रचना कला भारुड

भारुडाची रचना सांगा?

2 उत्तरे
2 answers

भारुडाची रचना सांगा?

0
एकनाथमहाराजांनी ४५० वर्षांपूर्वी 'एडका' या भारुडाची रचना केली होती. एकनाथांची अशी रूपके सध्याचे एचआयव्ही/एड्ससारखे आजार रोखण्यासाठी तंतोतंत लागू पडतात. म्हणूनच राज्याच्या एड्स नियंत्रण संस्थेद्वारे आज लोककलेच्या माध्यमातून लोकजागृती करण्यासाठी भारुडांचा उपयोग केला जातो.
भारूड हा एक मराठी पद्यवाङ्मयाचा प्रकार आहे. याद्वारे साध्या रूपकांमधून धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे. अनेक संतांनी समाजप्रबोधनपर भारुडे लिहिली आहेत. ज्ञानेश्वर आणि नामदेव या एकनाथपूर्व तसेच तुकाराम, रामदास या एकनाथांनंतर झालेल्या संतांनी भारुडे लिहिली, पण एकनाथ महाराजांसारखी विविधता त्यांत नाही. संत तुकडोजी महाराजांच्या रचनादेखील प्रचलित आहेत.

लोकशिक्षणासाठी संतांनी भारुडांची रचना केली. भारूड हे नुसते गायनाने दाखवायचे नसते तर त्याचे संपादनही करावे लागते. भारुडांत ब्रह्म ज्ञानाला गोष्टीचे रूप देऊन मनोरंजन करावे लागते. तसेच भारूड म्हणणारी व्यक्ती ही अध्यायाबरोबरच नटही असावी लागते. या दोन्ही गोष्टींची सांगड घातली गेल्यामुळेच भारुडांनी जनमनोरंजनाची साधने म्हणून शतकानुशतके लोक शिक्षणाचे व स्वधर्म जागृतीचे कार्य केले आहे. हीच भारुडे लळितात अभिनय करून संभाषणे टाकून म्हटली जातात आणि म्हणूनच लळिताचे बीज भारुडात आहे असे म्हटले जाते. मराठी संतांनी प्रौढ, सुशिक्षित जनांसाठी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा, अमृतानुभव अशा प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती केली. तसेच इतर सर्वजनांनाही परमार्थाचा आनंद घेता यावा व अध्यात्म सुलभ व्हावा म्हणून भारुडांची व्यवस्था केली. हा एक वारकरी कला आविष्कार आहे.

स्त्री भारूड सादरकर्त्या

पूर्वी भारूड फक्त पुरुष सादर करीत असत. परंतु ही परिस्थिती आता बदलली आहे. संत साहित्याच्या अभ्यासक गंगूबाई जाधव, लक्ष्मीबाई गिराम आणि चंदाबाई तिवाडी या स्त्री-भारुडकर्त्या भारुडे सादर करीत असतात. चंदाबाई तिवाडी यांना तर संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. आकाशवाणीवर आणि दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करण्यास त्यांना आमंत्रित केले जाते. महाराष्ट्रात निरंजन भाकरे, चंदाबाई तिवाडी आणि मीराबाई उमप हे भारूड सादरर्कते आहेत. स्वातंंत्र्यपूर्व काळात जुन्नर तालुक्यातील राधाबाई आरोटे व सीताबाई आरोटे (डुंंबरवाडी) यांंनी महाराष्ट्रभर वारकरी भारुडे सादर केली. पुरुषवेष धारण करून या दोघी बहिणींंनी मुंंबईसह महाराष्ट्र गाजविला. मुंबईमध्ये त्यांच्या भारुडासाठी अलोट गर्दी व्हायची.
उत्तर लिहिले · 8/2/2023
कर्म · 53750
0
भारुड हे एक प्रकारचे लोकनाट्य आहे. संत एकनाथांनी ते प्रसिद्ध केले. भारुड हे अध्यात्मिक ज्ञानाचे मनोरंजक पद्धतीने सादरीकरण करते.

भारुडाची रचना:

  • सुरुवात: भारुडाची सुरुवात सहसा एखाद्या देवाची स्तुती किंवा प्रार्थना करून होते.
  • कथा: भारुडात एक कथा असते, जी बहुतेक वेळा रूपक असते. या कथेतून आध्यात्मिक किंवा नैतिक संदेश दिला जातो.
  • पात्र: भारुडात विविध पात्रे असतात, जसे कीsettings साधू, फकीर, किंवा सामान्य माणसे. ही पात्रे विविध भूमिका वठवतात आणि उपदेश देतात.
  • संगीत आणि नृत्य: भारुडात संगीताला आणि नृत्याला खूप महत्त्व आहे. पारंपारिक वाद्ये वापरली जातात आणि विशिष्ट चाली व नृत्ये सादर केली जातात.
  • भाषा: भारुडाची भाषा सोपी आणि लोकांना समजायला सोपी असते. प्रादेशिक भाषेचा वापर केला जातो.
  • उपदेश: भारुडातून लोकांना नैतिक आणि आध्यात्मिक उपदेश दिला जातो, ज्यामुळे त्यांचे जीवन सुधारण्यास मदत होते.

भारुड हे केवळ एक मनोरंजन नाही, तर ते शिक्षण देण्याचे आणि जनजागृती करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5280

Related Questions

संत एकनाथांचे 'विंचू चावला' हे भारुड मिळवून शाळेच्या कार्यक्रमात त्याचे स्पष्टीकरण कसे सादर कराल?
भारुड म्हणजे काय?