संत भारुड साहित्य

संत एकनाथांचे 'विंचू चावला' हे भारुड मिळवून शाळेच्या कार्यक्रमात त्याचे स्पष्टीकरण कसे सादर कराल?

2 उत्तरे
2 answers

संत एकनाथांचे 'विंचू चावला' हे भारुड मिळवून शाळेच्या कार्यक्रमात त्याचे स्पष्टीकरण कसे सादर कराल?

0

विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥ धृ ॥

विंचू, विंचू चावला म्हणजे काय झालं? इथून सुरुवात करूया. हा विंचू नेहमीचा विंचू नसून काम (कोणत्याही वास्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल हाव निर्माण होणे) आणि क्रोध यांनी उत्पन्न झालेला अधर्मी, विनाशकारी आणि अहंकारी भाव आहे. हे तमस् म्हणजे अंधःकार. अज्ञानाचा आणि अहंकाराचा विनाशकारी अंधःकार. एकदा काम आणि क्रोधाचा विंचू चावला की माणसाला तमाचा घाम येतो, जणू माणूस खरोखरीच विंचू चावल्यासारखा बेभान होतो, विचित्र वागू लागतो, चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि शेवटी अधर्माच्या वाटेवर चालू लागतो.


पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥ १ ॥


अशा विंचू चावलेल्या मनुष्याला जेव्हा या दंशाची जाणीव होते तेव्हा लक्षात येतं की, या तामसी दोषांमुळे पंचप्राण (पाच प्रकारचे प्राणवायू, याबद्दल अधिक माहिती इथे देणं क्रमप्राप्त ठरणार नाही. पण या ठिकाणी चांगली माहिती दिलेली आहे.) आणि त्यांचा प्रवाह दोषरहित होतो. त्याचा परिणाम फक्त शरीरावरच नव्हे तर माणसाच्या वृत्तीवर, विचारांवर आणि शेवटी आचारांवर देखील होतो. हे प्राणवायू व्याकुळ होतात, जीव किंवा आत्मा (परमेश्वराचा अंश) गुदमरतो. असं वाटू लागतं आता प्राण जावू लागले आहेत. आयुष्य अनिर्बंध मार्गावर जात आहे, भरकटत आहे. पाप आणि अधर्माने बरबटलेले आहे. आणि आता यातून मुक्तता नाही! सर्वांगाचा दाह, हा दाह दोन प्रकारचा असू शकतो काम आणि क्रोधामुळे किंवा या निरुपयामुळे.


मनुष्य इंगळी अति दारुण ।
मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥ २ ॥

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज सांगतात की, या सगळ्या त्रासाचे मूळ कुठे आहे? तर मनुष्यामध्ये. शेवटी कर्म मनुष्यच करतो. त्यामुळे या रोगाचे मूळ म्हणजे मनुष्य हिटर इंगळी आहे. इंगळी म्हणजे मोठा विंचू. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण, ज्याच्या त्याच्या अवस्थेला ज्याचे त्याचे कर्म जबाबदार असते हे जोपर्यंत मनात ठसवून घेणार नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्याला दोष देण्यात गर्क राहतो. या मनुष्य इंगळीने नांगी मारली म्हणजे आपल्या कर्मावर आणि आपल्या विचारांवर जर मनुष्याचा ताबा राहिला नाही तर त्याची परिणीती दुःखात होणं अगदी स्वाभाविक आहे. हेच महाराज इथे सांगतात.

ह्या विंचवाला उतारा ।
तमो गुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरा ॥ ३ ॥

आत्तापर्यंत आपण विंचू म्हणजे काय, दाह कशाचा असतो आणि मूळ कुठे आहे हे पाहिलं. पण या सगळ्या दुःखाला आणि अवस्थेला उत्तर काय? जोपर्यंत या रोगाचे निवारण होणार नाही तोपर्यंत माणूस असाच तडफडत राहणार. मग या रोगाला औषध काय? या विंचवाच्या विषाला उतारा काय? तर महाराज सांगतात, तमोगुण मागे सारा, थोडक्यात असा कोणताही विचार आणि कृती जी तुम्हाला अज्ञानाकडे ढकलेल त्यांचा त्याग करा. क्रोध, काम, अहं भाव, लालसा, ईर्षा इत्यादी भाव मनात येत असतील तर त्यांना प्रयत्नपूर्वक टाळा. म्हणजेच तमोगुण मागे सारा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सत्वगुण अंगाऱ्यासारखा लावा. सत्वगुण म्हणजे सत् उत्पन्न करणारा गन. सत् म्हणजे सत्याचे मूळ. सत्याच्या मार्गावर चाला. ज्ञान मिळवा. थोडक्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. सतःला पुनःपुन्हा विचारा की ‘जे मी करतोय ते सत्याला आणि धर्माला अनुसरून आहे की नाही. यात माझ्यातले तमोगुण तर डोकावत नाही ना?’ सत्त्वगुण अंगी लावण्याचा आणखीन एक सोपा उपाय म्हणजे स्वतःला हे सतत सांगत राहणे की ‘जी गोष्ट माझी नाही त्याला स्पर्ष करायचा नाही’ मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. जिथे तुमचा अधिकार नाही तिथे तुमचा स्पर्ष नसलाच पाहिजे. एवढं केलं की, इंगळी म्हणजेच हे तमाचे विष झरझर उतरून जाईल.


सत्व उतारा येऊन ।
अवघा सारिला तमोगुण ।
किंचित्‌ राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दने ॥ ४ ॥

हा सत्त्व उतारा एकदा घेतला की तमोगुण मागे जाईल. पण तरीही माणसाची वृत्ती अशी असते की तो तमोगुण अधुनमधुन डोकावतोच. त्यालाच माझ्या मते संत एकनाथ महाराज फुणफुण म्हणतात. पण आता या फुणफुणीला उतारा किंवा औषध काय? तर परमेश्वराची भक्ती. कारण दरवेळेस फक्त माणसाचे कर्म उपयोगी नसते, त्याला परमेश्वराच्या आशीर्वादाची – कृपेची सुद्धा जोड लागते. त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा म्हणजे ही फुणफुण सुद्धा निघून जाईल!


उत्तर लिहिले · 6/2/2023
कर्म · 53750
0

नमस्कार! संत एकनाथांचे 'विंचू चावला' हे भारुड एक लोकप्रिय रचना आहे आणि ती शाळेतील कार्यक्रमासाठी निवडल्याबद्दल अभिनंदन. या भारुडाचे स्पष्टीकरण सादर करण्यासाठी, आपण खालीलप्रमाणे तयारी करू शकता:

1. भारुडाची निवड आणि तयारी:
  • भारुड मिळवा: 'विंचू चावला' हे भारुड आपल्याला इंटरनेटवर सहज उपलब्ध होईल. ते डाउनलोड करा किंवा त्याची प्रिंट काढा.
  • अर्थ समजून घ्या: भारुड वाचून त्याचा शब्दशः अर्थ आणि त्यातील आध्यात्मिक अर्थ समजून घ्या.
2. भारुडाचे स्पष्टीकरण:

विंचू चावला - भारुडाचा अर्थ आणि स्पष्टीकरण:

ओळी:

विंचू चावला, विंचू चावला ।
सर्वांगाला Feuer Feuer झाला ॥

अर्थ:

या भारुडात, 'विंचू' हा वासना, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंrepresented प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे षड्रिपू माणसाला चावतात, तेव्हा तो दु:खी होतो आणि त्याला त्रास होतो. 'सर्वांगाला Feuer Feuer झाला' म्हणजे त्याला असह्य वेदना होतात.

ओळी:

तयावर औषध काही चालेना ।
भूक लागेना, तहान लागेना ॥

अर्थ:

जेव्हा माणसाला षड्रिपूंचा विंचू चावतो, तेव्हा त्यावर कोणतीही भौतिक औषधे काम करत नाहीत. त्याला भूक आणि तहान लागत नाही, म्हणजे तो सांसारिक गोष्टींपासून दूर जातो.

ओळी:

prognose सांगेना वैद्य आकुणा ।
antrag झाला त्याला जाईना ॥

अर्थ:

वैद्य (डॉक्टर) देखील यावर काही उपाय करू शकत नाही, कारण हा रोग आध्यात्मिक आहे. मनुष्य हतबल होतो.

ओळी:

ottoman नामा म्हणे गुरुचरणी धरा ।
तेणे विंचू उतरे झरझरा ॥

अर्थ:

एकनाथ महाराज म्हणतात की या विंचवाच्या विषावर एकच उपाय आहे - गुरुचरणी लीन व्हा. गुरुचरणी लीन झाल्यावर हे षड्रिपू हळूहळू उतरतात आणि मनुष्य शांत होतो.

3. सादरीकरण कसे करावे:
  • परिचय: कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत एकनाथांविषयी थोडक्यात माहिती द्या.
  • भारुडाचे गायन: भारुड गाऊन सादर करा. आपण ते समूहगीत म्हणून किंवा एकट्याने गाऊ शकता.
  • स्पष्टीकरण: प्रत्येक ओळीचा अर्थ सोप्या भाषेत सांगा. जीवनातील षड्रिपूंचे महत्त्व आणि त्यावर मात कशी करावी हे स्पष्ट करा.
  • उदाहरणे: रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन भारुडाचा अर्थ अधिक स्पष्ट करा.
  • निष्कर्ष: भारुडाचा सार सांगा आणि श्रोत्यांना त्यातून काय शिकायला मिळाले हे सांगा.
4. सादरीकरणाची तयारी:
  • सराव: भारुडाचे गायन आणि स्पष्टीकरण याचा चांगला सराव करा.
  • वेशभूषा: पारंपरिक वेशभूषा करा, जसे की धोतर, कुर्ता आणि टोपी.
  • संगीत: आपण भारुडासाठी पारंपरिक वाद्यांचा उपयोग करू शकता, जसे की तबला, पेटी आणि वीणा.
5. महत्वाचे मुद्दे:
  • आपली भाषा सोपी आणि स्पष्ट ठेवा.
  • श्रोत्यांशी संवाद साधा.
  • आत्मविश्वासाने सादरीकरण करा.

या पद्धतीने तयारी करून, आपण 'विंचू चावला' हे भारुड शाळेतील कार्यक्रमात प्रभावीपणे सादर करू शकता.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5280

Related Questions

भारुडाची रचना सांगा?
भारुड म्हणजे काय?