेल्वे व्यवस्था चालू करण्यासाठी परवानगी दिली. दोन नवीन रेल्वे कंपन्यांची स्थापना करण्यात आली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला त्यांना मदत करण्यासाठी सांगण्यात आले. पुढेल काही वर्षात, इंग्लंडमधील गुंतवणुकदारांनी दाखवलेल्या व्यावसायिक औत्सुक्याचा रेल्वे व्यवस्था वृद्धिंगत होण्यात हातभार लागला. भारतातील पहिली रेल्वेगाडी डिसेंबर २२, इ.स. १८५१ रोजी रूडकी मध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर दीड वर्षांनी, एप्रिल २२, इ.स. १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर(नंतरचे व्हिक्टोरिया टर्मिनस, व आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) मुंबई ते ठाणे अशी ३४ किलोमीटर (२१ मैल) धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले होते, आणि भारतातील रेल्वे वाहतूकीला औपचारिक सुरुवात झाली. त्यानंतर १८५४ मध्ये बंगाल मध्ये हावडा ते हुगळी हे २४ मैलांचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्गही १८६४ मध्ये पूर्ण केला गेला. मुंबई ते कोलकाता हा ६४०० किलोमीटरचा रेल्वेमार्ग पूर्ण झाला १८७० मध्ये त्यावरून गाडी धावली. १८८५ मध्ये भारतीय बनावटीचे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली.
0
Answer link
भारतातील पहिली रेल्वे ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेने (Great Indian Peninsula Railway) चालवली.
ही रेल्वे १६ एप्रिल १८५३ रोजी बोरी बंदर (मुंबई) ते ठाणे दरम्यान धावली.
या ऐतिहासिक घटनेने भारताच्या इतिहासात महत्त्वपूर्ण बदल घडवले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: