शिक्षण शैक्षणिक धोरणे

नवीन शिक्षण पद्धती?

2 उत्तरे
2 answers

नवीन शिक्षण पद्धती?

0
नवीन शिक्षण पध्दती

देशातल्या शिक्षण पद्धतीत मोठा बदल, करण्यात आला आहे. नव्या शिक्षण पद्धतीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केल्या शिफारशीनंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे. मुळात देशातील शिक्षण पद्धतीत गेल्या 35 वर्षांत बदल करण्यात आलेले नव्हते. परंतु, भविष्याचा विचार करता, देशातील मुलांना सहावीपासून कोडिंग शिकवण्यासारखे काही महत्त्वाचे निर्णय केंद्राने घेतले आहेत.आणखी वाचा - दहावी, परीक्षा रद्द होणार; शिक्षण पद्धतीत बदलदहावी-बारावी परीक्षा रद्द देशात यापूर्वी दहावी-बारावी आणि त्यानंतर पदवी शिक्षण अशी, 10+12+3किंवा4 अशा शिक्षण पद्धती होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षणासाठी आता खास 5+3+3+4 अशी शिक्षणपद्धती लागू होणार आहे.बालकांना पद्धतीचं शिक्षण देशातील तीन ते सहा वर्षांपर्यंतच्या मुलांना आता एकाच पद्धतीचं शिक्षण दिलं जाणार आहे. त्यामुळं सहा वर्षांपर्यंतची सर्व मुलं एकाच पद्धतीनं शिक्षण घेणार आहेत. या वयोगतील मुलांना संख्या शास्त्राची ओळख करून दिली जाईल.मुलांसाठी नॅशनल मिशन देशात सहा ते नऊ वर्षांपर्यंतची मुलं ही पहिली ते तिसरी वर्गात असतात. त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी नॅशनल मिशन सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्याबरोबरच, त्यांना संख्या शास्त्राचं मूळ शिक्षण दिलं जाणार आहे.देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक कराविषयांची ओळख सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना शाळेत विषयांची ओळख करून दिली जाणार आहे. मुलांना फिजिक्स बरोबरच फॅशन डिझायनिंगचंही शिक्षण दिलं जाईल. सहावीपासूनच भारतातील मुलांना कोडिंग शिकवलं जाणार आहे.मातृभाषेला प्राधान्य शालेय शिक्षणात मातृभाषेला प्राधान्य देण्यात येणार आहे. आठवीपर्यंत शालेय शिक्षण प्रामुख्याने मातृभाषेतून दिले जाईल. त्यामुळं पालकांचा मुलांच्या इंग्रजी शिक्षणाचा अट्टाहास थांबणार आहे.ग्रॅज्युएश, पोस्ट ग्रॅज्युएशनचं काय? ज्या विद्यार्थ्यांना रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे. त्यांना चार वर्षांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात भाग घ्यावा लागणार आहे. तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. पण, ज्यांना रिसर्चमध्ये करिअर करायचं आहे. त्यांना पदवीचं चौथं अर्थात एमएचं वर्ष पूर्ण करावं लागेल. त्यानंतर त्यांना पीएचडीसाठी प्रवेश घेता येईल. सगळ्या विद्यापीठांना एकच नियम शिक्षण धोरणातील बदलांमध्ये विद्यापीठांची स्वतंत्र नियमावली इतिहासजमा झालीय. देशातील सर्व विद्यापीठांना एकच नियम लागू होणार आहे. त्यामुळं देशात सगळीकडेच एकाच प्रकारची शिक्षण पद्धती असणार आहे.

उत्तर लिहिले · 28/7/2023
कर्म · 53710
0

नवीन शिक्षण पद्धती ( New Education Policy- NEP) ही भारत सरकारने शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी सुरू केलेली एक योजना आहे. या धोरणाचे उद्दिष्ट शिक्षण प्रणालीला अधिक लवचिक, सर्वसमावेशक आणि 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करणारी बनवणे आहे.

नवीन शिक्षण पद्धतीची काही प्रमुख वैशिष्ट्ये:

  • लवचिक अभ्यासक्रम: विद्यार्थ्याना आवड आणि क्षमता नुसार विषय निवडण्याची संधी.
  • संकल्पनात्मक शिक्षण: पाठांतरावर भर न देता, विषय समजून शिकण्यावर भर.
  • तंत्रज्ञानाचा वापर: शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे, जसे की ऑनलाइन शिक्षण आणि डिजिटल साहित्य.
  • शिक्षकांचे प्रशिक्षण: शिक्षकांना नवीन पद्धती आणि तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रशिक्षण देणे.
  • मूल्यांकन पद्धतीत बदल: केवळ परीक्षांवर आधारित मूल्यमापन न करता, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित मूल्यांकन करणे.

नवीन शिक्षण धोरण 2020 नुसार, शिक्षण प्रणालीमध्ये 10+2 संरचनेऐवजी 5+3+3+4 प्रणालीचा अवलंब केला जाईल.

  • पायाभूत टप्पा (Foundation Stage): 3 ते 8 वर्षे (5 वर्षे) - पूर्व-प्राथमिक शिक्षण आणि इयत्ता 1-2
  • तयारीचा टप्पा (Preparatory Stage): 8 ते 11 वर्षे (3 वर्षे) - इयत्ता 3-5
  • मध्य टप्पा (Middle Stage): 11 ते 14 वर्षे (3 वर्षे) - इयत्ता 6-8
  • माध्यमिक टप्पा (Secondary Stage): 14 ते 18 वर्षे (4 वर्षे) - इयत्ता 9-12

हे धोरण शिक्षण प्रणालीला अधिक व्यावहारिक आणि रोजगारक्षम बनवण्याचा प्रयत्न करते.

अधिक माहितीसाठी, आपण शिक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://www.education.gov.in/en

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

शिक्षणात समानता, निष्पक्षपातीपणा व गुणात्मकता?
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार प्रत्येक शिक्षकाला सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासाचे उद्दिष्ट काय ठेवण्यात आले आहे? राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार एकात्मिक बीएड किती वर्षांचे असेल?
Q4 राष्ट्रीय शिक्षण धोरण 2०२० मध्ये नमूद केल्यानुसार देशात आजही - - मुले शाळेत येऊनही भाषिक व गणितीय साक्षरता प्राप्त करू शकलेली नाही. tive 1. पाच लाख 2. पाच कोटी 3. पन्नास कोटी 4. पन्नास लाख?
शिक्षणाच्या विकासासाठी काय आवश्यक आहे?
1964 66 च्या धोरणातील कोणती शिफारस राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये स्वीकारलेले दिसून येते?
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार 100% पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे कधी सादर करणे अपेक्षित आहे? एस. टी. आर. सर्वेक्षण कोणत्या संस्थेमार्फत केले जाते?
शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण यातील सहसंबंध स्पष्ट करा?