Topic icon

सत्य

1
छान प्रश्न आहे!
"पराजय कोणाचा होतो – खरा की खोट्याचा?" याचं उत्तर थोडं विचारपूर्वक द्यावं लागतं.

खरा माणूस अनेकदा सत्य आणि प्रामाणिकपणावर उभा असतो. त्यामुळे वाट तशी सोपी नसते. त्याला संघर्षांना तोंड द्यावं लागतं, काही वेळा तो हरतोसुद्धा. पण त्या पराजयातही त्याची मूल्यं जपलेली असतात, म्हणून तो खरा अर्थाने हरत नाही.

खोटा माणूस कधीकधी फसवणूक, कपट करून यशस्वी झाल्यासारखा वाटतो. पण वेळ गेल्यावर सत्य समोर येतं. तेव्हा त्याचा पराभव ठरलेलाच असतो.


म्हणून तात्पुरत्या नजरेत खरा माणूस हरल्यासारखा दिसू शकतो, पण दीर्घकाळात पराजय हा नेहमी खोट्याचाच होतो.




उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 53710
3



कोलंबियातील बसेसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असल्याच्या दाव्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये एका बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांचा फोटो दिसत आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अमेरिकेत आज देखील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला जातो. अमेरिका त्यांना आदर्श मानते.


https://bit.ly/306XPAJ
  ⏹️ Fact Check/Verification ⏹️
आम्ही कोलंबियातील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी गूगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला. या शोधा दरम्यान आम्हाला विकिपीडियावर बसचा फोटो आढळून आला मात्र यावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आढळून आला नाही. विकिपीडियाच्या माहितीनुसार हा फोटो लंडनमधील टूर बसचा आहे.
godfullyknown नावाच्या ब्लाॅगमध्ये देखील हा फोटो शेअर करण्यात आला आहे मात्र यात देखील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही.
      ⏺️  Conclusion  ⏺️
यावरुन हेच सिद्ध होते की कोलंबियातील बसवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी माई आंबेडकर यांचा फोटो नाही, दोघांचा जुना फोटो माॅर्फ करुन सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलेला आहे.
*Sources*
विकिपीडिया- https://es.wikipedia.org/wiki/Archivo:Tour_bus_in_bath_

*सौजन्यः* checkthis@newschecker.in
19
*विचार करायला लावणारा लेख*👇

*१९९८ मध्ये Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते ती कंपनी जगातील सर्वात जास्त८५% फोटो पेपर बनवून विकत होते काही वर्षांनंतर Digital photography ने कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकले kodak कंपनीच अक्षरशहा दिवाळे निघाले सर्व कामगार रस्त्यावर आले.*

*HMT ( घडी )*
*BAJAJ (स्कुटर)*
*DYNORA (टीव्ही)*
*MURPHY (रेडिओ)*
*NOKIA (मोबाईल)*
*RAJDOOT (बाईक)*
*AMBASDOR (कार)*

*या सर्व कंपन्यांच्या गूणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरीसुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.*
*कारण?*
*ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या नाहीत.*

*तूम्हाला अंदाज नसेल कि येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील!!*

*चौथ्या औद्योगिक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे....*

*Uber हे फक्त एक software आहे! त्याची स्वता:ची एक पण car नाही ! तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे!*

*Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company आहे तरीही तीची स्वता:चे असे एकपण होटेल नाही!*

*Paytm, Ola cabs, oyo rooms यांसारखी खुप उदाहरणे आहेत!*

*US मधल्या यंग वकीलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत, कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकत!* *येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९०% वकील बेरोजगार होतील जे  १०% वाचतील ते फक्त super Specialist राहतील!!*

*Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चा Diagnosis ४ पट जास्तीने Accuracy ने काम करतो!२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहे*

*२०१८ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील!२०२० पर्यंत एक असामान्य आविष्कार जगाला बदलून टाकण्यास सुरूवात केलेली असेल!*

*येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९०% Cars गायब झालेल्या असतील...ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid....  होऊन जातील Petrol ची खपत ९०% कमी होऊन जाईल!*
*सर्व अरबी देश कंगाल झालेले असतील!*

*आपण Uber सारखे एका Software ने कार मागऊ आणि Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहिल...*

*Cars Driverless असल्या कारणाने ९०% Accidents होण  बंद होतील...Cars Insurance नावाचा धंदा बंद पडेल !!*

*ड्रायव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९०% Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटेल.*

*मागच्या ५ ते १० वर्षा मध्ये  अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता..*
*तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली!आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय!*

*तुम्ही कधी लक्ष केंद्रित केले का?*

*आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारे तिसरे दूकान हे मोबाईल फोनचेच आहेत!*
*Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची !*

*आता तर Paytm ने व्यवहार  होतात. रेल्वे तिकीट  फोनवर बुक होतं पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत होते...* *Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झाले!*

*जग फार वेगात बदलत आहे! डोळे,कान,नाक उघडे ठेवा नाहीतर मागे राहाल!*

*वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.*

*यासाठी प्रत्येक माणसाने वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला पाहिजे!*

