3 उत्तरे
3
answers
विठ्ठलाच्या कानात माशांची कुंडले का आहेत?
10
Answer link
विठ्ठलाच्या कानात माश्यांची कुंडले नाहीत माश्यांच्या आकाराची कुंडले आहेत. तुम्हाला माहीत आहे का विठ्ठलाच्या उजव्या हातात शंख असतो आणि डाव्या हातात कमळ किंवा चक्र असते. तुम्हाला हे माहित आहे का की त्यांच्या डोक्यावर जे मुकुट आहे त्यामागे शिवलिंग असतो. त्यांची मूर्ती नीट निरखून पहिली असता नक्कीच त्यामागे काहीतरी आहे असा भास होतो. आणि मुकुटाचा आकार पण तसाच आहे.
म्हटले जाते विठ्ठल अर्थात पांडुरंग हे विष्णू, शिव ह्यांचे स्वरूप आहेत. विश्नुदेवाचे दोन हात कमरेभोवती ठेवले की ते पांडुरंगच भासतात.
मला वाटते जे कानातले दागिने पांडुरंगानी घातलेय त्याचा संबध विष्णूदेवांच्या 'मस्त्य अवतार' शी असावा.
काही विद्वान म्हणतात 'विठ्ठल' हा शब्द 'विष्ठल' अर्थात 'दूर जगलातली एक जागा' म्हणून केला जातो. जसे विष्णू भगवान समुद्राच्या खूप खूप आत मध्ये राहतात तसच हे पण.
काही विद्वान असं ही म्हणतात की 'विष्णू' ह्या शब्दाला कन्नड भाषेत 'बीत्ति' असं संबोधतात. आणि हेच 'बीत्ती' आर्यन-प्रकृत भाषेत 'विठ्ठू' होऊन जाते.
म्हणून विठोबाचे विष्णू देवाशी नक्कीच काहीतरी नाते आहे.
एका अभंगात ह्याचा संदर्भ पण येतो.
"मकर कुंडले तळपती श्रवनी" अर्थात कानात माश्याच्या आकाराचे कुंडल असलेलं.
ह्या विषयी एक गोष्ट अशी पण आहे, पण ती खरच आहे की नाही हे मला माहित नाही.
एकदा एक कोळी पांडूरंगाना भेटायला उपहार द्ययला त्यांच्याकडे जातो. पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत, का कारण की तो एक मच्छिमार आहे न. आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात आणि ते पण दोन. बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय, पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना.
तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की..
"तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय. त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय त्याकडे पहा. आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्विकार करेल, मग ते काही ही असू द्या. कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत. आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेद्भाव्नेत अडकत नाही." असं सांगून ते त्या व्यक्ती कडून ते दोन मासे घेतात आणि सर्वाना समजल पाहिजे की सगळे समान आहे म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात.
होऊ शकत असं काय झालं असेल.
पांडुरंग अर्थात 'पांढर्या रंगाचा' ना मग मूर्तीचा रंग काळा का ?? काही जण म्हणतात की पांडुरंगाचा खरा रंग पांढराच आहे. ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील. बहुतेक त्या ध्यानधारणेशी मस्त्य कुंडल, कमळ, वीट ह्यांचा काही संबंध असावा.
मला असे वाटते तुमची मदत संत तुकारामांचे अभंग करू शकतात.
मला अशी खात्री आहे आपल्याला ह्यातून काही क्लू मिळतील.
4
Answer link
ही मकराकार कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगत आहेत. ध्यानसाधनेद्वारे आपण नवद्वारांपैकी कान सोडून अन्य सर्व द्वारे बंद करू शकतो. कान बंद करणे, हे केवळ निर्विकल्प समाधीमध्येच शक्य असते.
मत्स्य हे आपतत्त्वाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण आपतत्त्वावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत वायूतत्त्वापर्यंत पोहोचू शकत नाही. वायूतत्त्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे; म्हणजे कान बंद करणे सुलभ होते, हेच ही मकराकार कुंडले आपल्याला सांगतात.
मत्स्य हे आपतत्त्वाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण आपतत्त्वावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत वायूतत्त्वापर्यंत पोहोचू शकत नाही. वायूतत्त्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे; म्हणजे कान बंद करणे सुलभ होते, हेच ही मकराकार कुंडले आपल्याला सांगतात.
0
Answer link
विठ्ठलाच्या कानात माशांच्या कुंडलांबद्दल अनेक कथा आणि मान्यता आहेत. त्यापैकी काही प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहेत:
- शंकराची उपासना: एक मान्यता अशी आहे की विठ्ठल हे शंकराचे भक्त होते आणि त्यांनी शंकराची उपासना करून ही कुंडले प्राप्त केली.
- स्त्री-पुरुषांचे प्रतीक: काही लोकांच्या मते, माशांची कुंडले स्त्री आणि पुरुषांचे प्रतीक आहेत, जे विठ्ठलाच्या दर्शनातून दिसून येते.
- सृष्टीतील जीवनचक्र: मासे हे जीवनचक्राचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे विठ्ठलाच्या कानातील माशांची कुंडले सृष्टीतील जीवन आणि मृत्यू यांचे चक्र दर्शवतात.
- लोककथा: या संदर्भात अनेक लोककथा प्रचलित आहेत, ज्या स्थानिक मान्यतांवर आधारित आहेत.
या कुंडलांचे महत्त्व आणि अर्थ विविध भक्तिगणांच्या श्रद्धा आणि समजुतीनुसार बदलू शकतात.