
धार्मिक प्रथा
0
Answer link
विठ्ठलाला बुक्का का लावतात
महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणजे पांडुरंग. पंढरीत तो विठ्ठल हा सदा भक्तांच्या गोतावळ्यात रमलेला आहे. त्यांच्या ओढीने भक्त पंढरीला जातात. विठोबाला भेटायला जाताना वारकरी अबीर-बुक्का आणि तुळशीमाळा भेट म्हणून देतात. बाकी या देवाला कशाची अपेक्षा नसते. विठोबाचं आणि वारकऱ्यांचं नातं वर्षानुवर्षे असेच सुरु आहे. तुम्ही पाहिलं असेल वारकरी कायम कपाळाला बुक्का लावतात. विठोबाला भेटायला जातांना त्याच्यासाठी खास बुक्का घेऊन जातात. विठोबाच्या अभंगात सुद्धा बुक्का असतोच.
माझ्या इठूला नका म्हनूसा काळा काळा।
माझा तो सबजाचा ढाळा।
पंढरीचा बुक्का लागला माझ्या मुखा।
सावळा पांडुरंग मला भेटून गेला सखा।।
किंवा
कपाळी बुक्का टिळा,विठ्ठल माझा भोळा
सकळ वारकऱ्यांच्या कळा सोशीत असे
असा हा बुक्का म्हणजे काय? तो का लावतात? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. बुक्का पांढरा आणि काळा अशा दोन्ही रंगांत सापडतो. पांढरा बुक्का जैन आणि बंगाली लोकांत वापरतात. महाराष्ट्रात काळा बुक्का वापरतात. चंदन, नागरमोथा, बकुळीची फुलं, वाळा, दवणा, मरवा अशा सुगंधी पदार्थांची वाळवून वस्त्रगाळ पूड करून ती कोळशाच्या पुडीत एकत्र करून काळा बुक्का बनवतात. पांढर्या बुक्क्यासाठी कापराची वस्त्रगाळ पूड वापरतात आणि चंदन, वाळा, देवदार, लवंग, वेलची अशा पदार्थांचा वापर करतात. अनेक नैमित्तिक पूजेत बुक्का वापरला जातो. बहुधा फक्त वैष्णवांत बुक्का वापरतात. त्यामुळे विठ्ठलाचे भक्त बुक्का वापरतात. यात्रेवरून प्रसाद म्हणूनही वारकरी बुक्का घेऊन येतात.
तुम्ही पाहिलं असेल विठ्ठलाला बुक्का लावला जातो. त्याला कधी कुंकू लावलं जात नाही. कारण कुंकू हे प्रत्यक्ष कार्यरत आदिशक्तीचे प्रतीक आहे. तर विठ्ठल हे शिवाच्या वैराग्यभावाचे, म्हणजेच साक्षीभावाचे प्रतीक असल्याने त्याला बुक्का लावला जातो. विठ्ठल हा प्रत्यक्ष कार्यस्वरूप नसून तो कर्मस्वरूपी आहे. सगुणाच्या साहाय्याने निर्गुणाची कास धरून ध्येयाप्रती स्थिरतेत एकत्व साधत असतो. मायेतील आसक्ती त्यागून वैराग्यभावात, म्हणजेच निर्गुणात रमणारा जीवच या पदाला पोहोचू शकतो. बुक्का लावल्याने श्री विठ्ठलाच्या मूर्तीत आज्ञाचक्राच्या ठिकाणी सुप्त असणाऱ्या साक्षी भावात्मकरूपी वैराग्यलहरी कार्यरत होतात.
अबीर गुलालं उधळीत रंग
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग
तुम्ही हे नक्की ऐकलं असेल यातील अबीर म्हणजे बुक्का असा अर्थ आहे. हा पांढरा बुक्का असून त्याला अबीर असे म्हणतात. तुम्ही हिंदी शब्दकोशात पाहिले, तर अबीर म्हणजे अभ्रकाचे चकचकीत चुर्ण असा अर्थ आहे. यात लाल रंग मिसळून होळीत त्याचा वापर करतात. अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशात अबीर म्हणजे चंदन, तुळस, कापूर यांचे सुगंधी चूर्ण असा अर्थ आहे. बुक्का हा तुळशीपासून तयार होतो. तुळशीच्या काड्या जाळून त्याची वस्त्रगाळ तयार करायची. ती गाळून त्यात कापूर मिश्रित करून तयार होणारी भुकटी म्हणजे अबीर असे काहीजण म्हणतात. वारकरी संप्रदायाची खूण म्हणजे गळ्यात माळ आणि कपाळाला बुक्का अशी आहे. वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का. पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो. प्रत्येक वारकर्याच्या कपाळावर बुक्का असतो. डोक्यावर तुळशीवृंदावन घेवून विठ्ठलाच्या भेटीला जाणाऱ्या वारकरी महिला तुम्ही पाहिल्या असतील. त्यासुद्धा कपाळी बुक्का लावतात. गावाकडे वयोवृद्ध किंवा ज्यांच्या पती स्वर्गवासी झाले आहेत त्या महिला डोक्याला बुक्का लावतात.
