पर्यटन
भूगोल
सामान्य ज्ञान
जिल्हा
जिल्हा माहिती
महाराष्ट्राचा इतिहास
सांगली जिल्ह्याची पूर्ण माहिती मिळेल का?
3 उत्तरे
3
answers
सांगली जिल्ह्याची पूर्ण माहिती मिळेल का?
8
Answer link
☙ सांगली जिल्हा ☙
_____________________________
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व काहीसा आग्नेयेस वसला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, कृष्णाकाठचा सुपीक व सखल मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील पठारी प्रदेश अशी या जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा, अग्रणी, माण व बोर या प्रमुख नद्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या आग्नेय भागात दंडोबाचा डोंगर, वाळवे तालुक्याच्या दक्षिण भागात मल्लिकार्जुन डोंगर, तासगाव तालुक्यात कालभैरव डोंगर, खानापूर तालुक्यात होनाई डोंगर, तर आटपाडी तालुक्यात शुक्राचार्याचा डोंगर असे डोंगर जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात देवराष्ट्रे येथे सागरेश्वर व शिराळा येथे चांदोली अशी दोन अभयारण्ये आहेत.जिल्ह्यात हवामान बहुतांशी कोरडे असून उन्हाळा सौम्य असतो. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण अधिक असून पूर्वेकडे ते कमी कमीहोत जाते. जत, आटपाडी व कवठेमहांकाळ हे तालुके रब्बी ज्वारीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. कृष्णाकाठच्या सखल व सुपीक प्रदेशात गहू पिकवला जातो. व शिराळा तालुक्यात भाताचे पीक अधिक आहे.हळदीच्या उत्पन्नासाठी सांगली जिल्हापूर्वापार प्रसिद्ध आहे. ऊस व द्राक्षेही जिल्ह्यातील बागायती पिके आहेत.
☙तालुके - शिराळा-वाळवा-तासगांव-खानापूर (विटा)-आटपाडी-कवठे महांकाळ-मिरज-पलूस-जत-कडेगांव
क्षेत्रफळ८,५७८ चौरस किमी (३,३१२ चौ. मैल)
लोकसंख्या२८२०५७५(२०११)
लोकसंख्या घनता३२८ प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या२४%साक्षरता दर८२.६२%लिंग गुणोत्तर१.०३♂/♀लोकसभा मतदारसंघ सांगली (लोकसभा मतदारसंघ),हातकणंगले(लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ इस्लामपूर•खानापूर•जत•तासगाव-कवठे महाकाळ•पलूस-कडेगाव•मिरज•शिराळा•
सांगली खासदार संजयकाका पाटील,राजू शेट्टी
_____________________________
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व काहीसा आग्नेयेस वसला आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, कृष्णाकाठचा सुपीक व सखल मैदानी प्रदेश आणि पूर्वेकडील पठारी प्रदेश अशी या जिल्ह्याची स्वाभाविक रचना आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा, अग्रणी, माण व बोर या प्रमुख नद्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या आग्नेय भागात दंडोबाचा डोंगर, वाळवे तालुक्याच्या दक्षिण भागात मल्लिकार्जुन डोंगर, तासगाव तालुक्यात कालभैरव डोंगर, खानापूर तालुक्यात होनाई डोंगर, तर आटपाडी तालुक्यात शुक्राचार्याचा डोंगर असे डोंगर जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यात देवराष्ट्रे येथे सागरेश्वर व शिराळा येथे चांदोली अशी दोन अभयारण्ये आहेत.जिल्ह्यात हवामान बहुतांशी कोरडे असून उन्हाळा सौम्य असतो. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचे प्रमाण अधिक असून पूर्वेकडे ते कमी कमीहोत जाते. जत, आटपाडी व कवठेमहांकाळ हे तालुके रब्बी ज्वारीसाठी विशेष प्रसिद्ध आहेत. कृष्णाकाठच्या सखल व सुपीक प्रदेशात गहू पिकवला जातो. व शिराळा तालुक्यात भाताचे पीक अधिक आहे.हळदीच्या उत्पन्नासाठी सांगली जिल्हापूर्वापार प्रसिद्ध आहे. ऊस व द्राक्षेही जिल्ह्यातील बागायती पिके आहेत.
☙तालुके - शिराळा-वाळवा-तासगांव-खानापूर (विटा)-आटपाडी-कवठे महांकाळ-मिरज-पलूस-जत-कडेगांव
क्षेत्रफळ८,५७८ चौरस किमी (३,३१२ चौ. मैल)
लोकसंख्या२८२०५७५(२०११)
लोकसंख्या घनता३२८ प्रति चौरस किमी (८५० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या२४%साक्षरता दर८२.६२%लिंग गुणोत्तर१.०३♂/♀लोकसभा मतदारसंघ सांगली (लोकसभा मतदारसंघ),हातकणंगले(लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ इस्लामपूर•खानापूर•जत•तासगाव-कवठे महाकाळ•पलूस-कडेगाव•मिरज•शिराळा•
सांगली खासदार संजयकाका पाटील,राजू शेट्टी
1
Answer link
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव (कर्नाटक), नैर्ऋत्येला कोल्हापूर व पश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.
सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.
मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्यांत काळी-कसदार जमीन आढळते.
सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
जिल्ह्यातील प्रमुख पिके- बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस..
लोकसभा मतदारसंघ : सांगली - मिरज,सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)
विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- [[मिरज], सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.
गणेशदुर्ग किल्ला : कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.
गणेश मंदिर : १८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.
कृष्णा व वारणा नद्यांचा संगम : सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.
कृष्णा-येरळा संगमावरील ब्रम्हनाळ आणि बहे येथील रामलिंग इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
मिरज : मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.