*"Time to Time Update & Upgrade"*

*वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना!*
*आता येणाऱ्या काळासाठी  अपडेट असणे व त्याबरोबरच  जनरेशन गॅप लक्षात घेऊन  जुने विचार मोडीत काढून Upgrade असणे गरजेचे आहे.*
🤷🏻‍♂🙏🙏🏻🙏🏻🙏🏻
उत्तर लिहिले · 26/12/2018
कर्म · 1265
14
खरं सांगायचं तर नेहमी खरचं बोलायला हवं असं काही नाही विशेषतः आपला मार्ग सत्याचा आणि नीतीचा असेल. तुम्ही म्हणाल खरं न बोलता सत्याचा मार्ग हे कसं शक्य आहे? मी दोन उदाहरण देतो.
कुरुक्षेत्र... नीती आणि अनीती याचं युद्ध चालू आहे. दोन्ही बाजूला वीर लढताहेत, एक बाजू राज्यासाठी लढते आहे जिथे १०० कौरव, पितामह भीष्म, महारथी कर्ण, गुरू द्रोणाचार्य आणि कृष्ण सेना आहे तर दुसरी बाजू न्याय नीती साठी लढते आहे ज्यात पांडव आणि साक्षात भगवंत आहेत.
शस्त्र संख्येच्या बळावर अर्थातच कौरवांच पारड जड आहे.पाचव्या दिवशी गुरू द्रोणाचार्य अगदी अर्जुनालाही आवरत नाहीत, पांडवांची फार हानी होत असतेआणि आणि अशावेळी एक आवई उठते अश्वत्थामा मेला. गुरू द्रोणाचार्य हे ऐकून  पुत्रवियोगाच्या कल्पनेने विचलित होतात. कोणाला विचारावं काय खरं आहे? त्यांना सत्यवचनी धर्मराज समोर दिसतो, त्याला ते विचारतं, खर्च सांग अश्वत्थामा मेला का? धर्मराज म्हणतो हो अश्वत्थामा हतो नरो वा कुंजरो वा ( हो अश्वत्थामा मेला, पण नर की हत्ती ते माहीत नाही) . साक्षात धर्मराजा कदम अस ऐकल्याने द्रोणाचार्य दुःखाने वेडे पिसे होतात आणि दृष्टद्युम्न संधी साधून त्यांचा वध करतो.

परत असाच एक लढा नीती विरुद्ध अनितीचा प्रतापगडच्या साक्षीने घडलेला. अफजलखान मोठा फौजफाटा घेउन विजापूरहून  निघाला. वाटेत येताना  तो देवळे पाडत व मुर्तीभंजन करत येत होता.अफजलखानाने तुळजापूर च्या भवानी मंदीराचा उध्वंस केला व आपली नजर पंढरपूर च्या विठ्ठ्ल मंदीरावर वळवली. खानाचा असा अंदाज होता की मंदीरे अश्या प्रकारे उधव्स्त केली तर मराठे चिडून उघड्यावर येउन युद्ध करतील परंतु महाराजांनी अजूनच बचावाचा पावित्रा घेतला.  खान येत आहे सुद्धा बातमी ऐकल्यावर आपला मुक्काम राजगडावरून घनदाट जंगलातील आणखी दुर्गम असलेल्या प्रतापगड येथे हलवला.
अफजलखानाच्य सैन्यात अनेक स्रदारांचा समावेश होता. त्यातील काही प्रमुख सय्यद बंडा, फाजलखान, अंबरखान, याकुतखान, सिद्दी हिलाल, मुसाखान  पिलाजी मोहिते, प्रतापराव मोरे असे दिगग्ज होते. त्याच्या फौजेत १२,००० च्या घोडदळाचा समावेश होता तसेच १०,००० पायदळ तसेच १,५०० बंदूकधारी सैनिक, ८५ हत्ती व १,२०० ऊंटांचा समावेश होता. तसेच ८० ते ९० तोफा होत्या.

महाराजांनी आपले दूत पाठवून खानाला आपण घाबरलो असे खोटे भासवले व आपल्याला खानाशी युद्ध करायचे नाही व समझोत्यास तयार आहोत हे कळवले. खानाने प्रथम वाईस बोलवणे धाडले, पण महाराजांनी नकार दिला. दोन्ही बाजूंकडून घातपाताची शक्यता होती. परंतु शिवाजींनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले व खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. भेटी दरम्यान दोन्ही पक्ष कोणतेही हत्यार वापरणार नाही असे ठरले.
यापुढचा इतिहास कुणाला नव्याने सांगायची गरज नाही.

तुमचा हेतू सत्याचा असण महत्वाचं!
उत्तर लिहिले · 8/5/2018
कर्म · 99520
6
हो,असे म्हणतात 'सत्य परेशान हो सकता है मगर पराजित नही'पण सद्यस्थितीत
जर मास्टर प्लॅन असला आणि समोरचा मूर्ख असला तर सत्य नेहमी पराभूत होते.जंगलचे नियम आजच्या कलीयुगात लागू पडतात.जिंकतो तो जो की शक्तिशाली असतो.
उत्तर लिहिले · 15/7/2017
कर्म · 17040