विठ्ठलाची मूर्ती तुम्ही पाहिली, तर ती काळ्या रंगाची आहे. म्हणून तर 'देव माझा विठू सावळा' असे म्हणतात. त्याला भेटायला येणारा वारकरी म्हणजे मुळचा शेतकरी त्या काळ्या आईची सेवा करणारा, जे उगवतं तेच खाऊ घालणारा आणि खाणारा. आता विठ्ठलही काळा आणि तो बुक्का ही काळ्या रंगाचा असाही एक अर्थ होऊ शकतो. बुक्का वारकऱ्यांना पटकन उपलब्ध होतो म्हणूनही तो विठ्ठलाला प्रिय असावा.
अती प्रिय आवडे तुळसी बुक्का | तैसीच प्रिती करी भोळ्या भाविका ||
नामा पद पंकज पादुका || शिरी मस्तकी वंदीतसे ||
1
Answer link
शास्त्रानुसार स्त्रिया अग्नी का देत नाहीत
कोणी व्यक्ती वारल्यानंतर घरातील पुरुष व्यक्तीच मृत व्यक्तीला अग्नी देताना आपण पाहतो. हिंदू पुराणात स्त्रियांना अग्नी देऊ नये असे म्हंटले आहे. पण असं का, हे जाणून घेऊया आजच्या लेखात!

१. हिंदू धर्म शास्त्रानुसार स्त्रियांचे हृदय नाजूक असते. स्त्रिया मुळात खूप भावनिक असतात. असे म्हणतात की, अग्नी देताना रडल्यास मृत शरीराच्या आत्म्याला शांती मिळत नाही. स्त्रिया इतके दुःख सहन करू शकत नाहीत. त्यामुळे एखादी स्त्री तिथे थांबली तर ती रडणारच असे शास्त्रात गृहीत धरून स्त्रियांनी अग्नी देऊ नये असे सांगितले गेले.
२. हिंदू धर्मात जी व्यक्ती अग्नी देते त्या व्यक्तीला टक्कल करावे लागते. पण शास्त्रानुसार महिलांना केस कापून टक्कल करायची अनुमती नाही.
३. शास्त्रानुसार अग्नी हा २७ प्रकारचा असतो. गरुड पुराणानुसार स्मशानातील अग्नी हा चांगला नसते. स्मशान घाटात कोणतेही पवित्र किंवा मंगल कार्य होत नाही. घरातील एखादी व्यक्ती जेव्हा अंत्यसंस्कार करून घरी येतात तेव्हा त्यांना आधी पाय धुवावे लागतात, अंघोळ करावी लागते. स्नान होई पर्यंत घरातील कोणत्याही वस्तूला शिवण्यास मनाई असते. अंगावर असलेले कपडे काढून ठेवले जातात आणि अंघोळ करून मगच घरात प्रवेश होतो. पुरुषांना पाणी देणे, योग्य निगा राखणे हे कार्य स्त्रिया चांगल्या प्रकारे करू शकतात. त्यामुळे महिलेचे घरी असणे आवश्यक आहे.
४. असे म्हणतात की, स्मशान भूमी मधे भूत, प्रेत, आत्मा यांचा वास असतो आणि आत्मा या स्त्रियांकडे जास्त आकर्षित होतात आणि त्यांच्या शक्तीचा लवकर प्रभाव टाकतात म्हणून स्त्रियांना स्मशान भूमीत न जाऊ देता त्यांना अग्नी पण देऊ दिला जात नाही.
