शब्दाचा अर्थ

आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?

1 उत्तर
1 answers

आधूनिक भारतात सर्व प्रथमता नागरिकत कशा प्रकारे घोषित झाली?

1
आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
नागरिकत्वाची रंजक गोष्ट:जर देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती असतील तर दुसरे, तिसरे आणि चौथे कोण? तुमचा नंबर कितवा?
मयुरी वाशिंबे3 महिन्यांपूर्वी

मी भारताचा नागरिक आहे...असे आपण अगदी सहज म्हणतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की भारताचा दुसरा, तिसरा, चौथा... नागरिक कोण आहे? आणि तुमचा नंबर कितवा आहे. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. हे लहानपणापासून पुस्तकांतून शिकवले जाते.


जर राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतील तर यानुसार तुमचा कितवा नंबर लागतो? देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. चला तर तुमचा कितवा नंबर लागतो ते जाणून घेऊया...

संविधानानुसार विचार केला तर प्रत्येक सामान्य नागरिक हा भारतातील 27व्या क्रमांकावरील नागरिक असतो. कारण, तरतुदीनुसार पहिल्या 26 क्रमांकांवर भारतातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपती देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करतात. सध्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. त्या भारताच्या पहिल्या नागरिक आहेत. तर उपराष्ट्रपतींना देशाचा द्वितीय नागरिक म्हटले जाते. सध्या भारताचे उपाध्यक्ष जगदीप धनखड आहेत. अशा प्रकारे ते देशाचे दुसरे नागरिक आहेत.

भारतात देशाच्या पंतप्रधानांना देशाचा तृतीय नागरिक म्हटले जाते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनंतर देशाचे पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती तिसरा नागरिक असते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत. त्यामुळे ते भारताचे तिसरे नागरिक बनले आहेत.


नागरिकत्वाची रंजक गोष्ट:जर देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती असतील तर दुसरे, तिसरे आणि चौथे कोण? तुमचा नंबर कितवा?
मयुरी वाशिंबे3 महिन्यांपूर्वी

मी भारताचा नागरिक आहे...असे आपण अगदी सहज म्हणतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की भारताचा दुसरा, तिसरा, चौथा... नागरिक कोण आहे? आणि तुमचा नंबर कितवा आहे. राष्ट्रपती हा देशाचा प्रथम नागरिक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहेच. हे लहानपणापासून पुस्तकांतून शिकवले जाते.


जर राष्ट्रपती देशाचे प्रथम नागरिक असतील तर यानुसार तुमचा कितवा नंबर लागतो? देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. चला तर तुमचा कितवा नंबर लागतो ते जाणून घेऊया...

संविधानानुसार विचार केला तर प्रत्येक सामान्य नागरिक हा भारतातील 27व्या क्रमांकावरील नागरिक असतो. कारण, तरतुदीनुसार पहिल्या 26 क्रमांकांवर भारतातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती भारतीय नागरिक असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपती देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती करतात. सध्या श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. त्या भारताच्या पहिल्या नागरिक आहेत. तर उपराष्ट्रपतींना देशाचा द्वितीय नागरिक म्हटले जाते. सध्या भारताचे उपाध्यक्ष जगदीप धनखड आहेत. अशा प्रकारे ते देशाचे दुसरे नागरिक आहेत.

द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. तर भारताचे 14 वे उपराष्ट्रपती हे जगदीप धनखड हे आहेत. - 
द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. तर भारताचे 14 वे उपराष्ट्रपती हे जगदीप धनखड हे आहेत.
भारतात देशाच्या पंतप्रधानांना देशाचा तृतीय नागरिक म्हटले जाते. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनंतर देशाचे पंतप्रधानपदी असलेली व्यक्ती तिसरा नागरिक असते. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले पंतप्रधान आहेत. त्यामुळे ते भारताचे तिसरे नागरिक बनले आहेत.

 -
भारतातील विविध राज्यांचे राज्यपाल हे देशाचे चौथे नागरिक असतात. उदाहरणार्थ, भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. अशा प्रकारे ते देशाचे चौथे नागरिक आहेत. त्यांच्याप्रमाणेच इतर राज्यांचे राज्यपालही देशाचे चौथे नागरिक असतात. भारताचे माजी राष्ट्रपती हे भारताचे पाचवे नागरिक आहेत. त्यानुसार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाचे पाचवे नागरिक बनले आहेत. याशिवाय माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पटेल याही देशाच्या पाचव्या नागरिक आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि लोकसभेचे अध्यक्ष हे देशाचे सहावे नागरिक असतात. त्यानुसार देशाचे सहावे नागरिक हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आहेत. नुकतीच देशाच्या 50व्या सरन्यायाधीशपदी मराठमोळ्या धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात आली. तर ओम बिरला हे 17व्या लोकसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांची जून 2019ला निवड बिनविरोध झाली होती.

तर देशाचा सातवे नागरिक हे केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, नीती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेते हे असतात. तर आठवे नागरिक हे भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर) हे असतात. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश हे देशाचे नववे नागरिक असतात. देशातील राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, नीती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडित इतर मंत्री हे दहावे नागरिक असतात. अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल हे देशातील अकरावे नागरिक असतात.

उत्तर लिहिले · 8/3/2023
कर्म · 7440

Related Questions

ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती येईल?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?
समतेचा अधिकार कसा स्पष्ट कराल?
'कृष्णावळ' म्हणजे काय?
वाचन म्हणजे काय व त्याची वैशिष्टे कोणती येतील?