अन्न प्येय पाणी पिणे आरोग्य आहार

पावसाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

2 उत्तरे
2 answers

पावसाळ्यात किती लिटर पाणी प्यावे?

13
पाणी जितके जास्त प्याल तितके शरीरास आरोग्यदायक ठरते...
पाणी हे दर दोन दोन तासाने प्यावे... पाणी प्यायल्याने शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि शुष्क पणा कमी होतो...
पाण्याची कमतरता शरीरास लागु देऊ नये... नाहीतर अनेक आजार उद्भवतात...
असो..

पावसाळ्यात व हिवाळयात मनुष्य कमी पाणी पितो...
म्हणूनच पाण्याची नैसर्गिक भर शरीरास मिळण्यासाठी सिझन वाइज फळे उपलब्ध होतात... ती रसाळ फळे खावी...

शारीरिक कष्टाची कामे करत असलेल्या व्यक्तींना दिवसाला दोन ते अडीच लिटर पाण्याची गरज असते... उन्हाळ्यात शरीराला स्वतःहून पाणी हवे असते, मात्र, अन्य ऋतूमध्ये पाणी आठवणीने प्यावे लागते... श्रमिक, गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता यांनी पाणी अधिक प्यावे. वाढत्या वयानुसार शरीरातील पाणी कमी होते...

उत्तर लिहिले · 11/6/2018
कर्म · 458560
0

पावसाळ्यात किती पाणी प्यावे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की तुमची शारीरिक हालचाल, आरोग्य आणि हवामान. तरीही, साधारणपणे, पावसाळ्यात दररोज 2 ते 3 लीटर पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले असते.

पावसाळ्यात पाणी पिण्याचे फायदे:

  • शरीराला हायड्रेटेड ठेवते.
  • रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • पचनक्रिया सुधारते.
  • त्वचा निरोगी राहते.

पावसाळ्यात पाणी कमी पिण्याची कारणे:

  • तहान कमी लागणे.
  • हवामान थंड असणे.
  • घाम कमी येणे.

पावसाळ्यात पाणी पिण्याचे काही नियम:

  • तहान लागल्यावर पाणी प्या.
  • शिळे पाणी पिऊ नका.
  • उकळलेले पाणी प्या.
  • जास्त पाणी पिऊ नका.

टीप: जर तुम्हाला काही आरोग्य समस्या असतील, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

कामावरून थकून आल्यावर एनर्जी कमी झाली तर एनर्जी लवकर काही मिनिटात येण्यासाठी काय करावे? घरगुती उपाय सांगा.
एखाद्या व्यक्तीला एनर्जी एकदम कमी झाल्यावर लवकर एनर्जी येण्यासाठी काय करावे?
बाळाला सारखी सारखी नजर लागते, उपाय सुचवा?
शरीराची चरबी कशी कमी करावी?
एड्सची लक्षणे कोणती?
गुप्तरोग कशामुळे होतात?
कुटुंब नियोजनाचे फायदे कोणते?