५. स्त्रियांमध्ये प्रजननाची क्षमता असते. स्त्रिया या सृजनशक्तीचे प्रतीक आहेत. स्मशानात नकारात्मक स्पंदने कार्यरत असतात. त्यामुळे त्या नकारात्मक लहरींचा त्यांच्या सृजनशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना काही ठराविक मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही. त्या मंत्रांचा उच्चार केल्यामुळे तिच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे त्यांनी मंत्रपठण करू नये, असे सांगितले आहे.
- आजकाल स्त्री पुरुष समानता, स्त्रियांनी अग्नी का देऊ नये असे प्रश्न उपस्थित केले जातात. जर एखादी पुत्र नसलेली व्यक्ती मृत झाली असेल, तर त्याच्या कुळातील कोणीही पुरुष अंत्यसंस्कार करू शकतो. स्त्रियांना अंत्यसंस्काराचा अधिकार नाही, मात्र त्यालाही काही अपवाद आहेत. उदाहरणार्थ नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध यामुळे पूर्ण कुळच नष्ट झाले असेल किंवा कुळातील पुरुष व्यक्ती दूरदेशी असेल, तर पत्नी किंवा इतर लोकांना अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार शास्त्राने दिला आहे.
जेव्हा धर्माबाबत चर्चा होते तेव्हा त्यात मुख्यतः दोन गट पडतात. एक जे धर्माने सांगितलेल्या गोष्टी काळाच्या कसोटीवर तासून पाहतात आणि जे योग्य आहे ते स्विकारतात आणि दुसरे जे पुर्वपरंपरागत चालत आलेल्या रूढी-परंपरा पूर्ण निष्ठेने सांभाळतात. या लेखातून केवळ अशा प्रथांची सुरुवात कशी झाली असावी किंवा शास्त्रामध्ये त्याचे काय स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे, याबाबत माहिती देण्याचा आमचा उद्देश आहे. कृपया कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्याचे समर्थन करण्याचा आमचा मानस नाही, हे लक्षात घ्यावे.
0
Answer link
जेवायला बसताना ताटाभोवती पाणी का फिरवले जाते

जेवतांना नेहमी ताटाभोवती पाणी फिरवायचे आणि ‘जय हरी विठ्ठल’ म्हणायचे. आपल्या पूर्वजांनी आपल्यावर किती छान संस्कार केलेत. आपले जीवन निरोगी राहावे यासाठी अशा पध्दतीचा खजिनाच आपल्या पूर्वजांनी आपल्याला बहाल केलाय. आज मी त्या विषयीच तुम्हाला सांगणार आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अन्नाला नमस्कार करून मंत्रोच्चारण केलं जायचं. आता सुद्धा गावाकडील लोक “वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" हा श्लोक म्हणतात. ह्या श्लोकात अन्नाला पूर्णब्रम्ह म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीत आपण अन्नाभोवती पाणी शिंपडतो म्हणजेच ते अन्न देवाला अर्पण करतो. अन्न दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो. अन्नाचा आदर करणे हे आपल्या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
आपण जेवण करण्यापूर्वी कृष्णाला अर्पण म्हणतो. देवाला नैवेद्य दाखवतो. अन्नाचा काही भाग देवासाठी बाजूला काढून ठेवतो. उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते मानेमागून हात फिरवून आपल्या पूर्ण शरीराभोवती पाण्याचे थेंब टाकतो. याचा अर्थ असाही होतो, हे परमेश्वरा ही पोळी, भात, वरण, भाजी तू ग्रहण कर. हे सर्व काही तुझंच आहे.
, जुन्या काळी लोक जमिनीवर बसून केळीच्या पानावर जेवायचे. त्यामुळे जवळून कोणी व्यक्ती गेली तर किंवा माती कोरडी असेल, तर धुळीचे कण ताटात उडण्याची शक्यता असायची. त्यामुळे हे कण उडू नयेत म्हणून पाणी टाकून तेवढा भाग ओला केलं जायचा. तसेच, जुन्या काळी रात्रीच्या वेळी वीज नसायची. त्यामुळे अंधारात जेवताना ताटामध्ये कोणताही कीटक दिसणे कठीण होते. त्यामुळे लहान लहान कीटकांना रोखण्यासाठी हा पाणी शिंपडणे हा चांगला उपाय होता.
