5 उत्तरे
5
answers
खरंच नेहमी खरं बोलावं का?
14
Answer link
खरं सांगायचं तर नेहमी खरचं बोलायला हवं असं काही नाही विशेषतः आपला मार्ग सत्याचा आणि नीतीचा असेल. तुम्ही म्हणाल खरं न बोलता सत्याचा मार्ग हे कसं शक्य आहे? मी दोन उदाहरण देतो.
कुरुक्षेत्र... नीती आणि अनीती याचं युद्ध चालू आहे. दोन्ही बाजूला वीर लढताहेत, एक बाजू राज्यासाठी लढते आहे जिथे १०० कौरव, पितामह भीष्म, महारथी कर्ण, गुरू द्रोणाचार्य आणि कृष्ण सेना आहे तर दुसरी बाजू न्याय नीती साठी लढते आहे ज्यात पांडव आणि साक्षात भगवंत आहेत.
शस्त्र संख्येच्या बळावर अर्थातच कौरवांच पारड जड आहे.पाचव्या दिवशी गुरू द्रोणाचार्य अगदी अर्जुनालाही आवरत नाहीत, पांडवांची फार हानी होत असतेआणि आणि अशावेळी एक आवई उठते अश्वत्थामा मेला. गुरू द्रोणाचार्य हे ऐकून पुत्रवियोगाच्या कल्पनेने विचलित होतात. कोणाला विचारावं काय खरं आहे? त्यांना सत्यवचनी धर्मराज समोर दिसतो, त्याला ते विचारतं, खर्च सांग अश्वत्थामा मेला का? धर्मराज म्हणतो हो अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो वा ( हो अश्वत्थामा मेला, पण नर की हत्ती ते माहीत नाही) . साक्षात धर्मराजा कदम अस ऐकल्याने द्रोणाचार्य दुःखाने वेडे पिसे होतात आणि दृष्टद्युम्न संधी साधून त्यांचा वध करतो.
परत असाच एक लढा नीती विरुद्ध अनितीचा प्रतापगडच्या साक्षीने घडलेला. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत येत होता.अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर मराठे चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला.
अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे असे दिगग्ज होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या.
महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असे खोटे भासवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले, पण महाराजांनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले.
यापुढचा इतिहास कुणाला नव्याने सांगायची गरज नाही.
तुमचा हेतू सत्याचा असण महत्वाचं!
कुरुक्षेत्र... नीती आणि अनीती याचं युद्ध चालू आहे. दोन्ही बाजूला वीर लढताहेत, एक बाजू राज्यासाठी लढते आहे जिथे १०० कौरव, पितामह भीष्म, महारथी कर्ण, गुरू द्रोणाचार्य आणि कृष्ण सेना आहे तर दुसरी बाजू न्याय नीती साठी लढते आहे ज्यात पांडव आणि साक्षात भगवंत आहेत.
शस्त्र संख्येच्या बळावर अर्थातच कौरवांच पारड जड आहे.पाचव्या दिवशी गुरू द्रोणाचार्य अगदी अर्जुनालाही आवरत नाहीत, पांडवांची फार हानी होत असतेआणि आणि अशावेळी एक आवई उठते अश्वत्थामा मेला. गुरू द्रोणाचार्य हे ऐकून पुत्रवियोगाच्या कल्पनेने विचलित होतात. कोणाला विचारावं काय खरं आहे? त्यांना सत्यवचनी धर्मराज समोर दिसतो, त्याला ते विचारतं, खर्च सांग अश्वत्थामा मेला का? धर्मराज म्हणतो हो अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो वा ( हो अश्वत्थामा मेला, पण नर की हत्ती ते माहीत नाही) . साक्षात धर्मराजा कदम अस ऐकल्याने द्रोणाचार्य दुःखाने वेडे पिसे होतात आणि दृष्टद्युम्न संधी साधून त्यांचा वध करतो.
परत असाच एक लढा नीती विरुद्ध अनितीचा प्रतापगडच्या साक्षीने घडलेला. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून निघाला. वाटेत येताना तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत येत होता.अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर मराठे चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला. खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला.
अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे असे दिगग्ज होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या.
महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असे खोटे भासवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले, पण महाराजांनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले.
यापुढचा इतिहास कुणाला नव्याने सांगायची गरज नाही.
तुमचा हेतू सत्याचा असण महत्वाचं!
3
Answer link
खर बोलणं हे खूपच चांगलं, पण तरीही खर बोलावं की नाही, हे परिस्थिती वर अवलंबून असते.
प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, की जिथे खरं बोलणे संकटात पाडू शकते...
अश्या वेळी खोटं बोलावं...
खोट बोलून काही चांगलं होत असेल, व खर बोलून काही वाईट होणार असेल तर खोटं बोलावं ...
आणि तुम्ही ही एकदा/अनेकदा खोटं बोललं आहात, बघा विचारा स्वताला प्रश्न!
प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतात, की जिथे खरं बोलणे संकटात पाडू शकते...
अश्या वेळी खोटं बोलावं...
खोट बोलून काही चांगलं होत असेल, व खर बोलून काही वाईट होणार असेल तर खोटं बोलावं ...
आणि तुम्ही ही एकदा/अनेकदा खोटं बोललं आहात, बघा विचारा स्वताला प्रश्न!
0
Answer link
नेहमी खरं बोलावं की नाही, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं सरळ उत्तर 'हो' किंवा 'नाही' असं देता येत नाही. खरं बोलण्याचे अनेक फायदे आहेत, पण काही वेळा परिस्थितीनुसार खोटं बोलणं अधिक योग्य ठरू शकतं.
खरं बोलण्याचे फायदे:
- विश्वासार्हता: खरं बोलल्याने लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो.
- संबंध सुधारतात: प्रामाणिक संवादामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतात.
- मानसिक शांती: खरं बोलल्याने मनात कोणताही अपराधभाव किंवा भीती नसते.
- समाजात आदर: खरं बोलणाऱ्या व्यक्तीला समाजात मान मिळतो.
खोटं बोलण्याची गरज केव्हा भासते:
- जीव वाचवण्यासाठी: जर तुमच्या खोटं बोलण्याने कोणाचे प्राण वाचणार असतील, तर खोटं बोलणं योग्य ठरतं.
- कोणाला दु:ख होऊ नये म्हणून: कधीकधी सत्य खूप कठोर असू शकतं आणि ते ऐकून समोरच्या व्यक्तीला खूप दुःख होऊ शकतं. अशा परिस्थितीत, परिस्थितीनुसार खोटं बोलणं अधिक उचित ठरतं.
- गुपित राखण्यासाठी: काही गोष्टी गुप्त ठेवणे आवश्यक असते, जसे की राष्ट्रीय सुरक्षा किंवा एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती. अशा परिस्थितीत खोटं बोलण्याची गरज भासू शकते.
निष्कर्ष:
नेहमी खरं बोलणं हे एक चांगलं धोरण आहे, पण प्रत्येक वेळी ते शक्य नसतं. परिस्थितीनुसार विचार करून काय योग्य आहे ते ठरवणं महत्त्वाचं आहे.