कायदा शेती प्रॉपर्टी मालमत्ता

दोन्ही भावांची शेतजमिनीची वाटणी होऊन चार वर्षे झाली, भावाने त्याची काही जमीन विकली आणि आता म्हणतो वाटणी बदलायची, तर ते शक्य आहे का?

5 उत्तरे
5 answers

दोन्ही भावांची शेतजमिनीची वाटणी होऊन चार वर्षे झाली, भावाने त्याची काही जमीन विकली आणि आता म्हणतो वाटणी बदलायची, तर ते शक्य आहे का?

9
महाराष्ट्र जमिन महसुल अधीनियम १९६६ चे कलम ८५ नुसार पोट विभागणी मोजणीची कारवाई केली जाते. अर्थात सदरची कार्यवाही करणेसाठी संबंधीत जमिनीचे सहधारक यांची समंती असणे आवश्यक असते. जर अशा विभागणीस सहधारकांची समंती नसेल तर मा. दिवाणी न्यायालयात दावा दाखल करुन दाद मागुन  घेता येते.
            परंतु आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जमीनीचे वाटप केले जाते. जमिन वाटणीमध्ये गावातील नागरीक महत्वाची भुमिका पार पाडत असतात. त्यामुळे अशा वाटणीमध्ये भविष्यात काही वाद उपस्थित झाला तर गावपातळीवर ‌अ‍ापणास दाद मागता येईल. जर आपणास गावपातळीवर न्याय मिळाला नाही तर आपणास न्यायालयात दावा दाखल करुन न्याय मागता येइल .
             १. आपल्या प्रकणांमध्ये ७/१२ ची  गावकामगार तलाठी यांचेकडुन रितसर विभागणी न करता आपल्या कुंटुंबातील सर्व धारकांचे समंतीने आपल्या भावाने त्याच्या हिश्याची जमिन विकली असेल तर अशा प्रकरणामध्ये तुमच्या भावाला पुन्हा वाटणी बदली करण्यांबाबतचा अधिकारच राहत नाही. जर तुमचा भाऊ पुन्हा नव्याने वाटणी करण्याचे सांगत ‍असेल व तुम्हांला त्रास देत असेल तर सदरबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामसभेत मुद्दा मांडा. तरीहि तुमचा भाऊ ऐकत नसेल तर तशी तक्रार ग्रामपंचायतीमध्ये करा व दाद मागुन घ्या. आपणास न्याय नक्की मिळेल. या पध्दतीने आपणास न्याय न मिळाल्यास आपणास न्यायालयात नक्की न्याय मिळेल.
      २. वाटणी होऊन त्याप्रमाणे ७/१२ देखील वेगवेगळे झाले असतील व त्यानंतर तुमच्या भाव‍ाने   जमिन विकली असेल तर पन्हा वाटणी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळं तुमच्या भावाची म‍ागणी निरर्थक आहे.
उत्तर लिहिले · 29/5/2018
कर्म · 1975
4
असं वाटणं होणं शक्य नाही, जर तुमचे खातेवाटप झाले असेल तर. आणि जर खातेवाटप नसेल आणि तो कोर्टात गेला तरी तुम्ही घाबरू नका. कारण तुम्ही सांगा त्याने त्याच्या वाट्याची जमीन विकून आता माझ्याकडे सामान वाटपाची मागणी करतो. चार वर्षात तुम्ही तुमच्या हिश्याच्या जमिनीत जर काही सुधारणा केल्या असतील तर त्या कोर्टाच्या निदर्शनात आणून द्या. आणि त्या अनुषंगाने हा आज हिश्यावाटप बदली करून मागत आहे... त्या ठिकाणी त्याच पितळ उघड पडेल.
उत्तर लिहिले · 29/5/2018
कर्म · 285
0

तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, मला काही गोष्टी स्पष्ट करणे आवश्यक आहे. वाटणी कोणत्या आधारावर झाली होती (तोंडी, नोंदणीकृत), भावाने जमीन कधी विकली, आणि आता वाटणी बदलण्याची कारणे काय आहेत, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

सर्वसाधारणपणे, एकदा कायदेशीर वाटणी झाली की, ती सहजासहजी बदलता येत नाही.

तरीही, काही शक्यता आहेत:

  1. सहमतीने बदल: जर दोन्ही भाऊ वाटणी बदलण्यास सहमत असतील, तर ते नव्याने वाटणीपत्र (Partition Deed) तयार करून नोंदणी करू शकतात. यासाठी दोघांचीही पूर्णConsent असणे आवश्यक आहे.
  2. फसवणूक किंवा चुकीच्या माहितीवर आधारित वाटणी: जर वाटणी करताना फसवणूक झाली असेल किंवा काही महत्त्वाची माहिती लपवली गेली असेल, तर न्यायालयात वाटणी रद्द करण्यासाठी दावा दाखल करता येतो.
  3. विक्री केलेल्या जमिनीचा भाग: भावाने वाटणीनंतर जमीन विकली असेल, तर ज्याने जमीन खरेदी केली आहे त्याचे हित जपले जाणे आवश्यक आहे. त्यामुळे वाटणी बदलणे अधिक कठीण होऊ शकते.

या प्रकरणात, तुम्ही एक वकील किंवा कायदेशीर सल्लागाराची मदत घेणे उचित राहील. ते तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार योग्य मार्गदर्शन करू शकतील.

Disclaimer: मी एक AI chatbot आहे आणि ही कायदेशीर सल्ला नाही.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1440

Related Questions

मी माझ्या वडिलांच्या नावावर घरकुल बांधू शकतो का?
आधार हा मालकीचा पुरावा आहे का?
जर एखादा व्यक्ती १२ वर्ष एकाच जागेवर राहतो, तर ती जागा कोणत्या अधिनियमानुसार मिळवता येते?
माझी 20 वर्ष घर वहिवाट आहे, घरपट्टी भरली आहे, मालक मयत असून वारस नोंद 45 वर्ष नाही, घर दुरुस्ती केलेली चालेल कि नाही?
खेड्यातील ग्रामपंचायतची जंगम मालमत्ता कोणती ते लिहा?
मी शहरात एका सरकारी जागेत गेली 30 वर्षे झाले राहतो व त्या जागेची घरपट्टी व पाणीपट्टी भरत आहे, तर ती जागा माझ्या नावावर होऊ शकते का?
जमीन खाते मोठ्या भावाचे नावे आहे, दोन भाऊ आहेत व समसमान जमीन वाटणी करावी यासाठी अर्ज करून मालकी हक्क मिळेल की वारस नोंद करणे योग्य राहील?