इतर काही सिद्धांत सांगतात, की आपल्या भारतीय अन्नामध्ये भरपूर पित्तयुक्त आणि मसाल्याचे पदार्थ असतात. पाणी शिंपडणे ही पद्धत पित्तशामक म्हणून वापरली जात असे. दुसरा सिद्धांत असा आहे, की दक्षिण भारतामधील अन्नामध्ये तांदूळ, स्टार्चचे प्रमाण खूप असते. त्यामुळे पाणी शिंपडल्यामुळे स्टार्च चे प्रमाण कमी होऊन अन्न पचन होण्यास मदत होते. पोटाचे विकार होत नाहीत.
आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धती विकसित केल्या त्यामागे आयुर्वेद, विज्ञान, अध्यात्म या सर्वांची मुळे आपल्याला दिसतात. जमिनीवर बसून जेवाव कारण यामागे त्यांचा उद्देश असायचा, की पाठीचा कणा हा नेहमी ताठ राहतो.
शास्त्रामध्ये अन्न हे पूजनीय मानले गेले आहे. अन्न घेण्यापूर्वी आपण अन्नपूर्णा देवीचे आभार मानले, तर ती आपल्याला नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा देते आणि अन्नामुळे होणाऱ्या अनेक विकारांपासूनही आपले रक्षण करते. अशाप्रकारे मंत्र शास्त्रानुसार अन्न खूप महत्त्वाचे आहे आणि जेवण्यापूर्वी तुम्ही देवाचे स्मरण केले पाहिजे, असे केल्याने तुम्हाला अन्नातून अधिक ऊर्जा मिळेल.
0
Answer link
सौंदळ देवक आणि पाच पालवी देवक हे एकच नाहीत. दोघांमध्ये काही फरक आहेत:
सौंदळ देवक:
- सौंदळ देवकात आंब्याच्या पानांचा वापर केला जातो.
- यात पानांची संख्या निश्चित नसते.
पाच पालवी देवक:
- पाच पालवी देवकात पाच वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पाने वापरली जातात.
- आंबा, जांभूळ, चिंच, पिंपळ आणि वड यांसारख्या झाडांच्या पानांचा समावेश असतो.
त्यामुळे, नावाप्रमाणेच, पाच पालवी देवकात पाच प्रकारची पाने वापरली जातात, तर सौंदळ देवकात मुख्यतः आंब्याची पाने वापरली जातात.
0
Answer link
तुमच्या प्रश्नाचा अर्थ मला पूर्णपणे समजला नाही. "कोरडी भिक्षा" म्हणजे काय आणि तुम्ही कोणत्या "वारा"बद्दल विचारत आहात, हे कृपया स्पष्ट करा.
या माहितीच्या आधारावर मी तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकेन.
0
Answer link
मृत व्यक्तीला स्मशानात नेताना तिरडीवर तांब्या उलटा ठेवण्यामागे आणि गुढी पाडव्याला गुढीवरील तांब्या उलटा ठेवण्यामागे काही साम्ये आणि काही विशिष्ट कारणे आहेत.
साम्य:
तिरडीवर तांब्या उलटा ठेवण्याचे कारण:
गुढी पाडव्याला गुढीवरील तांब्या उलटा ठेवण्याचे कारण:
दोन्ही प्रथांमध्ये तांब्या उलटा ठेवण्यामागे प्रतीकात्मक अर्थ आहेत, जे जीवन आणि मृत्यूच्या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहेत.
- उलटा तांब्या: दोन्ही ठिकाणी तांब्याची जागा उलटी असते.
- वैराग्य: मृत्यूनंतर माणूस भौतिक जगातून निघून जातो, त्यामुळे वैराग्य दर्शवण्यासाठी तांब्या उलटा ठेवतात.
- संबंध तोडणे: आत्मा जगातून मुक्त होतो, त्याचे earthly नातं संपले हे दर्शवण्यासाठी तांब्या उलटा ठेवतात.
- पाण्याची गरज नाही: मृत्यूनंतर देहाला पाण्याची गरज नसते, त्यामुळे तांब्या रिकामा व उलटा ठेवला जातो.
- नवीन सुरुवात: गुढी पाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात आहे, आणि उलटा तांब्या नवीन सुरुवात दर्शवतो.
- समೃದ್ಧी: तांब्या हे समृद्धीचे प्रतीक आहे, आणि तो उलटा ठेवणे म्हणजे समृद्धीची अपेक्षा करणे.
- नकारात्मकता दूर करणे: उलटा तांब्या नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतो आणि सकारात्मकता आकर्षित करतो.