2 उत्तरे
2
answers
अन्नभेसळ म्हणजे काय?
3
Answer link
अन्न भेसळ म्हणजे काय ?
भेसळ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे पुढील बाबींना भेसळ म्हणतात. :अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे एखाद्या अन्नपदार्थात कमी प्रतीचा माल मिसळणे. उदा. गोडेतेलात करडईचे तेल मिसळणे, शुध्द तुपात वनस्पती तूप मिसळणे. अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे. उदा. मिठाईत विषारी रंग मिसळणे.मूळ पदार्थाऐवजी बनावट माल वापरणे उदा. केशराच्या ऐवजी मक्याच्या कणसाचे रंगवलेले तुरे वापरणे. चहाच्या ऐवजी लाकडाचा भुसा रंगवून वापरणे. कायद्याने ठरवून दिलेल्या पदार्थांऐवजी दुसराच पदार्थ मिसळणे. उदा. साखर मिसळण्याऐवजी एक दुसराच गोड पदार्थ (सॅकरिन) मिसळणे. एखाद्या अन्नपदार्थात सडलेले, कुजलेले, खराब किंवा किडलेले पदार्थ असणे. एखाद्या पदार्थात विषारी अंश असणे. एखाद्या पदार्थात मर्यादेपेक्षा जास्त अयोग्य रंग मिसळलेला असणे. एखाद्या पदार्थात ते टिकवण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश सापडणे. ठरलेल्या गुणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेचा पदार्थ असणे.
0
Answer link
अन्नभेसळ म्हणजे अन्नाच्या वस्तूंची गुणवत्ता कमी करणे किंवा त्यात भेसळयुक्त पदार्थ मिसळणे होय.
- भेसळयुक्त पदार्थ: हे स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे असू शकतात, ज्यामुळे अन्नाची गुणवत्ता घटते.
- उदाहरण: दुधात पाणी मिसळणे, मसाल्यांमध्ये भेसळ करणे, तेलात स्वस्त तेल मिसळणे.
अन्नभेसळ मानवी आरोग्यासाठी धोकादायक असू शकते, कारण भेसळयुक्त पदार्थांमध्ये विषारी रसायने असू शकतात.
संदर्भ: