धार्मिक प्रथा धर्म

शास्त्रानुसार स्त्रिया अग्नी का देत नाहीत?

2 उत्तरे
2 answers

शास्त्रानुसार स्त्रिया अग्नी का देत नाहीत?

1


शास्त्रानुसार स्त्रिया अग्नी का देत नाहीत 


कोणी व्यक्ती वारल्यानंतर घरातील पुरुष व्यक्तीच मृत व्यक्तीला अग्नी देताना आपण पाहतो. हिंदू पुराणात स्त्रियांना अग्नी देऊ नये असे म्हंटले आहे. पण असं का, हे जाणून घेऊया आजच्या लेखात!





१. हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांचे हृदय नाजूक असते. स्त्रिया मुळात खूप भावनिक असतात. असे म्हणतात की, अग्नी देताना रडल्यास मृत शरीराच्या आत्म्याला शांती मिळत नाही. स्त्रिया इतके दुःख सहन करू शकत नाहीत. त्यामुळे एखादी स्त्री तिथे थांबली तर ती रडणारच असे शास्त्रात गृहीत धरून स्त्रियांनी अग्नी देऊ नये असे सांगितले गेले.
२. हिंदू धर्मात जी व्यक्ती अग्नी देते त्या व्यक्तीला टक्कल करावे लागते. पण शास्त्रानुसार महिलांना केस कापून टक्कल करायची अनुमती नाही.
३. शास्त्रानुसार अग्नी हा २७ प्रकारचा असतो. गरुड पुराणानुसार स्मशानातील अग्नी हा चांगला नसते. स्मशान घाटात कोणतेही पवित्र किंवा मंगल कार्य होत नाही. घरातील एखादी व्यक्ती जेव्हा अंत्यसंस्कार करून घरी येतात तेव्हा त्यांना आधी पाय धुवावे लागतात, अंघोळ करावी लागते. स्नान होई पर्यंत घरातील कोणत्याही वस्तूला शिवण्यास मनाई असते. अंगावर असलेले कपडे काढून ठेवले जातात आणि अंघोळ करून मगच घरात प्रवेश होतो. पुरुषांना पाणी देणे, योग्य निगा राखणे हे कार्य स्त्रिया चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे महिलेचे घरी असणे आवश्यक आहे.
४. असे म्हणतात की, स्मशान भूमी मधे भूत, प्रेत, आत्मा यांचा वास असतो आणि आत्मा या स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात आणि त्यांच्या शक्तीचा लवकर प्रभाव टाकतात म्हणून स्त्रियांना स्मशान भूमीत न जाऊ देता त्यांना अग्नी पण देऊ दिला जात नाही.
५. स्त्रियांमध्ये प्रजननाची क्षमता असते. स्त्रिया या सृजनशक्तीचे प्रतीक आहेत. स्मशानात नकारात्मक स्पंदने कार्यरत असतात. त्यामुळे त्या नकारात्मक लहरींचा त्यांच्या सृजनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना काही ठराविक मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. त्या मंत्रांचा उच्चार केल्यामुळे तिच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी मंत्रपठण करू नये, असे सांगितले आहे.
- आजकाल स्त्री पुरुष समानता, स्त्रियांनी अग्नी का देऊ नये असे प्रश्न उपस्थित केले जातात. जर एखादी पुत्र नसलेली व्यक्ती मृत झाली असेल, तर त्याच्या कुळातील कोणीही पुरुष अंत्यसंस्कार करू शकतो. स्त्रियांना अंत्यसंस्काराचा अधिकार नाही, मात्र त्यालाही काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध यामुळे पूर्ण कुळच नष्ट झाले असेल किंवा कुळातील पुरुष व्यक्ती दूरदेशी असेल, तर पत्नी किंवा इतर लोकांना अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे.
जेव्हा धर्माबाबत चर्चा होते तेव्हा त्यात मुख्यतः दोन गट पडतात. एक जे धर्माने सांगितलेल्या गोष्टी काळाच्या कसोटीवर तासून पाहतात आणि जे योग्य आहे ते स्विकारतात आणि दुसरे जे पुर्वपरंपरागत चालत आलेल्या रूढी-परंपरा पूर्ण निष्ठेने सांभाळतात. या लेखातून केवळ अशा प्रथांची सुरुवात कशी झाली असावी किंवा शास्त्रामध्ये त्याचे काय स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे, याबाबत माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे. कृपया कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्याचे समर्थन करण्याचा आमचा मानस नाही, हे लक्षात घ्यावे. 
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 53710
0
शास्त्रानुसार स्त्रिया अग्नी का देत नाहीत, याबद्दल अनेक कारणे दिली जातात, त्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
  • शारीरिक आणि भावनिक भिन्नता: स्त्रिया पुरुषांपेक्षा शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या वेगळ्या असतात. स्त्रिया अधिक हळव्या आणि भावनिक असतात आणि त्यामुळे त्यांना अग्नी देण्याची प्रक्रिया अधिक त्रासदायक वाटू शकते.
  • गर्भधारणेची क्षमता: स्त्रिया गर्भाला जन्म देऊ शकतात, त्यामुळे त्या सृजनाचे प्रतीक मानल्या जातात. अग्नी देणे हे विनाशाचे प्रतीक आहे, आणि त्यामुळे सृजनाचे प्रतीक असलेल्या स्त्रीला विनाशाच्या प्रक्रियेशी जोडणे योग्य नाही, असे मानले जाते.
  • कौटुंबिक जबाबदाऱ्या: स्त्रिया कुटुंबाचा आधार असतात आणि त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. अग्नी देण्याच्या विधीमध्ये बराच वेळ आणि ऊर्जा खर्च होते, आणि त्यामुळे स्त्रियांच्या इतर जबाबदाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो.
  • सामाजिक नियम: काही समाजांमध्ये, स्त्रियांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे, त्यांना अग्नी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
याव्यतिरिक्त, काही लोकांचे असेही मत आहे की स्त्रिया मृतात्म्याला शांती देऊ शकतात, त्यामुळे त्यांना अग्नी देण्याची गरज नाही. टीप: ही माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतेवर आधारित आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

श्रावण मध्ये केस कापले तर चालते का?
विठ्ठलाला बुक्का का लावतात?
जेवायला बसताना ताटाभोवती पाणी का फिरवले जाते?
सौंदळ देवक आणि पाच पालवी देवक एकच आहे का?
कोरडी भिक्षा मागण्याचा वार कोणता होता?
मयत स्मशानात नेताना तिरडीवर तांब्या उलटा ठेवला जातो, आणि गुढी पाडव्याला गुढीवरील तांब्या सुद्धा उलटाच असतो, या दोन्हीमधील साम्य काय आहे?
कार्तिक नवमी (कार्तिकी नवमी) भाजून या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती मिळेल का?