ख्वाजा मीरासाहेब दर्गा : हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.
सागरेश्वर अभयारण्य : सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.
चांदोली (ता. बत्तीस शिराळा) : हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात
.
औदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्यसाधना केली.
पेंटलोद येथील प्रचितगड, बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.
सांगली जिल्ह्यातील तालुके :- शिराळा, वाळवा, तासगांव, खानापूर (विटा), आटपाडी, कवठे महांकाळ, मिरज, पलूस, जत व कडेगांव
जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठे महांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर दुसरीकडे जत तालुक्यात मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या सांगलीचा निम्मा लोकव्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी व उतर-दक्षिण लांबी ९६ किमी आहे.
सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ अंश सेंटिग्रेड व कमाल ४२ अंश सेंटिग्रेड यांदरम्यान असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मिलिमीटर आहे. जिल्ह्याची २००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे.
सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ रोजी सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुंदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्ह्याचे नाव सांगली जिल्हा असे केले. या जिल्ह्यात १९६५ साली कवठे महांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण केले गेले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने (युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली.
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व ऱ्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता. गोरक्षनाथ महाराजांनी ( नवनाथांतले दुसरे नाथ) शिराळ्यामध्ये ३२ शिराळा येथे सुरू केलेला नागपंचमीचा उत्सव जगप्रसिद्ध आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगलोर या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.
मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्यांत काळी-कसदार जमीन आढळते.
सांगली जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. उसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यांतल्यात्यांत तासगाव व मिरज तालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
जिल्ह्यातील प्रमुख पिके- बाजरी, भात (तांदूळ). ज्वारी, गहू, मका, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबीन, द्राक्षे, डाळिंब, कापूस..
लोकसभा मतदारसंघ : सांगली - मिरज,सांगली, पलूस-कडेगांव, खानापूर, तासगाव-कवठे-महांकाळ व जत हे विधानसभा मतदारसंघ मिळून सांगली लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. (जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आले आहेत.)
विधानसभा मतदारसंघ : जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत- [[मिरज], सांगली, इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, खानापूर, तासगांव-कवठे महांकाळ व जत.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ६१ मतदारसंघ आहेत, तर पंचायत समितीचे १२२ मतदारसंघ आहेत.
गणेशदुर्ग किल्ला : कृष्णेकाठी वसलेले सांगली शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, गावात मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला आहे.
गणेश मंदिर : १८४४ मध्ये श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन यांनी बांधलेले येथील गणेश मंदिर प्रसिद्ध असून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांनी या मंदिरात बैठका घेतल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात.
कृष्णा व वारणा नद्यांचा संगम : सांगलीपासून जवळच हरिपूर येथे कृष्णा व वारणा या नद्यांचा संगम झाला असून येथील संगमेश्र्वराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे स्फूर्तिस्थळ नावाचे स्मारक आहे.
कृष्णा-येरळा संगमावरील ब्रम्हनाळ आणि बहे येथील रामलिंग इत्यादी ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
मिरज : मिरज हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून येथील भुईकोट किल्ला, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहेत.
ख्वाजा मीरासाहेब दर्गा : हा ५०० वर्षे जुना असून, सर्व धर्मांतील व पंथातील लोक येथे दर्शनास येतात.
सागरेश्वर अभयारण्य : सांगलीजवळील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. खानापूर, पलूस, वाळवा या तालुक्यांत हे अभयारण्य पसरले असून हे हरणांसाठी राखीव आहे.
चांदोली (ता. बत्तीस शिराळा) : हे धरण वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांदोली हे अभयारण्य येते. या जंगलात गवा ,अस्वल, बिबट्या हे प्राणी आढळतात
.
औदुंबर : सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे कृष्णाकाठी दत्त मंदिर आहे. औदुंबर येथे राहूनच प्रसिद्ध कवी सुधांशू यांनी काव्यसाधना केली.
पेंटलोद येथील प्रचितगड, बाणूरचा भूपाळगड, तासगावचे गणपती मंदिर, कवठे-एकंद येथील सिद्धारामाचे मंदिर व त्या ठिकाणी दसर्याच्या वेळी रात्रभर होणारी फटाक्यांची आतषबाजी विशेष प्रसिद्ध आहे.
0
Answer link
सांगली जिल्ह्याची माहिती
सांगली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागात आहे. हा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागात येतो.
भौगोलिक माहिती
- क्षेत्रफळ: 8,572 चौरस किलोमीटर
- लोकसंख्या: 2011 च्या जनगणनेनुसार 28,22,143
- समुद्रसपाटीपासून उंची: सरासरी 550 मीटर
- हवामान: उष्ण आणि कोरडे
प्रशासकीय विभाग
- तालुके: 10 (मिरज, जत, खानापूर, आटपाडी, तासगाव, शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ)
- विधानसभा मतदारसंघ: 8
- लोकसभा मतदारसंघ: 2 (सांगली, हातकणंगले)
नद्या
- कृष्णा नदी
- वारणा नदी
- येरळा नदी
अर्थव्यवस्था
- शेती: द्राक्षे, ऊस, डाळिंब, हळद आणि इतर भाजीपाला.
- उद्योग: मुख्यतः कृषी आधारित उद्योग आहेत.
- सांगलीची हळद देशभरात प्रसिद्ध आहे.
शिक्षण
- शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालये आहेत.
- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आहेत.
पर्यटन
- सांगलीचा किल्ला: ऐतिहासिक किल्ला कृष्णा नदीच्या काठी आहे.
- गणपती मंदिर: प्रसिद्ध गणेश मंदिर आहे.
- चांदोली राष्ट्रीय उद्यान: हे उद्यान सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे.