2 उत्तरे
2
answers
जेवायला बसताना ताटाभोवती पाणी का फिरवले जाते?
0
Answer link
जेवायला बसताना ताटाभोवती पाणी का फिरवले जाते

जेवतांना नेहमी ताटाभोवती पाणी फिरवायचे आणि ‘जय हरी विठ्ठल’ म्हणायचे. आपल्या पूर्वजांनी आपल्यावर किती छान संस्कार केलेत. आपले जीवन निरोगी राहावे यासाठी अशा पध्दतीचा खजिनाच आपल्या पूर्वजांनी आपल्याला बहाल केलाय. आज मी त्या विषयीच तुम्हाला सांगणार आहे.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अन्नाला नमस्कार करून मंत्रोच्चारण केलं जायचं. आता सुद्धा गावाकडील लोक “वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे" हा श्लोक म्हणतात. ह्या श्लोकात अन्नाला पूर्णब्रम्ह म्हटलं आहे. आपल्या संस्कृतीत आपण अन्नाभोवती पाणी शिंपडतो म्हणजेच ते अन्न देवाला अर्पण करतो. अन्न दिल्याबद्दल देवाचे आभार मानतो. अन्नाचा आदर करणे हे आपल्या संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
आपण जेवण करण्यापूर्वी कृष्णाला अर्पण म्हणतो. देवाला नैवेद्य दाखवतो. अन्नाचा काही भाग देवासाठी बाजूला काढून ठेवतो. उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ते मानेमागून हात फिरवून आपल्या पूर्ण शरीराभोवती पाण्याचे थेंब टाकतो. याचा अर्थ असाही होतो, हे परमेश्वरा ही पोळी, भात, वरण, भाजी तू ग्रहण कर. हे सर्व काही तुझंच आहे.
, जुन्या काळी लोक जमिनीवर बसून केळीच्या पानावर जेवायचे. त्यामुळे जवळून कोणी व्यक्ती गेली तर किंवा माती कोरडी असेल, तर धुळीचे कण ताटात उडण्याची शक्यता असायची. त्यामुळे हे कण उडू नयेत म्हणून पाणी टाकून तेवढा भाग ओला केलं जायचा. तसेच, जुन्या काळी रात्रीच्या वेळी वीज नसायची. त्यामुळे अंधारात जेवताना ताटामध्ये कोणताही कीटक दिसणे कठीण होते. त्यामुळे लहान लहान कीटकांना रोखण्यासाठी हा पाणी शिंपडणे हा चांगला उपाय होता.
इतर काही सिद्धांत सांगतात, की आपल्या भारतीय अन्नामध्ये भरपूर पित्तयुक्त आणि मसाल्याचे पदार्थ असतात. पाणी शिंपडणे ही पद्धत पित्तशामक म्हणून वापरली जात असे. दुसरा सिद्धांत असा आहे, की दक्षिण भारतामधील अन्नामध्ये तांदूळ, स्टार्चचे प्रमाण खूप असते. त्यामुळे पाणी शिंपडल्यामुळे स्टार्च चे प्रमाण कमी होऊन अन्न पचन होण्यास मदत होते. पोटाचे विकार होत नाहीत.
आपल्या पूर्वजांनी ज्या पद्धती विकसित केल्या त्यामागे आयुर्वेद, विज्ञान, अध्यात्म या सर्वांची मुळे आपल्याला दिसतात. जमिनीवर बसून जेवाव कारण यामागे त्यांचा उद्देश असायचा, की पाठीचा कणा हा नेहमी ताठ राहतो.
शास्त्रामध्ये अन्न हे पूजनीय मानले गेले आहे. अन्न घेण्यापूर्वी आपण अन्नपूर्णा देवीचे आभार मानले, तर ती आपल्याला नेहमीपेक्षा जास्त ऊर्जा देते आणि अन्नामुळे होणाऱ्या अनेक विकारांपासूनही आपले रक्षण करते. अशाप्रकारे मंत्र शास्त्रानुसार अन्न खूप महत्त्वाचे आहे आणि जेवण्यापूर्वी तुम्ही देवाचे स्मरण केले पाहिजे, असे केल्याने तुम्हाला अन्नातून अधिक ऊर्जा मिळेल.
0
Answer link
जेवण करताना ताटाभोवती पाणी फिरवण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. या परंपरेमागे अनेक कारणं आहेत:
1. शुद्धता आणि पावित्र्य:
- अन्न ग्रहण करण्यापूर्वी, ताट आणि आसपासची जागा शुद्ध असावी, यासाठी पाणी फिरवले जाते.
- पाणी हे शुद्धतेचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी मान्यता आहे.
2. नकारात्मक शक्ती दूर करणे:
- असे मानले जाते की पाण्याने एक वर्तुळ तयार केल्याने नकारात्मक शक्ती ताटाजवळ येत नाही.
- जुन्या काळात जमिनीवर बसून जेवताना किडे किंवा इतर जीवजंतू अन्नाजवळ येऊ नये म्हणून हे पाणी फिरवले जाई.
3. कृतज्ञता व्यक्त करणे:
- अन्नासाठी आणि ते देणाऱ्यांसाठी देवाला धन्यवाद देण्यासाठी ही कृती केली जाते.
- पाणी फिरवून आपण अन्नाचा आदर करतो, असे मानले जाते.
4. वैज्ञानिक कारण:
- पूर्वी जमिनीवर बसून पत्रावळीत जेवण्याची पद्धत होती, त्यामुळे ताटाभोवती पाणी फिरवल्याने पत्रावळी जागेवर स्थिर राहण्यास मदत होते.
टीप: ही माहिती धार्मिक आणि सामाजिक मान्यतेवर आधारित आहे.