
ईश्वर
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
Answer link
देव आहे की नाही...? देव कुठे असतो आणि कसा असतो या पेक्षा देवाचे खरे महात्म्य समजून घ्या ...जे आपले दुःख इच्छा विसरून आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जी धडपड करतात ते आई वडील देव असतात ...दिवस रात्र स्वताचे घाम गाळून पोटाला मार देऊन आपले पोट भरण्यास ज्याचा हातभार असतो त्या अन्नदाता बळीराजांत देव असतो ...जो व्यक्ती स्त्री जातीचा मान सन्मान राखतो त्यात देव असतो ...ज्या दगडात देव म्हणून संबोधले जाते आणि त्याचे मंदिर बांधून त्यात पावित्र्य राखले जाते की तिथे जाऊन मनाला एक शीतलता शांति समाधान मिळते ते वास्तव्य देव असते ...जी झाडं ,फळं ,फुलं ,पानं , पशु प्राणी अशी नैसर्गिक जीवंत उदाहरणं आहेत ज्यांमुळे ही सृष्टि निर्माण झाली आणि आजतगायत आहे त्यात देव वसले आहे ...तुमच्या मनातील चांगुलपणात देव आहे जो तुम्हाला सन्मान मिळवून देतो...निसर्गात देव आहे जो आपल्याला जीवन प्रदान करतो ...देवाचे विभिन्न प्रकार आहेत ...तुम्ही नास्तिक आहात असं नाही म्हणनार मी पण तुम्ही देवांवर विश्वास ठेवत नाही कारण देवाच्या नावाने अनेक गोष्टी चुकीच्या केल्या जातात किंवा कोणाचा बळी घेतला जातो ...कोणावर विनाकारण जबरीने प्रथा लादल्या जातात ...पण म्हणून देव वाईट नाही तर ती परिस्थिति वाईट आहे आणि त्या परिस्थितिला असलेले व्यक्ती कारणीभूत असतात ...मानवधर्म हाच खरा धर्म होय ...माणुसकी हीच खरी जात होय ...आणि प्रेम माया दया संयम हुशारी व्यक्तिमत्त्व हाच खरा ईश्वर होय ...देव आहे तो आपल्या सुंदर नजरेत आहे ....
काही चुकले असल्यास क्षमस्व..!
1
Answer link
🌺श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ🌺
माहीत नाही, कदाचित भेटला असेल पण मी ओळखला नसेल.
आयुष्यात अनेक प्रसंग आले जेव्हा अनेक माणसे अगदी देवासारखी धावून आली मदतीला, ती देवाने पाठवलेली माणसेच होती यात शंका नाही. मात्र माझ्या मताप्रमाणे जेव्हा सर्व गोष्टींबद्दल असलेले आकर्षण सोडून केवळ नाम घेईन व पूर्णपणे देवाला शरण जाईन आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा देव स्वतःच मला दर्शन देतील. मात्र आई व वडीलच देव आहेत, त्यांची सेवा केली की देवाचीच सेवा केल्यासारखी आहे.
3
Answer link
मला माझी मतं सांगायची नाहीत आणि लादायची नाहीत.
आंब्याच्या झाडाला कधी पेरू येत नाही. आंबाच येतो. ही व्यवस्था आपोआप तयार झाली का?
पाच माणसांना एकाच गोळी दिली, तर त्यांच्यावर परिणाम वेगळा होतो. विज्ञान हे सांगू शकत नाही.
ह्या जगाची निर्मिती एका बिग बँग थियरी ने झाल्याचं विज्ञान स्पष्ट करते. तिथे मुळात सगळ्या सूर्यमाला आल्या कुठून? हे कुणीच सांगत नाही.
एक शेर ऐकला होता, न जमीन थी, न आसमान था, अल्ला हुक्का पी रहा था. राख गिरी, बनी धरती; धुवा उठा, बना आसमान.
पण कुणी सांगत नाही, अल्लाला हुक्का पिण्यासाठी कोळसा कुठून मिळाला? किंवा धूर आला कशापासून? ह्या धार्मिक माणसांच्या कल्पना आहेत. फक्त कल्पना.
पण विज्ञान आणि वैज्ञानिक लोक काय करतात? काही पाहिलं तर प्रतिसाद द्यायला दोन सेकंद तरी लागतात. पण क्रिकेट मध्ये फलंदाज एका सेकंदाच्या आत मोठा फटका कसा मारतो? हे कुणी सांगू शकलं नाही.
नरेंद्र दाभोळकर आणि तसा विचार करणारे फक्त विचार करतात, विचार बोलतात. पण साहित्याची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला नामदेव ढसाळ कविता कशी करू शकला? कुणीच सांगत नाही.
ईश्वर आहे. आणि ते सहज सिद्ध करता येतं.
ज्यांच्या बुद्धीवर गंज चढला असेल त्यांना काही सिद्ध करून दाखवून मी काय करू?
0
Answer link
ईश्वर निराकार आहे की साकार, हा एक कठीण प्रश्न आहे आणि यावर अनेक मतभेद आहेत.
