राजकारण भारत अर्थशास्त्र इतिहास

कोणत्या वर्षी भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती?

2 उत्तरे
2 answers

कोणत्या वर्षी भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली होती?

1
आणीबाणी (भारत)

आणीबाणी (Emergency) हा भारताच्या इतिहासामधील १९७५−७७ दरम्यानचा २१ महिन्यांचा काळ होता. ह्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद ह्यांनी संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी जारी केली जी २५ जून १९७५ पासून लागू झाली. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या. इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिस इत्यादी अनेक राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबण्यात आले तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली गेली. रा.स्व. संघ व इतर काही संघटनांवर बंदी आणली गेली. पण जनता आणीबाणीच्या विरोधात ठामपणे संघर्षासाठी उभी राहिली. समाजवादी पक्ष्याच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणीबाणी विरोधात तीव्र लढा दिला. या लढ्यात मृणाल गोरे,पन्नालाल सुराणा,प्रभूभाई संघवी, यांनी मोठे योगदान दिले.
         
     पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सल्ल्यावर राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद               यांनी  २५ जून १९७५ रोजी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.

मार्च १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी उठवण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला व जनता पक्षाचे मोरारजी देसाई भारताचे पहिले काँग्रेसेतर पंतप्रधान बनले. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या लोकसभा मतदारसंघात हार पत्करावी लागली.

धन्यवाद...!!
उत्तर लिहिले · 11/8/2022
कर्म · 19610
0

भारतात राष्ट्रीय आणीबाणी १९७५ साली लागू करण्यात आली होती.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्याकडे राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची शिफारस केली, आणि त्यांनी ती मान्य केली.

आणीबाणी २१ महिने (१९७५-१९७७) लागू होती.


उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 2800

Related Questions

राजकारण करते वेळी भाषण शैली?
अरुण गवळीला डॅडी हे नाव कसे पडले?
राजकारणात ओपन जागेवर कोण लढू शकतो?
सरपंचासाठी महत्वाच्या कामासाठी कुठे जाण्याकरिता सरकारकडून काही सोईसुविधा असतात का?
लोकशाही दिनी तक्रार करायची असल्यास किती दिवस आधी अर्ज दाखल करावा?
मराठा आरक्षण का मागत आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक कोण?