3 उत्तरे
3
answers
हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे कोणती होती?
1
Answer link
संस्कृतीच्या ऱ्हासाची मुख्य कारणे म्हणजे भूकंप, महापूर, दुष्काळ हे असावेत. त्याच प्रमाणे परकीय टोळ्यांचे आक्रमण, नदी पात्रातील बदल आणि समुद्रपातळीतील बदल यामुळेही संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा.
नदी पात्रातील कोरडे पणा आणि पात्र बदलामुळे लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले. त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील शहरे उजाड पडली.
त्याचप्रमाणे आर्यांच्या आक्रमणामुळे देखील फरक पडला.
शिवाय हडप्पा संस्कृतीमध्ये नियम व कायद्याची कमतरता असल्यामुळे देखील ऱ्हास झाला.
1
Answer link
हडप्पा संस्कृतीचा विनाश
या संस्कृतीच्या विनाशाची अनेक कारणे सांगितली जातात.
- नैसर्गिक संकटामुळे
- नदीला आलेला पूर/अतिवृष्टी
- भूकंप
- हवामानात होणारा बदल
- जमिनीची सुपिकता घटली
- थर वाळवंट विस्तारल्याने सरस्वती नदी लुप्त होणे
- बाह्य आक्रमणे -
- आर्यांचे आक्रमण
- युयुत्सु लोकांचे आक्रमण
- तंत्रज्ञानावरील मक्तेदारी संपली
- राजकीय विघटनामुळे नाश
- आर्थिक विघटनामुळे नाश
- कायदा व सुव्यवस्था नसावी
संस्कृतीच्या ऱ्हासाची मुख्य कारणे म्हणजे भूकंप, महापूर, दुष्काळ हे असावेत. त्याच प्रमाणे परकीय टोळ्यांचे आक्रमण, नदी पत्रातील बदल आणि समुद्रपातळीतील बदल यामुळेही संस्कृतीचा ऱ्हास झाला असावा. नदी पत्रातील कोरडी आणि पात्र बदला मुळे लोक मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित झाले. त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील शहरे उजाड पडली
हडप्पा संस्कृतीची ऱ्हासाची कारणे
ज्या प्रमाणे हडप्पा संस्कृतीची सुर्वातीबद्दल माहिती उपलब्ध नाही त्याच प्रमाणे तिच्या ऱ्हासाबद्दल कुठेच माहिती उपलब्ध नाही. शास्त्रज्ञांच्या संशोधनाप्रमाणे या संस्कृतीचा शेवट इ. पु. १५०० मध्ये झाला असावा.
नदी पत्रातील कोरडी आणि पात्र बदला मुळे लोक मोठ्याप्रमाणावर स्थलांतरित झाले. त्यामुळे हडप्पा संस्कृतीतील शहरे उजाड पडली.
त्याचप्रमाणे आर्यांचे आक्रमणामुळे देखील फरक पडला.
शिवाय हडप्पा संस्कृती मध्ये नियम व कायदा याची देखील कमतरतेमुळे देखील ऱ्हास झाला.
0
Answer link
हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची अनेक कारणे आहेत, ज्यापैकी काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
1. हवामान बदल:
- पर्जन्याचे प्रमाण घटणे: काही संशोधकांच्या मते, हडप्पा संस्कृतीच्या काळात पर्जन्याचे प्रमाण घटले, ज्यामुळे नद्या सुकल्या आणि शेती करणे कठीण झाले.
- हवामानातील बदल: हवामानातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती वाढल्या, ज्यामुळे जीवनशैली अस्थिर झाली.
2. नैसर्गिक आपत्ती:
- पूर: सिंधू नदीला वारंवार येणाऱ्या पुरांमुळे शहरांचे मोठे नुकसान झाले.
- भूकंप: भूकंपांमुळे इमारती कोसळल्या आणि मोठे बदल झाले.
3. नद्यांचे मार्ग बदलणे:
- सिंधू नदी आणि इतर नद्या: नद्यांनी आपले मार्ग बदलल्यामुळे अनेक वस्त्या पाण्याविना ओस पडल्या, कारण पाणीपुरवठा आणि शेतीसाठी पाणी मिळेनासे झाले.
4. आर्थिक आणि सामाजिक कारणे:
- व्यापारामध्ये घट: इतर संस्कृतींशी असलेला व्यापार कमी झाल्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या.
- सामाजिक अशांतता: लोकांमध्ये सामाजिक तेढ निर्माण झाली, ज्यामुळे शहरांची रचना विस्कळीत झाली.
5. बाह्य आक्रमण:
- आर्य आक्रमण: काही इतिहासकारांच्या मते, आर्य लोकांच्या आक्रमणामुळे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. तथापि, हे मत अजूनही विवादास्पद आहे.
संदर्भ: