पर्यावरण चळवळ इतिहास

चिपको आंदोलनाविषयी थोडक्यात माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

चिपको आंदोलनाविषयी थोडक्यात माहिती मिळेल का?

0
.

चिपको आंदोलन

चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला व तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले. या आंदोलनामुळे शेकडो झाडांची जंगले, हजारो पक्षी, प्राण्यांची निवासस्थाने वाचली.

चिपको आंदोलन 

ठेकेदार झाडं कापायला असंख्य माणसं घेऊन आला की ‘त्या’ झाडाला घट्ट मिठ्या मारून उभ्या राहायच्या आणि ‘पेड कटने नही देंगे’च्या घोषणा द्यायच्या. एप्रिल १९७३ मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली. अलकनंदा खोऱ्यातील जंगलाचा एक भूभाग क्रीडा साहित्य तयार करणाऱ्या एका कंपनीला देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यातून आंदोलन उभे राहिले. ‘दाशैली ग्राम स्वराज्य संघ’ या स्थानिक संस्थेने शेतीची अवजारे तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे याच जंगलात वृक्षतोड करण्याची परवानगी मागितली होती, ती नाकारली गेली होती. त्यामुळे साहजिकच व्यापारी कंपनीला दिलेल्या परवानगीला लोकांनी विरोध केला. त्यातून ‘चिपको’ आंदोलन उभे राहिले. त्यात गौरादेवी, सुदेशादेवी, बचनीदेवी यांसारख्या स्त्रिया हिरिरीने उतरल्या. गौरादेवीने गावागावांत फिरून स्त्रियांना एकत्र आणले आणि जंगलात ‘चिपको’ आंदोलन सुरू केले.

जंगलात तब्बल अडीच हजार झाडांचा लिलाव त्यावेळी करण्यात आला. गावातील आंदोलकांनी विरोध केला, तरीही लिलाव झालाच. ठेकेदारांना लोकांच्या विरोधाची कल्पना होती. त्यांनी कार्यकर्त्यांना लोकांची जुनी देणी देण्याच्या निमित्ताने चामोलीत बोलावून घेतले. त्यांच्या गाफीलपणाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गुपचूप रेनीच्या जंगलात मजूर पाठविले. एका छोट्या झाडांची कत्तल करण्यासाठी आलेल्या मजुरांना पाहिलं आणि धावत गावात ही खबर दिली. पण, गावात फक्त १५-२० स्त्रिया आणि काही छोटी मुले होती. पुरुष मंडळींना निरोप कळवून ते परत येईपर्यंत दोन-तीन दिवस लागणार होते तोपर्यंत जंगलतोड अटळ होती. हे लक्षात येताच गावातील महिला आपल्या मुलांसह जंगलात आल्या. बायकांसह सगळी लहान मुलं झाडाला चिकटून उभी राहिली. ठेकेदारांनी स्त्रियांना विवस्त्र करण्याच्या धमक्या दिल्या. पण, एकीनीही ठेकेदारांच्या धमक्यांना भीक घातली नाही. शेवटी मजूरांनी माघार घेतली. पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारतात झालेलं हे पहिलंच अनोखं आंदोलन होतं. पुढे हे आंदोलन ‘चिपको’ आंदोलन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. दि.२१ मे २०२१ रोजी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोना ने निधन झाले.
 
उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53710
0
चिपको आंदोलन:

चिपको आंदोलन हे एक पर्यावरण संरक्षण आंदोलन होते. या आंदोलनात, गावकऱ्यांनी झाडे तोडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना मिठी मारली होती. हे आंदोलन 1973 मध्ये उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात सुरू झाले. सुंदरलाल बहुगुणा, गौरा देवी, चंडी प्रसाद भट्ट आणि इतर कार्यकर्त्यांनी या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली.

चिपको आंदोलनाची प्रमुख उद्दिष्ट्ये:

  • झाडे तोडण्यापासून वाचवणे.
  • पर्यावरणाचे संरक्षण करणे.
  • गावकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे.

चिपको आंदोलन हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या पर्यावरण आंदोलनांपैकी एक मानले जाते. या आंदोलनाने जगभरातील लोकांना पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरणा दिली.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1200

Related Questions

चिपको आंदोलनाबाबत माहिती द्या?
पर्यावरणविषयक व्यक्तिगत, संस्थात्मक व गटात्मक चळवळींचा थोडक्यात परिचय लिहा.
जंगल सत्याग्रह कुठे झाला?
महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आला?
पर्यावरणाशी संबंधित कोणत्याही पाच वैयक्तिक, संस्थात्मक किंवा सामूहिक हालचालींची माहिती कळवा?
गदर म्हणजे काय?
डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली राबवली गेलेली कोणती मोहीम आहे?