- निराकार ईश्वर: काही लोकांचे असे मत आहे की ईश्वर निराकार आहे, म्हणजे त्याला कोणताही आकार किंवा रूप नाही. तो केवळ एक ऊर्जा किंवा चेतना आहे.
- साकार ईश्वर: काही लोकांचे असे मत आहे की ईश्वर साकार आहे, म्हणजे त्याला रूप आणि आकार आहे. ते वेगवेगळ्या देव-देवतांची पूजा करतात.
- दोन्ही: काही लोकांचे असे मत आहे की ईश्वर निराकार आणि साकार दोन्ही आहे. म्हणजे तो निराकार रूपात अस्तित्वात आहे, पण भक्तांसाठी तो साकार रूप धारण करू शकतो.
भगवतगीतेमध्ये (Bhagavad Gita) भगवान कृष्णाने म्हटले आहे की तो निराकार आणि साकार दोन्ही आहे.
शेवटी, ईश्वर निराकार आहे की साकार, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि अनुभवाचा विषय आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर भेट देऊ शकता:
1
Answer link
दादा, तू म्हणतोय की देव कुठे आहे? आज संपूर्ण जगामध्ये कोरोना नावाचा एक लहान व्हायरस धुमाकूळ घातलेला आहे. त्या व्हायरसला आजपर्यंत कुणीही बघितलेलं नाही, पण तरीसुद्धा आम्ही तो आहे असं त्याचं अस्तित्व आहे हे मान्य केले. तसेच देव सुद्धा या जगामध्ये आहे. तो आहे म्हणून हे सर्व काही आत्तापर्यंत ठीक चालले आहे. कोरोना नावाचा वायरस आहे, त्याच्यावरती जसा मी विश्वास ठेवला, तसा देव आहे यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे.
4
Answer link
माऊली रामकृष्णहरि आपण समाजात जगत असताना अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दिसत नसतात परंतु त्या नक्कीच असतात उदा वारा वाहतो पण तो दिसत नाही म्हणजे तो नसतो का वायरमध्ये लाईट असते पण ती दिसत नाही तसंच देव जरी दिसत नसला तरी तो आहे आणि या पुढेही असेलच कारण तो पाहण्याचा नाही तर अनुभव घेण्याचा विषय आहे
जुने वाडे गड किल्ले मंदिर यावर दगडात झाडे वाढतात काय कारण कोण पाणी घालतो . खडकात बेडकी असते ती अन्न पाण्याविणा हवे विना जिवंत राहते काय कारण तेव्हा देव आहे हेच सत्य आहे कुणी मान्य करा वा नका करू
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तो बघा
कां रे नाठविसी कृपाळु देवासी ।
पोसितो जनासी एकला तो ॥1॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती ।
वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥2॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं ।
जीवन तयांसी कोण घाली ॥3॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता ।
राहे त्या अनंता आठवूनि ॥4॥
तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर ।
त्याचें निरंतर ध्यान करीं ॥5॥
अरे, तू कृपाळू अशा भगवंताचे चिंतन का करत नाहीस ? तो एकटाच सा-या जगाचे पोषण करीत आहे.
जन्मलेल्या बाळासाठी दुधाची निर्मिती कोण करतो ?
भगवान एकाच वेळी बाळाची व स्तनात दुधाची उत्पत्ती व वाढ करीत असतात.
तीव्र उन्हात झाडांना पालवी फुटते तेंव्हा त्यांना पाणी कोण घालते ?
जो सर्वांना जगवतो त्याने काय तुझी चिंता केलेली नाही का?
मग आताही तो करीलच.
रामकृष्णहरि
जुने वाडे गड किल्ले मंदिर यावर दगडात झाडे वाढतात काय कारण कोण पाणी घालतो . खडकात बेडकी असते ती अन्न पाण्याविणा हवे विना जिवंत राहते काय कारण तेव्हा देव आहे हेच सत्य आहे कुणी मान्य करा वा नका करू
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तो बघा
कां रे नाठविसी कृपाळु देवासी ।
पोसितो जनासी एकला तो ॥1॥
बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती ।
वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥2॥
फुटती तरुवर उष्णकाळमासीं ।
जीवन तयांसी कोण घाली ॥3॥
तेणें तुझी काय नाहीं केली चिंता ।
राहे त्या अनंता आठवूनि ॥4॥
तुका म्हणे ज्याचें नाम विश्वंभर ।
त्याचें निरंतर ध्यान करीं ॥5॥
अरे, तू कृपाळू अशा भगवंताचे चिंतन का करत नाहीस ? तो एकटाच सा-या जगाचे पोषण करीत आहे.
जन्मलेल्या बाळासाठी दुधाची निर्मिती कोण करतो ?
भगवान एकाच वेळी बाळाची व स्तनात दुधाची उत्पत्ती व वाढ करीत असतात.
तीव्र उन्हात झाडांना पालवी फुटते तेंव्हा त्यांना पाणी कोण घालते ?
जो सर्वांना जगवतो त्याने काय तुझी चिंता केलेली नाही का?
मग आताही तो करीलच.
रामकृष्णहरि